आजचा दिवस आयुष्यात आलाच नसता तर फार बरं झालं असतं. घरच्या दोन वृक्षांचा
आज बळी गेला आणि तो उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय काहीही मी करू शकलो
नाही. निराश, हतबल वगैरे सारं काही वाटते आहे आज. एक वृक्ष शेवग्याचा आणि
दुसरा कडूलिंबाचा. अनेक दशके जुने हे वृक्ष. त्यांची खोडंच प्रत्येकी
२००-३०० किलोची असतील. फेसबुकवर शेअर केलेली एक माहिती आठवली, एक झाडं किती
प्राणवायू तयार करतं वगैरे. लाज वाटली स्वत:ची.
असं होतं तर का
तोडली ही झाडं? मुळात शेवग्याच्या झाडाने जमीन सोडली होती. त्याचा स्वत:चाच
भार त्याला सावरत नव्हता. ते पडण्याची भीती होती. आजूबाजूला दोन घरे होती.
विजेच्या तारा होत्या. त्यामुळे ते तोडावं लागणारंच होतं. कडूलिंबाच्या
झाडाचं मात्र तसं काहीही नव्हतं. ते मध्ये येत नव्हतं आणि वाकलं वगैरे तर
मुळीच नव्हतं. नागपूरच्या जगप्रसिद्ध उन्हाळ्यात आजूबाजूची चार घरं थंड
ठेवत होतं. उपकारच होते त्याचे. कडूलिंबाचे उपयोग वगैरे सगळं पाठ होतं. पण
काहीही इलाज नव्हता.
कडूलिंबाचं झाड तोडावं लागलं त्यामागे दोन
कारणे होती. एक म्हणजे शेजाऱ्याचं त्याच्याशी असलेलं शत्रुत्व. मागे काही
वर्षांपूर्वी तर न सांगता सवरता चक्क आमच्या हद्दीतील ते झाड तोडून
टाकण्याचा प्रयत्न शेजाऱ्याने केला होता. तो सतर्कतेने टाळता आला. पण
त्याच्या मनात ते सलत होतंच. तो उघडपणे हे करत होता तरीही अन्य
शेजाऱ्याचाही तोच ताल होता. दुसरे कारण होते, झाड तोडणारी माणसे. एवढे मोठे
झाड आपण तोडणे शक्यच नव्हते. त्यासाठी माणसे बोलावली. त्यांची अट एकच.
आम्ही शेवग्याचे झाड तोडतो, पण आम्हाला कडूलिंबाचेही झाड द्या. ते देणार
नसाल तर शेवग्याचे झाड तोडण्याचे सहा हजार रुपये द्या. ज्यावेळी
त्यांच्याशी बोलणी झाली तेव्हा त्यांचा सारा भर काही हजार रुपये
घेण्यापेक्षा कडूलिंबाच्या झाडावरच होता. शेजाऱ्याला तर काय संधी आयतीच
चालून आली. झाले. सौदा ठरला आणि दोन्ही वृक्ष पाहता पाहता नामशेष झालेत.
दोन
झाडे गेलीत आणि असंख्य पक्षांची वसती उजाड झाली. खारूताईचं क्रीडास्थान
धुळीस मिळालं. घराची सावली गेली. शुद्ध प्राणवायु युक्त हवा गेली.
मनीम्याऊचं पाठ खाजवण्याचं साधन गेलं. आता पाखरं येतील आणि भिरभिर पाहत
निघून जातील. जन्माला आल्यापासून एका जागी उभं राहण्याचं प्राक्तन नशिबी
घेऊन आलेल्या या झाडांच्या बुंध्याला टेकून उभं राहिलं की, आपले भोग शीतल
होत असत. आता ती शीतलता गेली.
काही गोष्टींना इलाज नसतो. इथे तर
गरज, अपरिहार्यता, परिस्थितीची कोंडी; अशा पुष्कळ गोष्टी एकत्र झाल्या
होत्या. त्यांनी बाजी मारली. इथपर्यंत ठीक आहे. म्हणूनच मनाची समजूतही
घालता येईल. पण ही झाडे तोडल्यानंतर शेजाऱ्यांच्या चेहऱ्यावर आणि स्वरातून
जो आनंद ओसंडून वाहताना पाहिला त्याचं काय करायचं? झाडे गेली त्याचं दु:ख
आहेच, आपण काही करू शकलो नाही याचं त्याहून अधिक दु:ख आहे. पण
शेजाऱ्यांच्या या आनंदाचं दु:ख नाही, घृणा वाटते. आणि थोडीथोडकी नाही अपार
घृणा वाटते. चांगले शिकले सवरलेले. पूजापाठ, भागवत सप्ताह करणारे, गणपती
अथर्वशीर्षाची आवर्तने करणारे ब्राम्हण, (मी जातीचा उल्लेखही करण्याचे
टाळतो पण माझ्या मनातील चीड इतकी आहे की मी तो उल्लेख मुद्दाम केला.)
वर्तमानपत्रे, दूरचित्रवाहिन्या या साऱ्याशी परिचय, माणुसकी- पर्यावरण
वगैरे शब्द माहीत नाही असे नाही... पण केवळ आणि केवळ मनाचा आणि बुद्धीचा
कोतेपणा आणि क्षुद्रता, आळस आणि वृत्तीची दरिद्रता यासाठी वृक्षांचा राग
आणि ते तोडल्यानंतरचा घृणास्पद आनंद.
आयुष्यातील एक दुर्दैवी घटना
म्हणून मनाची समजूत घालेनही, दुसरं छानसं झाड लावून पुन्हा पाखरांना अंगणात
बोलावीनही. पण शेजाऱ्यांच्या या छद्मी आनंदाचं काय करू सुचत नाही. काही
तरी जोरदार ठेच लागावी अशी मनोमन इच्छा आहे. कधी कधी एखादी गोष्ट अयोग्य
आहे हे माहिती असूनही मनाविरुद्ध ती करावी लागते. पण त्याचा आनंद होणे ही
राक्षसी वृत्तीच आहे. म्हणूनच मला शेजारी राहणाऱ्या राक्षसांबद्दल मन मोठे
वगैरे करायचेच नाही. पाहू या प्रभूच्या मनात काय आहे ते...
- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, ३१ मार्च २०१३
शुक्रवार, २६ एप्रिल, २०१३
`आळीन माळीण फुले दे'
`little red flowers' नावाचा चीनी चित्रपट
पाहिला. `निवासी बालवाडी'वरील हा चित्रपट. आपल्या येथे अजून तरी निवासी
बालवाडी ऐकिवात नाही. छोट्या छोट्या मुलांचं जीवन. त्यांचं खाणं पिणं,
खेळणं, रडणं, मैत्री, भांडणं, मारामाऱ्या, इब्लीसपणा, त्यांचं विश्व... आणि
हे सगळं हाताळणाऱ्या त्यांच्या शिक्षिका. या शिक्षिकांचं त्यांना समजून
घेणं, रागावण, शिक्षा करणं, कठोर वागणं, प्रसंगी त्यांना मदत
करणं... सगळं खूप छान होतं. या विद्यार्थ्यांमधील एक व्रात्य मुलगा
चित्रपटाचा हिरो. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर सारी मुले छोटी छोटी लाल फुले
गणवेशावर लावून संचलन करतात आणि शाळेचा निरोप घेतात. चित्रपटाचा व्रात्य
हिरो मात्र अखेरीस एकटाच उरतो. इथे चित्रपटाचा शेवट. एखादा विषय किती सहज
आणि सकसपणे दाखवला जाऊ शकतो, त्याचं हे उदाहरण.
या मुलांचा एक खेळ मात्र आवर्जून सांगितला पाहिजे. आपल्याकडे मुली `आळीन माळीण फुले दे' असा काहीतरी खेळ खेळतात. दोघींनी एकमेकींसमोर उभे राहायचे आणि एकमेकींचे दोन्ही हात डोक्याच्या वर धरायचे. हातांच्या त्या मांडवाखालून सगळ्यांनी जायचे. गाणे म्हणता म्हणता मधेच थांबायचे आणि जो खाली असेल त्याला धरायचे. ज्याला धरले तो बाद. असा काहीसा तो खेळ. त्या खेळाचे चीनी नाव नाही कळले, पण अगदी तोच खेळ `निवासी बालवाडी'तील त्या छोट्या छोट्या मुली खेळल्या. क्षणभर असं वाटलं की, आपल्याच बालवाडीतील चित्रपट आहे की काय.
या मुलांचा एक खेळ मात्र आवर्जून सांगितला पाहिजे. आपल्याकडे मुली `आळीन माळीण फुले दे' असा काहीतरी खेळ खेळतात. दोघींनी एकमेकींसमोर उभे राहायचे आणि एकमेकींचे दोन्ही हात डोक्याच्या वर धरायचे. हातांच्या त्या मांडवाखालून सगळ्यांनी जायचे. गाणे म्हणता म्हणता मधेच थांबायचे आणि जो खाली असेल त्याला धरायचे. ज्याला धरले तो बाद. असा काहीसा तो खेळ. त्या खेळाचे चीनी नाव नाही कळले, पण अगदी तोच खेळ `निवासी बालवाडी'तील त्या छोट्या छोट्या मुली खेळल्या. क्षणभर असं वाटलं की, आपल्याच बालवाडीतील चित्रपट आहे की काय.
व्यवस्थापक स्वामी विवेकानंद - १
स्वामी विवेकानंद यांच्या बहुमुखी प्रतिभेचे एक दर्शन त्यांच्या
व्यवस्थापक, प्रशासक, संघटक या रूपातही होते. आध्यात्मिक व वैचारिक
प्रबोधनाचे काम वाढावे, फोफावावे आणि निरंतर सुरु राहावे यासाठी संस्थात्मक
कामाची उभारणीही स्वामीजींनी केली. त्यासोबतच समाजात चैतन्य निर्माण
करण्यासाठी आणि समाज शक्तिमान करण्यासाठी सेवाकार्ये वगैरेची सुरुवातही
केली. प्रचंड प्रमाणात केलेली भटकंती, प्रबोधन हेदेखील लक्षणीय आहे. या
सगळ्याच कामांमध्ये त्यांच्यातील व्यवस्थापक, संघटकाचे रूप पाहायला मिळते.
सत्ता, संपत्ती, संघटन यापैकी काहीही साथीला नसताना स्वामीजींनी अफाट कार्य केले हे विसरता येत नाही. उलट अक्षरश: शून्यातून सृष्टीची निर्मिती त्यांनी केली असेच म्हणावे लागेल. यासाठी माणसे, पैसा, जागा, कार्यपद्धती, वातावरण हे सारे त्यांनी उभारले. त्यासाठी आवश्यक त्या असंख्य लहानमोठ्या सूचना करण्यापासून जी अनेक व्यवधाने त्यांनी सांभाळली ती आश्चर्य करावी अशीच आहेत.
कोलकाता येथे मठाची स्थापना, त्याचा बेलूरच्या विस्तीर्ण जागेत विस्तार, चेन्नई मठाची स्थापना, हिमालयातील अलमोडा येथे अद्वैत आश्रमाची सुरुवात, प्लेग, दुष्काळ यासारख्या प्रसंगी केलेली सेवाकार्ये, वाराणशीचा सेवाश्रम, न्यूयॉर्क व बोस्टन या अमेरिकेतील आश्रमांची स्थापना, इंग्लंडमध्ये कामाची सुरुवात, विचार प्रसारासाठी मासिकांची सुरुवात, अशी एक ना अनेक कामे आणि त्याची सारी जुळवाजुळव त्यांनी केली.
हे सारे काम स्वामीजींनी उभे केले तेव्हा भारतात अशा प्रकारे एकत्र येउन काम करणे ही नवलाईच होती. अशी कामे फारशी प्रचलित नव्हती, अशी उदाहरणे नव्हती, लोकांना त्याची सवय नव्हती, मदत करण्यासाठी पैसा तर नव्हताच, साधनांचा अभावच होता, वीज- रस्ते- वाहने- दूरध्वनी- अशा सुविधांची कल्पनाच केलेली बरी. आपल्या समाजाची आजची मानसिकता आणि त्यावेळची मानसिकता, आजची आणि त्यावेळची विचारपद्धती, परिपक्वता अशा अनेक बाबींचे अडथळे होते. नवखेपण होते. कोणतीही मळलेली पायवाट नव्हती तर आपली वाट आपणच तयार करीत पुढे चालायचे होते. शिवाय स्वामीजी कधी हिमालयात, कधी कोलकात्यात, कधी राजस्थानात, तर कधी इंग्लंड- अमेरिकेत.
अशा परिस्थितीत स्वत:चे आणि आपल्यासोबत काम करणाऱ्यांचे मनोधैर्य कायम राखणे हे सगळ्यात महत्वाचे ठरते. हे कामही विवेकानंदांनी समर्थपणे केले आहे. याच संबंधात याकोहामा येथून आपला मद्रासी शिष्य अळसिंगा पेरूमल याला १० जुलै १८९३ रोजी लिहिलेल्या पत्रात स्वामीजी म्हणतात, `धीर, शांत आणि दृढ भावाने कार्य करावयास हवे. वर्तमानपत्रातील प्रसिद्धी किंवा नावलौकिक हे आपले उद्दिष्ट नाही हे नेहमी लक्षात असू द्या.'
अळसिंगा पेरूमल यांनाच २ नोव्हेंबर १८९३ रोजी शिकागोहून लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, `भगवान सतत माझ्या पाठीशी आहेत याचा मला दिवसेंदिवस अनुभव येत आहे. आणि मी त्यांच्या आदेशानुसार वागण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांचीच इच्छा पूर्ण होवो. आपण जगासाठी मोठमोठी कार्ये करू. नामयशाच्या हपापाने नव्हे, तर पूर्ण नि:स्वार्थ भावनेने. का? असे विचारण्याचा आपल्याला अधिकार नाही.कार्य करता करता मृत्युमुखी पडणे हेच आपले कर्तव्य होय. साहस बाळगा. भगवंताने आपल्याला थोर कर्मे करण्यासाठी निवडले आहे, असा विश्वास असू द्या आणि ती आपण करूच करू. तयार व्हा. पवित्र आणि शुद्ध बना आणि प्रेमासाठीच प्रेम करा. कोणताही स्वार्थ राहू देऊ नका. गरीब, दु:खी व दलित यांच्यावर प्रेम करा. प्रभू तुमच्यावर अवश्य कृपा करील.' कशा पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांच्या मनाची तयारी ते करीत होते हे येथे पाहायला मिळते.
आपल्या गुरुबंधूंना न्यूयॉर्क येथून २५ सप्टेंबर १८९४ रोजी लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, `आपण खूप कार्य केलेच पाहिजे. चैतन्य निर्माण केलेच पाहिजे. त्याशिवाय चालणार नाही. कुछ परवाह नही. सारे जग तुम्ही हलवून सोडाल. वाह गुरु की फतेह! अरे बाबांनो, श्रेयांसि बहुविघ्नानी- चांगल्या कार्यात अनेक विघ्ने नेहमी येतच असतात. या विघ्नांच्या आघातांनीच थोर माणसाचे चरित्र घडत असते.'
परंतु चांगल्या संघटकाला नुसतेच मनोधैर्य वाढवून चालत नाही. छोट्या छोट्या अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. कार्यकर्त्याच्या लक्षात अशा गोष्टी आणून द्याव्या लागतात. कौतुकाची थापही पाठीवर मारावी लागते. अळसिंगा पेरूमल यांना अमेरिकेतून २९ सप्टेंबर १८९४ रोजी लिहिलेल्या पत्रात स्वामीजी म्हणतात, `कोलकाताशी नेहमी पत्रव्यवहार करीत असणे. वत्सा, आतापर्यंत साहस दाखवून तू खरोखर गौरवाचा वाटेकरी झाला आहेस. जी.जी.ने खूपच अद्भुत आणि सुंदर कार्य केले आहे. माझ्या साहसी व नि:स्वार्थी मुलांनो! तुम्ही सर्वांनी फार सुंदर कार्य केले आहे. मला तुमचे मोठे भूषण वाटते. भारताला तुमचे भूषण वाटत आहे. तुमचा जो नियतकालिक काढण्याचा संकल्प होता तो सोडू नका. खेतरीचे राजेसाहेब आणि काठीयावाडमधील लिमडीचे ठाकूरसाहेब यांना माझ्या कार्याची नेहमी माहिती मिळत राहील अशी व्यवस्था करावी.' याच पत्रात पुढे ते म्हणतात, `आपल्या विचारांचा प्रसार होण्यासाठी आता आपल्याला चांगल्या शक्तिशाली केंद्राची आवश्यकता आहे. सध्या मद्रास आणि कोलकाता येथे अशी दोन केंद्रे झाली आहेत. लवकरच भारतात इतरत्रही आणखी शेकडो केंद्रे होतील. क्षणभरही विचलित होऊ नका. इच्छाशक्तीच जगाला चालवीत असते.'
अशा प्रकारच्या तात्त्विक भूमिकेसोबतच व्यवहाराची देखील त्यांना किती जाण होती हे स्वामी रामकृष्णानंद यांना २२ ऑक्टोबर १८९४ रोजी अमेरिकेतून लिहिलेल्या पत्रातून स्पष्ट होते. ते म्हणतात, `अहमहमिका, मत्सर यांना कायमची मूठमाती द्या. त्यांच्या मुळीच आहारी जाऊ नका. प्रत्यक्ष कार्याला प्रारंभ करा. कुणाशीही कलह करू नका. सर्वांविषयी सहानुभूती बाळगून कार्य करा. जगाचे हित करणे हाच आपला उद्देश आहे. केवळ आपल्या नावाचा डांगोरा पिटणे नव्हे. स्वत:चा मोठेपणा मिरवण्याची वृत्ती, भांडकुदाळपणा आणि मत्सर या साऱ्यांचा तुम्ही कायमचा त्याग करावा हीच तुमच्यापासून अपेक्षा आहे. पृथ्वीमातेप्रमाणे सहनशीलता तुमच्या ठायी बाणली पाहिजे.'
संघटना, एकीची शक्ती, परस्परांवर विश्वास, सहकार्य व साहाय्य करण्याची तत्परता हे पाश्चात्यांचे गुणविशेष आहेत आणि त्यांच्या यशाचेही तेच कारण आहे. आपणही हे गुण अंगी बाणवले पाहिजेत, असे त्यांनी अनेकदा आग्रहाने सांगितले आहे. अमेरिकेतून ३० नोव्हेंबर १८९४ रोजी अळसिंगा पेरूमल यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, `लवकरच आणखी काही ठिकाणी मी समित्या स्थापन करू शकेन अशी आशा आहे. आपल्या सर्व शक्ती एकवटून आपण आपल्या धार्मिक संस्थेचा व्यावहारिक भाग संघटित केला पाहिजे. पण आध्यात्मिक बाबतीत त्यातून एखादा पंथ तर निर्माण होत नाही ना याचीही काळजी घ्यायला हवी. धडाक्याने प्रचार सुरु करावयास हवा.सर्व मिळून विचार करा आणि संघटीत व्हा.' किती गोष्टी त्यांनी या ठिकाणी सांगितल्या आहेत. आपण समित्या स्थापन करीत आहोत हे सांगून उत्साह वाढविला, आपल्याला धार्मिक कार्य करायचे आहे पण त्याच्या व्यावहारिक बाबीकडे दुर्लक्ष होऊ नये, आपल्याला नवीन पंथ सुरु करायचा नाही याची काळजी घ्यावी, खूप प्रचार करायला हवा, सगळे मिळून विचार करा; या साऱ्याकडे त्यांचे दक्षतेने लक्ष आहे.
एखादे नवीन काम सुरु होते तेव्हा त्यावर टीकाटिप्पणी तर होतेच, पण कामाचे कौतुक करणारे; हे काम महत्वाचे आहे असे म्हणणारे अनेक असतात. गम्मत म्हणजे असे पाठीराखेच अनेकदा त्रासदायक ठरतात. अनेक सूचना त्यांच्याकडून होत असतात, आपले म्हणणे ऐकाल तरच काम वाढेल असा त्यांचा पवित्रा असतो, ते कामावर हक्क सांगू लागतात, लुडबुड करतात. अशा गोष्टींचीही स्वामीजींना जाण होती. त्याविषयी याच पत्रात ते म्हणतात, `आपले कार्य करीत राहा. या लोकांच्या मनाने चालू नका. पण त्यांना दुखावूही नका. खुश ठेवा. अशाने त्यांच्यापैकी एखादा तरी पुढे चांगला निघण्याची आशा आहे. स्वतंत्रपणे आपल्या मार्गाने पुढे व्हा. आयत्या बिळावर रेघोट्या ओढायला सगळेच तयार असतात. खूप सावधगिरी बाळगा व काम करीत राहा.'
एखादे काम करताना लोक वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असतात. टीकाटिप्पणी करीत असतात. त्या सगळ्याची उपेक्षा करावी. ते फार मनावर घेऊ नये असे मार्गदर्शनही विवेकानंदांनी केले आहे. ख्रिश्चन मिशनरी अमेरिकेत व भारतातही आपल्याबद्दल काहीबाही बोलतात हे आपल्याला ठाऊक आहे, पण आपण त्यांना महत्व देत नाही. तुम्हीही त्यांना फार महत्व देऊ नका. सत्कर्म करणाऱ्याची कधीच दुर्दशा होत नाही हे लक्षात ठेवा, असेही त्यांनी पेरूमल यांना म्हटले आहे. आपल्या शिष्यांनी, कार्यकर्त्यांनी आपल्यावर अवलंबून राहू नये. स्वत:च्या मार्गावर धैर्याने चालावे, असा आत्मविश्वासाचा सल्लाही त्यांनी अनेकदा दिला आहे.
आपल्यापुढील काम काय आहे आणि त्यसाठी कशी माणसे आपल्याला हवीत हा तर उत्कृष्ट व्यवस्थापकाचा पहिला मुद्दा असतो. स्वामीजींनी त्यावरही भर दिला आहे. कल्पकता, चिकाटी, शिकलेसवरलेले, बुद्धिमान, साहसी तरुण हवेत. असे तरुण मिळवा आणि त्यांना आपल्यात सामील करून घ्या, असे स्वामीजींचे सांगणे होते. मृत्युच्या जबड्यात उडी घेण्याची तयारी असलेले तरुण ही कामाची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संघटना व एखादे काम म्हटले की त्याचे नेतृत्व हा मुद्दा महत्वाचा ठरतो. नेतृत्वासाठी चढाओढ पाहायला मिळते तसेच नेतृत्व टाळण्याची वृत्तीही पाहायला मिळते. नेत्याविषयी स्वामी रामकृष्णानंद यांना १८९४ मध्ये लिहिलेल्या पत्रात स्वामीजी म्हणतात, `बाबा, नेता काय धरूनबांधून तयार करता येतो? नेतृत्वाचा गुण जन्मजातच असावा लागतो. आले ध्यानात मी काय म्हणतो ते? नेतेपण करणे फार अवघड गोष्ट आहे- दासस्य दास: - अनेकांची अंतरे राखण्याची कला अंगी असायला हवी. स्वार्थाचा, द्वेष मत्सरादिकांचा अगदी समूळ नाश झाल्यावरच खरे नेतेपण अंगी बाणते. प्रथमत: जन्मगुणाने, दुसरे म्हणजे संपूर्ण स्वार्थत्यागाने ते अंगी बाणते. अनेकांची अंतरे राखण्याबद्दल स्वामीजींनी जो निर्देश केला आहे तो तर साध्या कौटुंबिक व्यवस्थापनापासून तर संपूर्ण देशाच्या व्यवस्थापनापर्यंत सर्वत्र लागू होणारा आहे.
स्वत: अमेरिकेत असतानाही येथील कामाकडे त्यांचे बारकाईने लक्ष होते. १८९४ मधीलच एका पत्रात ते म्हणतात, `सध्या गरज आहे सेवा व प्रचार अशा दोन्ही प्रकारच्या कार्याची. जिथे तुम्ही दर आठवड्याला जमू शकाल अशी एखादी जागा निवडा. तेथे पूजा वगैरे आटोपून नंतर भाष्यासहित उपनिषदांचे वाचन करा. अशा तऱ्हेने अध्ययन व काम दोन्ही करीत राहा.' याच पत्रात पुढे ते म्हणतात, `जी.जी. हा भावनाप्रधान आहे. तुम्ही आहात शांत डोक्याचे. तेव्हा दोघे मिळून काम करा. अगदी मग्न व्हा कामात. एखादे मध्यवर्ती केंद्रस्थान आवश्यक आहे. सुरुवात करा अगदी लहान प्रमाणावर. कुणावरही सत्ता गाजवण्याचा हव्यास धरू नका. जो उत्कृष्ट सेवा करू शकतो तोच खरा शासक होऊ शकतो. प्राण गेला तरी पर्वा नाही, पण सत्याशी प्रतारणा करू नका. कामातील स्वाधीनता न गमावता वरिष्ठांविषयी आदरभाव असू द्या.' अशा प्रकारे संस्था उभारण्याविषयी मौलिक मार्गदर्शन करतानाच, हिंदू धर्माच्या पुनरुत्थानासाठी आपण अमेरिकेच्या पैशावर अवलंबून राहता कामा नये, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. आकर्षक वक्ता बनण्याचा सल्लाही स्वामीजींनी शिष्यांना दिला आहे. तुम्ही प्रत्यक्ष काय काम केले हे पाहू तर द्या मला एकदा, असे आव्हान देऊन स्वामीजी म्हणतात, मंदिर, छापखाना, एखादे नियतकालिक आणि एखादे निवासस्थान हे करून तर दाखवा. कार्यकर्त्यांना कुठेतरी चेतवावे लागते. पौरुषाला थोडेसे आव्हान हवे असते. तेव्हा त्यातून भव्यदिव्य काही घडते. स्वामीजींनी तेदेखील जाणीवपूर्वक केले आहे.
एखादे काम करताना कौशल्यही हवे असते. स्वामीजींनी आपले सहकारी, शिष्य, कार्यकर्ते यांना हे कौशल्यही शिकवले आहे. अमेरिकेतून १८९४ साली स्वामी शिवानंद यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, `जग हे तत्वांची फिकीर करीत नाही. त्यांना हवी असते व्यक्ती. आपल्याला मान्य असलेल्या व्यक्तींचे मूर्खपणाचे बडबडणे ऐकणे लोकांना परवडते, पण नावडत्या माणसाचे काहीही ऐकून घेण्यास ते तयार नसतात. ही गोष्ट पक्की लक्षात बाळगूनच आपल्या वागणुकीला मुरड घाला. तुमचे शब्द जरी क्वचित कठोर असले तरी तुमच्या प्रेमाचाच खरा प्रभाव पडेल. प्रेमभावना कशाही शब्दात व्यक्त झाली असली तरीही ती ओळखण्याची सहजप्रवृत्ती लोकांच्या ठिकाणी स्वाभाविकपणेच असते.' कार्याच्या यशाची खुबी अतिशय नेमक्या शब्दात स्वामीजींनी येथे सांगितली आहे. याचा अर्थ तत्व सोडून द्यायची, काहीही चालवून घ्यायचे, असा खचितच नाही. पण काम करणाऱ्यांमध्ये एक माणुसकीचा स्पर्श असला तर काम सहज होते. हा माणुसकीचा स्पर्श वंगणाचे काम करतो हे विवेकानंदांनी अधोरेखित केले आहे.
चांगल्या व्यवस्थापकाला फक्त कामाची फिकीर करून चालत नाही. काम करणाऱ्याचीही फिकीर त्याने करायला हवी. काम करणाऱ्यांमध्ये जो स्नेहाचा स्पर्श असायला हवा असे मार्गदर्शन स्वामीजींनी केले तो स्नेहस्पर्श त्यांच्या व्यवहारात देखील होता. हे त्यांचे लक्षणीय वैशिष्ट्य आहे. स्वामी शिवानंद यांना लिहिलेल्या याच पत्रात कोलकाता भागातील मलेरियाविषयी काळजी व्यक्त करून स्वामीजी लिहितात, `मलेरियाचे मुख्य कारण असते दूषित पाणी. तुम्ही दोन तीन फिल्टर का नाही तयार करीत? आधी उकळून, नंतर फिल्टर करून घेतल्यास पाण्यातील सारे दोष निघून जातात. जंतूंपासून सुरक्षित असलेले पाश्चर कंपनीचे दोन मोठेथोरले फिल्टर विकत आणा. स्वयंपाकाला, प्यायला सारे तेच पाणी वापरा. पाहाल पुन्हा मलेरियाचे नावदेखील ऐकू येणार नाही कुठे.' मलेरियावर उपाय सांगता सांगता शेवटी स्वामीजी हिम्मत वाढवून जातात.
११ एप्रिल १८९५ रोजी अमेरिकेतूनच स्वामी रामकृष्णानंद यांना लिहिलेल्या पत्रातही हा स्नेहस्पर्श दिसून येतो. ते लिहितात, `तुम्ही आजारातून उठला असे तुम्ही लिहिलेत. तरी पण यापुढे तुम्हाला प्रकृतीबाबत खूपच खबरदारी घ्यावयास हवी. उशिरा जेवणे, कुपथ्य करणे व घाण असलेल्या जागी राहणे यामुळे आजार उलटण्याची भीती आहे. आणि मग मलेरियाच्या तावडीतून सुटणे कठीण आहे. पहिली गोष्ट ही करा की एखादे उद्यानगृह भाड्याने घ्या. ३०-४० रुपयात तुम्हाला ते सहज मिळेल. दुसरे म्हणजे पिण्याचे व स्वयंपाकाचे सारे पाणी फिल्टर करून घ्या. बांबूचे मोठे फिल्टर केले की काम भागेल. साऱ्या रोगांचे मूळ म्हणजे दूषित पाणी. पाण्यामुळे रोग होतात; ते पाणी घाण आहे की स्वच्छ आहे यामुळे नाही. रोग होतात ते पाण्यात असलेल्या रोगाच्या जंतूंमुळे. पाणी आधी उकळून मग फिल्टर करून घ्यावे. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सर्वांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यायला हवी. सैपाकी, एखादा नोकर, स्वच्छ अंथरुणे, वेळच्या वेळी जेवणखाण या साऱ्या गोष्टींची आवश्यकता आहे. या साऱ्या सूचना तंतोतंत पाळा.' लाजळूपणाने कामे होणार नाहीत, अध्ययनाकडे लक्ष द्यावे इत्यादी सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
काम पुढे जाते तेव्हा नेत्याचे नावही मोठे होते. ती स्वाभाविक प्रक्रिया असली तरीही त्याने अनेक दोष निर्माण होतात. स्वामीजींनी याकडेही लक्ष दिले आणि सहकाऱ्यांना स्पष्ट शब्दात त्याची कल्पना दिली. १२ जानेवारी १८९५ रोजी अमेरिकेतून अळसिंगा पेरूमल यांना लिहिलेल्या पत्रात स्वामीजी म्हणतात, `माझ्या नावाला प्राधान्य देण्याची गरज नाही. माझ्या कल्पना, माझे विचार, प्रत्यक्षात उतरण्याशीच माझे काम. साऱ्या महापुरुषांच्या शिष्यांनी गुरुचे उपदेश व गुरु ही व्यक्ती यांची गल्लत केलेली आढळते. एवढेच नव्हे तर अखेर त्यांनी व्यक्तीसाठी तिचे उपदेश नष्ट करून टाकले. ही गोष्ट घडू नये म्हणून श्रीरामकृष्णांच्या शिष्यांनी खूप खबरदारी घ्यावयास हवी. विचारांसाठी, आदर्शांसाठी कार्य करा. कुणा व्यक्तीसाठी म्हणून नव्हे.' काम उभे करताना स्वामीजी अशा प्रकारे खूप खबरदारी घेत होते.
कामाच्या प्रारंभिक अवस्थेत प्रत्येकालाच लहान मोठी सारीच कामे करावी लागतात. याबद्दल श्रीमती ओली बुल यांना २५ एप्रिल १८९५ रोजी लिहिलेल्या पत्रात स्वामीजींनी चर्चा केली आहे. ज्ञानयोगाच्या वर्गाला येणाऱ्या सगळ्यांची नावे नोंदवून घ्यायची आणि सगळ्यांना सूचना पाठवायच्या हे एक मोठेच काम आहे. आपण आळसामुळे ते केले नाही. पण आता स्वत: ते काम करीन अशी प्रांजळ कबुलीही स्वामीजींनी दिली. सोबतच वर्गाला येणाऱ्या १२० लोकांची नावे कुमारी हॅम्लिन यांनी उतरवून घेतल्याबद्दल आनंद आणि आभारही व्यक्त केले आहेत.
सत्ता, संपत्ती, संघटन यापैकी काहीही साथीला नसताना स्वामीजींनी अफाट कार्य केले हे विसरता येत नाही. उलट अक्षरश: शून्यातून सृष्टीची निर्मिती त्यांनी केली असेच म्हणावे लागेल. यासाठी माणसे, पैसा, जागा, कार्यपद्धती, वातावरण हे सारे त्यांनी उभारले. त्यासाठी आवश्यक त्या असंख्य लहानमोठ्या सूचना करण्यापासून जी अनेक व्यवधाने त्यांनी सांभाळली ती आश्चर्य करावी अशीच आहेत.
कोलकाता येथे मठाची स्थापना, त्याचा बेलूरच्या विस्तीर्ण जागेत विस्तार, चेन्नई मठाची स्थापना, हिमालयातील अलमोडा येथे अद्वैत आश्रमाची सुरुवात, प्लेग, दुष्काळ यासारख्या प्रसंगी केलेली सेवाकार्ये, वाराणशीचा सेवाश्रम, न्यूयॉर्क व बोस्टन या अमेरिकेतील आश्रमांची स्थापना, इंग्लंडमध्ये कामाची सुरुवात, विचार प्रसारासाठी मासिकांची सुरुवात, अशी एक ना अनेक कामे आणि त्याची सारी जुळवाजुळव त्यांनी केली.
हे सारे काम स्वामीजींनी उभे केले तेव्हा भारतात अशा प्रकारे एकत्र येउन काम करणे ही नवलाईच होती. अशी कामे फारशी प्रचलित नव्हती, अशी उदाहरणे नव्हती, लोकांना त्याची सवय नव्हती, मदत करण्यासाठी पैसा तर नव्हताच, साधनांचा अभावच होता, वीज- रस्ते- वाहने- दूरध्वनी- अशा सुविधांची कल्पनाच केलेली बरी. आपल्या समाजाची आजची मानसिकता आणि त्यावेळची मानसिकता, आजची आणि त्यावेळची विचारपद्धती, परिपक्वता अशा अनेक बाबींचे अडथळे होते. नवखेपण होते. कोणतीही मळलेली पायवाट नव्हती तर आपली वाट आपणच तयार करीत पुढे चालायचे होते. शिवाय स्वामीजी कधी हिमालयात, कधी कोलकात्यात, कधी राजस्थानात, तर कधी इंग्लंड- अमेरिकेत.
अशा परिस्थितीत स्वत:चे आणि आपल्यासोबत काम करणाऱ्यांचे मनोधैर्य कायम राखणे हे सगळ्यात महत्वाचे ठरते. हे कामही विवेकानंदांनी समर्थपणे केले आहे. याच संबंधात याकोहामा येथून आपला मद्रासी शिष्य अळसिंगा पेरूमल याला १० जुलै १८९३ रोजी लिहिलेल्या पत्रात स्वामीजी म्हणतात, `धीर, शांत आणि दृढ भावाने कार्य करावयास हवे. वर्तमानपत्रातील प्रसिद्धी किंवा नावलौकिक हे आपले उद्दिष्ट नाही हे नेहमी लक्षात असू द्या.'
अळसिंगा पेरूमल यांनाच २ नोव्हेंबर १८९३ रोजी शिकागोहून लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, `भगवान सतत माझ्या पाठीशी आहेत याचा मला दिवसेंदिवस अनुभव येत आहे. आणि मी त्यांच्या आदेशानुसार वागण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांचीच इच्छा पूर्ण होवो. आपण जगासाठी मोठमोठी कार्ये करू. नामयशाच्या हपापाने नव्हे, तर पूर्ण नि:स्वार्थ भावनेने. का? असे विचारण्याचा आपल्याला अधिकार नाही.कार्य करता करता मृत्युमुखी पडणे हेच आपले कर्तव्य होय. साहस बाळगा. भगवंताने आपल्याला थोर कर्मे करण्यासाठी निवडले आहे, असा विश्वास असू द्या आणि ती आपण करूच करू. तयार व्हा. पवित्र आणि शुद्ध बना आणि प्रेमासाठीच प्रेम करा. कोणताही स्वार्थ राहू देऊ नका. गरीब, दु:खी व दलित यांच्यावर प्रेम करा. प्रभू तुमच्यावर अवश्य कृपा करील.' कशा पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांच्या मनाची तयारी ते करीत होते हे येथे पाहायला मिळते.
आपल्या गुरुबंधूंना न्यूयॉर्क येथून २५ सप्टेंबर १८९४ रोजी लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, `आपण खूप कार्य केलेच पाहिजे. चैतन्य निर्माण केलेच पाहिजे. त्याशिवाय चालणार नाही. कुछ परवाह नही. सारे जग तुम्ही हलवून सोडाल. वाह गुरु की फतेह! अरे बाबांनो, श्रेयांसि बहुविघ्नानी- चांगल्या कार्यात अनेक विघ्ने नेहमी येतच असतात. या विघ्नांच्या आघातांनीच थोर माणसाचे चरित्र घडत असते.'
परंतु चांगल्या संघटकाला नुसतेच मनोधैर्य वाढवून चालत नाही. छोट्या छोट्या अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. कार्यकर्त्याच्या लक्षात अशा गोष्टी आणून द्याव्या लागतात. कौतुकाची थापही पाठीवर मारावी लागते. अळसिंगा पेरूमल यांना अमेरिकेतून २९ सप्टेंबर १८९४ रोजी लिहिलेल्या पत्रात स्वामीजी म्हणतात, `कोलकाताशी नेहमी पत्रव्यवहार करीत असणे. वत्सा, आतापर्यंत साहस दाखवून तू खरोखर गौरवाचा वाटेकरी झाला आहेस. जी.जी.ने खूपच अद्भुत आणि सुंदर कार्य केले आहे. माझ्या साहसी व नि:स्वार्थी मुलांनो! तुम्ही सर्वांनी फार सुंदर कार्य केले आहे. मला तुमचे मोठे भूषण वाटते. भारताला तुमचे भूषण वाटत आहे. तुमचा जो नियतकालिक काढण्याचा संकल्प होता तो सोडू नका. खेतरीचे राजेसाहेब आणि काठीयावाडमधील लिमडीचे ठाकूरसाहेब यांना माझ्या कार्याची नेहमी माहिती मिळत राहील अशी व्यवस्था करावी.' याच पत्रात पुढे ते म्हणतात, `आपल्या विचारांचा प्रसार होण्यासाठी आता आपल्याला चांगल्या शक्तिशाली केंद्राची आवश्यकता आहे. सध्या मद्रास आणि कोलकाता येथे अशी दोन केंद्रे झाली आहेत. लवकरच भारतात इतरत्रही आणखी शेकडो केंद्रे होतील. क्षणभरही विचलित होऊ नका. इच्छाशक्तीच जगाला चालवीत असते.'
अशा प्रकारच्या तात्त्विक भूमिकेसोबतच व्यवहाराची देखील त्यांना किती जाण होती हे स्वामी रामकृष्णानंद यांना २२ ऑक्टोबर १८९४ रोजी अमेरिकेतून लिहिलेल्या पत्रातून स्पष्ट होते. ते म्हणतात, `अहमहमिका, मत्सर यांना कायमची मूठमाती द्या. त्यांच्या मुळीच आहारी जाऊ नका. प्रत्यक्ष कार्याला प्रारंभ करा. कुणाशीही कलह करू नका. सर्वांविषयी सहानुभूती बाळगून कार्य करा. जगाचे हित करणे हाच आपला उद्देश आहे. केवळ आपल्या नावाचा डांगोरा पिटणे नव्हे. स्वत:चा मोठेपणा मिरवण्याची वृत्ती, भांडकुदाळपणा आणि मत्सर या साऱ्यांचा तुम्ही कायमचा त्याग करावा हीच तुमच्यापासून अपेक्षा आहे. पृथ्वीमातेप्रमाणे सहनशीलता तुमच्या ठायी बाणली पाहिजे.'
संघटना, एकीची शक्ती, परस्परांवर विश्वास, सहकार्य व साहाय्य करण्याची तत्परता हे पाश्चात्यांचे गुणविशेष आहेत आणि त्यांच्या यशाचेही तेच कारण आहे. आपणही हे गुण अंगी बाणवले पाहिजेत, असे त्यांनी अनेकदा आग्रहाने सांगितले आहे. अमेरिकेतून ३० नोव्हेंबर १८९४ रोजी अळसिंगा पेरूमल यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, `लवकरच आणखी काही ठिकाणी मी समित्या स्थापन करू शकेन अशी आशा आहे. आपल्या सर्व शक्ती एकवटून आपण आपल्या धार्मिक संस्थेचा व्यावहारिक भाग संघटित केला पाहिजे. पण आध्यात्मिक बाबतीत त्यातून एखादा पंथ तर निर्माण होत नाही ना याचीही काळजी घ्यायला हवी. धडाक्याने प्रचार सुरु करावयास हवा.सर्व मिळून विचार करा आणि संघटीत व्हा.' किती गोष्टी त्यांनी या ठिकाणी सांगितल्या आहेत. आपण समित्या स्थापन करीत आहोत हे सांगून उत्साह वाढविला, आपल्याला धार्मिक कार्य करायचे आहे पण त्याच्या व्यावहारिक बाबीकडे दुर्लक्ष होऊ नये, आपल्याला नवीन पंथ सुरु करायचा नाही याची काळजी घ्यावी, खूप प्रचार करायला हवा, सगळे मिळून विचार करा; या साऱ्याकडे त्यांचे दक्षतेने लक्ष आहे.
एखादे नवीन काम सुरु होते तेव्हा त्यावर टीकाटिप्पणी तर होतेच, पण कामाचे कौतुक करणारे; हे काम महत्वाचे आहे असे म्हणणारे अनेक असतात. गम्मत म्हणजे असे पाठीराखेच अनेकदा त्रासदायक ठरतात. अनेक सूचना त्यांच्याकडून होत असतात, आपले म्हणणे ऐकाल तरच काम वाढेल असा त्यांचा पवित्रा असतो, ते कामावर हक्क सांगू लागतात, लुडबुड करतात. अशा गोष्टींचीही स्वामीजींना जाण होती. त्याविषयी याच पत्रात ते म्हणतात, `आपले कार्य करीत राहा. या लोकांच्या मनाने चालू नका. पण त्यांना दुखावूही नका. खुश ठेवा. अशाने त्यांच्यापैकी एखादा तरी पुढे चांगला निघण्याची आशा आहे. स्वतंत्रपणे आपल्या मार्गाने पुढे व्हा. आयत्या बिळावर रेघोट्या ओढायला सगळेच तयार असतात. खूप सावधगिरी बाळगा व काम करीत राहा.'
एखादे काम करताना लोक वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असतात. टीकाटिप्पणी करीत असतात. त्या सगळ्याची उपेक्षा करावी. ते फार मनावर घेऊ नये असे मार्गदर्शनही विवेकानंदांनी केले आहे. ख्रिश्चन मिशनरी अमेरिकेत व भारतातही आपल्याबद्दल काहीबाही बोलतात हे आपल्याला ठाऊक आहे, पण आपण त्यांना महत्व देत नाही. तुम्हीही त्यांना फार महत्व देऊ नका. सत्कर्म करणाऱ्याची कधीच दुर्दशा होत नाही हे लक्षात ठेवा, असेही त्यांनी पेरूमल यांना म्हटले आहे. आपल्या शिष्यांनी, कार्यकर्त्यांनी आपल्यावर अवलंबून राहू नये. स्वत:च्या मार्गावर धैर्याने चालावे, असा आत्मविश्वासाचा सल्लाही त्यांनी अनेकदा दिला आहे.
आपल्यापुढील काम काय आहे आणि त्यसाठी कशी माणसे आपल्याला हवीत हा तर उत्कृष्ट व्यवस्थापकाचा पहिला मुद्दा असतो. स्वामीजींनी त्यावरही भर दिला आहे. कल्पकता, चिकाटी, शिकलेसवरलेले, बुद्धिमान, साहसी तरुण हवेत. असे तरुण मिळवा आणि त्यांना आपल्यात सामील करून घ्या, असे स्वामीजींचे सांगणे होते. मृत्युच्या जबड्यात उडी घेण्याची तयारी असलेले तरुण ही कामाची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संघटना व एखादे काम म्हटले की त्याचे नेतृत्व हा मुद्दा महत्वाचा ठरतो. नेतृत्वासाठी चढाओढ पाहायला मिळते तसेच नेतृत्व टाळण्याची वृत्तीही पाहायला मिळते. नेत्याविषयी स्वामी रामकृष्णानंद यांना १८९४ मध्ये लिहिलेल्या पत्रात स्वामीजी म्हणतात, `बाबा, नेता काय धरूनबांधून तयार करता येतो? नेतृत्वाचा गुण जन्मजातच असावा लागतो. आले ध्यानात मी काय म्हणतो ते? नेतेपण करणे फार अवघड गोष्ट आहे- दासस्य दास: - अनेकांची अंतरे राखण्याची कला अंगी असायला हवी. स्वार्थाचा, द्वेष मत्सरादिकांचा अगदी समूळ नाश झाल्यावरच खरे नेतेपण अंगी बाणते. प्रथमत: जन्मगुणाने, दुसरे म्हणजे संपूर्ण स्वार्थत्यागाने ते अंगी बाणते. अनेकांची अंतरे राखण्याबद्दल स्वामीजींनी जो निर्देश केला आहे तो तर साध्या कौटुंबिक व्यवस्थापनापासून तर संपूर्ण देशाच्या व्यवस्थापनापर्यंत सर्वत्र लागू होणारा आहे.
स्वत: अमेरिकेत असतानाही येथील कामाकडे त्यांचे बारकाईने लक्ष होते. १८९४ मधीलच एका पत्रात ते म्हणतात, `सध्या गरज आहे सेवा व प्रचार अशा दोन्ही प्रकारच्या कार्याची. जिथे तुम्ही दर आठवड्याला जमू शकाल अशी एखादी जागा निवडा. तेथे पूजा वगैरे आटोपून नंतर भाष्यासहित उपनिषदांचे वाचन करा. अशा तऱ्हेने अध्ययन व काम दोन्ही करीत राहा.' याच पत्रात पुढे ते म्हणतात, `जी.जी. हा भावनाप्रधान आहे. तुम्ही आहात शांत डोक्याचे. तेव्हा दोघे मिळून काम करा. अगदी मग्न व्हा कामात. एखादे मध्यवर्ती केंद्रस्थान आवश्यक आहे. सुरुवात करा अगदी लहान प्रमाणावर. कुणावरही सत्ता गाजवण्याचा हव्यास धरू नका. जो उत्कृष्ट सेवा करू शकतो तोच खरा शासक होऊ शकतो. प्राण गेला तरी पर्वा नाही, पण सत्याशी प्रतारणा करू नका. कामातील स्वाधीनता न गमावता वरिष्ठांविषयी आदरभाव असू द्या.' अशा प्रकारे संस्था उभारण्याविषयी मौलिक मार्गदर्शन करतानाच, हिंदू धर्माच्या पुनरुत्थानासाठी आपण अमेरिकेच्या पैशावर अवलंबून राहता कामा नये, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. आकर्षक वक्ता बनण्याचा सल्लाही स्वामीजींनी शिष्यांना दिला आहे. तुम्ही प्रत्यक्ष काय काम केले हे पाहू तर द्या मला एकदा, असे आव्हान देऊन स्वामीजी म्हणतात, मंदिर, छापखाना, एखादे नियतकालिक आणि एखादे निवासस्थान हे करून तर दाखवा. कार्यकर्त्यांना कुठेतरी चेतवावे लागते. पौरुषाला थोडेसे आव्हान हवे असते. तेव्हा त्यातून भव्यदिव्य काही घडते. स्वामीजींनी तेदेखील जाणीवपूर्वक केले आहे.
एखादे काम करताना कौशल्यही हवे असते. स्वामीजींनी आपले सहकारी, शिष्य, कार्यकर्ते यांना हे कौशल्यही शिकवले आहे. अमेरिकेतून १८९४ साली स्वामी शिवानंद यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, `जग हे तत्वांची फिकीर करीत नाही. त्यांना हवी असते व्यक्ती. आपल्याला मान्य असलेल्या व्यक्तींचे मूर्खपणाचे बडबडणे ऐकणे लोकांना परवडते, पण नावडत्या माणसाचे काहीही ऐकून घेण्यास ते तयार नसतात. ही गोष्ट पक्की लक्षात बाळगूनच आपल्या वागणुकीला मुरड घाला. तुमचे शब्द जरी क्वचित कठोर असले तरी तुमच्या प्रेमाचाच खरा प्रभाव पडेल. प्रेमभावना कशाही शब्दात व्यक्त झाली असली तरीही ती ओळखण्याची सहजप्रवृत्ती लोकांच्या ठिकाणी स्वाभाविकपणेच असते.' कार्याच्या यशाची खुबी अतिशय नेमक्या शब्दात स्वामीजींनी येथे सांगितली आहे. याचा अर्थ तत्व सोडून द्यायची, काहीही चालवून घ्यायचे, असा खचितच नाही. पण काम करणाऱ्यांमध्ये एक माणुसकीचा स्पर्श असला तर काम सहज होते. हा माणुसकीचा स्पर्श वंगणाचे काम करतो हे विवेकानंदांनी अधोरेखित केले आहे.
चांगल्या व्यवस्थापकाला फक्त कामाची फिकीर करून चालत नाही. काम करणाऱ्याचीही फिकीर त्याने करायला हवी. काम करणाऱ्यांमध्ये जो स्नेहाचा स्पर्श असायला हवा असे मार्गदर्शन स्वामीजींनी केले तो स्नेहस्पर्श त्यांच्या व्यवहारात देखील होता. हे त्यांचे लक्षणीय वैशिष्ट्य आहे. स्वामी शिवानंद यांना लिहिलेल्या याच पत्रात कोलकाता भागातील मलेरियाविषयी काळजी व्यक्त करून स्वामीजी लिहितात, `मलेरियाचे मुख्य कारण असते दूषित पाणी. तुम्ही दोन तीन फिल्टर का नाही तयार करीत? आधी उकळून, नंतर फिल्टर करून घेतल्यास पाण्यातील सारे दोष निघून जातात. जंतूंपासून सुरक्षित असलेले पाश्चर कंपनीचे दोन मोठेथोरले फिल्टर विकत आणा. स्वयंपाकाला, प्यायला सारे तेच पाणी वापरा. पाहाल पुन्हा मलेरियाचे नावदेखील ऐकू येणार नाही कुठे.' मलेरियावर उपाय सांगता सांगता शेवटी स्वामीजी हिम्मत वाढवून जातात.
११ एप्रिल १८९५ रोजी अमेरिकेतूनच स्वामी रामकृष्णानंद यांना लिहिलेल्या पत्रातही हा स्नेहस्पर्श दिसून येतो. ते लिहितात, `तुम्ही आजारातून उठला असे तुम्ही लिहिलेत. तरी पण यापुढे तुम्हाला प्रकृतीबाबत खूपच खबरदारी घ्यावयास हवी. उशिरा जेवणे, कुपथ्य करणे व घाण असलेल्या जागी राहणे यामुळे आजार उलटण्याची भीती आहे. आणि मग मलेरियाच्या तावडीतून सुटणे कठीण आहे. पहिली गोष्ट ही करा की एखादे उद्यानगृह भाड्याने घ्या. ३०-४० रुपयात तुम्हाला ते सहज मिळेल. दुसरे म्हणजे पिण्याचे व स्वयंपाकाचे सारे पाणी फिल्टर करून घ्या. बांबूचे मोठे फिल्टर केले की काम भागेल. साऱ्या रोगांचे मूळ म्हणजे दूषित पाणी. पाण्यामुळे रोग होतात; ते पाणी घाण आहे की स्वच्छ आहे यामुळे नाही. रोग होतात ते पाण्यात असलेल्या रोगाच्या जंतूंमुळे. पाणी आधी उकळून मग फिल्टर करून घ्यावे. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सर्वांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यायला हवी. सैपाकी, एखादा नोकर, स्वच्छ अंथरुणे, वेळच्या वेळी जेवणखाण या साऱ्या गोष्टींची आवश्यकता आहे. या साऱ्या सूचना तंतोतंत पाळा.' लाजळूपणाने कामे होणार नाहीत, अध्ययनाकडे लक्ष द्यावे इत्यादी सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
काम पुढे जाते तेव्हा नेत्याचे नावही मोठे होते. ती स्वाभाविक प्रक्रिया असली तरीही त्याने अनेक दोष निर्माण होतात. स्वामीजींनी याकडेही लक्ष दिले आणि सहकाऱ्यांना स्पष्ट शब्दात त्याची कल्पना दिली. १२ जानेवारी १८९५ रोजी अमेरिकेतून अळसिंगा पेरूमल यांना लिहिलेल्या पत्रात स्वामीजी म्हणतात, `माझ्या नावाला प्राधान्य देण्याची गरज नाही. माझ्या कल्पना, माझे विचार, प्रत्यक्षात उतरण्याशीच माझे काम. साऱ्या महापुरुषांच्या शिष्यांनी गुरुचे उपदेश व गुरु ही व्यक्ती यांची गल्लत केलेली आढळते. एवढेच नव्हे तर अखेर त्यांनी व्यक्तीसाठी तिचे उपदेश नष्ट करून टाकले. ही गोष्ट घडू नये म्हणून श्रीरामकृष्णांच्या शिष्यांनी खूप खबरदारी घ्यावयास हवी. विचारांसाठी, आदर्शांसाठी कार्य करा. कुणा व्यक्तीसाठी म्हणून नव्हे.' काम उभे करताना स्वामीजी अशा प्रकारे खूप खबरदारी घेत होते.
कामाच्या प्रारंभिक अवस्थेत प्रत्येकालाच लहान मोठी सारीच कामे करावी लागतात. याबद्दल श्रीमती ओली बुल यांना २५ एप्रिल १८९५ रोजी लिहिलेल्या पत्रात स्वामीजींनी चर्चा केली आहे. ज्ञानयोगाच्या वर्गाला येणाऱ्या सगळ्यांची नावे नोंदवून घ्यायची आणि सगळ्यांना सूचना पाठवायच्या हे एक मोठेच काम आहे. आपण आळसामुळे ते केले नाही. पण आता स्वत: ते काम करीन अशी प्रांजळ कबुलीही स्वामीजींनी दिली. सोबतच वर्गाला येणाऱ्या १२० लोकांची नावे कुमारी हॅम्लिन यांनी उतरवून घेतल्याबद्दल आनंद आणि आभारही व्यक्त केले आहेत.
हिंदू राष्ट्र कशासाठी? कोणासाठी?
माघ वद्य एकादशी, जी विजया एकादशी म्हणून ओळखली जाते; हा गोळवलकर गुरुजींचा
जन्मदिवस. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक म्हणून ते ओळखले
जातात. हिंदू संघटनेच्या कामासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित
केले होते. भारत हे हिंदू राष्ट्र आहे. इस्लाम किंवा ख्रिश्चन यांच्या
जन्माच्याही कितीतरी आधीपासून हे राष्ट्र अस्तित्वात आहे. त्यामुळे कोणत्या
एखाद्या समूहाच्या, विचाराच्या विरोधात ते उत्पन्नही करावयाचे नाही आणि
उभेही करावयाचे नाही. त्याचे स्वयंभू असे व्यक्तिमत्व आहे, हा विचार
त्यांनी आयुष्यभर मांडला. हे हिंदू राष्ट्र कशासाठी? अन कोणासाठी याचेही
विस्तृत विवेचन त्यांनी वेळोवेळी केले. कार्यकर्ते, जनता, पत्रकार, विद्वान
अशा अनेकांपुढे त्यांनी वेळोवेळी याविषयीचे विचार मांडले. राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाच्या सिंदी (मार्च १९५४), इंदोर (मार्च १९६०) आणि ठाणे
(ऑक्टोबर, नोव्हेंबर १९७२) चिंतन बैठकांमध्ये देखील हिंदू राष्ट्र कशासाठी?
कोणासाठी? याचे सखोल विवेचन त्यांनी केले आहे.
सिंदी बैठकीच्या पहिल्याच दिवशी, ९ मार्च १९५४ रोजी त्यांनी या विषयावर विचार व्यक्त केले. जागतिक वाद, तत्वज्ञान, राष्ट्रीयता, आंतरराष्ट्रीयता, राष्ट्रभावना समाप्त करता येईल वा नाही, विश्वराज्य संकल्पना या साऱ्याचा उहापोह करून गुरुजी म्हणतात, `आपल्यापुढे राष्ट्र आणि जग यांच्या समन्वयाचा मार्गच तेवढा शिल्लक राहतो. जर राष्ट्रभावना आपण नाहीशी करू शकत नाही आणि विश्वराज्याची शक्यताही जर दिसत नाही तर मग कोणत्या मार्गाचा अवलंब करावयाचा? आपल्याकडे याचे उत्तर आहे पण भौतिकता हा त्याचा आधार नाही. भौतिकता ही एकाला दुसऱ्यापासून दूर ठेवण्याचेच काम करते. विश्वैक्यासाठी भौतिकतेहून अधिक उच्च भूमिकेची आवश्यकता आहे.' स्पष्ट आहे की ही भूमिका हिंदूंची आध्यात्मिक भूमिका होय. या आध्यात्मिकतेचे थोडक्यात विवेचन करून गुरुजी पुढे म्हणतात, `हिंदूजवळ हे ज्ञान सुरक्षित आहे. अन्य कोणाजवळ हे नाही. जो समाज हे ज्ञान बाकीच्या समाजाला देण्यासाठी वेळोवेळी श्रेष्ठ महापुरुष निर्माण करतो त्या समाजाने उत्तम रीतीने जिवंत राहणे आवश्यक आहे. म्हणूनच सामर्थ्य निर्माण करण्यासाठी आम्ही संघटना करतो. म्हणूनच आमची ही संघटना जगाच्या कल्याणासाठीच आहे.' हाच विषय पुढे नेउन त्यांनी तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिघातून बाहेर काढला आहे. याचे अंतिम स्वरूप काय असेल याबद्दल गुरुजी म्हणतात, `हिंदू समाजाला आपण इतके जागृत केले पाहिजे की, तो निश्चल भावाने, आत्मविश्वासाने, जगाच्या बाहेर पाहणाऱ्या प्रवृत्तीला अंतर्मुखी करून हे ज्ञान जगाला शिकवू शकेल.' परंतु त्यांचे हे व्यापक चिंतन केवळ स्वप्नरंजन नाही. अतिशय जमिनीवर राहून ते पुढे म्हणतात, `जगाच्या गोष्टी करावयाच्या म्हणजे घरच्या गोष्टी सोडावयाच्या हा भाव अशुद्ध आहे.दोघांचाही समन्वय हाच श्रेष्ठ आणि उत्तम आहे.'
या सिंदी बैठकीतच त्यांनी या विषयाचा आणखी विस्तार केला आहे. ते म्हणतात, `आम्ही राष्ट्रांचा विनाश नव्हे समन्वय चाहतो. म्हणून आम्ही आपल्या राष्ट्रजीवनाची वैशिष्ट्ये जतन करून मानवतेसाठी त्याचा विकास करू. आपल्या राष्ट्राचे त्याच्या संपूर्ण वैशिष्ट्यांसह संवर्धन करणे हेच हिंदू राष्ट्र निर्माण करणे होय. जगाला संपूर्ण मानवाच्या एकात्मतेचे दर्शन घडवण्यासाठी आपल्याला काम करावे लागेल. हिंदूंची विशेषता कायम राखण्यातच विश्वाचे कल्याण होईल. आपली प्रकृती काय आहे? भौतिकतेचा कमाल विचार करूनही आपण त्यापलीकडे जी वस्तू आहे तिचा साक्षात्कार केला आहे.त्याच दृष्टीने आपण समाजालाही पाहिले पाहिजे.'
सिंदी बैठकीतील सूत्रच इंदोर बैठकीतही कायम असल्याचे पाहायला मिळते. यासंबंधीचे आपले विचार आणखीन स्पष्ट करताना इंदोर बैठकीत गुरुजी म्हणतात, `साऱ्या जगात ज्या ज्या म्हणून राज्यव्यवस्था आणि राष्ट्रव्यवस्था आहेत त्यात मनुष्यमात्राच्या जीवनाचे लक्ष्य ऐहिक सुख समृद्धीत मानलेले आहे. म्हणजेच खाणे-पिणे, वस्त्र-प्रावरणे, निवासाची स्थाने, सुखोपभोग, वासनावृद्धी, वासना संतुष्ट करणाऱ्या साधनांची वृद्धी, त्या साधनांची उपलब्धी, मनोरंजनाची भिन्न भिन्न साधने हेच जगातील सर्व देशात सर्वसाधारण लक्ष्य त्या देशांनी स्वत:समोर ठेवलेले आहे असे आढळून येते. ज्याचे खूप प्रगतीमान असे वर्णन केले जाते तेथे सामान्य माणसाकडे टेलिफोन, मोटार, मोटारसायकल आदी ऐहिक सुखाची साधने हाच प्रगतीचा मानदंड मानला जातो. वास्तविक मानवाच्या प्रगतीचा हाच मानदंड आहे का?' असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणतात, `आमच्या पूर्वजांनी सर्व प्रकारच्या ऐहिक सुखाची आणि ऐश्वर्याची इच्छा बाळगूनही तेच काही जीवनाचे अंतिम लक्ष्य मानलेले नाही. तर मग जीवनाचे लक्ष्य कोणते? चिंतनानंतर त्यांना जे उत्तर मिळाले ते शब्दांच्या पलीकडचे आहे. आपल्या राष्ट्राचे लक्ष्य काय आहे? या अवस्थेच्या प्राप्तीसाठी व्यक्ती अग्रेसर होईल अशी विशुद्ध प्रेरणा देणे हेच ते लक्ष्य होय. प्रत्येक मानव मग तो वन्य अवस्थेतील मानव का न असो, त्याच्या हृदयात ही प्रेरणा जागृत करून तो या लक्ष्यप्राप्तीसाठी वाटचाल करील आणि या सुखाचा अधिकारी ठरेल हा आमचा राष्ट्रीय संकल्प आहे.'
माणसाने चोवीसही तास पोटाच्याच मागे धावावे काय? असा भेदक प्रश्न उपस्थित करून गुरुजी म्हणतात, `खाणे पिणे आणि सुखाने झोपणे हेच त्यांचे लक्ष्य असल्यामुळे आणि हे जीवन प्राय: पशुसारखेच असल्यामुळे मानवाला पशुसमान बनविणारी रचना त्यांनी केली. आपले लक्ष्य पशुत्वाकडून देवत्वाकडे जाणे हे आहे.' जगातील अन्य व्यवस्थांचे असे विश्लेषण करून आपल्या व्यवस्थेसंबंधी ते म्हणतात, `नवे घर तयार करावयाचे तर जुने घर पाडावे लागते. आजची जी विकृत झालेली समाजरचना आहे तिची इथून तिथपर्यंत पाडापाड करून ढीग रचून ठेवू. मग त्यातून पुढे जे काही विशुद्ध रूप उभे होईल ते होईल. आज तर सर्वांचा एकरस असा समूह बनवून, आपल्या विशुद्ध राष्ट्रीय तत्वाचे संपूर्ण स्मरण अंत:करणात ठेवून, राष्ट्राच्या नित्य चैतन्यमय व सूत्रबद्ध सामर्थ्याची आकांक्षा अंत:करणात जागृत राखणारा समाज उभा करावयाचा आहे.'
याच सूत्राचा पुढे विस्तार करताना गुरुजी म्हणतात, `प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात सत्याच्या आविष्काराचा अनुभव आणि अखिल सृष्टीतील एकात्मतेचे दर्शन घडवून; मानवाला सुखशांतीचा अनुभव प्राप्त करून देणे यातच मनुष्य जीवनाची खरी सार्थकता आहे, हे पटवून देणे हीच ती मुलभूत प्रेरणा आहे. हे कार्य आपल्याला अखिल जगतात प्रसृत करावयाचे आहे. या जगात आपले एक फार मोठे कार्य आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. आपले हे प्राचीन राष्ट्र आहे आणि त्याचे जीवन जगाचे नेतृत्व करण्यासाठी आहे. परंतु आपण आपल्या देशातील जीवन ठीक करू शकलो नाही, आपण स्वत:ला ओळखू शकलो नाही आणि जगाचे अज्ञान दूर करण्याचा संकल्प केलेले आम्ही जर स्वत:लाच विसरून बसलो तर आपले `वर्ल्ड मिशन' आपण कसे पूर्ण करू शकू?'
हे `वर्ल्ड मिशन' पूर्ण करायचे म्हणजे इतर साऱ्यांचे अस्तित्व आणि वैशिष्ट्य मिटवून टाकायचे का? किंवा या अतिभव्य लक्ष्याकडे वाटचाल करताना हे लौकिक जग सोडून द्यायचे का? या ऐहिक जगातील साऱ्या क्रियाकलापांचे स्थान काय राहील? याविषयी गुरुजी म्हणतात, `निरनिराळे भौतिकतावादी समूह त्यांचाच विचार सर्व लोकांच्या माथी मारून त्यांची डोकी बिघडविण्याचा प्रयत्न करतात, तशी काही आपली कल्पना नाही हे आपण समजून घेतले पाहिजे. याउलट प्रत्येक समाजाला त्याच्या प्रकृतीनुसारच उन्नती, उत्कर्ष आदीची प्रेरणा देत देत त्याच्यावर अंतिम सत्य आणि सद्गुणांचा सत्संस्कार योग्य प्रकारे केला पाहिजे हीच आपली दृढ धारणा आहे. परंतु यासाठी प्रभुत्वसंपन्न, शक्तीसंपन्न, सद्गुण आणि सद्भावनांनी ओतप्रोत; पारलौकिक ज्ञान आणि ऐहिक वैभव यांनी युक्त असे राष्ट्रजीवन प्रथम आपल्या घरी आपण निर्माण करू. आज जगात जितके भौतिक म्हणजेच केवळ जडवादी कार्य चालते त्यांची कबर येथेच बांधली जाईल यात मला मुळीच शंका नाही. या बाबतीत मी बिलकुल निश्चिंत आहे. पण त्यासाठी खूप कष्ट सहन करावे लागतील. खूप किंमत द्यावी लागेल. पण अशा सर्व कार्यांना मूठमाती देऊन श्रेष्ठ मानव जीवनाची निर्मिती आपण करून दाखवूच.'
ठाणे बैठकीतही याच गोष्टीचा निर्देश गुरुजींनी केला. ते म्हणाले, `आपल्या प्राचीन, चिरंतन हिंदू राष्ट्राला जगात पुन्हा श्रेष्ठ स्थान प्राप्त करून देण्याचे ; या राष्ट्राला बलसंपन्न, विजयशाली, सुखी व विश्वातील सर्व मानवांचे कल्याण करण्यास सक्षम बनविण्याचे जे उदात्त ध्येय आम्ही आपल्यासमोर ठेवले आहे त्याची पूर्ती करण्यासाठीच विविध कार्ये व कार्यक्रमांची रचना करण्याकडे आम्ही सर्वांनी लक्ष द्यावयास हवे.'
या ठाणे बैठकीत गुरुजींशी कार्यकर्त्यांशी चर्चाही झाली. अनेक प्रश्नही त्यांना विचारण्यात आले. त्यातील एका प्रश्नावर त्यांनी जे उत्तर दिले ते फार मार्मिक आहे. गुरुजी म्हणाले, `ख्रिश्चन, मुसलमान, हिंदू या सर्वांनी एकत्र नांदावे, हे केवळ हिंदूच म्हणत असतो. मुसलमान किंवा ख्रिश्चन म्हणत नाही. आमचा कोणत्याही उपासना पद्धतीला विरोध नाही. पण एखादा कोणी राष्ट्र विघातक कार्य करीत असेल; तर तो कोणीही का असेना - प्रत्यक्ष पुत्र असला तरी - त्याची गय आम्ही करणार नाही. अहल्याबाई आणि शिवाजी महाराज यांचा आदर्श याबाबतीत आमच्यासमोर आहे. तेव्हा राष्ट्रद्रोही व्यक्ती जर इतर धर्माची असेल तर तिच्याशी आम्ही तसाच व्यवहार करू, असे म्हणताना कचरण्याचे आम्हाला काही कारण नाही. आज मात्र नेमके उलटे होते आहे. शत्रू असूनही देशभक्तीचा मुखवटा धारण करणाऱ्यास मित्र बनविले जाते आणि जे रात्रंदिवस देशाचेच हितचिंतन करतात त्या आपल्याच लोकांचा निषेध केला जातो.'
या सगळ्या विवेचनावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाव धारण करणारा आणि फक्त लौकिक गोष्टींच्या मागे धावत सुटलेला जमाव नाही. या लौकिक जगाकडे (देव संकल्पनेसह साऱ्या गोष्टींकडे. कारण देव ही सुद्धा लौकिक गोष्टच आहे.) अलौकिक दृष्टीने पाहण्याची आमची आध्यात्मिकता लक्षात घेऊन संपूर्ण जगासाठी जिवंत राहणाऱ्या आणि जगणाऱ्या माणसांचा समाज असे या हिंदू राष्ट्राचे स्वरूप आहे. ते कोणाच्याही विरोधात नाही, कोणावरही दडपशाही करू इच्छिणारे नाही, जुन्याला कवटाळून बसणारे नाही, ऐहिकता नाकारणारे नाही, नवीनतेचे विरोधी नाही.परंतु त्याच वेळेस अरेरावी खपवून घेणारे, स्वार्थी, सुखलोलुप, विधीनिषेधशून्य, एकांगी असेही नाही. हिंदू राष्ट्र हे सगळ्या जगासाठी आणि संपूर्ण जगाच्या सात्विक सुखशांतीसाठी आहे.
`मल्याळम मनोरमा' या केरळातील मासिकाचे तत्कालीन संपादक के. पी. के. पिशाद्री यांचा अभिप्राय मननीय आहे. पिशाद्री हे स्वत: गांधीवादी होते. संघ वगैरेंशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. महात्मा गांधींच्या हत्येनंतर शिवनी कारागृहात गुरुजींना भेटण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. पण त्यांना भेट नाकारण्यात आली होती. १९६५ साली गुरुजी आयुर्वेदिक उपचारासाठी पालघाटला असताना मात्र ते गुरुजींना भेटले. त्यानंतर अनेकदा त्यांची गुरुजींशी भेट व चर्चा झाली. ते म्हणतात, गुरुजींशी चर्चा करून आणि संघाचे साहित्य वाचून माझ्या सर्व शंका दूर झाल्या. ते मुळीच धर्मांध नव्हते.
हिंदू राष्ट्राचे पुरस्कर्ते, पाठीराखे, हितचिंतक, कार्यकर्ते (संघाचे व अन्यही), विरोधक, विश्लेषक या सगळ्यांनीच हिंदू राष्ट्राचा हा व्यापक, भावात्मक आशय आणि दिशा लक्षात घेणे आवश्यक आहे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
सिंदी बैठकीच्या पहिल्याच दिवशी, ९ मार्च १९५४ रोजी त्यांनी या विषयावर विचार व्यक्त केले. जागतिक वाद, तत्वज्ञान, राष्ट्रीयता, आंतरराष्ट्रीयता, राष्ट्रभावना समाप्त करता येईल वा नाही, विश्वराज्य संकल्पना या साऱ्याचा उहापोह करून गुरुजी म्हणतात, `आपल्यापुढे राष्ट्र आणि जग यांच्या समन्वयाचा मार्गच तेवढा शिल्लक राहतो. जर राष्ट्रभावना आपण नाहीशी करू शकत नाही आणि विश्वराज्याची शक्यताही जर दिसत नाही तर मग कोणत्या मार्गाचा अवलंब करावयाचा? आपल्याकडे याचे उत्तर आहे पण भौतिकता हा त्याचा आधार नाही. भौतिकता ही एकाला दुसऱ्यापासून दूर ठेवण्याचेच काम करते. विश्वैक्यासाठी भौतिकतेहून अधिक उच्च भूमिकेची आवश्यकता आहे.' स्पष्ट आहे की ही भूमिका हिंदूंची आध्यात्मिक भूमिका होय. या आध्यात्मिकतेचे थोडक्यात विवेचन करून गुरुजी पुढे म्हणतात, `हिंदूजवळ हे ज्ञान सुरक्षित आहे. अन्य कोणाजवळ हे नाही. जो समाज हे ज्ञान बाकीच्या समाजाला देण्यासाठी वेळोवेळी श्रेष्ठ महापुरुष निर्माण करतो त्या समाजाने उत्तम रीतीने जिवंत राहणे आवश्यक आहे. म्हणूनच सामर्थ्य निर्माण करण्यासाठी आम्ही संघटना करतो. म्हणूनच आमची ही संघटना जगाच्या कल्याणासाठीच आहे.' हाच विषय पुढे नेउन त्यांनी तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिघातून बाहेर काढला आहे. याचे अंतिम स्वरूप काय असेल याबद्दल गुरुजी म्हणतात, `हिंदू समाजाला आपण इतके जागृत केले पाहिजे की, तो निश्चल भावाने, आत्मविश्वासाने, जगाच्या बाहेर पाहणाऱ्या प्रवृत्तीला अंतर्मुखी करून हे ज्ञान जगाला शिकवू शकेल.' परंतु त्यांचे हे व्यापक चिंतन केवळ स्वप्नरंजन नाही. अतिशय जमिनीवर राहून ते पुढे म्हणतात, `जगाच्या गोष्टी करावयाच्या म्हणजे घरच्या गोष्टी सोडावयाच्या हा भाव अशुद्ध आहे.दोघांचाही समन्वय हाच श्रेष्ठ आणि उत्तम आहे.'
या सिंदी बैठकीतच त्यांनी या विषयाचा आणखी विस्तार केला आहे. ते म्हणतात, `आम्ही राष्ट्रांचा विनाश नव्हे समन्वय चाहतो. म्हणून आम्ही आपल्या राष्ट्रजीवनाची वैशिष्ट्ये जतन करून मानवतेसाठी त्याचा विकास करू. आपल्या राष्ट्राचे त्याच्या संपूर्ण वैशिष्ट्यांसह संवर्धन करणे हेच हिंदू राष्ट्र निर्माण करणे होय. जगाला संपूर्ण मानवाच्या एकात्मतेचे दर्शन घडवण्यासाठी आपल्याला काम करावे लागेल. हिंदूंची विशेषता कायम राखण्यातच विश्वाचे कल्याण होईल. आपली प्रकृती काय आहे? भौतिकतेचा कमाल विचार करूनही आपण त्यापलीकडे जी वस्तू आहे तिचा साक्षात्कार केला आहे.त्याच दृष्टीने आपण समाजालाही पाहिले पाहिजे.'
सिंदी बैठकीतील सूत्रच इंदोर बैठकीतही कायम असल्याचे पाहायला मिळते. यासंबंधीचे आपले विचार आणखीन स्पष्ट करताना इंदोर बैठकीत गुरुजी म्हणतात, `साऱ्या जगात ज्या ज्या म्हणून राज्यव्यवस्था आणि राष्ट्रव्यवस्था आहेत त्यात मनुष्यमात्राच्या जीवनाचे लक्ष्य ऐहिक सुख समृद्धीत मानलेले आहे. म्हणजेच खाणे-पिणे, वस्त्र-प्रावरणे, निवासाची स्थाने, सुखोपभोग, वासनावृद्धी, वासना संतुष्ट करणाऱ्या साधनांची वृद्धी, त्या साधनांची उपलब्धी, मनोरंजनाची भिन्न भिन्न साधने हेच जगातील सर्व देशात सर्वसाधारण लक्ष्य त्या देशांनी स्वत:समोर ठेवलेले आहे असे आढळून येते. ज्याचे खूप प्रगतीमान असे वर्णन केले जाते तेथे सामान्य माणसाकडे टेलिफोन, मोटार, मोटारसायकल आदी ऐहिक सुखाची साधने हाच प्रगतीचा मानदंड मानला जातो. वास्तविक मानवाच्या प्रगतीचा हाच मानदंड आहे का?' असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणतात, `आमच्या पूर्वजांनी सर्व प्रकारच्या ऐहिक सुखाची आणि ऐश्वर्याची इच्छा बाळगूनही तेच काही जीवनाचे अंतिम लक्ष्य मानलेले नाही. तर मग जीवनाचे लक्ष्य कोणते? चिंतनानंतर त्यांना जे उत्तर मिळाले ते शब्दांच्या पलीकडचे आहे. आपल्या राष्ट्राचे लक्ष्य काय आहे? या अवस्थेच्या प्राप्तीसाठी व्यक्ती अग्रेसर होईल अशी विशुद्ध प्रेरणा देणे हेच ते लक्ष्य होय. प्रत्येक मानव मग तो वन्य अवस्थेतील मानव का न असो, त्याच्या हृदयात ही प्रेरणा जागृत करून तो या लक्ष्यप्राप्तीसाठी वाटचाल करील आणि या सुखाचा अधिकारी ठरेल हा आमचा राष्ट्रीय संकल्प आहे.'
माणसाने चोवीसही तास पोटाच्याच मागे धावावे काय? असा भेदक प्रश्न उपस्थित करून गुरुजी म्हणतात, `खाणे पिणे आणि सुखाने झोपणे हेच त्यांचे लक्ष्य असल्यामुळे आणि हे जीवन प्राय: पशुसारखेच असल्यामुळे मानवाला पशुसमान बनविणारी रचना त्यांनी केली. आपले लक्ष्य पशुत्वाकडून देवत्वाकडे जाणे हे आहे.' जगातील अन्य व्यवस्थांचे असे विश्लेषण करून आपल्या व्यवस्थेसंबंधी ते म्हणतात, `नवे घर तयार करावयाचे तर जुने घर पाडावे लागते. आजची जी विकृत झालेली समाजरचना आहे तिची इथून तिथपर्यंत पाडापाड करून ढीग रचून ठेवू. मग त्यातून पुढे जे काही विशुद्ध रूप उभे होईल ते होईल. आज तर सर्वांचा एकरस असा समूह बनवून, आपल्या विशुद्ध राष्ट्रीय तत्वाचे संपूर्ण स्मरण अंत:करणात ठेवून, राष्ट्राच्या नित्य चैतन्यमय व सूत्रबद्ध सामर्थ्याची आकांक्षा अंत:करणात जागृत राखणारा समाज उभा करावयाचा आहे.'
याच सूत्राचा पुढे विस्तार करताना गुरुजी म्हणतात, `प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात सत्याच्या आविष्काराचा अनुभव आणि अखिल सृष्टीतील एकात्मतेचे दर्शन घडवून; मानवाला सुखशांतीचा अनुभव प्राप्त करून देणे यातच मनुष्य जीवनाची खरी सार्थकता आहे, हे पटवून देणे हीच ती मुलभूत प्रेरणा आहे. हे कार्य आपल्याला अखिल जगतात प्रसृत करावयाचे आहे. या जगात आपले एक फार मोठे कार्य आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. आपले हे प्राचीन राष्ट्र आहे आणि त्याचे जीवन जगाचे नेतृत्व करण्यासाठी आहे. परंतु आपण आपल्या देशातील जीवन ठीक करू शकलो नाही, आपण स्वत:ला ओळखू शकलो नाही आणि जगाचे अज्ञान दूर करण्याचा संकल्प केलेले आम्ही जर स्वत:लाच विसरून बसलो तर आपले `वर्ल्ड मिशन' आपण कसे पूर्ण करू शकू?'
हे `वर्ल्ड मिशन' पूर्ण करायचे म्हणजे इतर साऱ्यांचे अस्तित्व आणि वैशिष्ट्य मिटवून टाकायचे का? किंवा या अतिभव्य लक्ष्याकडे वाटचाल करताना हे लौकिक जग सोडून द्यायचे का? या ऐहिक जगातील साऱ्या क्रियाकलापांचे स्थान काय राहील? याविषयी गुरुजी म्हणतात, `निरनिराळे भौतिकतावादी समूह त्यांचाच विचार सर्व लोकांच्या माथी मारून त्यांची डोकी बिघडविण्याचा प्रयत्न करतात, तशी काही आपली कल्पना नाही हे आपण समजून घेतले पाहिजे. याउलट प्रत्येक समाजाला त्याच्या प्रकृतीनुसारच उन्नती, उत्कर्ष आदीची प्रेरणा देत देत त्याच्यावर अंतिम सत्य आणि सद्गुणांचा सत्संस्कार योग्य प्रकारे केला पाहिजे हीच आपली दृढ धारणा आहे. परंतु यासाठी प्रभुत्वसंपन्न, शक्तीसंपन्न, सद्गुण आणि सद्भावनांनी ओतप्रोत; पारलौकिक ज्ञान आणि ऐहिक वैभव यांनी युक्त असे राष्ट्रजीवन प्रथम आपल्या घरी आपण निर्माण करू. आज जगात जितके भौतिक म्हणजेच केवळ जडवादी कार्य चालते त्यांची कबर येथेच बांधली जाईल यात मला मुळीच शंका नाही. या बाबतीत मी बिलकुल निश्चिंत आहे. पण त्यासाठी खूप कष्ट सहन करावे लागतील. खूप किंमत द्यावी लागेल. पण अशा सर्व कार्यांना मूठमाती देऊन श्रेष्ठ मानव जीवनाची निर्मिती आपण करून दाखवूच.'
ठाणे बैठकीतही याच गोष्टीचा निर्देश गुरुजींनी केला. ते म्हणाले, `आपल्या प्राचीन, चिरंतन हिंदू राष्ट्राला जगात पुन्हा श्रेष्ठ स्थान प्राप्त करून देण्याचे ; या राष्ट्राला बलसंपन्न, विजयशाली, सुखी व विश्वातील सर्व मानवांचे कल्याण करण्यास सक्षम बनविण्याचे जे उदात्त ध्येय आम्ही आपल्यासमोर ठेवले आहे त्याची पूर्ती करण्यासाठीच विविध कार्ये व कार्यक्रमांची रचना करण्याकडे आम्ही सर्वांनी लक्ष द्यावयास हवे.'
या ठाणे बैठकीत गुरुजींशी कार्यकर्त्यांशी चर्चाही झाली. अनेक प्रश्नही त्यांना विचारण्यात आले. त्यातील एका प्रश्नावर त्यांनी जे उत्तर दिले ते फार मार्मिक आहे. गुरुजी म्हणाले, `ख्रिश्चन, मुसलमान, हिंदू या सर्वांनी एकत्र नांदावे, हे केवळ हिंदूच म्हणत असतो. मुसलमान किंवा ख्रिश्चन म्हणत नाही. आमचा कोणत्याही उपासना पद्धतीला विरोध नाही. पण एखादा कोणी राष्ट्र विघातक कार्य करीत असेल; तर तो कोणीही का असेना - प्रत्यक्ष पुत्र असला तरी - त्याची गय आम्ही करणार नाही. अहल्याबाई आणि शिवाजी महाराज यांचा आदर्श याबाबतीत आमच्यासमोर आहे. तेव्हा राष्ट्रद्रोही व्यक्ती जर इतर धर्माची असेल तर तिच्याशी आम्ही तसाच व्यवहार करू, असे म्हणताना कचरण्याचे आम्हाला काही कारण नाही. आज मात्र नेमके उलटे होते आहे. शत्रू असूनही देशभक्तीचा मुखवटा धारण करणाऱ्यास मित्र बनविले जाते आणि जे रात्रंदिवस देशाचेच हितचिंतन करतात त्या आपल्याच लोकांचा निषेध केला जातो.'
या सगळ्या विवेचनावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाव धारण करणारा आणि फक्त लौकिक गोष्टींच्या मागे धावत सुटलेला जमाव नाही. या लौकिक जगाकडे (देव संकल्पनेसह साऱ्या गोष्टींकडे. कारण देव ही सुद्धा लौकिक गोष्टच आहे.) अलौकिक दृष्टीने पाहण्याची आमची आध्यात्मिकता लक्षात घेऊन संपूर्ण जगासाठी जिवंत राहणाऱ्या आणि जगणाऱ्या माणसांचा समाज असे या हिंदू राष्ट्राचे स्वरूप आहे. ते कोणाच्याही विरोधात नाही, कोणावरही दडपशाही करू इच्छिणारे नाही, जुन्याला कवटाळून बसणारे नाही, ऐहिकता नाकारणारे नाही, नवीनतेचे विरोधी नाही.परंतु त्याच वेळेस अरेरावी खपवून घेणारे, स्वार्थी, सुखलोलुप, विधीनिषेधशून्य, एकांगी असेही नाही. हिंदू राष्ट्र हे सगळ्या जगासाठी आणि संपूर्ण जगाच्या सात्विक सुखशांतीसाठी आहे.
`मल्याळम मनोरमा' या केरळातील मासिकाचे तत्कालीन संपादक के. पी. के. पिशाद्री यांचा अभिप्राय मननीय आहे. पिशाद्री हे स्वत: गांधीवादी होते. संघ वगैरेंशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. महात्मा गांधींच्या हत्येनंतर शिवनी कारागृहात गुरुजींना भेटण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. पण त्यांना भेट नाकारण्यात आली होती. १९६५ साली गुरुजी आयुर्वेदिक उपचारासाठी पालघाटला असताना मात्र ते गुरुजींना भेटले. त्यानंतर अनेकदा त्यांची गुरुजींशी भेट व चर्चा झाली. ते म्हणतात, गुरुजींशी चर्चा करून आणि संघाचे साहित्य वाचून माझ्या सर्व शंका दूर झाल्या. ते मुळीच धर्मांध नव्हते.
हिंदू राष्ट्राचे पुरस्कर्ते, पाठीराखे, हितचिंतक, कार्यकर्ते (संघाचे व अन्यही), विरोधक, विश्लेषक या सगळ्यांनीच हिंदू राष्ट्राचा हा व्यापक, भावात्मक आशय आणि दिशा लक्षात घेणे आवश्यक आहे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
भाव+ राग+ ताल= भारत
२६ जानेवारीला मित्र-मैत्रिणींना एक मेसेज पाठवला होता की, इंडिया ऐवजी
`भारत'चा वापर करा. अगदी इंग्रजीत संभाषण, लेखन करताना सुद्धा `भारत'च
वापरा. त्यावर एका मित्राचा रिप्लाय आला की, असे करणे घटनाबाह्य आहे आणि मी
भावनाशील होऊ नये. यातील एका मुद्याशी मी सहमत आहे तर एकाशी नाही. भारत या
नावाचा वापर करणे घटनाबाह्य नाही. घटनेने `india that is bharat ' असे
म्हटलेले आहे. म्हणजे दोन्हीही नावे घटनेने मान्य केली आहेत. त्यामुळे भारत
या नावाचा वापर घटनाबाह्य होऊच शकत नाही. मी फक्त घटनेनेच मान्य केलेल्या
एका नावाचा आग्रह धरला होता. पण हां, असा आग्रह करण्यात मी भावनांना महत्व
देत आहे हे त्या मित्राचे म्हणणे मला पूर्ण मान्य आहे. नव्हे ही भावना
सर्वत्र पोहोचावी, सगळ्यांनी ती उचलून धरावी असेही माझे मत आहे.
कोणतीही गोष्ट विशेषत: भाषा समजून घेताना ती `letter and spirit' अशा दोन्ही अंगांनी समजून घेणे आवश्यक असते. नुसतेच शब्द उपयोगाचे नसतात. त्यातील भाव अतिशय महत्वाचा असतो. भावासहित वापरले जाणारे शब्द अर्थवाही असतात एवढेच नाही तर त्यातून प्रवाहित होणारा अर्थ प्रेरक शक्तीसह परिणाम घडवून आणतो. आम्ही या `भाव' अंगाकडे अक्षम्य दुर्लक्ष तर केलेच आहे, उलट आता आम्ही ते नाकारू लागलो आहोत. आज दिसणारे अराजक त्याचाच परिणाम आहे.
आपल्या देशाचे नाव हाच मुद्दा घेऊ. `भारत' म्हटले की स्वाभाविकच `भारत माता की जय' मनात उमटते. इंडिया म्हटल्यावर कितीही प्रयत्न केला तरी `इंडिया माता की जय' येईल का? `भारतमाता' म्हटल्यानंतर जे जिवंत नाते, त्यापोटी येणारी समर्पणाची भावना, बांधिलकी, हजारो वर्षांचे व्यक्तिमत्वाला प्रभावित करणारे संचित, असे सारे काही प्रकट होते. पाहण्याची दृष्टीच बदलते. `i love my india' असे कितीही प्रेमाने म्हटले तरीही `भारत माता की जय'ची स्पंदने निर्माण नाही होऊ शकत. एखाद्या भाषेचा दुस्वास वा प्रेम हा मुद्दाच गैरलागू आहे. त्या-त्या भाषेचे आणि शब्दांचे सहचरी भाव असतात. त्यांचा हा परिणाम असतो. म्हणूनच कुंभमेळ्यात सहभागी होणारे विदेशी भक्त त्यांच्या उच्चारात, त्यांना शक्य होईल तसे `गंगामैय्या की जय' असेच म्हणतात. त्याचे भाषांतर करीत नाहीत किंवा त्यांच्या भाषेत `गंगामैय्या की जय'चा भाव व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत नाहीत.
आपण कितीही काही म्हटले तरीही इंडिया म्हटले की, या भूमीशी असलेले नाते; आपला सांस्कृतिक अनुबंध, आपले सामाजिक वातावरण उत्पन्न होत नाही, हे वास्तव आहे. गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, कृष्णा, गोदावरी, हिमालय, कन्याकुमारी, राम-कृष्ण, बुद्ध, महावीर, गुरु गोविंदसिंग, शिवाजी, जगन्नाथ रथयात्रा, श्रावणबाळ, जोरावरसिंह- फतेहसिंह, कुंभमेळा, दसरा, दिवाळी, होळी, पुरणपोळी, वडाभात, झुणका-भाकर, नागपंचमी, तुळशीचे लग्न, मंगळागौर, वेद, उपनिषदे, आर्यभट्ट, कणाद, सुश्रुत, अशोक, विक्रमादित्य, कालिदास, शाकुंतल, शेजारधर्म, तुळशी वृंदावन, मरणाला आणि तोरणाला जाण्याचा आग्रह वगैरे वगैरे त्यातील काहीही आशयासह मनात उमटत नाही. असे अनेक दृश्य- अदृश्य धागे असतात ज्यामुळे समाजाच्या मनात `आम्ही' भावाचा उदय होतो.
आम्ही भावनांचा ओलावा काढून टाकून प्रत्येक माणसाचा एकेक ठोकळा करून टाकला आहे. माणूस म्हणजे फारतर एक मत. वास्तविक मत ही एक राजकीय व्यवस्था आहे. माणूस त्या मतापेक्षा खूप अधिक असतो. एक मत टाकले की झाले, असे होत नाही. तो काही राजकीय यंत्राचा एक नट-बोल्ट नाही. केवळ कायदे, नियम, शिक्षेची तरतूद हे सारे; त्याचे विचार आणि व्यवहार यांचे नियमन करू शकत नाही. माणसाचे विचार आणि व्यवहार त्याच्या स्वत:चे मन आणि बुद्धी यांनीच चालत असतात आणि नियंत्रित होत असतात. अन भावनांचे आवाहन त्याचा विवेकबोध जागृत ठेवीत असते. त्यामुळेच आजकाल बुद्ध्यांक लक्षात घेतात तसेच भावनांक देखील मोजू लागले आहेत. आता तर spiritual quotient देखील पाहू लागले आहेत. माणसाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर प्रथम त्याचा सर्वांगीण विचार करायला हवा.
व्यवहारात सुद्धा ही बाब पाहायला मिळते. आपण एखाद्या व्यक्तीसाठी काही करतो तेव्हा त्याच्याविषयी मनात असलेल्या भावना याच निर्णायक ठरतात. `आधी लगीन कोंडाण्याचे, मग रायबाचे' असे म्हणणारे तानाजी मालुसरे किंवा `तोफांचे आवाज येईतो गनिमास खिंड ओलांडू देणार नाही' असे महाराजांना आश्वस्त करणारे बाजीप्रभू देशपांडे भावनांच्या आवेगानेच कार्यप्रवण होत असतात. भारतीय स्वातंत्र्यासाठी सुद्धा जे झुंजले, त्यांच्याकडे भावनांशिवाय दुसरे काय होते? अगदी १९६५ च्या भारत- पाक युद्धाच्या वेळी देखील लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान- जय किसान ही घोषणा केली आणि लोकांना बचत करण्याचे, शक्य असल्यास एक वेळ जेवण्याचे आवाहन केले आणि लोकांनी या भावनांना प्रचंड प्रतिसाद दिला. अनेक जण तर त्यानंतर जन्मभर एकदाच जेवत असत. भावनांमध्ये माणसाला त्याच्या अंगभूत मर्यादांच्या वर उचलण्याची शक्ती असते. भावनांचे आवाहन माणसाला हिमालयाएवढे कर्तृत्व गाजवण्याचे बळ देते. भावनांचा आधारच माणसाला अनेक संकटातून तारून नेते.
आज मात्र आम्ही सगळीकडूनच या भावनांची हकालपट्टी करण्याच्या मागे लागलो आहोत. सध्या हैद्राबाद बॉम्बस्फोट प्रकरण सुरु आहे. अन्यत्रही बॉम्बस्फोट होत असतात. सुरक्षा यंत्रणांचे अपयश, यावरही चर्चा सुरु आहेत. या सुरक्षा यंत्रणांचे खबरे असतात. त्यांना काही थोडीबहुत रक्कमही दिली जाते, त्यांनी माहिती द्यावी म्हणून. हा सगळा व्यवहार झाला. तो योग्यही आहे, पण आपण त्यात भावना ओतल्या नाहीत. ओतत नाही. आपण तो फक्त पैशाचा व्यवहार म्हणून करतो. त्यामुळे मग कोणी अधिक पैसे दिले की खबऱ्या त्याला माहिती देणार. किंवा `एवढ्या कमी पैशात माहिती कशी देणार' म्हणून बहाणेबाजी करणार. मात्र, आपण जे माहिती देण्याचे काम करीत आहोत ते देशभक्तीचे काम आहे अशी भावना त्याच्या मनात जागवली तर? मग त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळू शकतील.
सरकारी कार्यालयात वा अन्यत्रही लोक काम करताना आढळत नाहीत. किंवा जे काम करतात ते परिणामकारक नसते. टाळाटाळ, चालढकल हे सारे का पाहायला मिळते? कारण काम करण्याची प्रेरणाच मुळी, पैसा कमावणे ही आहे. आपण आपल्याच समाज बांधवांचे काम करतो आहोत, त्यांच्या सुख-सुविधांसाठी काम करीत आहोत. या कामाचा मोबदला आपल्याला मिळतो, मिळायलाही हवा. त्यातून आपला चरितार्थ चालतो. पण कामाचा उद्देश पैसा कमावणे हा नाही, तर समाजाचे, लोकांचे हित हा उद्देश आहे ही भावना असली तर माणसे मनापासून आणि चांगले काम करू शकतील. आज मात्र आम्ही कामाची प्रेरणाच खुजी करून टाकली आहे. सारा समाजच निरर्थक, निरुद्देश जगतो आहे. त्याला उद्देश आणि सार्थकता प्रदान करण्यासाठी त्याच्या व्यक्तित्वाच्या भावनिक पैलूकडे लक्ष देण्याची अन तो अधिक समृद्ध आणि सकस बनवण्याची गरज आहे.
सगळ्या जगभरच आज हा पोकळपणा जाणवू लागला आहे. त्यामुळेच इतक्या बैठकी होतात, अहवाल होतात, सर्वेक्षणे होतात, अभ्यास होतात, नियोजन होते, ठराव होतात; त्यातून हाती मात्र काहीच लागत नाही. ज्या माणसांसाठी हे सारे सुरु असते, त्या माणसाला सुटे सुटे करून काही साध्य होणार नाही. माणसाला माणसाशी, समाजाशी, निसर्गाशी, भावनांशी, संवेदनांशी जोडण्याची गरज आहे. `मी आणि माझे' विरुद्ध `सर्वेपि सुखिन: सन्तु' असा हा मूल्यसंघर्ष आहे. `इंडिया' `मी आणि माझे'चा निर्देश करतो; तर `भारत' `सर्वेपि सुखिन: सन्तु'चा निर्देश करतो. म्हणून `भारत' म्हणण्याचा भावनिक आग्रह मी सगळ्या मित्रांना गणराज्य दिनानिमित्त केला होता. दोन दिवसांपूर्वी हैद्राबाद शहरात झालेल्या बॉम्बस्फोटांनी पुन्हा एकदा तोच आग्रह करावासा वाटला.
आमच्या देशाचे नाव भारत आहे. अतिशय अन्वर्थक असे ते नाव आहे. त्यात भा=भाव, र=राग, त=ताल आहेत. याच आशयपूर्ण नावाचा आग्रही वापर करीत त्याला गमावलेला ताल परत मिळवून देण्याचा प्रयत्न केला तरच भारताची भावसरगम संपूर्ण जगात माधुर्यसंगीत निर्माण करेल.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, २३ फेब्रुवारी २०१३
कोणतीही गोष्ट विशेषत: भाषा समजून घेताना ती `letter and spirit' अशा दोन्ही अंगांनी समजून घेणे आवश्यक असते. नुसतेच शब्द उपयोगाचे नसतात. त्यातील भाव अतिशय महत्वाचा असतो. भावासहित वापरले जाणारे शब्द अर्थवाही असतात एवढेच नाही तर त्यातून प्रवाहित होणारा अर्थ प्रेरक शक्तीसह परिणाम घडवून आणतो. आम्ही या `भाव' अंगाकडे अक्षम्य दुर्लक्ष तर केलेच आहे, उलट आता आम्ही ते नाकारू लागलो आहोत. आज दिसणारे अराजक त्याचाच परिणाम आहे.
आपल्या देशाचे नाव हाच मुद्दा घेऊ. `भारत' म्हटले की स्वाभाविकच `भारत माता की जय' मनात उमटते. इंडिया म्हटल्यावर कितीही प्रयत्न केला तरी `इंडिया माता की जय' येईल का? `भारतमाता' म्हटल्यानंतर जे जिवंत नाते, त्यापोटी येणारी समर्पणाची भावना, बांधिलकी, हजारो वर्षांचे व्यक्तिमत्वाला प्रभावित करणारे संचित, असे सारे काही प्रकट होते. पाहण्याची दृष्टीच बदलते. `i love my india' असे कितीही प्रेमाने म्हटले तरीही `भारत माता की जय'ची स्पंदने निर्माण नाही होऊ शकत. एखाद्या भाषेचा दुस्वास वा प्रेम हा मुद्दाच गैरलागू आहे. त्या-त्या भाषेचे आणि शब्दांचे सहचरी भाव असतात. त्यांचा हा परिणाम असतो. म्हणूनच कुंभमेळ्यात सहभागी होणारे विदेशी भक्त त्यांच्या उच्चारात, त्यांना शक्य होईल तसे `गंगामैय्या की जय' असेच म्हणतात. त्याचे भाषांतर करीत नाहीत किंवा त्यांच्या भाषेत `गंगामैय्या की जय'चा भाव व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत नाहीत.
आपण कितीही काही म्हटले तरीही इंडिया म्हटले की, या भूमीशी असलेले नाते; आपला सांस्कृतिक अनुबंध, आपले सामाजिक वातावरण उत्पन्न होत नाही, हे वास्तव आहे. गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, कृष्णा, गोदावरी, हिमालय, कन्याकुमारी, राम-कृष्ण, बुद्ध, महावीर, गुरु गोविंदसिंग, शिवाजी, जगन्नाथ रथयात्रा, श्रावणबाळ, जोरावरसिंह- फतेहसिंह, कुंभमेळा, दसरा, दिवाळी, होळी, पुरणपोळी, वडाभात, झुणका-भाकर, नागपंचमी, तुळशीचे लग्न, मंगळागौर, वेद, उपनिषदे, आर्यभट्ट, कणाद, सुश्रुत, अशोक, विक्रमादित्य, कालिदास, शाकुंतल, शेजारधर्म, तुळशी वृंदावन, मरणाला आणि तोरणाला जाण्याचा आग्रह वगैरे वगैरे त्यातील काहीही आशयासह मनात उमटत नाही. असे अनेक दृश्य- अदृश्य धागे असतात ज्यामुळे समाजाच्या मनात `आम्ही' भावाचा उदय होतो.
आम्ही भावनांचा ओलावा काढून टाकून प्रत्येक माणसाचा एकेक ठोकळा करून टाकला आहे. माणूस म्हणजे फारतर एक मत. वास्तविक मत ही एक राजकीय व्यवस्था आहे. माणूस त्या मतापेक्षा खूप अधिक असतो. एक मत टाकले की झाले, असे होत नाही. तो काही राजकीय यंत्राचा एक नट-बोल्ट नाही. केवळ कायदे, नियम, शिक्षेची तरतूद हे सारे; त्याचे विचार आणि व्यवहार यांचे नियमन करू शकत नाही. माणसाचे विचार आणि व्यवहार त्याच्या स्वत:चे मन आणि बुद्धी यांनीच चालत असतात आणि नियंत्रित होत असतात. अन भावनांचे आवाहन त्याचा विवेकबोध जागृत ठेवीत असते. त्यामुळेच आजकाल बुद्ध्यांक लक्षात घेतात तसेच भावनांक देखील मोजू लागले आहेत. आता तर spiritual quotient देखील पाहू लागले आहेत. माणसाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर प्रथम त्याचा सर्वांगीण विचार करायला हवा.
व्यवहारात सुद्धा ही बाब पाहायला मिळते. आपण एखाद्या व्यक्तीसाठी काही करतो तेव्हा त्याच्याविषयी मनात असलेल्या भावना याच निर्णायक ठरतात. `आधी लगीन कोंडाण्याचे, मग रायबाचे' असे म्हणणारे तानाजी मालुसरे किंवा `तोफांचे आवाज येईतो गनिमास खिंड ओलांडू देणार नाही' असे महाराजांना आश्वस्त करणारे बाजीप्रभू देशपांडे भावनांच्या आवेगानेच कार्यप्रवण होत असतात. भारतीय स्वातंत्र्यासाठी सुद्धा जे झुंजले, त्यांच्याकडे भावनांशिवाय दुसरे काय होते? अगदी १९६५ च्या भारत- पाक युद्धाच्या वेळी देखील लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान- जय किसान ही घोषणा केली आणि लोकांना बचत करण्याचे, शक्य असल्यास एक वेळ जेवण्याचे आवाहन केले आणि लोकांनी या भावनांना प्रचंड प्रतिसाद दिला. अनेक जण तर त्यानंतर जन्मभर एकदाच जेवत असत. भावनांमध्ये माणसाला त्याच्या अंगभूत मर्यादांच्या वर उचलण्याची शक्ती असते. भावनांचे आवाहन माणसाला हिमालयाएवढे कर्तृत्व गाजवण्याचे बळ देते. भावनांचा आधारच माणसाला अनेक संकटातून तारून नेते.
आज मात्र आम्ही सगळीकडूनच या भावनांची हकालपट्टी करण्याच्या मागे लागलो आहोत. सध्या हैद्राबाद बॉम्बस्फोट प्रकरण सुरु आहे. अन्यत्रही बॉम्बस्फोट होत असतात. सुरक्षा यंत्रणांचे अपयश, यावरही चर्चा सुरु आहेत. या सुरक्षा यंत्रणांचे खबरे असतात. त्यांना काही थोडीबहुत रक्कमही दिली जाते, त्यांनी माहिती द्यावी म्हणून. हा सगळा व्यवहार झाला. तो योग्यही आहे, पण आपण त्यात भावना ओतल्या नाहीत. ओतत नाही. आपण तो फक्त पैशाचा व्यवहार म्हणून करतो. त्यामुळे मग कोणी अधिक पैसे दिले की खबऱ्या त्याला माहिती देणार. किंवा `एवढ्या कमी पैशात माहिती कशी देणार' म्हणून बहाणेबाजी करणार. मात्र, आपण जे माहिती देण्याचे काम करीत आहोत ते देशभक्तीचे काम आहे अशी भावना त्याच्या मनात जागवली तर? मग त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळू शकतील.
सरकारी कार्यालयात वा अन्यत्रही लोक काम करताना आढळत नाहीत. किंवा जे काम करतात ते परिणामकारक नसते. टाळाटाळ, चालढकल हे सारे का पाहायला मिळते? कारण काम करण्याची प्रेरणाच मुळी, पैसा कमावणे ही आहे. आपण आपल्याच समाज बांधवांचे काम करतो आहोत, त्यांच्या सुख-सुविधांसाठी काम करीत आहोत. या कामाचा मोबदला आपल्याला मिळतो, मिळायलाही हवा. त्यातून आपला चरितार्थ चालतो. पण कामाचा उद्देश पैसा कमावणे हा नाही, तर समाजाचे, लोकांचे हित हा उद्देश आहे ही भावना असली तर माणसे मनापासून आणि चांगले काम करू शकतील. आज मात्र आम्ही कामाची प्रेरणाच खुजी करून टाकली आहे. सारा समाजच निरर्थक, निरुद्देश जगतो आहे. त्याला उद्देश आणि सार्थकता प्रदान करण्यासाठी त्याच्या व्यक्तित्वाच्या भावनिक पैलूकडे लक्ष देण्याची अन तो अधिक समृद्ध आणि सकस बनवण्याची गरज आहे.
सगळ्या जगभरच आज हा पोकळपणा जाणवू लागला आहे. त्यामुळेच इतक्या बैठकी होतात, अहवाल होतात, सर्वेक्षणे होतात, अभ्यास होतात, नियोजन होते, ठराव होतात; त्यातून हाती मात्र काहीच लागत नाही. ज्या माणसांसाठी हे सारे सुरु असते, त्या माणसाला सुटे सुटे करून काही साध्य होणार नाही. माणसाला माणसाशी, समाजाशी, निसर्गाशी, भावनांशी, संवेदनांशी जोडण्याची गरज आहे. `मी आणि माझे' विरुद्ध `सर्वेपि सुखिन: सन्तु' असा हा मूल्यसंघर्ष आहे. `इंडिया' `मी आणि माझे'चा निर्देश करतो; तर `भारत' `सर्वेपि सुखिन: सन्तु'चा निर्देश करतो. म्हणून `भारत' म्हणण्याचा भावनिक आग्रह मी सगळ्या मित्रांना गणराज्य दिनानिमित्त केला होता. दोन दिवसांपूर्वी हैद्राबाद शहरात झालेल्या बॉम्बस्फोटांनी पुन्हा एकदा तोच आग्रह करावासा वाटला.
आमच्या देशाचे नाव भारत आहे. अतिशय अन्वर्थक असे ते नाव आहे. त्यात भा=भाव, र=राग, त=ताल आहेत. याच आशयपूर्ण नावाचा आग्रही वापर करीत त्याला गमावलेला ताल परत मिळवून देण्याचा प्रयत्न केला तरच भारताची भावसरगम संपूर्ण जगात माधुर्यसंगीत निर्माण करेल.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, २३ फेब्रुवारी २०१३
चव्हाटा'वरील धटिंगणशाही
फेसबुकवर `चव्हाटा' नावाचा एक ग्रुप आहे. गेल्या शुक्रवारी १५ फेब्रुवारी
रोजी `संघ समजून घेताना' या शीर्षकाने एक लेख मी त्यावर टाकला. (हा लेख
नेटवर अन्यत्रही टाकला आहे.) त्यावर स्वाभाविकच प्रतिक्रियाही आल्या. आता
प्रतिक्रिया म्हटल्यावर काही समर्थनाच्या येणार तर काही विरोधाच्याही.
त्यात नवीन काहीच नाही. गेली २० वर्षे लेखन करीत असल्याने ते सवयीचे आहे.
`चव्हाटा'वर आलेल्या प्रतिक्रिया मात्र खोडसाळ होत्या. त्यातील आशय आणि
शैली पाहून हा खोडसाळपणा स्पष्ट होत होताच. तरीही त्याला उत्तर दिले.
अर्थात हे उत्तर खरमरीत असेच होते. त्याचाच एक लेख होईल एवढे विस्तृतही
होते. त्यावरही पुन्हा प्रतिक्रिया आली. त्यावरून संबंधितांना विषय समजूनही
घ्यायचा नाही आणि नीट चर्चाही करायची नाही हे लक्षात आले. त्यामुळे त्या
लिखाणाची आणि लिहिणाऱ्याची थोडीबहुत टिंगलटवाळी करून आणि काही तडाखे लावून
मी विषय संपविला.
आज (सोमवार, १८ फेब्रुवारी) त्यावर पुन्हा प्रतिक्रिया दिसल्या. यावेळी झुंडशाही सुरु झाली होती. मी मुद्देसूद दिलेले उत्तर दुर्लक्षित करून काहीतरी इकडतिकडचे भारुड त्यात होते. तेही प्रत्यक्ष वस्तुस्थिती या स्वरूपाचे नसून गृहीतक या स्वरूपाचे. म्हणजे `आम्हाला असे वाटते, म्हणून ते तसेच आहे' अशा पद्धतीचे. तिथवर सुद्धा काही हरकत नव्हती. काही नाठाळ लोक असतातच. पण त्यात एक वाक्य होते की, `असे काही यापुढे लिहाल आणि प्रसारित कराल तर आम्ही तुमच्यावर तुटून पडणारच.' ही चक्क अरेरावी आणि हडेलहप्पी होती. तरीही माझा अनुभव लक्षात घेऊन, माझे निखळ प्रबोधनाचे हेतू आठवून आणि थोडेसे दुर्लक्ष करून; त्यावर काही उत्तर लिहिण्याऐवजी मी दुसरा मार्ग उपयोगात आणला.
माझ्या समर्थनार्थ जे मुद्दे मी मांडले होते त्यांना आधार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे `thoughts on pakistan', महात्मा गांधींचा हिंदुत्वावरील संपूर्ण लेख, सर्वोच्च न्यायालयाचे हिंदुत्वाच्या मुद्यावरील संपूर्ण निकालपत्र, मनुस्मृती आणि डॉ. आंबेडकर याविषयीची काही माहिती आणि अजमेर दर्ग्यापुढून जाणारे संघाचे संचलन आणि त्याचे स्वागत करणारे मुस्लिम बांधव यांचे छायाचित्र `चव्हाटा'वर टाकले. थोड्याच वेळात `चव्हाटा'च्या अॅडमीनचा मेसेज आला की, मी कोणतेही प्रचारकी साहित्य त्या ग्रुपवर टाकू नये. खरे तर मी टाकलेल्या छायाचित्राशिवाय अन्य काहीही प्रचारकी या पद्धतीचे नव्हते. मी त्यांना कळवले की, मी कोणाचा प्रचार वगैरे करण्याचा प्रश्नच नाही. मी माझे विचार स्वतंत्रपणे मांडत असतो. परंतु योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. अपप्रचार आणि गैरसमज रोखण्याचा तोच परिणामकारक आणि एकमेव मार्ग आहे. छायाचित्र हा प्रचार नसून लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे आहे. त्यावर अॅडमीनचे उत्तर आले की, सध्या व्यस्त आहे. मग बोलू. थोड्या वेळाने `चव्हाटा'वर पाहिले तर माझी सगळी पोस्ट काढून टाकलेली होती. मी लगेच अॅडमीनला मेसेज पाठवला आणि ग्रुप सोडला.
हा प्रकार इथेच संपला. तो फार काही मनावर घ्यावा असेही काही नाही. तो ग्रुप सोडल्याने मी माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवू शकणार नाही असेही नाही. केवळ फेसबुकचा विचार केला तरीही अन्य अनेक पर्याय आहेत. बाकी मार्ग तर आहेतच. त्या ग्रुपची सदस्यसंख्या साडेआठशेच्या जवळपास आहे. त्याहून जास्त लोकांपर्यंत एका दिवसात प्रत्यक्ष पोहोचण्याची माझी शक्ती आहे. त्यामुळे तोही भाग नाही. हे सगळं काही लिहून शेअर करावं असंही मनात नव्हतं.
परंतु हा प्रकार झाल्यावर दूरचित्रवाणी पाहिली. त्यावर headlines today वर राजीव कंवल चर्चा घेत होता. मार्कंडेय काटजू आणि अरुण जेटली वादावर. मोदींना मुस्लिम समाजाचा असलेला विरोध, हा मुद्दा होता. राजीव कंवल मुद्दा मांडत होता की, मोदी तर मुस्लिम बहुल भागातही जिंकले आहेत. विधानसभाही जिंकले आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थाही जिंकले आहेत. पण काटजू यांचे एकच उत्तर, मोदींना मुसलमानांचा प्रचंड विरोध आहे. राजीव कंवल मांडत असलेल्या वास्तवावर बोलायला ते तयारच नव्हते, बस आपला निष्कर्ष रेटणे एवढेच.
वास्तविक, समोर असलेल्या आणि येणाऱ्या माहितीचे विश्लेषण करून त्याचा अन्वयार्थ लावून निष्कर्ष काढणे हीच शास्त्रीय पद्धत असू शकते. दुसरी कुठलीही नाही. पण निष्कर्ष आधीच काढायचा, त्याचा आधार `आम्ही म्हणतो म्हणून'; अन्य गोष्टींकडे पूर्ण दुर्लक्ष करायचे. आणि एकदम जाणवले, प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सन्माननीय अध्यक्ष काय आणि `चव्हाटा'वरील दीडदमडीचे विद्वान काय, एकाच माळेचे मणी. त्यांचे हेतू वेगळे सांगायची गरज आहे का? समाज एकसंध राहावा असे त्यांना खरेच वाटते का?
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, १८ फेब्रुवारी २०१३
आज (सोमवार, १८ फेब्रुवारी) त्यावर पुन्हा प्रतिक्रिया दिसल्या. यावेळी झुंडशाही सुरु झाली होती. मी मुद्देसूद दिलेले उत्तर दुर्लक्षित करून काहीतरी इकडतिकडचे भारुड त्यात होते. तेही प्रत्यक्ष वस्तुस्थिती या स्वरूपाचे नसून गृहीतक या स्वरूपाचे. म्हणजे `आम्हाला असे वाटते, म्हणून ते तसेच आहे' अशा पद्धतीचे. तिथवर सुद्धा काही हरकत नव्हती. काही नाठाळ लोक असतातच. पण त्यात एक वाक्य होते की, `असे काही यापुढे लिहाल आणि प्रसारित कराल तर आम्ही तुमच्यावर तुटून पडणारच.' ही चक्क अरेरावी आणि हडेलहप्पी होती. तरीही माझा अनुभव लक्षात घेऊन, माझे निखळ प्रबोधनाचे हेतू आठवून आणि थोडेसे दुर्लक्ष करून; त्यावर काही उत्तर लिहिण्याऐवजी मी दुसरा मार्ग उपयोगात आणला.
माझ्या समर्थनार्थ जे मुद्दे मी मांडले होते त्यांना आधार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे `thoughts on pakistan', महात्मा गांधींचा हिंदुत्वावरील संपूर्ण लेख, सर्वोच्च न्यायालयाचे हिंदुत्वाच्या मुद्यावरील संपूर्ण निकालपत्र, मनुस्मृती आणि डॉ. आंबेडकर याविषयीची काही माहिती आणि अजमेर दर्ग्यापुढून जाणारे संघाचे संचलन आणि त्याचे स्वागत करणारे मुस्लिम बांधव यांचे छायाचित्र `चव्हाटा'वर टाकले. थोड्याच वेळात `चव्हाटा'च्या अॅडमीनचा मेसेज आला की, मी कोणतेही प्रचारकी साहित्य त्या ग्रुपवर टाकू नये. खरे तर मी टाकलेल्या छायाचित्राशिवाय अन्य काहीही प्रचारकी या पद्धतीचे नव्हते. मी त्यांना कळवले की, मी कोणाचा प्रचार वगैरे करण्याचा प्रश्नच नाही. मी माझे विचार स्वतंत्रपणे मांडत असतो. परंतु योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. अपप्रचार आणि गैरसमज रोखण्याचा तोच परिणामकारक आणि एकमेव मार्ग आहे. छायाचित्र हा प्रचार नसून लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे आहे. त्यावर अॅडमीनचे उत्तर आले की, सध्या व्यस्त आहे. मग बोलू. थोड्या वेळाने `चव्हाटा'वर पाहिले तर माझी सगळी पोस्ट काढून टाकलेली होती. मी लगेच अॅडमीनला मेसेज पाठवला आणि ग्रुप सोडला.
हा प्रकार इथेच संपला. तो फार काही मनावर घ्यावा असेही काही नाही. तो ग्रुप सोडल्याने मी माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवू शकणार नाही असेही नाही. केवळ फेसबुकचा विचार केला तरीही अन्य अनेक पर्याय आहेत. बाकी मार्ग तर आहेतच. त्या ग्रुपची सदस्यसंख्या साडेआठशेच्या जवळपास आहे. त्याहून जास्त लोकांपर्यंत एका दिवसात प्रत्यक्ष पोहोचण्याची माझी शक्ती आहे. त्यामुळे तोही भाग नाही. हे सगळं काही लिहून शेअर करावं असंही मनात नव्हतं.
परंतु हा प्रकार झाल्यावर दूरचित्रवाणी पाहिली. त्यावर headlines today वर राजीव कंवल चर्चा घेत होता. मार्कंडेय काटजू आणि अरुण जेटली वादावर. मोदींना मुस्लिम समाजाचा असलेला विरोध, हा मुद्दा होता. राजीव कंवल मुद्दा मांडत होता की, मोदी तर मुस्लिम बहुल भागातही जिंकले आहेत. विधानसभाही जिंकले आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थाही जिंकले आहेत. पण काटजू यांचे एकच उत्तर, मोदींना मुसलमानांचा प्रचंड विरोध आहे. राजीव कंवल मांडत असलेल्या वास्तवावर बोलायला ते तयारच नव्हते, बस आपला निष्कर्ष रेटणे एवढेच.
वास्तविक, समोर असलेल्या आणि येणाऱ्या माहितीचे विश्लेषण करून त्याचा अन्वयार्थ लावून निष्कर्ष काढणे हीच शास्त्रीय पद्धत असू शकते. दुसरी कुठलीही नाही. पण निष्कर्ष आधीच काढायचा, त्याचा आधार `आम्ही म्हणतो म्हणून'; अन्य गोष्टींकडे पूर्ण दुर्लक्ष करायचे. आणि एकदम जाणवले, प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सन्माननीय अध्यक्ष काय आणि `चव्हाटा'वरील दीडदमडीचे विद्वान काय, एकाच माळेचे मणी. त्यांचे हेतू वेगळे सांगायची गरज आहे का? समाज एकसंध राहावा असे त्यांना खरेच वाटते का?
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, १८ फेब्रुवारी २०१३
या विकृतांना वठणीवर कसे आणायचे?
आपल्या समाजाला कौतुकाची खूप घाणेरडी सवय लागली आहे आणि राजकारण नामक
गोष्टीने सारा समाज नासवून टाकला आहे. आज पुन्हा हे आठवायचे कारण म्हणजे
डीजे नावाचा प्रकार. प्रत्येकाला कधी ना कधी हा त्रास सोसावा लागतोच. आम्ही
करू मात्र काहीच शकत नाही. तीन-चार तास ज्यावेळी सतत कानठळ्या बसत असतात
त्यावेळी करायचे काय? कायदा गाढव असतो म्हणतात ते काही खोटे नाही. अमुक
वेळेत तुम्ही डीजे वाजवू शकता. म्हणजे त्या वेळेत कोणाला त्रास होऊ शकत
नाही की काय? की त्या वेळेतील त्रास निमूटपणे सहन केलाच पाहिजे? बरे या
प्रकारात आनंद काय असतो देवच जाणे. अन समजा माझ्यासारख्या मूर्खाला तो आनंद
समजत नसेल वा तो लुटता येत नसेल तरीही, मला त्रास देऊन आनंद साजरा
करण्याची परवानगी कोणाला कशी काय असू शकेल? अनेकदा तर समाजातील तथाकथित
प्रतिष्ठीतच या प्रकाराशी संबंधित असतात. `जाऊ द्या ना' अशीच त्यांची
भूमिका असते.
वास्तविक कोणाच्या तक्रारीची वगैरेही वाट न पाहता कारवाई करण्याचे आणि साहित्य जप्त करण्याचे अधिकार पोलिसांना द्यायला हवेत. अन ज्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली जाईल त्या ठाण्यातील अधिकाऱ्याचीच त्वरित बदली करायला हवी. म्हणजे ते स्वत:हून efficiently काम करतील. दुसरे म्हणजे हे साहित्य काही कोणाच्या घरात नसते. बहुतेक वेळा ते भाड्याने आणलेले असते. हा व्यवसाय करणाऱ्यावरच ही कारवाई व्हायला हवी. त्याने सामानच ठेवले नाही तर कोण वाजवणार डीजे. जेव्हा डीजे नव्हते तेव्हाही मंडप डेकोरेशनवाले होतेच ना?
अशा प्रकारची गाणी तयार करणारे, म्हणणारे, वाजवणारे, असे चित्रपट, असे studio या सार्यांवर बंदी घालून कारवाई करायला हवी. यांना दुसरा काही रोजगार नाही मिळाला अन ते मेले तरी काय हरकत आहे. जो दुसऱ्याचा विचार करायला नकार देतो तो जिवंत असल्यापेक्षा मेलेलाच बरा. घर हलवणारे, डोके बधिर करणारे हे गाणे बजावणे बंद व्हायलाच हवे. घरे हलवणाऱ्या गाण्यांपेक्षा मने डोलवणारे संगीत हवे. आजचे गीतकार, संगीतकार ते देऊ शकत नसतील तर त्यांनी मरून जावे. आणि समाजानेही काय पोसायचे आणि काय संपवायचे याचा विवेक शिकला पाहिजे. स्वत:च्या कौतुकाच्या आरत्या ओवाळून घेणे समाजानेही टाकून द्यायला हवे.
ज्यांनी कारवाई करायला हवी ते आणि त्रास सोसूनही तो निमूट सहन करतात ते षंढ आहेत तर दुसऱ्यांचा विचार न करणारे विकृत आहेत, असे म्हणण्याशिवाय गत्यंतर नाही. सर्व प्रकारचं पाप वाट्याला आलं तरीही चालेल पण अशा विकृतांचं तळपट व्हावं, कधीही भलं होऊ नये, त्यांच्या अंगात किडे पडावे आणि मेल्यावर त्यांनी नरकात जावं याशिवाय दुसरं काहीही म्हणता येण्यासारखं नाही.
वास्तविक कोणाच्या तक्रारीची वगैरेही वाट न पाहता कारवाई करण्याचे आणि साहित्य जप्त करण्याचे अधिकार पोलिसांना द्यायला हवेत. अन ज्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली जाईल त्या ठाण्यातील अधिकाऱ्याचीच त्वरित बदली करायला हवी. म्हणजे ते स्वत:हून efficiently काम करतील. दुसरे म्हणजे हे साहित्य काही कोणाच्या घरात नसते. बहुतेक वेळा ते भाड्याने आणलेले असते. हा व्यवसाय करणाऱ्यावरच ही कारवाई व्हायला हवी. त्याने सामानच ठेवले नाही तर कोण वाजवणार डीजे. जेव्हा डीजे नव्हते तेव्हाही मंडप डेकोरेशनवाले होतेच ना?
अशा प्रकारची गाणी तयार करणारे, म्हणणारे, वाजवणारे, असे चित्रपट, असे studio या सार्यांवर बंदी घालून कारवाई करायला हवी. यांना दुसरा काही रोजगार नाही मिळाला अन ते मेले तरी काय हरकत आहे. जो दुसऱ्याचा विचार करायला नकार देतो तो जिवंत असल्यापेक्षा मेलेलाच बरा. घर हलवणारे, डोके बधिर करणारे हे गाणे बजावणे बंद व्हायलाच हवे. घरे हलवणाऱ्या गाण्यांपेक्षा मने डोलवणारे संगीत हवे. आजचे गीतकार, संगीतकार ते देऊ शकत नसतील तर त्यांनी मरून जावे. आणि समाजानेही काय पोसायचे आणि काय संपवायचे याचा विवेक शिकला पाहिजे. स्वत:च्या कौतुकाच्या आरत्या ओवाळून घेणे समाजानेही टाकून द्यायला हवे.
ज्यांनी कारवाई करायला हवी ते आणि त्रास सोसूनही तो निमूट सहन करतात ते षंढ आहेत तर दुसऱ्यांचा विचार न करणारे विकृत आहेत, असे म्हणण्याशिवाय गत्यंतर नाही. सर्व प्रकारचं पाप वाट्याला आलं तरीही चालेल पण अशा विकृतांचं तळपट व्हावं, कधीही भलं होऊ नये, त्यांच्या अंगात किडे पडावे आणि मेल्यावर त्यांनी नरकात जावं याशिवाय दुसरं काहीही म्हणता येण्यासारखं नाही.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)