बुधवार, २९ मार्च, २०२३

प्रतिनिधी सभेतील श्रद्धांजली प्रस्ताव

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागौर येथे नुकत्याच झालेल्या प्रतिनिधी सभेत पारित श्रद्धांजली ठराव खालीलप्रमाणे आहे. यातील नावांवर- विशेषत: क्रमांक १७ ते २७ वर नजर टाकावी. अन हेच चित्र यापूर्वीच्या ठरावांमध्येही दिसून येईल. अन्य संस्था, संघटनांच्या संबंधात असे म्हणता येईल का? सर्वसमावेशकता, सहिष्णुता, मतभेद असावेत- मनभेद नकोत, राष्ट्रीय एकात्मता; इत्यादी शब्द सहज आठवले.

अपनी प्रदीर्घ यात्रा में अपने साथ रहे ऐसे कई महानुभावों की अनुपस्थिति हम अनुभव कर रहे हैं। वैसे ही राष्ट्रजीवन में अपनी समर्पित प्रतिभा, ज्ञान तथा कर्तृत्व आदि से समाज में स्वनामधन्य हो गए ऐसे महानुभाव भी आज हमारे मध्य नहीं रहे।

1) श्री अशोक जी सिंघल - विश्व हिन्दू परिषद के मार्गदर्शक, 2) श्री मधुजी लिमए - पूर्व प्रान्त प्रचारक असम, 3) श्री मुकुंदराव पणशीकर - अ.भा. कार्यकारिणी सदस्य एवं धर्मजागरण विभाग प्रमुख, 4) श्री संजय कुलासपुरकर - वनवासी कल्याण आश्रम के क्षेत्र संगठन मंत्री, असम क्षेत्र, 5)मा. राजनारायण ठाकूर - अ.भा.प्रतिनिधि एवं महानगर संघचालक, मुजफ्फरपुर, 6) श्री कृष्णचंद्र सूर्यवंशी - वरिष्ठ प्रचारक एवं किसान संघ के अ.भा. पूर्व कोषाध्यक्ष, मध्यभारत, 7) श्री रामदौरसिंह - भारतीय मजदूर संघ के राजस्थान क्षेत्र संगठन मंत्री, 8) श्री नित्यानंद जी - पूर्व प्रांत कार्यवाह, उत्तरांचल, 9) श्री अरुणभाई यार्दी - अखिल भारतीय विद्यार्थी परिषद के पूर्व अ.भा.अध्यक्ष, गुजरात, 10) श्री नेकशाम समशेरी - पूर्व क्षेत्र संघचालक, पश्चिम उत्तरप्रदेश क्षेत्र, 11) श्री वीरेन्द्र प्रसाद अग्रवाल - पूर्व प्रांत संघचालक, जयपुर प्रांत, 12) श्री जगन्नाथ गुप्ता - पूर्व प्रदेशाध्यक्ष विहिप एवं कल्याण आश्रम, जयपुर प्रांत, 13) श्री सुजीत - कन्नूर जिले के स्वयंसेवक, 14) Dr. K. N. Sengottaiyan - अध्यक्ष, सेवाभारती तमिलनाडु, 15) श्री जे. दामोदर राव - पूर्व प्रांताध्यक्ष भारतीय किसान संघ एवं पूर्व विधायक, भा. ज. पा., तेलंगाणा, 16) श्री व्ही. रामा राव - पूर्व राज्यपाल, सिक्किम, 17) श्री शरद जोशी - किसान नेता, महाराष्ट्र, 18) श्री मुफ्ती मुहम्मद सईद – मुख्यमंत्री जम्मू कश्मीर 19) श्री ए. बी. बर्धन - मजदूर नेता, नागपुर 20) श्री बलराम जाखड़ - पूर्व लोकसभा अध्यक्ष, 21) श्री भंवरलाल जैन - प्रसिद्ध उद्योगपति, जळगांव 22) श्री मंगेश पाडगांवकर - ख्यातनाम कवि, महाराष्ट्र, 23) श्री सईद जाफरी - सिने अभिनेता, 24) श्रीमती साधना - सिने अभिनेत्री, 25) श्रीमती मृणालिनी साराभाई - प्रसिद्ध नृत्यांगना, 26) आचार्य बलदेव जी -गुरुकुल कालवा, 27) पी.ए.संगमा-पूर्व लोकसभा अध्यक्ष।

वैसे ही चेन्नई में आयी बाढ़ के कारण एवं समय-समय पर घटित प्राकृतिक आपदाओं में काल के ग्रास बने, आतंकवादी घटनाओं के शिकार बने, सियाचिन में बर्फ के तूफान में तथा सीमाओं की रक्षा करते हुए अपने प्राणों की बलि चढ़ाई ऐसे सुरक्षाबलों के जवान, ऐसे समस्त महानुभावों के समस्त परिवार-जनों के प्रति अखिल भारतीय प्रतिनिधि सभा अपनी गहरी शोक संवेदना प्रकट करती है। ईश्वर उन्हें सद्गति प्रदान करें। उन्हें हम हमारी श्रद्धांजलि अर्पित करते हैं।

- श्रीपाद कोठे

३० मार्च २०१६

गणेश चा लेख व माझी प्रतिक्रिया

माझे मित्र गणेश कनाटे यांची सद्यस्थितीत आवश्यक आणि महत्त्वाची अशी ही पोस्ट. (लिंक दिलेली आहे.) त्यावरील माझी प्रतिक्रिया. वादावादी न करता चर्चा सकारात्मक दिशेने जावी एवढीच अपेक्षा. माझी प्रतिक्रिया - 

गणेश, तू हा initiative घेतो आहे याचा समाधान आहे. तुझ्या या प्रामाणिक प्रयत्नांना supplement म्हणून फक्त काही गोष्टी. रोग दूर करायचा असेल तर फक्त लक्षणांचा विचार करून चालत नाही. कारणांचाही विचार करावा लागतो, हे मान्य व्हायला हरकत नसावी. अन तिथे नेमकी बरेचदा पंचाईत होते. गुण अवगुण, बुद्धिमत्ता, क्षमता इत्यादी गोष्टी समूहगत नसतात हे अगदी खरं आहे पण त्या तशा असतात या समजातून बाहेर यावे लागेल. अन ती जबाबदारी सगळ्या जाती, पंथ, पक्ष, संस्था, संघटना यांची आणि त्यात सहभागी प्रत्येकाची आहे. शिवाय हे फक्त लिहिणे वा बोलणे यातूनच नाही तर व्यवहारातून दिसावे, जाणवावे, व्यक्त व्हावे लागेल. आपल्या नागपुरातल्याच एक दोन गोष्टी उदाहरण म्हणून. स्व. सुदर्शनजी रा. स्व. संघाचे सरसंघचालक झाले तेव्हा त्यांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले होते. नागपुरातल्या अनेक मोठमोठ्या लोकांनी डॉ. आंबेडकर यांचा पुतळा अपवित्र झाला म्हणून तो धुतला होता. अगदी स्व. भा. ल. भोळे यांच्यासारख्या माणूस त्यात होता. द्वेषपूर्ण आणि द्वेष निर्माण करणाऱ्या या कृत्यावर कोणी कोणी आणि काय प्रतिक्रिया दिल्या? अगदी याच धाग्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणारेही अनेक नागपूरकर आहेत. त्यावेळचे जाऊ द्या. आज 'ते कृत्य चूक होते' एवढे तरी ही मंडळी म्हणू शकते का? हे धैर्य आणि प्रामाणिकपणा नसेल तर इच्छाचिंतनाला किती अर्थ राहील?

दुसरे उदाहरण. मुस्लिम राष्ट्रीय मंच. आपल्या नागपूरचेच अन तूही ज्यांच्यासोबत काम केलं आहे ते विराग पाचपोर या मंचाचं काम करतात. हिंदू- मुस्लिम संवाद सौहार्द वाढावा याचा तो प्रयत्न. दोन दशके झाली त्याला. माहिती नाही असे नाही पण किती लेखक, किती पत्रकार, किती विद्वान, किती विचारवंत त्याचा उल्लेख तरी करतात किंवा त्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतात? मी तर म्हणेन मुद्दाम टाळतात. आजपासून सुमारे साठ वर्षांपूर्वी विश्व हिंदू परिषदेने अनेक संतांना एकत्र आणून अस्पृश्यता चुकीची असून त्याला धर्माचा आधार नाही अशी जाहीर भूमिका घेतली आणि यासाठी अनेक प्रयत्न केले. समाजातील किती विचारवंतांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला?

- व्यक्तिगत अनुभवांच्या आधारेही खूप बोलता येईल. त्या अनुभवांचेच काही लेख होतील. मात्र संबंधित लोक त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करतात, त्याची टवाळी करतात आणि शहाजोगपणे मोठमोठ्या गोष्टी करतात. अन मी चिल्लर लोकांबद्दल बोलतच नाही. अगदी मोठाली नावे आहेत. नाव मोठं लक्षण खोटं असे हे लोक किती ढोंगी असतात हे मला व्यक्तिगत अनुभव आहेत. मी ते गंगार्पण करतो. सगळ्यांनी करायला हवेत पण नाही करू शकत. अन मी म्हणतो तशी अपेक्षा तरी का करावी? उघड दिसणाऱ्या गोष्टींबाबत प्रामाणिक खंत तर व्यक्त करायला हवी. तरच पुढे जाता येईल.

- तू म्हणतो तसे हिंदूंना खोऱ्यातून पळून जावे लागले तसे आजही तिथे राहणारे हिंदू आहेतच. हाच न्याय अन्यत्रही लावायला हवा की नको. देश स्तरावर मुस्लिम समाज राहतो आहेच नं? मग हिंदू बिथरले या ओरड्याला काय अर्थ राहतो? किमान ते तसं नाही हे प्रकटपणे बोलणारे हवेत.

- योगायोगाने आजच्या फेसवुक मेमरीत या विषयाशी संबंधित एक पोस्ट आली. तिची लिंक पोस्ट करतो. पहावी. त्यावर प्रतिक्रिया वाचायलाही आवडेल.


गणेश कनाटे यांच्या पोस्टची लिंक -

https://www.facebook.com/633133472/posts/10158828263108473/


माणुसकी जिवंत असलेले लोक कमी प्रमाणात का होईना पण तेव्हाही होते आजही आहेत! 

१९८६ पासून १९९७ पर्यंत काश्मिरी पंडितांचे खोऱ्यातून मोठया प्रमाणात विस्थापन झाले. ते विस्थापन होण्यापूर्वी पंडितांची लोकसंख्या खोऱ्यातील एकूण लोकसंख्येच्या ४.५% इतकी होती. (काश्मीर फाईल्समध्ये अनुपम खेर ती २% होती, असं म्हणतो.) त्यापैकी बहुसंख्य पंडित खोरे सोडून प्रथम जम्मूला व नंतर देशात इतरत्र स्थलांतरित झाले. इतके मोठ्या प्रमाणात विस्थापन होऊनही जवळजवळ ८०० पंडितांचे परिवार खोऱ्यातून कधीच बाहेर पडले नाहीत. ते अजूनही तिथेच आहेत. विश्वास बसत नसेल तर श्रीनगरला एक वैष्णो भोजनालय आहे त्याच्या मालकाशी कधी गेलात तर भेटून या.

जर खोऱ्यातील ९५% मुसलमान ५% हिंदूंचे शिरकाणच करायला निघाले असते तर एकतरी पंडित कुटुंब सोडा व्यक्ती तरी खोऱ्याबाहेर जिवंत बाहेर पडू शकली असती काय?

मुसलमानांचा पराकोटीचा द्वेष करणाऱ्या आरती टिक्कु या पत्रकार मुलीच्या कुटुंबालाही एका मुस्लिम मुलानेच त्यांना जीवे मारण्याच्या कटाबद्दल माहिती दिली आणि एका मुस्लिम टांस्पोर्टरच्या ट्रकमधून आधी टिक्कु परिवाराच्या मुली व नंतर संपूर्ण परिवार जम्मूला पोहोचू शकला.

तसेच गांधींच्या हत्येनंतर सातारा-सांगली-कोल्हापूर भागातील ब्राह्मणांच्या घरांवर चालून गेलेल्या जमावासमोर अनेक बहुजन समाजातील नेते, गावागावांतील प्रतिष्ठित नागरिक/नेते उभे झाले नसते तर साडे तीन टक्के लोकसंख्या असलेले ब्राह्मण या राज्यात औषधालादेखील उरले नसते,असे आपल्याला वाटत नाही का?

आकड्यांचा खेळ सोडून देऊ. पण काश्मीरच्या प्रकरणात काही माणुसकी जपणारे मुसलमान निश्चितच होते तसेच गांधीहत्येनंतर असलेल्या प्रक्षोभात माणुसकी जपणारे ब्राह्मणेतर लोकही निश्चितच होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे उदाहरण आवर्जून द्यायचे का?

असे असेल तर आज जी मंडळी काश्मीर प्रश्नाचा आधार घेऊन मुसलमानांच्या विरोधात आणि गांधीहत्याप्रकरणी काँग्रेसविचारांच्या बहुजनांच्या विरोधात फेसबुक, व्हाट्सअप्प इत्यादी समाजमाध्यमांवर द्वेष पसरविणारी खोटी माहिती पेरताहेत, यांचा सद्सद्विवेक मेला असे म्हणायचे काय? यांना केवळ इतरांचे रक्त प्यायचे आहे काय? राजकारणात मते मिळविण्यासाठी, सत्ता मिळविण्यासाठी कुणाचेही रक्त सांडले तरी यांना चालतं काय?

माझे म्हणणे भाबडे आणि आजकाल ज्याला शहाणपणा म्हणतात तसे नसलेले वाटत असेल तर माझी काहीही हरकत नाही परंतु समाजात असा द्वेष पसरू नये, कुणी पसरवू नये, यासाठी जे काय करता येईल ते केले पाहिजे, असे मला मनापासून वाटते. अशा कोणत्याही प्रयत्नात मी यथाशक्ती सहभागी होईन.