शुक्रवार, २० मे, २०२२

शाश्वत धर्म

भारताबाहेरील बहुतांश समाज युगधर्म आणि आपद्धर्म यांच्याच आधारे चालतात. शाश्वत धर्माचा विचार तेथील पुष्कळांनी केला आहे पण भारताएवढा नाही. अन भारतीय समाजात शाश्वत धर्म मुरवण्याचा जेवढा सातत्यपूर्ण प्रयत्न झाला तेवढा अन्यत्र झाला नाही. जे प्रयत्न झाले ते अयशस्वी राहिले. भारतात युगधर्म आणि आपद्धर्म यासोबतच शाश्वत धर्माचा प्रवाहदेखील वाहत राहिला. हा प्रत्येक धर्म पार पाडणारे वेगवेगळे होते, त्यांची भाषा वेगवेगळी राहत असे, त्यांचे विषय आणि प्रतिपादन वेगवेगळे राहत असे, त्यांचे प्राधान्यक्रम वेगवेगळे असत. त्यामुळेच भारताबाहेरच्या समाजांना अभिप्रेत असलेली monolithic एकता भारतात नाही. मानव जातीसमोरील आजचे प्रश्न, आजच्या समस्या या monolithic विचारांमुळे उत्पन्न झालेल्या आहेत. शाश्वत धर्माची विश्वव्यापी चर्चा घडवण्याची आणि त्याला मानव जीवनात रुजवण्याचा प्रयत्न करण्याची ही एक चांगली संधीही आहे. या दिशेने पुढे जायला हवे. त्यामुळे विश्व मानव जातीपुढील समस्या कमी होण्यासोबतच भारताचे श्रेष्ठत्वही सिद्ध होईल. भारतीय श्रेष्ठत्वाची चर्चा करून ते होणार नाही.

- श्रीपाद कोठे

२१ मे २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा