tag:blogger.com,1999:blog-22407899272208554202024-03-14T01:43:43.588-07:00कोहम??k. shripadhttp://www.blogger.com/profile/06682708646050770427noreply@blogger.comBlogger937125tag:blogger.com,1999:blog-2240789927220855420.post-40625095794463538732023-08-14T19:15:00.003-07:002023-08-14T19:15:11.806-07:00प्रयत्न आणि उपाय<p>प्रयत्न आणि उपाय यांच्यात फरक आहे हे आपल्याला कळतं का? बहुतेक नाही कळत. रोज सतत पाहायला, ऐकायला मिळणारं अरण्यरुदन, आक्रोश, आकांडतांडव, अभिनिवेश पाहून तरी तसंच वाटतं. धार्मिक कर्मकांड, विज्ञान तंत्रज्ञान, राज्यघटना, योग, शिक्षण, वैद्यकशास्त्र, संस्कार, गुन्ह्याला सजा, चांगल्या कामाला पुरस्कार, कला, व्यायाम, आहार... कोणतीही गोष्ट घ्या. अन थोडा विचार करून पाहा. `अमुक गोष्टीने अमुक होईल' असे जे जे म्हणून दावे केले जातात ते ते खोटे ठरतात. एखादा उपचार हा उपाय असता तर त्याचे निकाल १०० टक्के लागायला हवेत. ते लागत नाहीत. या जगात आजवर जे जे म्हणून झालं आणि सध्या सुरु आहे, ते सारेच्या सारे प्रयत्न आहेत. ते कधी परिणाम देतात, कधी देत नाहीत. आम्हाला हवे ते, आम्हाला हवे तेवढे, आम्हाला हवे त्या पद्धतीने, आम्हाला हवे तेव्हा परिणाम आले की आम्ही खुश होतो. हा प्रयत्नाचा परिणाम आहे असा दावा करतो आणि एकांगीपणे, अट्टाहासाने त्याला घट्ट धरून ठेवतो. आम्हाला क्षणभर सुद्धा प्रश्न पडत नाही की, मिळालेला परिणाम हा प्रयत्नामुळे मिळाला असेल तर त्याचा अनुभव १०० टक्के का नसतो? असा प्रश्न पडत नाही, पण तो समोर आला की आम्ही कारणे शोधतो. त्यावरून वेगवेगळी मते मांडली जातात. एखादा प्रयत्न असफल का झाला याची कारणमीमांसा करताना एकवाक्यता कधीच राहत नाही. कारण प्रत्येकाला अपयशाची कारणे जरी वेगळी वाटली तरीही प्रत्येकाच्या मनात एक मात्र अगदी शिगोशिग भरलेलं असतं- प्रयत्न हाच उपाय आहे. दु:ख असो, दारिद्र्य असो, वेदना असो, वंचना असो, अभाव असो, आकांक्षा असो, आपल्या कल्पनेतील एखादे चांगले- सुंदर- सुखद- व्यक्तिगत वा सामुहिक चित्र असो; त्यासाठी जे जे करतो वा केलं जातं ते उपाय आहेत ही आमच्या मनातील भावना आम्हाला जाणवतच नाही. परंतु कोणताही विचार, कोणतीही कृती; हे प्रयत्न आहेत, प्रयत्न असतात. एखाद्या गोष्टीला उपाय समजणे याचा अर्थ, अपेक्षित परिणामांची शाश्वती वा खात्री वाटणे, शाश्वती वा खात्री गृहीत धरणे असते. मात्र प्रयत्न समजणे याचा अर्थ, परिणामांचा विचार सोडून देऊन प्रामाणिक प्रेरणेने कृती करणे असा होतो. उपाय समजले की, अपयशाचे दोषारोपण करण्याची चढाओढ सुरु होते. प्रयत्न समजले की, आत्मचिंतन येतं. उपाय समजले की, जबाबदारी ढकलण्याची अहमहमिका सुरु होते. प्रयत्न समजले की, जबाबदारी स्वीकारणे सुरु होते. उपाय समजले की, स्वत:ला excuse मागणे सुरु होते. प्रयत्न समजले की, स्वत: स्वत:ची चिरफाड करणे सुरु होते. उपाय समजणे दुबळे बनवते. प्रयत्न समजणे सशक्त बनवते. उपाय समजणे म्हणजे अहंकार गोंजारणे. प्रयत्न समजणे म्हणजे अहंकार तपासणे. उपाय समजणे म्हणजे स्वत:ला सर्वशक्तिमान समजणे. प्रयत्न समजणे म्हणजे अपूर्णतेचा बोध होणे. `कर्मण्येवाधिकारस्ते, मा फलेषु कदाचन' या कालातीत उपदेशाचे हे मर्म असावे. महाभारताचे युद्ध भगवद्गीतेच्या प्रस्थापनेसाठी होते. आम्हाला मात्र महाभारत युद्धातच रस आहे. अजूनही. कौरव किंवा पांडवांच्या बाजूला उभे राहण्यातच आम्हाला धन्यता वाटते. आम्हाला भगवद्गीता हवी आहे का?</p><p>आजच्या घटकेला सुरु असलेल्या एकूण एक चर्चा पाहून हा प्रश्न मनात उभा राहिला. स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देताना आपणापुढे ठेवतो.</p><p>- श्रीपाद कोठे</p><p>नागपूर</p><p>मंगळवार, १५ ऑगस्ट २०१७</p>k. shripadhttp://www.blogger.com/profile/06682708646050770427noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2240789927220855420.post-70634676679847430432023-08-14T19:11:00.003-07:002023-08-14T19:11:10.617-07:00अमृतयोग<p>पंतप्रधानांनी आजच्या भाषणात २०४७ पर्यंत विकसित देश होण्याचा संकल्प जाहीर केला. हे छान झालं. अमृत महोत्सवाच्या उत्सवातून आपल्याला बाहेर पडायचं आहे हे त्यातून स्पष्ट व्हावं. या संकल्पासाठी काय करावं लागेल यावरही ते बोलले. मला तीन गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या. १) आत्मनिर्भर भारत. २) घराणेशाहीतून मुक्ती. ३) भ्रष्टाचारातून मुक्ती. या संदर्भात काही सूचना, काही विचार.</p><p>घराणेशाहीतून मुक्ती म्हटल्याबरोबर गांधी परिवार हे सगळ्यांच्या मनात येतं. पण हे तेवढ्यापुरतं असू नये. शिक्षण, उद्योग इत्यादी क्षेत्रातही घराणेशाही खूप आहे. ही घराणेशाहीसुद्धा असू नये. 'औद्योगिक घराणी' यांची जागा 'प्रत्येक घराण्याचा (परिवाराचा) उद्योग' याने घ्यावी. याचाच विस्तार करायचा तर - देशाचे एक रिलायन्स, देशाचे एक अमूल, देशाचे एक पतंजली, देशाचे एक लिज्जत... ... ... असे न राहता; जिल्ह्याचे रिलायन्स, जिल्ह्याचे अमूल, जिल्ह्याचे पतंजली, जिल्ह्याचे लिज्जत... असे असावे. पाणी, दूध, धान्य, तेल, स्वच्छता, पापड, लोणची, शेवया, शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, पोलीस, कपडे, पादत्राणे, खते, बांधकाम; अशा असंख्य गोष्टीत प्रत्येक जिल्हा स्वयंपूर्ण व्हावा. वास्तविक न्यायव्यवस्थेत देखील काही विषयांसाठी जिल्हा हीच अंतिम सीमा ठरवायला हवी. जिल्हा स्तरावर होऊ शकणारी उत्पादने, त्यांचे वितरण, सेवा यासाठी जिल्हा स्तरापेक्षा मोठ्या कंपन्या, प्रतिष्ठाने असू नयेत. यासाठी जसा समाजाने पुढाकार घेतला पाहिजे; तसेच नियम, कायदे इत्यादीसाठी शासनाने देखील आपला वाटा उचलायला हवा. </p><p>समाजाने जसे सुरुवातीला काही अडचणी सोसण्याची तयारी ठेवावी, तसेच शासनाने देखील सुरुवातीला नाराजी सहन करण्याची तयारी ठेवावी. शेकडो गोष्टी अशा आहेत ज्यासाठी मोठ्या आस्थापनांची गरज नाही. त्यासाठी विद्यमान तंत्रज्ञान पुरेसे आहे. नवीनच तंत्रज्ञान असले पाहिजे हा स्वप्नाळूपणा सोडावा लागेल. तंत्रज्ञान ही सतत बदलणारी, विकसित होणारी गोष्ट आहे. त्यामुळे त्याच्यामागे धावण्यापेक्षा उपलब्ध तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून चांगले जीवन उभे करणे महत्त्वाचे. केवळ जगात याच्याकडे अमुक तंत्रज्ञान आहे, त्याच्याकडे तमुक तंत्रज्ञान आहे; असे करत धावाधाव करण्यात अर्थ नाही. मागासलेले अन पुढारलेले हे डोक्यातून काढून टाकले पाहिजे. जीवन महत्त्वाचे आहे तंत्रज्ञान नाही. पुढारलेले, मागासलेले, आधुनिक इत्यादी संदर्भात आपली मानसिकता सुदृढ असायला हवी विकृत नको.</p><p>खरं तर एकूणच मानसिकता योग्य वळणावर यायला हवी आहे. उदा. खाद्यतेल. खाद्यतेल काढणारे छोटे उद्योजक आजही आहेत. त्यांची संख्या वाढूही शकेल. पण तेल काढण्यासाठी तेलबिया उपलब्ध असायला हव्यात. त्यासाठी शेती नीट व्हायला हवी. आज त्याची मानसिकता नाही. ही मानसिकता नसण्याची पुष्कळ कारणे आहेत. त्यातील एक कारण आहे अवास्तव स्वप्ने. आपल्याला समाज म्हणून स्वप्नेही योग्य, व्यावहारिक व मानवीय पाहावी लागतील. अवास्तव स्वप्नांमुळे तरुण मोठ्या प्रमाणात निष्क्रिय राहतात हे वास्तव ध्यानात घ्यायला हवे. जसे राज्य वा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा. सरकारी नोकरी म्हणजे सुखाचे आणि निश्चिन्त आयुष्य असा समज. त्यामुळे त्यासाठी आटापिटा. प्रत्यक्षात परीक्षा देणाऱ्यांपैकी किती जणांना ती नोकरी मिळते. बाकी सगळे त्या प्रयत्नात जो वेळ वाया घालवतात त्याचे काय? मनोरंजन क्षेत्राचे उदाहरण देखील घेता येईल. जेवढे लोक यशस्वी होतात, नावलौकिक व पैसा कमावतात त्याच्या कितीतरी पटीने लोक सुमार जीवन ओढत राहतात. अशी अनेक उदाहरणे घेता येतील. अन दुसरीकडे अनेक कामांना माणसे नाहीत किंवा सुमार माणसे आहेत. स्वप्ने व्यावहारिक ठेवतानाच, सगळ्या कामांच्या मोबल्यातील तफावत सुद्धा व्यावहारिक पातळीवर आणावी लागेल. शेती आणि सरकारी नोकरी यातील मोबल्यातील तफावत खूप जास्त असेल तर ओढाताण होणारच. त्यासाठी काही ठिकाणी मोबदला कमी करण्याची गरज असेल तर तेही करायला हवे. मनोरंजन क्षेत्राची चमकधमक आणि अवाजवी पैसा कमी करण्याचीही गरज आहे.</p><p>देश स्वयंपूर्ण व्हायचा असेल, भ्रष्टाचारमुक्त, घराणेशाहीतून मुक्त व्हायचा असेल तर; आपल्याला खऱ्या अर्थाने आध्यात्मिक व्हावे लागेल. अध्यात्म याचा अर्थ ऐहिकतेसाठी वा पारलौकिकासाठी देव प्राप्त करणे नाही; तर स्वतः देवस्वरूप होणे. ही आत्मविकासाची प्रक्रिया आहे. याशिवाय आम्ही ना भ्रष्टाचारातून मुक्त होणार, ना घराणेशाहीतून मुक्त होणार, ना आपली स्वप्ने व्यावहारिक करू शकणार. सगळं जग मुठीत करणे, अमाप पैसा कमावणे, सगळ्यांवर सत्ता गाजवणे, मोठं... मोठं... मोठं... होत जाणे, आणखीन... आणखीन... आणखीन... मिळवत जाणे; याला नियंत्रित करायचं असेल तर आध्यात्मिक वृत्तीला पर्याय नाही. याशिवाय आमच्या सवयी इत्यादींसाठीही आध्यात्मिकता महत्त्वाची आहे. खाद्यान्न समस्या आहे. त्यासाठी फक्त उत्पादन वाढवून उपयोग नाही. वाया जाणारे अन्न वाया जाणार नाही हेही आवश्यक आहे. किती जण याची जाणीव रोजच्या जगण्यात ठेवतात. अन्न वाया जाणार नाही म्हणजे नाही. त्यासाठी आवडीनिवडी इत्यादी फार टोकदार न ठेवता flexible ठेवण्याची सवय करावी लागेल. न आवडणारी भाजी समोर आली तरी खाता यायला हवी. योग्य अंदाज घेऊन स्वयंपाक करण्याची सवय लावून घ्यावी लागेल. उरलेले अन्न टाकून न देता त्याला नवीन करून उपयोग करण्यात कमीपणा वाटू न देण्याची मानसिकता घडवावी लागेल. आम्हाला कसली कमी नसल्याने काहीही करू हा माज सोडावा लागेल. अशा असंख्य बाबी. त्यासाठी वृत्ती आध्यात्मिक हवी. योग हा योगदिवसापुरता किंवा शारीरिक सुदृढतेपुरता न ठेवता; योग म्हणजे कर्मकुशलता आणि चित्तवृत्तींचा निरोध (मनाला काबूत ठेवणे म्हणजेच मनाला वाटते त्यात वाहून न जाता, मनाला काय वाटायला हवे त्याकडे वळवणे) हे व्यवहारात उतरवावे लागेल.</p><p>हे सगळे उत्सव करण्याइतके सोपे नाही. त्यासाठी व्यक्ती म्हणून आणि समाज म्हणून स्वतःला बदलावे लागेल. अमृतयोगाने त्यासाठी शक्ती, बुद्धी द्यावी.</p><p>- श्रीपाद कोठे</p><p>सोमवार, १५ ऑगस्ट २०२२</p>k. shripadhttp://www.blogger.com/profile/06682708646050770427noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2240789927220855420.post-33936958948313177242023-03-29T18:21:00.001-07:002023-03-29T18:21:05.651-07:00प्रतिनिधी सभेतील श्रद्धांजली प्रस्ताव<p>राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागौर येथे नुकत्याच झालेल्या प्रतिनिधी सभेत पारित श्रद्धांजली ठराव खालीलप्रमाणे आहे. यातील नावांवर- विशेषत: क्रमांक १७ ते २७ वर नजर टाकावी. अन हेच चित्र यापूर्वीच्या ठरावांमध्येही दिसून येईल. अन्य संस्था, संघटनांच्या संबंधात असे म्हणता येईल का? सर्वसमावेशकता, सहिष्णुता, मतभेद असावेत- मनभेद नकोत, राष्ट्रीय एकात्मता; इत्यादी शब्द सहज आठवले.</p><p>अपनी प्रदीर्घ यात्रा में अपने साथ रहे ऐसे कई महानुभावों की अनुपस्थिति हम अनुभव कर रहे हैं। वैसे ही राष्ट्रजीवन में अपनी समर्पित प्रतिभा, ज्ञान तथा कर्तृत्व आदि से समाज में स्वनामधन्य हो गए ऐसे महानुभाव भी आज हमारे मध्य नहीं रहे।</p><p>1) श्री अशोक जी सिंघल - विश्व हिन्दू परिषद के मार्गदर्शक, 2) श्री मधुजी लिमए - पूर्व प्रान्त प्रचारक असम, 3) श्री मुकुंदराव पणशीकर - अ.भा. कार्यकारिणी सदस्य एवं धर्मजागरण विभाग प्रमुख, 4) श्री संजय कुलासपुरकर - वनवासी कल्याण आश्रम के क्षेत्र संगठन मंत्री, असम क्षेत्र, 5)मा. राजनारायण ठाकूर - अ.भा.प्रतिनिधि एवं महानगर संघचालक, मुजफ्फरपुर, 6) श्री कृष्णचंद्र सूर्यवंशी - वरिष्ठ प्रचारक एवं किसान संघ के अ.भा. पूर्व कोषाध्यक्ष, मध्यभारत, 7) श्री रामदौरसिंह - भारतीय मजदूर संघ के राजस्थान क्षेत्र संगठन मंत्री, 8) श्री नित्यानंद जी - पूर्व प्रांत कार्यवाह, उत्तरांचल, 9) श्री अरुणभाई यार्दी - अखिल भारतीय विद्यार्थी परिषद के पूर्व अ.भा.अध्यक्ष, गुजरात, 10) श्री नेकशाम समशेरी - पूर्व क्षेत्र संघचालक, पश्चिम उत्तरप्रदेश क्षेत्र, 11) श्री वीरेन्द्र प्रसाद अग्रवाल - पूर्व प्रांत संघचालक, जयपुर प्रांत, 12) श्री जगन्नाथ गुप्ता - पूर्व प्रदेशाध्यक्ष विहिप एवं कल्याण आश्रम, जयपुर प्रांत, 13) श्री सुजीत - कन्नूर जिले के स्वयंसेवक, 14) Dr. K. N. Sengottaiyan - अध्यक्ष, सेवाभारती तमिलनाडु, 15) श्री जे. दामोदर राव - पूर्व प्रांताध्यक्ष भारतीय किसान संघ एवं पूर्व विधायक, भा. ज. पा., तेलंगाणा, 16) श्री व्ही. रामा राव - पूर्व राज्यपाल, सिक्किम, 17) श्री शरद जोशी - किसान नेता, महाराष्ट्र, 18) श्री मुफ्ती मुहम्मद सईद – मुख्यमंत्री जम्मू कश्मीर 19) श्री ए. बी. बर्धन - मजदूर नेता, नागपुर 20) श्री बलराम जाखड़ - पूर्व लोकसभा अध्यक्ष, 21) श्री भंवरलाल जैन - प्रसिद्ध उद्योगपति, जळगांव 22) श्री मंगेश पाडगांवकर - ख्यातनाम कवि, महाराष्ट्र, 23) श्री सईद जाफरी - सिने अभिनेता, 24) श्रीमती साधना - सिने अभिनेत्री, 25) श्रीमती मृणालिनी साराभाई - प्रसिद्ध नृत्यांगना, 26) आचार्य बलदेव जी -गुरुकुल कालवा, 27) पी.ए.संगमा-पूर्व लोकसभा अध्यक्ष।</p><p>वैसे ही चेन्नई में आयी बाढ़ के कारण एवं समय-समय पर घटित प्राकृतिक आपदाओं में काल के ग्रास बने, आतंकवादी घटनाओं के शिकार बने, सियाचिन में बर्फ के तूफान में तथा सीमाओं की रक्षा करते हुए अपने प्राणों की बलि चढ़ाई ऐसे सुरक्षाबलों के जवान, ऐसे समस्त महानुभावों के समस्त परिवार-जनों के प्रति अखिल भारतीय प्रतिनिधि सभा अपनी गहरी शोक संवेदना प्रकट करती है। ईश्वर उन्हें सद्गति प्रदान करें। उन्हें हम हमारी श्रद्धांजलि अर्पित करते हैं।</p><p>- श्रीपाद कोठे</p><p>३० मार्च २०१६</p>k. shripadhttp://www.blogger.com/profile/06682708646050770427noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2240789927220855420.post-38834300586270254802023-03-29T18:17:00.001-07:002023-03-29T18:17:20.301-07:00गणेश चा लेख व माझी प्रतिक्रिया<p>माझे मित्र गणेश कनाटे यांची सद्यस्थितीत आवश्यक आणि महत्त्वाची अशी ही पोस्ट. (लिंक दिलेली आहे.) त्यावरील माझी प्रतिक्रिया. वादावादी न करता चर्चा सकारात्मक दिशेने जावी एवढीच अपेक्षा. माझी प्रतिक्रिया - </p><p>गणेश, तू हा initiative घेतो आहे याचा समाधान आहे. तुझ्या या प्रामाणिक प्रयत्नांना supplement म्हणून फक्त काही गोष्टी. रोग दूर करायचा असेल तर फक्त लक्षणांचा विचार करून चालत नाही. कारणांचाही विचार करावा लागतो, हे मान्य व्हायला हरकत नसावी. अन तिथे नेमकी बरेचदा पंचाईत होते. गुण अवगुण, बुद्धिमत्ता, क्षमता इत्यादी गोष्टी समूहगत नसतात हे अगदी खरं आहे पण त्या तशा असतात या समजातून बाहेर यावे लागेल. अन ती जबाबदारी सगळ्या जाती, पंथ, पक्ष, संस्था, संघटना यांची आणि त्यात सहभागी प्रत्येकाची आहे. शिवाय हे फक्त लिहिणे वा बोलणे यातूनच नाही तर व्यवहारातून दिसावे, जाणवावे, व्यक्त व्हावे लागेल. आपल्या नागपुरातल्याच एक दोन गोष्टी उदाहरण म्हणून. स्व. सुदर्शनजी रा. स्व. संघाचे सरसंघचालक झाले तेव्हा त्यांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले होते. नागपुरातल्या अनेक मोठमोठ्या लोकांनी डॉ. आंबेडकर यांचा पुतळा अपवित्र झाला म्हणून तो धुतला होता. अगदी स्व. भा. ल. भोळे यांच्यासारख्या माणूस त्यात होता. द्वेषपूर्ण आणि द्वेष निर्माण करणाऱ्या या कृत्यावर कोणी कोणी आणि काय प्रतिक्रिया दिल्या? अगदी याच धाग्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणारेही अनेक नागपूरकर आहेत. त्यावेळचे जाऊ द्या. आज 'ते कृत्य चूक होते' एवढे तरी ही मंडळी म्हणू शकते का? हे धैर्य आणि प्रामाणिकपणा नसेल तर इच्छाचिंतनाला किती अर्थ राहील?</p><p>दुसरे उदाहरण. मुस्लिम राष्ट्रीय मंच. आपल्या नागपूरचेच अन तूही ज्यांच्यासोबत काम केलं आहे ते विराग पाचपोर या मंचाचं काम करतात. हिंदू- मुस्लिम संवाद सौहार्द वाढावा याचा तो प्रयत्न. दोन दशके झाली त्याला. माहिती नाही असे नाही पण किती लेखक, किती पत्रकार, किती विद्वान, किती विचारवंत त्याचा उल्लेख तरी करतात किंवा त्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतात? मी तर म्हणेन मुद्दाम टाळतात. आजपासून सुमारे साठ वर्षांपूर्वी विश्व हिंदू परिषदेने अनेक संतांना एकत्र आणून अस्पृश्यता चुकीची असून त्याला धर्माचा आधार नाही अशी जाहीर भूमिका घेतली आणि यासाठी अनेक प्रयत्न केले. समाजातील किती विचारवंतांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला?</p><p>- व्यक्तिगत अनुभवांच्या आधारेही खूप बोलता येईल. त्या अनुभवांचेच काही लेख होतील. मात्र संबंधित लोक त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करतात, त्याची टवाळी करतात आणि शहाजोगपणे मोठमोठ्या गोष्टी करतात. अन मी चिल्लर लोकांबद्दल बोलतच नाही. अगदी मोठाली नावे आहेत. नाव मोठं लक्षण खोटं असे हे लोक किती ढोंगी असतात हे मला व्यक्तिगत अनुभव आहेत. मी ते गंगार्पण करतो. सगळ्यांनी करायला हवेत पण नाही करू शकत. अन मी म्हणतो तशी अपेक्षा तरी का करावी? उघड दिसणाऱ्या गोष्टींबाबत प्रामाणिक खंत तर व्यक्त करायला हवी. तरच पुढे जाता येईल.</p><p>- तू म्हणतो तसे हिंदूंना खोऱ्यातून पळून जावे लागले तसे आजही तिथे राहणारे हिंदू आहेतच. हाच न्याय अन्यत्रही लावायला हवा की नको. देश स्तरावर मुस्लिम समाज राहतो आहेच नं? मग हिंदू बिथरले या ओरड्याला काय अर्थ राहतो? किमान ते तसं नाही हे प्रकटपणे बोलणारे हवेत.</p><p>- योगायोगाने आजच्या फेसवुक मेमरीत या विषयाशी संबंधित एक पोस्ट आली. तिची लिंक पोस्ट करतो. पहावी. त्यावर प्रतिक्रिया वाचायलाही आवडेल.</p><p><br /></p><p>गणेश कनाटे यांच्या पोस्टची लिंक -</p><p>https://www.facebook.com/633133472/posts/10158828263108473/</p><p><br /></p><p>माणुसकी जिवंत असलेले लोक कमी प्रमाणात का होईना पण तेव्हाही होते आजही आहेत! </p><p>१९८६ पासून १९९७ पर्यंत काश्मिरी पंडितांचे खोऱ्यातून मोठया प्रमाणात विस्थापन झाले. ते विस्थापन होण्यापूर्वी पंडितांची लोकसंख्या खोऱ्यातील एकूण लोकसंख्येच्या ४.५% इतकी होती. (काश्मीर फाईल्समध्ये अनुपम खेर ती २% होती, असं म्हणतो.) त्यापैकी बहुसंख्य पंडित खोरे सोडून प्रथम जम्मूला व नंतर देशात इतरत्र स्थलांतरित झाले. इतके मोठ्या प्रमाणात विस्थापन होऊनही जवळजवळ ८०० पंडितांचे परिवार खोऱ्यातून कधीच बाहेर पडले नाहीत. ते अजूनही तिथेच आहेत. विश्वास बसत नसेल तर श्रीनगरला एक वैष्णो भोजनालय आहे त्याच्या मालकाशी कधी गेलात तर भेटून या.</p><p>जर खोऱ्यातील ९५% मुसलमान ५% हिंदूंचे शिरकाणच करायला निघाले असते तर एकतरी पंडित कुटुंब सोडा व्यक्ती तरी खोऱ्याबाहेर जिवंत बाहेर पडू शकली असती काय?</p><p>मुसलमानांचा पराकोटीचा द्वेष करणाऱ्या आरती टिक्कु या पत्रकार मुलीच्या कुटुंबालाही एका मुस्लिम मुलानेच त्यांना जीवे मारण्याच्या कटाबद्दल माहिती दिली आणि एका मुस्लिम टांस्पोर्टरच्या ट्रकमधून आधी टिक्कु परिवाराच्या मुली व नंतर संपूर्ण परिवार जम्मूला पोहोचू शकला.</p><p>तसेच गांधींच्या हत्येनंतर सातारा-सांगली-कोल्हापूर भागातील ब्राह्मणांच्या घरांवर चालून गेलेल्या जमावासमोर अनेक बहुजन समाजातील नेते, गावागावांतील प्रतिष्ठित नागरिक/नेते उभे झाले नसते तर साडे तीन टक्के लोकसंख्या असलेले ब्राह्मण या राज्यात औषधालादेखील उरले नसते,असे आपल्याला वाटत नाही का?</p><p>आकड्यांचा खेळ सोडून देऊ. पण काश्मीरच्या प्रकरणात काही माणुसकी जपणारे मुसलमान निश्चितच होते तसेच गांधीहत्येनंतर असलेल्या प्रक्षोभात माणुसकी जपणारे ब्राह्मणेतर लोकही निश्चितच होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे उदाहरण आवर्जून द्यायचे का?</p><p>असे असेल तर आज जी मंडळी काश्मीर प्रश्नाचा आधार घेऊन मुसलमानांच्या विरोधात आणि गांधीहत्याप्रकरणी काँग्रेसविचारांच्या बहुजनांच्या विरोधात फेसबुक, व्हाट्सअप्प इत्यादी समाजमाध्यमांवर द्वेष पसरविणारी खोटी माहिती पेरताहेत, यांचा सद्सद्विवेक मेला असे म्हणायचे काय? यांना केवळ इतरांचे रक्त प्यायचे आहे काय? राजकारणात मते मिळविण्यासाठी, सत्ता मिळविण्यासाठी कुणाचेही रक्त सांडले तरी यांना चालतं काय?</p><p>माझे म्हणणे भाबडे आणि आजकाल ज्याला शहाणपणा म्हणतात तसे नसलेले वाटत असेल तर माझी काहीही हरकत नाही परंतु समाजात असा द्वेष पसरू नये, कुणी पसरवू नये, यासाठी जे काय करता येईल ते केले पाहिजे, असे मला मनापासून वाटते. अशा कोणत्याही प्रयत्नात मी यथाशक्ती सहभागी होईन.</p>k. shripadhttp://www.blogger.com/profile/06682708646050770427noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2240789927220855420.post-19533548568764925022022-12-27T19:32:00.002-08:002022-12-27T19:32:18.101-08:00संपत्ती संचय<p>उत्तर प्रदेशात एकाच व्यक्तीकडे अडीच शे कोटींपेक्षा जास्त रोख सापडली. महाराष्ट्रात पण वेगवेगळी सुमारे तेवढीच रक्कम सापडली. अशा बातम्यात नवीन काही राहिलेले नाही. शिवाय शेकडो वा हजारो कोटी रुपये संपत्तीचे मालक असल्याच्या बातम्या असतातच. ताज्या दोन बातम्या वाचताना मनात सहज दोन गोष्टी आल्या -</p><p>१) अतिशय बदनाम झालेल्या भारताच्या जुन्या आर्थिक व्यवस्थेत एक व्यक्ती अनेक व्यवसाय करू शकत नव्हती. त्यामुळे खरे खोटे व्यवसाय, उद्योग दाखवून संपत्तीचे असे केंद्रीकरण किंवा संचय यांची शक्यता नव्हती. आजच्या समस्यांच्या संदर्भात जुन्याचे विश्लेषण व्हायला नको का? (ज्यांना लगेच जातीयवाद वगैरे आणायचा असेल त्यांनी डॉ. आंबेडकर यांचे मुंबई विधिमंडळातील खोत कायद्यावरील भाषण वाचावे.)</p><p>२) शारीरिक श्रम करणाऱ्यांनाच मतदानाचा अधिकार राहावा अशी सूचना महात्मा गांधी यांनी केली होती. आजच्या crony capitalism च्या छायेत त्याचा साधकबाधक विचार व्हावा का?</p><p>- श्रीपाद कोठे</p><p>२८ डिसेंबर २०२२</p>k. shripadhttp://www.blogger.com/profile/06682708646050770427noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2240789927220855420.post-36078488813281041322022-11-29T19:22:00.002-08:002022-11-29T19:22:17.918-08:00श्रीलंका<p>भारताने श्रीलंकेला मदत केल्याची छोटीशी बातमी पेपरला आहे. चांगले आहे. मनाने सहजच आठवले; स्वामी विवेकानंद पहिला विदेश प्रवास आटोपून भारतात परतले तेव्हा त्यांचे पहिले स्वागत आणि मानपत्र अर्पण कोलंबोला झाले होते. त्यांचे भाषणही झाले होते. ते भारतातील पहिलं स्वागत होतं. मानपत्र आणि भाषण दोन्हीत तसा उल्लेख तर होताच पण त्याला सगळ्यांची स्वीकृती होती. गेल्या उण्यापुऱ्या सव्वाशे वर्षात असं काय आणि काय काय झालं की, श्रीलंका आणि भारत यांचं एकत्व मनातूनही पुसलं जावं? गडबड फार मोठी आहे. नीट समजून घेतली तर. हा हिंदू/ भारतीय समाज बाह्य आघातांचाच विचार करू लागला आहे. त्यावरच त्याचं लक्ष आहे. स्वतःची शक्ती, सत्व, जीवन यांच्याकडे लक्ष देण्याची त्याला गरज वाटेनाशी झाली. अन तो दुबळा होतो आहे. सबळ होण्याचा त्याचा अर्थदेखील बदलला आहे. त्यामुळेच अखंड भारत म्हटल्यावर सुद्धा आम्हाला फक्त पाकिस्तान आठवतो. वास्तविक भारत म्हणजे काय? हे समजून घ्यायला स्वामीजींचं कोलंबो भाषण पुरेसं आहे. त्याचं वारंवार वाचन सुद्धा आपली जाणीव, दृष्टी आणि चिंतन घडवू शकतं, व्यापक करू शकतं, त्याला दिशा देऊ शकतं. हां, आम्हाला ते आवडेल आणि पटेल का ही मात्र शंका मनात आहे.</p><p>- श्रीपाद कोठे</p><p>३० नोव्हेंबर २०१९</p>k. shripadhttp://www.blogger.com/profile/06682708646050770427noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2240789927220855420.post-19684823846629096022022-11-28T18:48:00.003-08:002022-11-28T18:48:20.127-08:00असमर्थनीय<p>समता परिषदेने अरुंधती रॉय ला पुरस्कार दिला. मानभावीपणे लाखात लाख घालून तिने तो अन्य कोणाला दिला. अन महानतेचा एक कडा सर केल्याचे दाखवत नक्षलवादाला समर्थन देऊन कौतुकही केले. नक्षलवादाची मानवीय चर्चाही भरपूर झालेली आहे. मात्र आपल्या खऱ्याखोट्या अधिकारांसाठी, न्यायासाठी वगैरे दुसऱ्या मानवाची हत्या करणे ही कोणत्याही रंगाची मानवता होऊच शकत नाही. म्हणूनच नक्षलवादाचे स्पष्ट वा प्रच्छन्न समर्थनही होऊ शकत नाही. शिवाय प्रस्थापित शासकीय भूमिकेला हे छेद देणारेही आहे. यासाठी सरकारने अरुंधती बाईंना `सरकारी पुरस्कार' द्यायला हवा, अन तिला पुरस्कार देऊन प्रतिष्ठित करणाऱ्या अन तिच्या नक्षलसंबंधित भूमिकेवर मूग गिळून अप्रत्यक्ष समर्थन देणाऱ्या समता परिषदेच्या भुजबळ महाशयांनाही `सरकारी पुरस्कार' द्यावा.</p><p>- श्रीपाद कोठे</p><p>२९ नोव्हेंबर २०१५</p>k. shripadhttp://www.blogger.com/profile/06682708646050770427noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2240789927220855420.post-604799140632624542022-11-21T20:18:00.002-08:002022-11-21T20:18:20.312-08:00स्वयंसेवक आणि राजकीय पक्ष<p>नागपूरचे भाजप नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. स्वाभाविकच अनेकांना वाईट वाटले, अनेक जण अस्वस्थ झाले. हिंदुत्व, संघ, भाजप अशीही चर्चा होणे स्वाभाविकच. त्यांना संघाचा कौटुंबिक वारसा होता हेही खरं. पण यात वाईट वाटण्यासारखे वा अस्वस्थ होण्यासारखे काय आहे? हां; भाजप या पक्षापुरते दु:ख, अस्वस्थता, धक्का असू शकतात. पक्षाचा फायदा वा नुकसानही असू शकते. त्याहून अधिक काही नाही. कारण कोणाच्या राजकीय महत्त्वाकांक्षा दडपून तर टाकता येऊ शकत नाहीत. त्या राहणारच. एकीकडे संघ वाढत जाणार, हिंदुत्वाची स्वीकार्यता वाढत जाणार, अन बहुपक्षीय लोकशाही असल्यामुळे राजकीय आकांक्षा आणि राजकीय गणिते हेही सुरूच राहणार. हिंदुत्वाचे पुरस्कर्ते, संघाचे स्वयंसेवक सगळ्या पक्षांमध्ये दिसू लागणार. त्यांचे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणेयेणेही राहणारच. आजवर संघ म्हणत असे की आम्हाला कोणताही राजकीय पक्ष वर्ज्य नाही. सगळे पक्ष आपलेच पक्ष आहेत. पण हे एकतर्फी होते. आता विविध पक्षांनाही संघाचे स्वयंसेवक चालू लागतील. विविध पक्षांची संघाबद्दलची एकतर्फी अस्पृश्यता हळूहळू संपू लागेल. हा सामाजिक, राजकीय बदल होणे अपरिहार्य आहे. सगळ्यांना त्याची सवय करून घ्यावी लागेल.</p><p>- श्रीपाद कोठे</p><p>सोमवार, २२ नोव्हेंबर २०२१</p>k. shripadhttp://www.blogger.com/profile/06682708646050770427noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2240789927220855420.post-911701987742813812022-11-15T19:10:00.006-08:002022-11-15T19:10:31.528-08:00थोडेसे अप्रिय<p>आपली अर्थव्यवस्था १२ टक्के रोखीची आहे. जगाचा हा दर ४ टक्के आहे.</p><p>- अर्थमंत्री</p><p>अर्थमंत्री महोदय,</p><p>१) जेथे ४ टक्के दर आहे त्या अर्थव्यवस्था आपण आदर्श मानता का?</p><p>२) `international standard syndrome' चे आपण समर्थन करता का?</p><p>३) भारत `सोने की चिडिया' होता तेव्हाही भारताची अर्थव्यवस्था रोखीचीच होती. आजच्यापेक्षा त्याचे प्रमाण अधिकच होते.</p><p>४) आपले सरकार सत्तेवर आल्यापासूनच्या अडीच वर्षात foreign exchange reserve दुथडी भरून वाहत आहेत. या काळातही आपली अर्थव्यवस्था cash intense अशीच आहे.</p><p>५) IMF, WB यांच्यासाठी cashless चा खटाटोप सुरु आहे का?</p><p>६) आपल्यासारख्या तज्ञांनी स्वत:चे (स्वदेशी) paradigms निर्माण करून जगाला ते imitate करायला का लावू नयेत?</p><p>@@@@@@@@@@@@@@@@@</p><p>आज एका बँक प्रतिनिधीने त्यांचे payment app ऑफर केले. हे करताना ती म्हणाली, याचा उपयोग केल्यास सिनेमाच्या एका तिकिटावर एक फ्री मिळणार. तुम्ही आणि मादाम दोघांसाठी एकच तिकीट. मी एकटाच आहे मादाम नाहीत, हे त्या प्रतिनिधीला सांगण्यात अर्थ नव्हता. म्हणून एवढेच म्हणालो- गेल्या पुष्कळ वर्षात मी सिनेमाला गेलेलोच नाही अन पुढेही बहुतेक जाणार नाहीच. मग? माझ्या या बोलण्यावर ती बुचकळ्यात पडली. संवाद संपला.</p><p>cashless economy will push the society towards consumerism. does bjp is for that? भाजपने तसे असायला काहीच हरकत नाही. पण भाजपने हे स्पष्ट करायला हवे. अन तसे असेलच तर दीनदयाळजींचे नाव घेणे थांबवावे.</p><p>@@@@@@@@@@@@@@@@@@</p><p>जगज्जेता अलेक्झांडर याचा पराभव एका अकिंचन, अनिकेत, अवस्त्र ऋषीने केला होता. भारताची तीच पद्धती आणि परंपरा आहे आणि उपभोगवाद, सत्ताकांक्षा यांचा पराभव तसाच होऊ शकतो. सत्ताकांक्षेचा पराभव दुसरी सत्ता करू शकत नाही. भारतावर थोपवल्या जाणाऱ्या सत्ताकांक्षेचा पराभव सुद्धा याच पद्धतीने व्हावा लागेल. होईल.</p><p>@@@@@@@@@@@@@@@@@@</p><p>थोडेसे अप्रिय-</p><p>`बुडाला औरंग्या पापी, म्लेंच्छसंहार जाहला</p><p>अभक्तांचा क्षयो झाला, आनंदवनभुवनी'</p><p>असे धन्योद्गार समर्थांनी काढल्यानंतरही ते आनंदवनभुवन किती काळ टिकले?</p><p>महाप्रतापी आर्य चाणक्याने अपार पुरुषार्थ करून स्थापित केलेल्या विक्रमादित्याचे आणि साम्राज्याचे नंतर काय झाले?</p><p>सत्तेचे स्वरूपच तसे आहे. सत्ता क्षणस्थायी असते. राष्ट्र चिरस्थायी असतं.</p><p>समाज कोणत्या सत्तेचा किती पाठीराखा आहे यापेक्षा समाज किती राष्ट्रमय आहे हे महत्वाचे.</p><p>- श्रीपाद कोठे</p><p>नागपूर</p><p>बुधवार, १६ नोव्हेंबर २०१६</p>k. shripadhttp://www.blogger.com/profile/06682708646050770427noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2240789927220855420.post-64755979065725782392022-11-11T19:36:00.006-08:002022-11-11T19:36:51.110-08:00भ्रष्टाचार प्रतिबंधक विधेयक<p>भ्रष्टाचार प्रतिबंधक विधेयक (सुधारित) संसदेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात येणार आहे. संसदेच्या संबंधित समितीने त्याला मंजुरी दिली आहे. या समितीत सगळ्याच राजकीय पक्षांचे सदस्य असतात. या प्रस्तावात एक तरतूद अशी आहे की- कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याच्या विरुद्ध भ्रष्टाचाराची तक्रार करावयाची असेल तर त्यासाठी आधी परवानगी घ्यावी लागेल. अशी तरतूद आहे हे निश्चित. कारण यावरील चर्चेत भाग घेणाऱ्या भारतीय जनता पार्टी आणि कॉंग्रेसच्या प्रतिनिधींनी ती नाकारली नाही. शिवाय भाजपाच्या प्रतिनिधीने त्याचे समर्थन केले. असे असेल तर हा भयानक प्रकार आहे. देशाचे माजी मुख्य सचिव राहिलेले टी.आर.एस. सुब्रमण्यम यांनी तर हे विधेयक केराच्या टोपलीत फेकून द्यावे या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रस्तावित विधेयकाचे कागद घेऊनच ते बसले होते. टी.आर.एस. सुब्रमण्यम यांच्या प्रामाणिकपणाबद्दल, सचोटी आणि अध्ययनाबद्दल तसेच अनुभवाबद्दल कोणालाच शंका नाही. ते भाजपाचे विरोधकसुद्धा नाहीत. आदल्याच दिवशी times now वर नोटा रद्द करण्याचे सशक्त आणि आक्रमक समर्थन करणारे टी.आर.एस. सुब्रमण्यम दुसऱ्या दिवशी सीएनबीसी आवाज वर प्रस्तावित विधेयकावर प्रखर प्रहार करीत होते.</p><p>प्रकरण गंभीर आहे एवढे खरे.</p><p>- श्रीपाद कोठे</p><p>१२ नोव्हेंबर २०१६</p>k. shripadhttp://www.blogger.com/profile/06682708646050770427noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2240789927220855420.post-85518945545916940632022-11-07T20:04:00.005-08:002022-11-07T20:04:25.177-08:00बिहारच्या निकालानंतर-<p>१) स्वत:च्या विजयाच्या आनंदापेक्षा भाजपच्या पराभवाचा आनंद अधिक.</p><p>२) हा पराभव हिंदुत्व विचारांचा म्हणायचा असेल, तर हा विजय हजारो कोटींचा घोटाळा करणाऱ्या भ्रष्ट वृत्तीचा म्हणायचा का? लोकांना भ्रष्टाचार हवा आहे का?</p><p>३) कथित लोकशाहीने समाज अनेक तुकड्यात विभाजित केला आहे, समाजाला विचारहीन, विवेकहीन बनवले आहे.</p><p>४) लोकशाही म्हणजे झुंडशाही.</p><p>५) ६५ वर्षात विविध जातीजमाती सशक्त का झाल्या नाहीत याचा विचार करण्यापेक्षा आरक्षणाचा झेंडा उंच धरून लाचार राहणे आणि लाचार ठेवणे हेच लोकांना आवडते.</p><p>६) मतभेद उमदेपणाने मान्य करून, मनोमालिन्य उरू न देणे; याऐवजी सगळ्या बऱ्यावाईट गोष्टींना गोंजारत खोटी दिखावटी सहिष्णुता जोपासणे (बोलीभाषेत- मुंह मे राम, बगल मे छुरी), लोकांना भावते.</p><p>७) लोकशाही ही खूप अपेक्षा करू नये अशी किंवा फारशा गांभीर्याने घेऊ नये अशी व्यवस्था आहे.</p><p>८) गांधीजी किंवा संविधान निर्मात्यांसारख्या आदर्शवाद्यांना लोकशाहीत स्थान नसते. उदा.- समाजाने गोवंशहत्याबंदी, समान नागरी कायदा यासारख्या आदर्श गोष्टींच्या दिशेने चालण्याऐवजी; शक्तीपरीक्षणात यश मिळवण्यासाठी आदर्शांना सामूहिक तिलांजली द्यावी लागते.</p><p>९) काही महिन्यांपूर्वी दिल्लीत याहून अधिक बहुमताने आम आदमी पार्टी निवडून आली. आता दिल्लीत फक्त अराजक आहे. बिहारच्या लोकांना कदाचित अराजक हवे आहे किंवा त्यांना फारसे काही कळत नाही.</p><p>- श्रीपाद कोठे</p><p>८ नोव्हेंबर २०१५</p>k. shripadhttp://www.blogger.com/profile/06682708646050770427noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2240789927220855420.post-64342127008539577492022-11-07T20:01:00.005-08:002022-11-07T20:01:28.443-08:00नोटबंदी<p>मी नोटबंदीचा समर्थक आहे की विरोधक? मला नाही ठाऊक. तुम्ही म्हणाल ते मला मान्य. पण मला वाटतं- स्व. चंद्रशेखर पंतप्रधान होईपर्यंत कधीही भाजपा वा जनसंघाची सत्ता नव्हती. होती फक्त कॉंग्रेसची सत्ता आणि विविध प्रकारे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कम्युनिस्ट, समाजवादी वगैरेंची. त्या ४५ वर्षांच्या आर्थिक धोरणांनी आणि निर्णयांनी चंद्रशेखर सरकारला रिझर्व्ह बँकेचे सोने जागतिक बँकेकडे गहाण ठेवावे लागले होते. देशाच्या दिवाळखोरीच्या एकच पाऊल अलीकडे. नोटबंदीने काय बरेवाईट केले असेल ते असो; पण सोने गहाण ठेवून देशाला दिवाळखोर करण्याकडे मात्र नाही नेले, हे नक्की.</p><p>- श्रीपाद कोठे</p><p>८ नोव्हेंबर २०१७</p>k. shripadhttp://www.blogger.com/profile/06682708646050770427noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2240789927220855420.post-52767448298069841762022-11-04T20:28:00.003-07:002022-11-04T20:29:12.326-07:00अल्पसंख्य हिंदू<p>काही राज्यात हिंदूंना अल्पसंख्यक दर्जा द्यावा असा एक विचार पुढे येतो आहे. केवळ `अरे'ला `कारे' करण्याची खुमखुमी किंवा चार सवलती पदरात पाडून घेण्यासाठी हे करू नये. याचे दूरगामी मानसिक व व्यावहारिक परिणाम चांगले होणार नाहीत. अगदी एक हिंदू असेल तरीही त्याला अल्पसंख्य म्हणू नये. हे प्रयत्न हिंदूंचेच असले तरीही ते हाणून पाडले पाहिजेत. त्याजागी अल्पसंख्य, बहुसंख्य हे शब्दच हद्दपार करण्याचे वातावरण आणि प्रयत्न व्हावे. आणि या देशातील सगळे रहिवासी `हिंदू' आहेत हे रुजवण्याचा प्रयत्न व्हावा. `सिंधूच्या पलीकडले हिंदू' हा सुरुवातीचा अर्थच प्रमाण ठेवून तो पक्का करावा. हिंदू धर्म याचा अर्थ हिंदू नावाचा धर्म असा न करता हिंदूंचे धर्म असा होईल याचा प्रयत्न व्हावा. म्हणजे त्यानुसार ख्रिश्चन आणि इस्लाम हे सुद्धा हिंदू धर्मच ठरतील. (उपासना पद्धती या अर्थाने धर्म. या पोस्टपुरता.) हिंदू मूळ समुदायवाचक शब्द होता. तो पुन्हा तसाच प्रतिष्ठीत व्हावा. किमान हिंदूंना अल्पसंख्य म्हटले जाऊ नये. कोणत्याही परिस्थितीत.</p><p>- श्रीपाद कोठे</p><p>५ नोव्हेंबर २०१७</p>k. shripadhttp://www.blogger.com/profile/06682708646050770427noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2240789927220855420.post-57535077616079599262022-10-31T20:06:00.003-07:002022-10-31T20:06:24.041-07:00कांद्याचे भाव<p>कांदा आयात करून कांद्याचे भाव खाली आणण्याची चर्चा आहे. चांगलाच निर्णय आहे पण त्यासाठी एवढा वेळ का लागावा?</p><p>दुसरे म्हणजे कांद्याचे (अन्यही पुष्कळ जिन्नस) भाव निश्चित का करू नयेत? एक भाव निश्चित करून जाहीर करावा. त्यापेक्षा अधिक भावाने विक्री करण्यास बंदी घालावी. याने साठेबाजी कमी होऊ शकेल. भाव जर जास्त मिळणारच नसेल तर कोणी साठवून का ठेवेल? कांदा कमीच असेल तर आहे तोवर ठरलेल्या भावात विकला जाईल. संपला तर मिळणार नाही. कांदा मिळाला नाही तर जीवन काही थांबत नाही. माल साठवून ठेवायचा, सोयीने टंचाई निर्माण करायची, सोयीने भाव वाढवायचे वा पाडायचे; हे बंद होणार की नाही? विक्रीत हस्तक्षेप, धाडी वगैरे घालणे, त्यातून निर्माण होणारी साटेलोटे साखळी, हे हवेच कशाला? Fixed rate ठरवून द्यायचा. त्याचा दरवर्षी आढावा घ्यायचा. जसे शेतमालाचे हमीभाव जाहीर करतात तसेच ग्राहकांसाठी विविध वस्तूंचे भाव ठरवून द्यायचे. व्यापारी, अडते, दलाल आदी मोडून काढण्याची हिंमत दाखवावी लागेल. सध्याच्या प्रयत्नांनी हे साध्य होणे कठीण. समाजाच्या organic checks and balances चा उपयोग करून घेणेही महत्वाचे.</p><p>- श्रीपाद कोठे</p><p>१ नोव्हेंबर २०२०</p>k. shripadhttp://www.blogger.com/profile/06682708646050770427noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2240789927220855420.post-69452396084685555802022-10-28T20:01:00.003-07:002022-10-28T20:01:27.700-07:00जेपींचा वारसा<p>नरेंद्र मोदी यांनी पाटण्याच्या सभेत `जे जेपींना सोडू शकतात ते बीजेपीही सोडू शकतात' अशी बोचरी टीका नितीश कुमार यांच्यावर केली. त्याला नितीश कुमारांनी आज उत्तर दिले. आणखीनही बरेच राजकारणी जेपींचे नाव जपत असतात. प्रश्न असा की जेपी म्हणून प्रसिद्ध असलेले जयप्रकाश नारायण यांचे खरे उत्तराधिकारी कोण? जेपी यांच्याबद्दल पूर्ण आदर बाळगूनही एक ऐतिहासिक सत्य दुर्लक्षित करता येत नाही की, जयप्रकाशजींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळेच यश लाभले. मुळात जयप्रकाशजींचे आंदोलन आकाराला आले ते गुजरातमधून आणि त्याचे शिल्पकार होते नानाजी देशमुख. बिहारमध्ये त्यांनी मोठी सभा वगैरे घेतली होती, पण ती तेवढ्यापुरतीच होती. नानाजींनी सूत्रे हाती घेतली आणि त्याचे विशाल आंदोलन झाले. आणिबाणीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरात जेपींनी जे उद्गार काढले ते पाहिले तर सगळ्या शंका दूर होतात.</p><p>जयप्रकाशजीचा, सरदार पटेलांचा, एवढेच नव्हे तर महात्मा गांधींचाही खरा वारसदार जर कोणी असेल तर तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघच आहे.</p><p>- श्रीपाद कोठे</p><p>२९ ऑक्टोबर २०१३</p><p>कारण मुळात आणि प्रामाणिकपणे संघ त्याच्या जन्मापासूनच कोणालाही विरोधक वा शत्रू मानत नाही. `सर्वेषां अविरोधेन' हीच संघाची सततची भूमिका आहे. आणि हे केवळ बोलणे नाही व्यवहारही तसाच आहे. म्हणूनच पहिल्या बंदीनंतर गोळवलकर गुरुजींनी देशभर एकच भूमिका मांडली- `वयं पंचाधिकम शतम' आणि बाळासाहेब देवरसांनी दुसर्या बंदीनंतर देशभर भूमिका मांडली- `forget & forgive'. पंजाबमधील दहशतवादाच्या वेळी हिंदू-शीख असा भेद करून वातावरण तापत असताना, संघ शाखांवर हल्ले होत असताना बाळासाहेब देवरस यांनी स्पष्ट भूमिका घेतली `no retaliation'. सगळेच पक्ष आपलेच आहेत. कोणताही पक्ष शत्रू नाही वा परका नाही. संघाची ही भूमिका मोरोपंत पिंगळे यांनी जाहीरपणे नागपुरात विमानतळाजवळच्या डो. हेडगेवार चौकाच्या उदघाटनाच्या वेळी मांडली होती. १९६८ साली संविद सरकारे स्थापन करताना दीनदयाल उपाध्याय यांनीही हीच भूमिका घेतली होती. मुद्दा हा आहे की, अन्य पक्ष संघाला आपला शत्रू मानतात. तसेच वागतात. मग स्वाभाविकच स्वयंसेवकांना त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटत नाही. आणि संघासोबत राहणे त्या पक्षांना अनेक कारणांनी परवडत नाही. समस्या ते पक्ष आणि संघाचा विरोध करणार्यांची आहे. संघाची नाही.</p><p><br /></p><p>मी नरहर कुरुंदकर वाचेन, पण त्यांचे मत काय आहे त्यावरून मी मत बनवणार नाही. दुसरे असे की, जयप्रकाशजींचे स्वत:चे मतच महत्वाचे. आणि जेपींचे मत किती प्रखर होते? जेली म्हणाले होते- `संघ जर facist असेल तर मीही facist आहे.' अन्य मतांची काय गरज?</p><p><br /></p><p>देशातलं प्रत्येक सरकार हे देशाचं सरकार असतं, मग त्यांना फक्त ४०-४५ टक्के लोकांचाच पाठींबा का असतो? किंवा ४०-४५ टक्के पाठींबा असणार्या सरकारला देशाचं सरकार म्हणायचं का? मुद्दा सत्तेचा- संघावर आक्षेप घेणारेच ठरवतात की संघाला सत्ता प्राप्त करायची आहे वगैरे किंवा संघाला या राष्ट्रासाठी काही करायचं असेल तर त्याने सत्ता मिळवली पाहिजे वगैरे. आणि प्रश्न विचारतात. संघाने सत्ता का मिळवायची? टीकाकारांना वाटते म्हणून? संघाचा विचारच वेगळा आहे. त्या विचारात सत्तेला स्थान नाही असे नाही, पण तो विचार सत्तासापेक्ष नाही. संघाने जे स्वप्न पाहिले आहे, त्यात सत्ता ही खूप छोटी गोष्ट आहे. बाकीच्यांना वाटते तेवढे महत्व संघाला सत्तेचे वाटत नाही. सत्ता हे संघाचे उद्दीष्टच नाही. कोणाला त्यावर विश्वास आहे की नाही हा ज्याचा त्याचा भाग आहे. संघाने नेहमीच `पथ का अंतिम लक्ष्य नही है, सिंहासन चढते जाना... सब समाज को लिये साथ मे आगे है बढते जाना...' असाच संस्कार दिला आहे. तसे नसते तर ईशान्य भारतात शेकडो कार्यकर्ते घरदार सोडून कशाला सेवाकार्यात लागले असते?</p><p><br /></p><p>अन्य समाज लोकसंख्या हे हत्यार म्हणून वापरणार असतील वा तशी तयारी करीत असतील तर हिंदूंनाही त्याचा तसाच विचार करावा लागेल. आम्ही कोणावर आदळणार नाही, पण आमच्यावर कोणी आदळत असेल तर त्याची काळजीही आम्ही घेतली पाहिजे; हा तर सामान्य जीवशास्त्रीय नियम आहे ना?</p><p><br /></p><p>पोपने तर संपूर्ण आशिया ख्रिश्चन करण्याचा संकल्प आपल्या नवी दिल्लीतील विज्ञान भवनात जाहीर केला होता.</p>k. shripadhttp://www.blogger.com/profile/06682708646050770427noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2240789927220855420.post-26715355325174995122022-10-26T20:56:00.001-07:002022-10-26T20:56:36.710-07:00विरोधी पक्ष की सहयोगी पक्ष<p> - चुकीचा विचार चुकीच्या शब्दांना जन्म देतो, ते शब्द चुकीचे भाव आणि चुकीच्या धारणा घेऊन पुढे जातात, अन ही मालिका सुरूच राहते. 'विरोधी पक्ष' हे असेच चुकीचे शब्द. त्याऐवजी सत्ताधारी पक्ष आणि सहयोगी पक्ष अशी शब्दावली रूढ व्हायला हवी. देशातले सगळे पक्ष देशाचे पक्ष आहेत आणि सहयोगी पक्ष आहेत. कोणीही विरोधी नाही. हास्यास्पद वाटणारा हा प्रयोग नेटाने रेटला तर भविष्यात फरक दिसेल. सगळ्याच गोष्टींचं असंच असतं नं?</p><p>- श्रीपाद कोठे</p><p>२७ ऑक्टोबर २०१८</p>k. shripadhttp://www.blogger.com/profile/06682708646050770427noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2240789927220855420.post-77890460434869293382022-10-26T20:43:00.002-07:002022-10-26T20:43:20.224-07:00चलनी करण नको<p>सध्या दिवाळीची हवा आहे. दिवाळी हा लक्ष्मीचा सण. या सणाच्या शुभेच्छांमध्ये 'ज्ञानाची दिवाळी' वगैरे येत असले तरीही, कोणी ते फार गंभीरपणे घेत नाही. मात्र दिवाळीला अवकाश असल्यामुळे लक्ष्मी आणि ज्ञान यांना एकत्र करणारा एक विचार - 'सगळ्या गोष्टींचे चलनीकरण ही चुकीची गोष्ट आहे.' त्यामुळे जीवनाचं मूल्यवर्धन होत नाही. सगळ्या गोष्टींची किंमत पैशात करू नये हे आपल्याला बऱ्यापैकी कळतं. (वळतं का माहिती नाही.) पण सगळ्या गोष्टीचं चलनीकरण नको हेही तेवढंच महत्वाचं आहे. जसे अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेचा विचार करताना ती किती बिलियन किंवा ट्रीलीयन डॉलर्सची आहे हे बोललं जातं. हे अयोग्य आहे. केंद्र सरकारनेही असं काही उद्दिष्ट ठेवलं आहे. हे बरोबर नाही. त्या ऐवजी अमुक काळानंतर देशात कोणीही उपाशी झोपणार नाही, कोणीही अशिक्षित राहणार नाही, कोणीही उपचारवंचित राहणार नाही; अशी उद्दिष्ट हवीत. अशीच भाषाही हवी. कारण डॉलर्समध्ये उद्दिष्ट ठरवलं की फोकस डॉलर्सवर होतो. भूक, आरोग्य, शिक्षण असं उद्दिष्ट ठेवलं की फोकस त्या गोष्टींवर होतो. अन फोकस कशावर आहे त्यानुसार गोष्टी आकार घेतात. केंद्रात भाजप सरकार असल्याने ही भाषा बदलण्याची थोडी अपेक्षा करता येते. पण जागतिक शक्ती, नाणेनिधी, जागतिक बँक, अर्थतज्ज्ञ; यासारखी कारणे देऊन जर तीच डॉलर्सवाली भाषा सुरू राहिली तर जीवनाचं चलनीकरण आणखीन वाढत जाईल. हा बदल करण्यासाठी हिंमत, धैर्य, बांधिलकी हवे आणि त्यासाठीची बौद्धिक, सैद्धांतिक तयारी भरपूर हवी. ती तयारी आहे का मला ठाऊक नाही, पण एवढं ठाऊक आहे की, भारताने जगाच्या पावलावर पाऊल न टाकता वेगळी वाट चोखाळली तरी भारताला काही म्हणण्याची वा खोडा घालण्याची शक्ती आज कोणाकडे नाही. प्रश्न फक्त आपल्या संकल्पाचा आहे.</p><p>- श्रीपाद कोठे</p><p>२७ ऑक्टोबर २०२१</p>k. shripadhttp://www.blogger.com/profile/06682708646050770427noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2240789927220855420.post-20153760081913749422022-10-24T20:13:00.003-07:002022-10-24T20:13:14.062-07:00बावळट भाटांचा विजय असो<p>माणूस किती निर्बुद्ध वा बावळट असू शकतो? आयबीएन-लोकमत पाहताना आज या प्रश्नाचं उत्तर मिळालं. ते उत्तर आहे, कुमार केतकर यांच्याएवढा. का? याला आधार त्यांचं एक विश्लेषण. भारतीय जनता पार्टीने `कॉंग्रेसमुक्त भारत' अशी घोषणा दिली आहे. त्यावरील त्यांचा अभिप्राय- `देशाला कॉंग्रेसमुक्त करायचे म्हणजे, हेडगेवारमुक्त आणि वल्लभभाईमुक्तही करावे लागेल. कारण हेडगेवार आणि वल्लभभाई पटेल हे पण कॉंग्रेसचेच होते.'</p><p>माझे आक्षेप-</p><p>संघ कॉंग्रेसविरोधी आहे म्हणताना हेडगेवार कॉंग्रेसचे होते हे का आठवत नाही?</p><p>यांच्याच तर्काने जायचे तर, हेडगेवार हिंदुत्वसमर्थक होते म्हणजे कॉंग्रेस पण हिंदुत्वाची समर्थक आहे का?</p><p>कॉंग्रेस विसर्जित करावी असे स्वत: महात्मा गांधी यांनी म्हटले होते. म्हणजे नेहरू, पटेल यांच्यासह सगळे नेते; एवढेच नव्हे तर कॉंग्रेसने दिलेला स्वातंत्र्याचा लढा आणि मिळवलेले स्वातंत्र्य यांचेही विसर्जन करायला हवे असेच गांधीजींना म्हणायचे होते का?</p><p>अनेक जागतिक संस्था अनेक अहवाल सादर करीत असतात. त्यांचे निष्कर्ष असतात- कधी भारत अप्रामाणिक आहे, कधी भारत मागासलेला आहे; वगैरे. म्हणजे केतकर अप्रामाणिक आहेत, मागासलेले आहेत असाच त्याचा अर्थ होईल का?</p><p>आपण सगळे म्हणतो, अमुक एकाचे ऑपरेशन झाले. म्हणजे त्या व्यक्तीचे डोळ्याचे, डोक्याचे, हाताचे, पायाचे, हृदयाचे, नाकाचे, कानाचे, पोटाचे, हाडाचे; असे सगळ्याच गोष्टींचे ऑपरेशन झाले असे म्हणायचे का?</p><p>तुम्ही-आम्ही असे म्हणत नाही, कारण आपण केतकर यांच्याएवढे निर्बुद्ध आणि बावळट नसतो. बावळट भाटांचा विजय असो.</p><p>- श्रीपाद कोठे</p><p>२५ ऑक्टोबर २०१३</p>k. shripadhttp://www.blogger.com/profile/06682708646050770427noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2240789927220855420.post-70363992658560268752022-10-20T20:07:00.004-07:002022-10-20T20:07:25.355-07:00हिंदुत्व<p>- हिंदुत्व हे राजकारण वा समूह अस्मिता एवढंच राहीलं तर काय होतं याचं, नेपाळ हे चांगलं उदाहरण आहे. हिंदुत्वाचं तत्व तिथे फार कधी नव्हतंच. किंवा असेल तर ते टिकवून ठेवता आलं नाही. त्याचाच हा परिणाम.</p><p>- मुस्लिम, ख्रिश्चन वा साम्यवाद यांना उर्वरित जगाच्या तुलनेत भारतात यश मिळालं नाही; हे आपण मान्य करतो पण; असं का झालं याची चिकित्सा करत नाही.</p><p>- ज्याला हिंदूंची दुर्बलता म्हटले जाते वा सांगितले जाते, ती खरंच दुर्बलता किती आणि शक्ती किती; याचाही विचार करायला हवा.</p><p>- श्रीपाद कोठे</p><p>२१ ऑक्टोबर २०२०</p>k. shripadhttp://www.blogger.com/profile/06682708646050770427noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2240789927220855420.post-87965994283983865232022-10-15T20:19:00.003-07:002022-10-15T20:19:30.285-07:00महत्त्वाचा मुद्दा कोणता?<p>सरसंघचालकांच्या कालच्या भाषणातील कोणता मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा वाटला? असा प्रश्न एकाने विचारला.</p><p>त्यावर माझं उत्तर होतं - 'आपण या जगाचे स्वामी नाही आहोत. ईशावास्यम इदं सर्वम.' हा मुद्दा.</p><p>त्यावर तो म्हणाला, पण हे फार तात्त्विक आहे.</p><p>मी म्हटलं 'हो.'</p><p>त्यावर तो पुन्हा म्हणाला - 'बाकीच्या व्यावहारिक गोष्टींचं काय?'</p><p>मी - 'बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आलेला आहे त्याच्या कारणांच्या मुळाशी आणि सोडवणुकीच्या प्रारंभाशी नेणारा हा विचार आहे. ज्याला तू तात्त्विक म्हणतो आहेस तो. तालिबान, लोकसंख्या, मंदिर व्यवस्थापन, कुटुंब प्रबोधन, राजकीय संस्कृती, फेडरल व्यवस्था; सगळ्या सगळ्या प्रश्नांचं मूळ आणि उत्तर त्यात आहे. त्याचा विचार फार कोणी करणार नाही. पण त्याकडे लक्ष दिल्याशिवाय समस्यांची उकल आणि सोडवणूक पण होणार नाही.'</p><p>- श्रीपाद कोठे</p><p>१६ ऑक्टोबर २०२१</p>k. shripadhttp://www.blogger.com/profile/06682708646050770427noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2240789927220855420.post-64286042602660461022022-10-14T21:13:00.003-07:002022-10-14T21:13:19.685-07:00नोबेल पुरस्कार विजेत्या कडून अपेक्षा<p>अभिजित भट्टाचार्य यांना मिळालेल्या अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्कारावर होणारी टीका मला मान्य नाही. मी त्यांचे अभिनंदन करतो. फक्त या अभिनंदनासोबत एक अपेक्षा व्यक्त करतो की, जगाची नीट न्यायपूर्ण आर्थिक घडी बसवण्यासाठी काही मार्ग आणि उपाय त्यांनी सांगावे. भारतात मोदी सरकार असल्याने आणि सध्या भारताला हिंदुत्वाचा विळखा असल्याने भारताचं भलं होणं अयोध्येतल्या प्रभू रामावर सोपवू. पण आज अमेरिका ते रशिया, व्हाया चीन आणि इक्वेडोरपासून श्रीलंकेपर्यंतची सगळी स्थानके; येथील आर्थिक स्थिती; संपत्तीचे असमान वाटप आणि आहे रे - नाही रे यांच्यातील जमीन आस्मानाचे अंतर; जागतिक मंदी; जागतिक कुपोषण; बँका आणि कंपन्या बुडणे; युनोची दिवाळखोरी; अशा अक्षरशः न संपणाऱ्या यादीची लांबी कशी कमी करता येईल याचा मार्ग दाखवला तर पुढेमागे बिचाऱ्या भारताला काही शिकता येईल. मागे आणखीन एक बंगाली बाबू आदरणीय अमर्त्य सेन यांनाही नोबेल मिळाले होते. त्यावेळीही आशा जागी झाली होती पण काही साधलं नाही. बांगला भाषिक आणि मुस्लिम अशाही एका मोठ्या अर्थतज्ञाला बांगलादेशातील प्रयोग वगैरे लक्षात घेऊन नोबेल मिळाले होते. पण अजून बांगला देशाचे आर्थिक चित्र चांगले झाल्याचे कोणी बोलताना दिसत नाही. तेव्हा अभिजित बाबू काही करतील अशी आशा अन अपेक्षा ठेवून त्यांचे अभिनंदन करतो.</p><p>- श्रीपाद कोठे</p><p>१५ ऑक्टोबर २०१९</p>k. shripadhttp://www.blogger.com/profile/06682708646050770427noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2240789927220855420.post-1265723175881012042022-10-12T21:32:00.003-07:002022-10-12T21:32:16.148-07:00प्रगती म्हणजे... ... ...<p>२९ ऑक्टोबर १८९६ रोजी लंडन शहरात `आत्मसाक्षात्कार' या विषयावर दिलेल्या व्याख्यानात स्वामीजी म्हणाले- `विषयभोगवासना कधीकधी अत्यंत धोक्याच्या पण अतिशय भुरळ पाडणाऱ्या एका आगळ्याच कल्पनेचे रूप घेत असते. ही कल्पना तुम्हाला नेहमीच ऐकू येईल. अगदी जुन्या काळीही ती होतीच. ती तुम्हाला प्रत्येक धर्माच्या अनुयायात आढळून येईल. ती कल्पना अशी की, अशी एक वेळ येईल की ज्यावेळी जगातली सर्व दु:खे लयास जातील, केवळ सुखेच मागे उरतील आणि ही पृथ्वी स्वर्ग होऊन जाईल. यावर माझा विश्वास नाही. ही पृथ्वी जशी आहे तशीच सदा राहणार आहे. असे म्हणणे फार कठोर आहे खरे, पण तसे म्हटल्याखेरीज काही गत्यंतर दिसत नाही. या जगातील दु:ख माणसाच्या शरीरातील संधिवातासारखे आहे. संधिवाताला तुम्ही एका अवयवातून हुसकून लावा, तो दुसऱ्या एखाद्या अवयवात शिरतो. तिथून हाकला की तो तुम्हाला आणखीच कुठेतरी सतावू लागतो. तुम्ही काहीही करा, तो आपले ठाण सोडायचा नाही. फार जुन्या काळी लोक जंगलात राहत आणि एकमेकांना मारून खात. आजच्या काळात ते एकमेकांचे मांस खात नाहीत खरे, परंतु अगदी मन लावून एकमेकांना ठकवितात. या ठकवाठकविने देशचे देश, शहरेची शहरे पोखरून निघत आहेत. हे काही प्रगतीचे चिन्ह नव्हे. आणि जगात जिला तुम्ही प्रगती म्हणता ती म्हणजे वासनांनी वासनांना गुणायचे याखेरीज आणखी दुसरे काय आहे? वासनांच्या संतत वृद्धीखेरीज आणखी काय आहे हे मला तरी काही कळत नाही. मला जर काही अगदी स्पष्ट दिसत असेल तर ते म्हणजे हेच की, दु:खे सगळी वासनांमुळे ओढवत असतात. वासना म्हणजे एखाद्या भिकाऱ्यासारखी दशा. तो सदा कशाची तरी भिक मागत असतो. कोणत्याही गोष्टीकडे `ही मला मिळाली पाहिजे' या वासनेखेरीज तो बघूच शकत नाही. सदा लसलस, सदा पाहिजे, पाहिजे, आणखी पाहिजे हीच भगभग. वासना तृप्त करण्याची आपली शक्ती जर गणितश्रेढीने वाढली तर वासनेची शक्ती भूमितीश्रेढीने वाढत असते. या जगातल्या सुखांची आणि दु:खांची बेरीज सदैव सारखी असते. समुद्रात एका जागी लाट उंचावली की दुसरीकडे त्यामुळे खळगा पडत असतो. जर एखाद्या माणसाला सुख लाभले तर दुसऱ्या एखाद्या माणसाला किंवा पशुला त्यासाठी दु:ख भोगावे लागते. माणसांची संख्या वाढत आहे आणि पशूंची संख्या घटत आहे. आपण त्यांना मारून टाकून त्यांची जमीन हिसकून घेत आहोत. आपण त्यांचे सगळे खाद्य लुबाडून घेत आहोत. असे असता- सुख वाढत आहे असे आपण कोणत्या तोंडाने म्हणू शकू? प्रबळ देश दुबळ्यांचा फन्ना उडवीत आहेत. त्याने ते प्रबळ देश सुखी होतील असे का तुम्हास वाटते? मुळीच नाही. ते मग एकमेकांचा नि:पात करू लागतील. एक व्यवहारी माणूस या दृष्टीने मला हे मुळीच कळत नाही की या जगाचा स्वर्ग कसा काय बनणार आहे? वस्तुस्थिती याच्या अगदी विरुद्ध आहे. व्यवहारी दृष्टी सोडून तात्त्विक दृष्टीने विचार केला तरी मला हे शक्य दिसत नाही.'</p><p>- श्रीपाद कोठे</p><p>१३ ऑक्टोबर २०१४</p>k. shripadhttp://www.blogger.com/profile/06682708646050770427noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2240789927220855420.post-34761704930954710542022-10-10T22:15:00.003-07:002022-10-10T22:15:30.704-07:00महिलांचे सर्वेक्षण<p>दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्राने केलेल्या भारतीय स्त्रियांच्या सद्यस्थितीच्या सर्वेक्षणाचे लोकार्पण काल नागपूरला झाले. त्या कार्यक्रमाचे वृत्त आजच्या वृत्तपत्रात आले आहे. राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी या प्रसंगी बोलताना एक विचार मांडला की - 'हे सर्वेक्षण उत्कृष्ट झाले आहे पण विदेशी मापदंडाने झाले आहे. सर्वेक्षणाचे मापदंड भारतीय दृष्टीने तयार व्हावयास हवे.' अतिशय महत्त्वाचा आणि मूलभूत असा हा विचार आहे. तसेच केवळ महिला या विषयापुरता मर्यादित नसून; सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, मनोरंजन, वैद्यक, कला, कामगार, विकास, उपासना आणि जीवनाच्या सगळ्याच अंगांना लागू होणारा आहे. अनेक गोष्टी चांगल्या आणि चांगल्या हेतूंनी केल्या जातात; पण तेवढे पुरेसे नसते. तात्कालिक, दीर्घकालीन आणि चिरंतन असा सगळा विचार आवश्यक असतो. त्या दृष्टीने शांताक्काजी यांनी मांडलेला मूलभूत विचार पाहिला पाहिजे.</p><p>- श्रीपाद कोठे</p><p>११ ऑक्टोबर २०१९</p>k. shripadhttp://www.blogger.com/profile/06682708646050770427noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2240789927220855420.post-32175175676439059332022-10-10T22:09:00.002-07:002022-10-10T22:09:19.177-07:00बाष्कळ राहुल<p>राहुल गांधीच्या कालच्या विधानावर संघ, समितीकडून काही प्रतिक्रिया येत आहेत. कशाला हवीत ही स्पष्टीकरणे? हो, संघ ही पुरुषांची संघटना आहे आणि समिती ही महिलांची संघटना आहे. प्रत्येक संघटना आपापली मर्यादा, कामाची पद्धती ठरवू शकते की नाही? फक्त महिलांसाठी वा फक्त पुरुषांसाठी असे काम असू शकते की नाही? एकत्रित काम करायचे की वेगवेगळे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य आहे की नाही? राहुलसारखे मूर्ख काहीही बरळणार, त्यावर त्यांच्याहून विद्वान संपादक, पत्रकार चर्चा करणार, संघात महिला नाहीत म्हणून संघ महिलाविरोधी आहे; असे गाढवाला शोभणारे तर्कट देणार. अन आम्ही त्याला उत्तरे देणार? कशाला? मुळात समता वगैरे म्हणजे काय हे समजण्याची कुवत किती जणांची आहे? खरं तर समता वगैरेच्या नावाने जो बाष्कळपणा सुरु आहे त्याचीच झाडाझडती घेण्याची गरज आहे. बावळटांच्या निर्बुद्ध तर्कटांना आम्ही बळी पडण्याची गरज नाही.</p><p>या निमित्ताने संघ, हिंदुत्व, धर्म, परंपरा, संस्कृती, भारतीयता इत्यादीवर उठताबसता तोंडसुख घेत राहणाऱ्या, तमाम स्त्रीवादी महिला आणि पुरुषांचाही तीव्र निषेध. अतिशय अप्रस्तुत आणि अशोभनीय अशा राहुलच्या बकवासनंतर त्यांना तोंडही उघडावेसे वाटले नाही. हाच त्यांच्या मनातील महिलांचा आदर म्हणायचा का?</p><p>- श्रीपाद कोठे</p><p>११ ऑक्टोबर २०१७</p>k. shripadhttp://www.blogger.com/profile/06682708646050770427noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2240789927220855420.post-9182565619755996442022-10-09T07:03:00.008-07:002022-10-09T07:03:48.618-07:00 हे-ते च्या पलीकडे<p>यशवंत सिन्हा यांनी सरकारच्या अर्थनीतीवर टीका केली. नंतर अरुण शौरी यांनीही तसे केले. काल republic च्या sunday debate मध्ये पाहिलं, तिस्ता सेटलवाडला कडवी झुंज देत मोदींना defend करणारे यतीन ओझा हे केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणाची कडाडून आलोचना करीत होते. या सगळ्यांच्या आधी, सिन्हा यांच्याही खूप आधी, गोविंदाचार्य यांनीही केंद्राच्या अर्थनीतीवर टीका केली होती. राजकीय गणिते किंवा त्यांचे व्यक्तिगत हानीलाभाचे हिशेब हे यामागील कारण असू शकते. तशी टीकाही होते.</p><p>परंतु भारतीय मजदूर संघाने नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत केंद्राच्या आर्थिक धोरणांवर कठोर टीका केली. एवढेच नाही तर येत्या १७ तारखेला दिल्लीत मोठ्या निदर्शनांची घोषणा केली. भारतीय किसान संघाच्या एका प्रतिनिधीने राज्यसभा टीव्हीवर बोलताना सांगितले की, सुरुवातीला आम्हाला बैठकीला वगैरे बोलावले तरी जात होते. आता तेही बंद झाले आहे. या ठिकाणी कोणती राजकीय लाभहानी म्हणावी?</p><p>खरं असं आहे की, आपण समाज म्हणून अजून परिपक्व झालेलो नाही. सगळ्या गोष्टींचा जसा समन्वित विचार करायचा असतो, तसेच त्या समजून घेण्यासाठी त्याचे स्वतंत्र विश्लेषणही करायचे असते. वर्गीकरण आणि वर्गांचे संश्लेषण दोन्ही हवे. आम्ही मात्र एकच गोष्ट धरून ठेवतो. अर्थकारणाच्या बाबतीतही तेच होते आहे. यावेळी मी मोदी/ भाजप/ संघ विरोधक यांच्याबद्दल बोलत नाहीय. ते विरोध करतच राहणार. पण जे असे विरोधक नाहीत त्यांनी स्वतंत्रपणे विचार न करता मोदी वा केंद्र सरकार यांचे डोळे मिटून समर्थन करण्याचे काय कारण? किंवा कोणी टीका केली तर त्याची हेटाळणी करण्याची काय गरज? मुळात असा स्वतंत्र नीट विचार केला पाहिजे हे मोदी/ भाजप/ संघ समर्थक समजू शकतील. कारण त्यांना तीच शिकवण आणि संस्कार मिळतात. बाकीच्यांना ती शिकवण आणि ते संस्कार मिळत नाहीत. (व्यक्तिगत शिकवण वा संस्कार म्हणत नाही. ते असू शकतात.) त्यामुळे सगळ्यांनी नीट विचार करून समर्थन वा टीका करावी.</p><p>माझे मत काय? भाजपने सत्ताप्राप्तीसाठी जेवढी मेहनत घेतली तेवढी मेहनत अर्थकारणासाठी घेतलेली नाही. सध्याच्या केंद्र सरकारची आर्थिक धोरणे योग्य नाहीत. मुळात अर्थकारणाबाबत भाजप फारसा गांभीर्याने विचारच करत नाही, असे माझे मत आहे. अन हे मत फार जुने आहे. आजचे नाही. व्यक्तिगत अनुभवांच्या आधारेही बरेच लिहिता येईल. ते योग्यही नाही अन हे ते स्थानही नाही.</p><p>खूप मोठा विषय आहे. एक दोन गोष्टींचा फक्त निर्देश करतो. १) मागणीनुसार पुरवठा आणि २) उपलब्धतेनुसार किमती; हे अर्थशास्त्राचे दोन मुलभूत सिद्धांत. आज जगभरात आणि भारतातही हे दोन्ही धाब्यावर बसवले आहेत. आजचे सगळे अर्थकारण या दोन्हीच्या विपरीत आहे. नुकतीच १९७१ ची किराणा यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्याच्याशी आजची तुलना करून पाहिल्यास माझा मुद्दा पटेल. किंवा काही वर्षांपूर्वी सोन्याचे भाव १८ हजारावरून एकदम ३२ हजारापर्यंत गेले होते. ते नीट समजून घेतल्यास मुद्दा पटेल. उदाहरण म्हणून घरांच्या किमतीही घेता येतील. आज जे भाव वाढतात ते मागणी वाढल्याने वाढत नाहीत. हे अर्थशास्त्राच्या विपरीत आहे. तसेच एकीकडे उत्पादन वाढते तर दुसरीकडे भावही वाढतात. वास्तविक उत्पादन वाढीने भाव खाली यायला हवेत. तसे न होणे अर्थशास्त्राच्या विपरीत आहे. ६०-७० वर्षांपूर्वीची जगाची लोकसंख्या आज जेवढी वाढली आहे, त्या प्रमाणात किमती अव्वाच्या सव्वा वाढल्या आहेत. आजचे अर्थकारण आणि अर्थतंत्र प्रचलित अर्थशास्त्राच्याही विपरीत आहे. गांधी, दीनदयाळ आदींनी मांडलेल्या अर्थशास्त्राचा तर प्रश्नच नाही. कालच पियुष गोयल यांनी एक मुद्दा मांडला की, सरकार नवीन नोकऱ्या निर्माण करत नाही याचा अर्थ बेरोजगारी वाढते असा होत नाही. तर स्वयंरोजगार वाढतो आहे. त्यांचे म्हणणे काही अंशी खरे आहे. सरकारने नोकऱ्या निर्माण करणे वा देणे हा एकच पर्याय नसतो. परंतु लोक स्वयंरोजगार करतील यासाठी तशी धोरणे हवीत. विकासाची ती दिशा असायला हवी. केवळ त्यांना कर्जे देणे म्हणजे स्वयंरोजगाराला चालना देणे नसते. अशा बऱ्याच गोष्टी आहेत.</p><p>हे बदलणे सोपे नक्कीच नाही. पण त्यासाठी प्रयत्न करणे, प्रयत्नांची ती दिशा असणे हे भाजपकडून अपेक्षित आहे. त्याऐवजी भाजप प्रवाहपतितासारखा वागतो, बोलतो आहे. हे बदलायला हवे एवढे खरे.</p><p>- श्रीपाद कोठे</p><p>नागपूर</p><p>९ ऑक्टोबर २०१७</p>k. shripadhttp://www.blogger.com/profile/06682708646050770427noreply@blogger.com0