शनिवार, २८ मे, २०२२

चर्चा निष्फळ का?

बहुतांश चर्चा निष्फळ का ठरतात? कारण त्या चर्चा करणारे कोणा ना कोणाचे प्रतिनिधी असतात. केवळ राजकीय पक्षांचेच नाही, तर शेतकरी, गरीब, महिला, युवा, शिक्षक, व्यावसायिक; असे कोणत्या ना कोणत्या गटाचे प्रतिनिधित्व ते करीत असतात. अन कोणताही प्रतिनिधी हा ज्यांचे प्रतिनिधित्व करतो, त्यांच्याच बाजूने बोलणार. त्यांचेच मुद्दे मांडणार. त्यांचीच भूमिका सांभाळणार. `ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी' हा सामान्य नियम आहे. ज्यावेळी कोणाचेही प्रतिनिधित्व न करणारी व्यक्ती मत मांडेल, बोलेल, विश्लेषण करेल, उपाय सांगेल; तेव्हा ते अधिक समतोल राहू शकेल. तोच विचार, चर्चा, मत; ग्राह्य मानता येईल. तीच चर्चा सार्थक मानता येईल. प्रतिनिधींच्या चर्चा आणि विश्लेषणे एकांगीच राहणार.

- श्रीपाद कोठे

२९ मे २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा