शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२

भांडायला कारणे हवीत

बाबासाहेब पुरंदरे प्रकरणाचे वादळ आले अन गेले. विरोध करणाऱ्यांनाही समाधान वाटले, आपण सामाजिक- ऐतिहासिक विषय लावून धरले याचे. अन सरकारला समाधान वाटले ठरल्याप्रमाणे पुरस्कार देण्याचे. बाबासाहेबांना पाठींबा देणाऱ्यांना समाधान वाटले विजयाचे. त्यावेळी बोलायचा एक मुद्दा बोललो नव्हतो. मुद्दाम. कारण त्या गदारोळात कोणी त्याकडे शांतपणे अन गांभीर्याने पाहिले नसते. तो मुद्दा म्हणजे, प्रमाणीकरणाचा. इतिहास म्हटला म्हणजे पुरावे, प्रमाण आले. बरे दिलेले पुरावे सबळ आहेत की कच्चे वगैरे प्रश्न आहेतच. सहज एक वाटलं, आजचा एखादा संदर्भ घेऊन याचा विचार करून पाहावा.

संदर्भ म्हणून लोकसभा आठवली. नुकतेच संसदेचे पावसाळी अधिवेशन झाले. रोजच कामकाजात व्यत्यय येत होता. ललितगेट प्रकरण तापवले जात होते. अखेर एक दिवस चर्चा झाली. त्यात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे बोलत असताना भाजपच्या एका सदस्याने सोनिया गांधींच्या बहिणीचे नाव घेतले. त्यावरून कॉंग्रेसचे सदस्य संतापले. खडगे तर `यू शट अप' म्हणाले. सोनिया संतापल्या. सभापतींसमोर येऊन घोषणा देऊ लागल्या. सगळ्या जगाने हे live पाहिले.

शे-दोनशे-पाचशे वर्षांनी जेव्हा भारतीय संसदेच्या इतिहासाची चर्चा होईल तेव्हा काय होऊ शकेल? पुरावे तपासले जातील. सगळ्यात सबळ पुरावा- सभागृहातील नोंदी. दुय्यम पुरावा- इलेक्ट्रोनिक वा मुद्रित प्रसार माध्यमे. कच्चा पुरावा- लोकांमधील चर्चा, किंवदंती, दंतकथा. सभागृहातील नोंदींमध्ये तर काहीच राहणार नाही. कारण तो भाग काढून टाकावा असेच अध्यक्षांचे आदेश होते. रोज सभागृह तहकूब होताना तर केवळ `सभागृह अमुक वेळेपर्यंत तहकूब करण्यात येत आहे,' एवढेच सांगितले आणि नोंदवले जाते. कारण नसतेच. मग पाचशे वर्षांनी चर्चा झडतील की, सभागृह तहकूब झाले कशावरून? सोनियांच्या बहिणीबद्दल टिप्पणी केली कशावरून? सोनियांनी घोषणा दिल्या कशावरून? यासाठी असलेले पुरावे दुय्यम, तिय्यम आहेत. त्यावर विश्वास ठेवता यात नाही. ते प्रमाण नाहीत. याचा अर्थ या गोष्टी झाल्याच नाहीत, असा होईल का? प्रमाणीकरण हे असे असते. खूप साऱ्या घटना आणि खूप सारे तपशील घेऊन चर्वितचर्वण करता येईल. मात्र त्याचा लघुत्तम साधारण विभाजक उर्फ लसावि उर्फ आशय उर्फ निष्कर्ष हाच काढावा लागेल की, प्रमाणीकरण असेच असते. प्रमाणीकरण आणि सत्यता या वेगवेगळ्या गोष्टी असतात.

प्रमाणीकरण ही मुळातच अपुरी, अयोग्य बाब आहे. ती ताणली जाते तेव्हा तर ती त्याज्यच ठरवायला हवी. सगळ्या प्रकारचे, पुन्हा म्हणतो- सगळ्या प्रकारचे प्रमाणीकरण; ही सामूहिक गुन्हेगारी आहे. विशिष्ट स्वार्थाच्या पूर्तीच्या प्रयत्नांचा तो भाग असतो. भेसळीचे वा शव विच्छेदनाचे अहवाल असोत की, गुणवत्तेसाठीची विविध प्रमाणपत्रे असोत. `नेसले'ला काय प्रमाणपत्र नव्हते का? किंवा सोन्याच्या शुद्धतेसाठी प्रमाणीकरण असूनही त्यात घोटाळे होत नाहीत का? उलट गावचा सोनार अधिक प्रामाणिक होता.

वर्तमान गोष्टींच्या प्रमाणीकरणाची ही तऱ्हा असते तर इतिहासाबद्दल तर बोलायलाच नको. तरीही आपल्याला प्रमाणे हवी असतात. कशासाठी? आम्हाला फक्त भांडायला कारणे हवी असतात बहुतेक.

- श्रीपाद कोठे

२८ ऑगस्ट २०१५

शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२

खूप जणांना न पटणारं :

- एखादा ब्राम्हण चुकीचं वागला तर सगळे ब्राम्हण वाईट.

- एखादा पुरुष चुकीचं वागला तर सगळे पुरुष वाईट,

- एखादी स्त्री चुकीचं वागली तर सगळ्या स्त्रिया वाईट,

- एखाद्या देशाच्या प्रमुखाने चुकीचं वक्तव्य केलं तर तो देशच वाईट,

- एखाद्या शीख व्यक्तीने इंदिराजींची हत्या केली तर सगळे शीख वाईट,

- एखाद्या मराठी माणसाने गांधीजींची हत्या केली तर सगळी मराठी माणसे वाईट,

- काही मुसलमान आतंकी असतात म्हणून सगळे मुसलमान अतिरेकी,

एखाद्या कृतीसाठी एखादी जात, एखादा पंथ, एखादा देश, एखादी भाषा, एखादी संघटना; यांना घाऊक दोषी ठरवणे... गुण किंवा अवगुण यांचं समूहिकरण हे मुळातच चुकीचं आणि अपक्व बुद्धीचं लक्षण. इंग्रजी आमदनी पासून आमची विचारपद्धती बिघडवण्यात आली अन आम्हीही त्याला प्रतिसाद दिला. अगदी मुस्लिम समस्येलाही हे लागू होते.

*********

सध्या अफगाणिस्थानच्या निमित्ताने बरीच चर्चा सुरू आहे. त्यातील discourse देखील मोठ्या प्रमाणात मुस्लिम असा आहे. हे चूक आहे. अफगाणिस्थानात आतंक निर्माण करणारे मुस्लिम आहेत आणि त्यात होरपळणारेही मुस्लिम आहेत. अनेक मुस्लिम देश तालिबानला साथ देण्याला तयार नाहीत. आपल्या देशातही हळूहळू तालिबान अमान्य करणारे मुस्लिम स्वर ऐकू येऊ लागले आहेत. मुस्लिमेतर लोकांसोबतच खुद्द मुसलमानांनाही विचार करायला लावणारी सध्याची परिस्थिती आहे. अशा वेळी चर्चा योग्य वळणावर जाईल याची दक्षता घ्यायला हवी.

कोणते असेल ते योग्य वळण? मुस्लिम समाजाचे परिवर्तन हे ते योग्य वळण असेल. तालिबान म्हणजे जागतिक मुस्लिम समुदाय असं समीकरण योग्य म्हणता येणार नाही. मुसलमान समाजाची कट्टरता, त्या कट्टरतेचा गैरफायदा घेणाऱ्या मुस्लिमांमधील आणि मुस्लिमांबाहेरील शक्ती; हे वास्तव नाकारण्यात अर्थ नाही. मात्र सोबतच मुस्लिम समाजातील कट्टर नसलेल्या शक्तीही आहेत हेही नाकारून चालणार नाही.

मुस्लिम राष्ट्रीय मंच असो, मुस्लिम सत्यशोधक समाज असो, बिराजदार यांच्यासारखे मुस्लिम संस्कृत पंडित असो, हिंदू ग्रंथांचे भाषांतर करणारे पारेख असोत, स्व. ए. पी.जे. अब्दुल कलाम, शिवभक्त डागर बंधू असोत, संगीत क्षेत्रातील राशीद खान किंवा झाकीर हुसेन असोत... अशी थोडीबहुत मंडळी तर आहेतच. शिवाय मुस्लिम देशात कट्टरता बाजूस सारणाऱ्या थोड्याबहुत शक्तीही आहेतच. अनेक मुस्लिम देशांच्या महिला खेळाडू जागतिक स्पर्धांमध्ये मोकळेपणाने खेळत असतात.  पाक कॉफी हाऊस नावाच्या वेबसाईटवर पाकिस्तानातीलच अनेक लोक कट्टरतेच्या विरुद्ध लिहीत असतात. अयोध्येतील राम मंदिराच्या वेळी किंवा तीन तलाक प्रकरणी समजूतदार भूमिका घेणारे मुस्लिम होतेच. हे सगळे मुस्लिमांचे प्रतिनिधी व्हायला हवेत. ते आपोआप होणार नाहीत. त्यासाठी मुस्लिम समुदायाने प्रयत्न करणे जसे आवश्यक आहे तसेच मुस्लिमेतर लोकांनीही या परिवर्तनशील मुस्लिम लोकांची चर्चा केली पाहिजे, दखल घेतली पाहिजे, त्यांच्या प्रतिमा निर्माण केल्या पाहिजेत. कोळसा उगाळून काय होणार? अन किती उगाळायचा? जे व्हायला हवे असे वाटते त्यालाही चालना द्यायला हवीच ना? मुस्लिमेतरांच्या बोलण्यातून मुस्लिमांनाही जाणीव व्हायला हवी की, कट्टर नसलेलेही मुसलमान आहेत/ असतात आणि त्यांना स्वीकार्यता असते. कट्टरतेला स्वीकार्यता नसते हे बहुसंख्य समाजाच्या लक्षात यायला हवे.

याचा अर्थ हिंदू, बौद्ध वा अन्य समुदायांनी भोळसट राहावे अस नाही. सावधगिरी, तत्परता, चुकीच्या गोष्टींचा प्रतिकार करण्याची सिद्धता; हे सगळे हवेच. परंतु एकमेकांचा गळा घोटण्याच्या वृत्तीने काहीही साध्य होत नाही, याचं realization होण्यासाठी आवश्यक असा अवकाश आणि असा discourse याही आवश्यक बाबी. अन ही मुस्लिम आणि मुस्लिमेतर दोघांचीही जबाबदारी ठरते. घाऊक विचार न करता 'माझी जबाबदारी' असा विचार करायला हवा. शेवटी 'तू असा, तू तसा' असं करून साध्य तर काही होणार नाहीच ना?

- श्रीपाद कोठे

२७ ऑगस्ट २०२१

सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२

रुपयाचे अपमूल्यन

सरकारे वेळोवेळी चलनाचे अवमूल्यन करतात. त्याच प्रकारे चलनाचं अपमूल्यन करता येत नाही का? अपमुल्यनाबद्दल ऐकण्या, वाचण्यात नाही. पण करायला काय हरकत आहे. चंद्रशेखर सरकारने देश चालवण्यासाठी सोने गहाण टाकल्यानंतरच्या घडामोडीत नरसिंहराव सरकारने रुपयाचे ३० टक्के अवमूल्यन केले होते. आजची आर्थिक स्थिती त्या वेळेपेक्षा कितीतरी चांगली आहे. परकीय गंगाजळी ओसंडून वाहते आहे. सोन्याचा साठा वाढला आहे. तीस वर्षांनंतर आता रुपयाचे अपमूल्यन करायला हवे. आज ७५ च्या घरातील डॉलर ३० टक्केच अपमूल्यन केल्यास ५० च्या जवळ जाईल. त्याचा बराच फायदा होऊ शकेल.

- श्रीपाद कोठे

२३ ऑगस्ट २०२१

गोहत्या

गोहत्या, गोरक्षण, गोमांस भक्षण यांची बरीच चर्चा होत असते. हिंदू, अहिंदू असाही मुद्दा येतो. वेदकाळातही गोमांस भक्षण करीत असत वगैरे मुद्देही येतात. वेदातील ते उल्लेख इंद्रिये या अर्थाने आहेत हा युक्तिवादही मांडला जातो. या साऱ्यात मूळ विषय बाजूलाच सारला जातो. मुद्दा आहे की, अशा प्रकारे आपल्या आहारासाठी गायी वा अन्य पशुपक्षी यांची हत्या योग्य ठरेल का? पर्यावरण, जैवविविधता, नीतीमत्ता आणि मानवी मनाची उन्नती या कोणत्याही अंगाने ते योग्य म्हणता येत नाही. क्षणभर मान्य केले की, वेदकाळात गोमांस भक्षण करीत असत, पण म्हणून ते आजही केले पाहिजे असे तर नाही ना? हिंदू चिंतन तर काळाच्या, व्यवस्थांच्या कोणत्याही टप्प्यावर थांबून राहण्याचा आदेश देत नाही, अट्टाहास करीत नाही. त्यामुळे आधी काय होते वा नाही याने काय फरक पडतो? जे योग्य आहे ते स्वीकारणे हेच इष्ट. जुन्या गोष्टी आहेत म्हणून धरून ठेवणे योग्य नाही आणि योग्य गोष्टी सुटून गेल्या असतील तर त्यांचे पुनरुज्जीवन करण्यातही गैर काहीच नाही. तुमचं-आमचं, जुनं-नवं हे वाद, विचारांची ही पद्धत मुळातच चूक. समग्रतेने आणि जीवन हे साचलेले डबके नसून प्रवाह आहे हे जाणून घेऊन विचार करणेच योग्य असू शकते.

- श्रीपाद कोठे

२३ ऑगस्ट २०१८

सामाजिक परिवर्तनाची पद्धत

`त्रिवार तलाक' अवैध घोषित होऊन २४ तास होऊन गेले आहेत. पहिला भर ओसरला आहे. म्हणूनच एका गोष्टीकडे लक्ष वेधायला हवे की, हा विजयोत्सव न होता आनंदोत्सव राहावा. सामाजिक परिवर्तन हा अनेक मिती आणि पदर असलेला विषय. अगदी सामाजिक सुधारणांनी माणूस सुखी होतो का? या मुलभूत प्रश्नापासून सुधारणा केल्या नाहीत तर समाज अस्तित्वात राहू शकेल का, इथपर्यंत त्याचा पसारा असतो. त्यातील एक महत्वाचा भाग म्हणजे- सामाजिक परिवर्तनाची पद्धत. एकाने जिंकल्याची भावना बाळगणे आणि दुसऱ्याने हरल्याची भावना बाळगणे दोन्हीही गैर. तसे शब्दप्रयोग, तसा आवेश आणि अभिनिवेश, वातावरण, विश्लेषण, समर्थन किंवा टीका; असे सारेच त्यात येते. सामाजिक परिवर्तनाच्या अयोग्य पद्धतींचे परिणाम आपण भोगलेले आहेत, भोगत आहोत. जातींचा प्रश्न हा त्यापैकी एक. या ठिकाणी एक आठवण होते. अलाहाबाद उच्च न्यायालयाने अयोध्येतील राम मंदिर प्रकरणात निकाल दिला तेव्हा रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती की, हा कोणाचा जय किंवा पराजय नसून, एक समस्या सुटण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. `त्रिवार तलाक'वर सुद्धा अशीच संतुलित भूमिका सगळ्या समाजाची असली पाहिजे. `कशी जिरवली? किंवा आता तुम्ही बाजी मारली, पुन्हा पाहून घेऊ.' अशा दोन्ही भूमिका टाळणे/ तयार होऊ न देणे आवश्यक आहे. सामावून घेण्याच्या या देशाच्या स्वभावाचे विस्मरण होऊ नये, एवढेच.

- श्रीपाद कोठे

२३ ऑगस्ट २०१७

मूर्ख की बावळट

राज्यांचा आकार हा अनेकदा चर्चेचा मुद्दा असतो. वेगळ्या विदर्भाचा मुद्दा येतो तेव्हाही त्याची चर्चा होते. लहान राज्ये आर्थिकदृष्ट्या शक्य आणि सक्षम नसतात असाही तर्क करण्यात येतो. सहज एक विचार मनात आला- देश स्वतंत्र झाला तेव्हा ५६५ संस्थाने होती. म्हणजे राज्येच. त्यांचे नियम, कायदेकानू वेगवेगळे होते. महसूल व्यवस्था वेगवेगळी होती. तरीही ही सगळी संस्थाने (राज्ये) चांगली सधन होती. आजही त्याचे अवशेष पाहिले तरीही अबब म्हणावे लागते. कोल्हापूर, म्हैसूर, ग्वाल्हेर, बडोदे ही वानगीदाखल नावे. यावर तर्क करता येईल की, तेथील संस्थानिक (राजे) सधन होते. (म्हणजेच राज्य- state सधन होते.) पण जनता कंगाल होती. मुळात असे नव्हते. तरीही वादासाठी हा तर्क मान्य केला तरीही एक प्रश्न निर्माण होतोच- आज काय स्थिती आहे? आज तर राज्येही कंगाल आणि जनताही कंगाल. तेव्हा किमान राजा अन राज्ये तरी सधन होती. एवढेच कशाला, नदीला घाट बांधणे, मंदिरे उभारणे, अन्नछत्र चालवणे, कलाकारांना बिदागी यासारख्या गोष्टींसाठी जनतेवर `सेस' वगैरे लादला जात नव्हता. अहिल्याबाईंचे उदाहरण तर आदर्श आहे. त्यांनी तर केवळ त्यांच्या संस्थानात नव्हे तर बाहेरही अनेक कामे केली. आज तर रस्ता बांधायचा आहे; लावा पेट्रोल डिझेलवर `सेस'. तरीही कंगाली दूर होत नाही ती नाहीच. आम्ही कशाचाच काही विचार करीत नाही का? की, आम्हाला काहीच समजत नाही? आम्ही मूर्ख आहोत की बावळट?

- श्रीपाद कोठे

२३ ऑगस्ट २०१६

स्वत:ची आणि घराची साफसफाई

सध्या महाराष्ट्रात जो एक वैचारिक आरडाओरडा सुरु आहे त्याचे अनेक पैलू आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन फक्त हिंदूपुरतेच का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आणि त्यावर असे उत्तर देण्यात आले की `आम्ही स्वत:च्या घराची, स्वत:ची साफसफाई करतो असे डॉ. दाभोळकर म्हणत असत. आमचेही तेच मत आहे.' फार चांगली गोष्ट. पण या युक्तिवादाच्या संबंधाने काही गोष्टी स्पष्ट करण्याची गरज आहे.

अशा आशयाचा युक्तिवाद प्रथम रा.स्व.संघाचे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी केला होता. सुमारे ४० वर्षांपूर्वी, त्यांचे पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत भाषण झाले होते. त्यात त्यांनी नि:संदिग्धपणे संघाचा सामाजिक विचार मांडला होता. तो विचार नवीन नव्हता, पण संघाबाहेरील जगात ज्या भाषेचा उपयोग केला जातो तशा स्वरुपात तो मांडण्यात आला होता. संघाच्या स्वयंसेवकांना ती भाषा नवीन होती. शब्दावली नवीन होती. तो विषयही एवढ्या विस्ताराने आणि तपशिलाने प्रथमच मांडण्यात आला होता. स्वाभाविकच त्यावर स्वयंसेवकांच्या विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यावेळी, फुले- आंबेडकर- शाहू महाराज यांच्याकडे कसे पाहिले पाहिजे आणि त्यांना कसे समजून घेतले पाहिजे हे सांगण्यासाठी, बाळासाहेब देवरस यांनी वरील आशयाचा तर्क दिला होता. त्यांचे म्हणणे असे की, आपल्या घराची साफसफाई व्हावी या कळकळीतून या सुधारकांनी प्रयत्न केले. कदाचित त्यांची भाषा कठोर असेल, पण त्यांचा त्यामागचा विचार आपला समाज निरोगी व्हावा हाच होता.

डॉ. दाभोळकर यांनी बाळासाहेब देवरस यांचा युक्तिवाद स्वीकारला होता, की त्यांना स्वतंत्रपणे तो सुचला होता यावर कितीही वाद घालता येईल, पण एक गोष्ट मात्र डॉ. दाभोळकर यांनी अनायास व अभावितपणे स्वीकारली की, आपले घर/ आपला समाज/ आपण म्हणजे हिंदू समाज. आपल्या समाजाची, आपल्या शरीराची साफसफाई करायची म्हणजे हिंदू समाजाची साफसफाई करायची. थोडक्यात काय तर हिंदू हीच या समाजाची, देशाची ओळख आहे. मग हिंदू राष्ट्र म्हणताना जीभ का लुळी पडते. हा देश सगळ्यांचा आहे, येथे मिश्र संस्कृती आहे वगैरे बुद्धिवादी थोतांड कशासाठी? हिंदू राष्ट्र या सत्याचाच स्वीकार का नाही?

दुसरा मुद्दा- माणसाला निरोगी राहायचे असेल तर केवळ स्वत:ची वा घराची स्वच्छता पुरेशी असते का? मी घर स्वच्छ ठेवलं, स्वत: रोज स्वच्छ आंघोळ केली; पण माझ्या दाराशी रस्त्यावर कचऱ्याचा ढीग असेल, त्यावर माशा- डास- किडे याचं साम्राज्य असेल तर? ते स्वच्छ करायला नको का? शिवाय मी स्वच्छ राहिलो आणि दुसरा मात्र माझ्यावर चिखलफेक करीत असेल तर त्याचा बंदोबस्त करायला नको का? आज आम्ही पाकिस्तानच्या किंवा चीनच्या बाबतीत काय भोगतो आहोत? आम्ही आमची स्वच्छता, आमचा चांगुलपणा पाळणार, त्याचीच काळजी करणार; पण आमचे शांत, सुरक्षित, सुखी जगणे फक्त आमच्यावर अवलंबून नसते. बाकीच्यांवरही अवलंबून असतेच. आम्ही स्वत:बद्दल काय विचार करतो, कसा व्यवहार करतो यासोबतच; अन्य लोक आमच्याबद्दल काय विचार करतात आणि कसा व्यवहार करतात हेही महत्वाचे आहे.

अन किमान समाज प्रबोधन, समाज सुधारणा, सामाजिक कल्याण आणि वैश्विक व्यक्तित्वाचा दावा करणाऱ्यांनी तरी असले भ्रामक युक्तिवाद करू नयेत. त्यांना यच्चयावत सगळ्यांबद्दल कळकळ आणि कणव असायला हवी ना !!

- श्रीपाद कोठे

२३ ऑगस्ट २०१३

कावेबाज कायदा

महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकावरील गदारोळात मुख्य मुद्दा कुठेतरी बाजूला पडत आहे. या विधेयकाचा तपशील, त्याच्या तांत्रिक बाजू आणि त्याला अनुसरून शब्दावली यावरून मते मतांतरे असू शकतील. पण त्यातील भावनेला आणि त्या प्रयत्नांना कोणी आक्षेप घेण्याचे कारण नाही. हिंदूंनी तर नाहीच नाही. चमत्कार दाखवल्याशिवाय `संत' पदवी मिळत नाही ही ख्रिश्चन परंपरा आणि पद्धती आहे. हिंदू नाही. चमत्कार हा हिंदू धर्माचा पायाही नाही आणि ते योग्यही नाही. योगशास्त्रात चमत्कार नाकारलेले नाहीत. पण हे चमत्कार (ज्याला सिद्धी म्हणतात- अष्टसिद्धी) हे आध्यात्मिक साधनेतील, ईश्वर दर्शनाच्या मार्गातील धोंड असून त्याज्य आहेत, असाच स्पष्ट निर्वाळा आहे. त्यामुळे हिंदूंना वाईट वाटण्यासारखे काही नाही.

मुख्य मुद्दा वेगळाच आहे. तो आहे, तथाकथित विचारवंत आणि पुरोगामी यांची अप्रामाणिकता. सध्याच्या वातावरणात आमचा धर्माला विरोध नाही वगैरे म्हणायचे आणि मग कायद्याच्या चिंध्या फाडत पुरोगामित्व, धर्मनिरपेक्षता, आधुनिकता यांचे ढोल बडवत किंचाळत सुटायचे. हा केवळ आरोप नाही तर त्यांचा इतिहास तसाच आहे. म्हणूनच सूर्यनमस्कार शिकवले, योग शिकवला, संस्कृत शिकवले, भगवद्गीता शिकवली की यांचा कलकलाट सुरु होतो. मागे सरस्वती पूजनावरून केवढे गळे काढले होते. आणि खोटारडेपणाला तर सीमाच नाही. गांधी हत्येचे सत्य बाहेर येउन, दोषी- निर्दोष निर्णय होऊन, युगं लोटली आहेत. सर्वोच्च न्यायालयापर्यंत सगळ्यांनी निकाल देऊन झाले आहेत. पण अजूनही निर्लज्जपणे तोच खोटारडा राग आळवणारे हेच नतद्रष्ट आहेत. या प्रयत्नात न्यायालयांचा आपण अपमान करतो आहोत. फुले आंबेडकरांचे नाव घेत आपण घटनेच्या विरुद्ध वागत आहोत वगैरे कशाचीही पर्वा न करणारे हेच आहेत. आम्ही हळू आवाजात किंवा शांतपणे बोलतो म्हणजे आमचे बरोबर असे होत नाही. अनेकदा अन्यायापोटी आवाज चढतात आणि मतलबीपणापोटी आवाज सौम्य व भाषा मवाळ राहू शकतात. हा कायदा योग्य असला तरी हा कावेबाजपणा सगळ्यांनी ओळखला पाहिजे.

- श्रीपाद कोठे

२३ ऑगस्ट २०१३

रविवार, २१ ऑगस्ट, २०२२

धर्मनिरपेक्ष बावळटपणाचा सुंदर नमुना.

`टाईम्स नाऊ' वरील कालची चर्चा. महान अर्णव गोस्वामी संचालन करतात ती.

विषय १... उत्तर प्रदेशातील ८४ कोसी परिक्रमा.

त्याने विश्व हिंदू परिषदेच्या प्रतिनिधीला सुनावले की तुम्ही (म्हणजे विहिंप) काही सगळ्या हिंदूंचे प्रतिनिधी नाही.

विषय २... डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या.

अर्णवची सगळी चर्चा- ही हत्या हिंदुत्व वाद्यानीच केली नाही हे सिद्ध करा.

म्हणजे कोट्यवधी हिंदू पाठीशी असणारी विहिंप हिंदूंची प्रतिनिधी नाही आणि हत्या करणारा हिंदू की मुस्लीम की ख्रिश्चन हेही स्पष्ट झाले नसताना तमाम हिंदुत्वाभिमानी त्यासाठी जबाबदार.

काही लाख दर्शक असलेले `टाईम्स नाऊ' १२१ कोटी भारतीयांचे प्रतिनिधी.

५० टक्केही मते नसणारी सरकारे देशाची (राज्याची) प्रतिनिधी आणि ठेकेदार.

बहुसंख्य लोक अंधश्रद्धा चळवळीबाबत अनभिज्ञ असताना वा त्यातील अनेक गोष्टींबद्दल त्यांना आक्षेप असतानाही त्या चळवळीच्या नेत्याची निर्मम हत्या झाली आणि बुद्धिवादी अतिरेकी तुटून पडले म्हणून लगेच विधेयक पारित. म्हणजेच तो प्रातिनिधिक विचार.

प्रतिनिधित्व म्हणजे काय? मोठ्या संख्येचा पाठिंबा की १००% पाठींबा?

मोठी संख्या म्हणजे लोकशाही असेल तर अल्पसंख्येचे प्रतिनिधित्व करणारी सरकारे वा त्यांची कामे लोकशाहीचे पोषण करणारी म्हणता येतील का?

सत्यता आणि योग्यता यांची कसोटी संख्या नसेल तर प्रतिनिधित्व वगैरे वगैरे वगैरे निरर्थक म्हणावे का?

विचार व विवेकाच्या गोष्टी करतानाच मी वेगळा विचार मांडला म्हणून मी अंधश्रद्धा वा हुकूमशाहीचा समर्थक होईन का?

बावळटपणाचा विजय असो.

- श्रीपाद कोठे

२२ ऑगस्ट २०१३

कावेबाज

एका मोठ्या साहित्यिकाची एक पोस्ट थोड्या वेळापूर्वी वाचण्यात आली. नाव सांगितले की वाद होतो आणि विषय भरकटतो म्हणून सांगत नाही. पण आज मराठी जगात परिचित आणि प्रतिष्ठित नाव आहे. त्यांनी लिहिले आहे - 'सगळे धर्म आपणच श्रेष्ठ असल्याचा दावा करतात. सगळे सारखे असं कोणीही म्हणत नाही.'

आपण किती चुकीचं लिहितो, किती दिशाभूल करतो आणि पर्यायाने मानवतेचा गुन्हा आणि मानत असेल तर पाप करतो, हे या महान लेखक महाशयांना कळत नसेल का? बरे सामान्य माणूस अशा लिखाणावरूनच आपले विचार, मते, भावना घडवत असतो. मग एवढा निर्लज्जपणा अशा साहित्यिकात का येतो? की हा माज असतो? की जाणीवपूर्वक घेतलेली धोरणी भूमिका असते ही?

साधं स्वामी विवेकानंद यांचं शिकागो परिषदेतील पहिलं छोटंसं भाषण वाचलं किंवा त्यांनी त्यात उद्धृत केलेला चार ओळींचा श्लोक वाचून समजून घेतला तरीही या महाशयांना आपली भूमिका बदलावी लागेल. बरं तर बरं हे भाषण इतक्या वेळा चर्चेत असतं की त्यासाठी वेगळे सायास करण्याची गरज नाहीच. पण या महाशयांनी त्याकडे लक्ष दिले नसेल किंवा दुर्लक्ष केले असेल. लक्ष दिले नसेल तर त्यांच्या एकूणच वकूबावर आणि integrity वर प्रश्नचिन्ह लागते आणि दुर्लक्ष केले असेल तर ते बदमाश ठरतात. वास्तविक तिसरी शंकाच सार्थ आहे. ती म्हणजे 'हिंदूंचा' मानभंग करण्याचा polished, refined धोरणी कावा.

समाजानेच अशा 'मान्यवरांना' (!!!) मोडीत काढले पाहिजे.

- श्रीपाद कोठे

२२ ऑगस्ट २०१८

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२२

हिंदुत्वाची व्याख्या

सुमारे ३५ वर्षांपूर्वीची गोष्ट. नागपूरपासून जवळच असलेल्या खापरी येथे रा.स्व. संघ नागपूरचं तरुणांचं हिवाळी शिबीर होतं. त्यावेळी अखिल भारतीय शारीरिक प्रमुख असलेले श्री. सुदर्शन जी, (जे नंतर २००० साली सरसंघचालक झाले) यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पाच बैठकी घेतल्या होत्या. पहिल्या बैठकीची सुरुवातच त्यांनी एका प्रश्नाने केली. प्रश्न होता- आम्हाला या देशात हिंदुत्व आणायचं आहे म्हणजे काय करायचं आहे? आणि सलग पाच बैठकीत याची सखोल आणि विस्तृत चर्चा केल्यानंतर पाचव्या बैठकीचा समारोप करताना सुदर्शन जी म्हणाले, `आम्हाला या देशात हिंदुत्व आणायचं आहे याचा अर्थ; अशी सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक व्यवस्था या देशात निर्माण करायची आहे; जी व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी यांच्यात सामंजस्य निर्माण करून; प्रत्येक व्यक्तीला शरीर, मन, बुद्धी आणि आत्म्याचे सुख प्रदान करू शकेल.'

आज जेव्हा आक्षेपकांची हिंदुत्वावरची चर्चा ऐकतो तेव्हा फक्त हसायला येते.

- श्रीपाद कोठे

२० ऑगस्ट २०१४

पैसा आणि प्रतिष्ठा

भाववाढ, महागाई, चलनवाढ इत्यादी बाबी कशाने होतात या प्रश्नाला, मागणी-पुरवठ्याचे तत्व, दुष्काळ, अतिवृष्टी, साठेबाजी अशी काही उत्तरे मिळू शकतात. पण या बाबी केवळ तेवढ्यावरच अवलंबून नसतात. पैशाची प्रतिष्ठेशी घालण्यात आलेली सांगड हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. परंतु त्यावर कधीही, कुठेही बोलले, लिहिले जात नाही. थोडी नजर इकडेतिकडे फिरवली तरीही ही गोष्ट स्पष्ट होते. रेल्वे स्थानक आणि विमानतळ येथील वाहनतळाच्या दरात मोठी तफावत असते. रस्त्याच्या कडेचा चहा, साध्या हॉटेलातील चहा अन पंचतारांकित हॉटेलातील चहा (तेथील maintainance लक्षात घेऊनही) यांच्या भावातही मोठी तफावत असते. हीच बाब खाण्यापिण्याच्या गोष्टी, कपडे, अन्य सामान, गाड्या अशा बहुतेक सगळ्या गोष्टींना लागू होते. वाहनतळाच्या दरातील तफावतीला जसे काहीही कारण नाही, तसेच ५-१० लाखाची गाडी आणि काही कोटींची गाडी यातील किमतीच्या फरकाला काही कारण नाही. एखादा चांगल्या कापडाचा आपल्या शिंप्याकडून शिवलेला शर्ट आणि पीटर इंग्लंडचा शर्ट याच्या किमतीत मोठा फरक का असावा? या सगळ्याचे कारण एकच- प्रतिष्ठा. मिळणारा पगार किंवा पगारवाढ यांचे तरी कारण काय असते? मिळणारा पगार न पुरणे की प्रतिष्ठा? याचे उत्तर प्रतिष्ठा हेच आहे. नाही तर आमदारांची नुकतीच झालेली पगारवाढ का झाली असती? मोठमोठ्या कंपन्यांच्या संचालकांचे, अधिकाऱ्यांचे कोटीत जाणारे पगार वा भत्ते जगण्यासाठी असतात की प्रतिष्ठेसाठी? यातूनच एक साखळी तयार होते. ही साखळी जपण्याचे प्रयत्न सतत केले जातात, करावे लागतात. एक तर खालच्यांची प्रतिष्ठा वाढू न देणे किंवा ती वाढली तर वरच्यांची आणखीन वाढवणे, असे चक्र सुरु राहते. याच्या मध्ये अनेक पायऱ्या गरजेपोटी तयार होतात. शिवाय आजचे status उद्या खाली यायला नको. म्हणजेच चल, अचल संपत्ती, गाड्या, घरे इत्यादी वाढतच राहिले पाहिजे. कमी होता कामा नये. या साऱ्याचा जगण्याशी संबंध नसतो. संबंध असतो प्रतिष्ठेशी. या दुष्टचक्रातूनच आर्थिक विषमता, शोषण, भ्रष्टाचार जन्माला येतात, वाढतात, फोफावतात. जागतिक स्तरावर देखील हेच चालते. जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण या गोष्टीदेखील याच साखळीचा भाग होत्या. याला अंत नाही आणि अनेक आर्थिक प्रश्नांनाही अंत नाही. कारण आर्थिक प्रश्न केवळ अर्थशास्त्राने सुटत नाहीत. तसे करणे अप्रगल्भता आहे. सेवेची अनेक कामे, गरिबांसाठीच्या योजना, रोटरी वा लॉयन्सच्या असंख्य शाखा आदींनी हे प्रश्न सुटत नाहीत. अर्थकारण हे अर्थशास्त्रासोबतच समाजकारण, राजकारण, संस्कृतिकारण, विचार, भावना इत्यादी गोष्टींनी घडत वा बिघडत असते. त्यामुळेच पैसा आणि प्रतिष्ठा यांचा संबंध तोडणे आवश्यक आहे. प्राचीन भारतीय चिंतन, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, गोळवलकर गुरुजी, पंडित दीनदयाळ उपाध्याय आदींनी यावर मुलभूत चिंतन मांडलेले आहे. यातूनच भारताची ऋषी कल्पनाही विकसित झालेली आहे. ही गोष्ट मुळातून नीट समजून घेतल्याशिवाय हिंदू संस्कृती/ भारतीय संस्कृती इत्यादी कळू शकत नाही. हिंदू वा भारतीय ही फक्त लेबले नाहीत.

- श्रीपाद कोठे

२० ऑगस्ट २०१६

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०२२

संघप्रचारक

संघाची प्रचारक व्यवस्था ही संघातीलच नव्हे तर सामाजिक कार्याच्या क्षेत्रातील अनोखी गोष्ट आहे. संघाच्या स्थापनेनंतर लगेचच २-३ वर्षातच प्रचारक पद्धतीची पायाभरणी झाली. त्याचा विकास नंतर हळूहळू झाला. सुरुवातीला संघात येणाऱ्या बाल-किशोर स्वयंसेवकांना संस्थापक डॉ. हेडगेवार शालेय शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जाण्यासाठी प्रोत्साहित करीत असत. या स्वयंसेवकांनी शिक्षणासोबतच तेथे संघाचे काम सुरू करावे असाही त्यांचा प्रयत्न असे. अशा प्रकारे सर्वप्रथम १९२८ साली काशीला बनारस हिंदू विश्वविद्यालयात स्वयंसेवक शिकायला गेले. त्यात नंतरच्या काळात संघाचे सरकार्यवाह राहिलेल्या भय्याजी दाणी यांचाही समावेश होता. हीच संघाची महाराष्ट्राबाहेरील मुहूर्तमेढ. हीच आजच्या प्रचारक पद्धतीची सुरुवात म्हणता येईल. त्यावेळी मात्र प्रचारक वगैरे शब्दावली रूढ़ नव्हती.

सुरुवातीला संघाचे काम वाढू लागले तसे अधिक वेळ देणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज भासू लागली. परंतु असे कार्यकर्ते सहजासहजी मिळत नाहीत. शिवाय किमान गरजांची पूर्तता करण्याएवढीही संघाची शक्ती नव्हती. त्यामुळे कोणाला म्हणायचे तरी कसे? अशा स्थितीत उमाकांत केशव उपाख्य बाबासाहेब आपटे हे कार्यकर्ते स्वत:हून पुढे आले. त्यांनी पूर्ण वेळ संघाचे काम करण्याची तयारी दर्शवली आणि प्रत्यक्ष कामात स्वत:ला झोकून दिले. तेच संघाचे पहिले प्रचारक. संघाचे काम नव्हते, संघाचे नाव नव्हते, संघाची व्यवस्था नव्हती, कामाचे स्वरूप आणि चित्र स्पष्ट नव्हते, भविष्य तर कोणीच सांगू शकत नव्हते, शिवाय हे काम भविष्यातही कधी लोकप्रिय होण्याची शक्यता नव्हतीच. सतत समाजाला काही तरी देतच राहायचे, देण्याचाच विचार करायचा, तोच विचार लोकांना शिकवायचा, समाजात रुजवायचा. हे काम लोकप्रिय होणार कसे? तरीही बाबासाहेब आपटे घरदार सोडून संघाच्या कामासाठी बाहेर पडले आणि त्यानंतर हळूहळू ही संख्या वाढली. अर्थात त्यालाही १०-१२ वर्षांचा काळ जावा लागला. १९३५ ते १९४० या पाच वर्षात सुमारे १०० प्रचारक देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारार्थ विविध प्रांतात गेले.

या प्रारंभीच्या काळातील प्रचारकांची मानसिकता काय असेल, त्यांचा कृतनिश्चय काय आणि कसा असेल, त्यांच्या श्रद्धा आणि निष्ठा कशा असतील, झोकून देण्याची, उधळून देण्याची त्यांची वृत्ती कशी असेल, त्यांचा कणखरपणा, स्वत:विषयीची उदासीन वृत्ती, त्यांच्या प्रेरणा, त्यांचा संघर्ष या साऱ्याची कल्पनाही करणे सामान्य कार्यकर्त्याला कठीण आहे. ज्या व्यक्तीला संघाच्या कामाचा गंधही नाही, तो तर हे सारे समजून सुद्धा घेऊ शकणार नाही. त्यांच्या संघर्षाचे स्वरूपही बहुपदरी होते. स्वत:शी, परिस्थितीशी, कुटुंबाशी, समाजाशी, विरोधकांशी असा तो संघर्ष होता. हा आर्थिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक आणि प्रसंगी शारीरिकदेखील होता. सामान्य गरजा भागवण्यासाठी पैसा नव्हता हे त्या संघर्षाचे एक स्वरूप होते, तर संघाच्या कामाची गरज आणि महत्व पटवून देण्यासाठी आवश्यक असलेले बौद्धिक खाद्य सुद्धा उपलब्ध नसणे ही त्याची अन्य एक बाजू. राहण्याची सोय नाही, जिथे जशी परिस्थिती असेल तसे राहायचे. कधी एखादे परिचिताचे घर असेल तर ती चैन. हा परिचितसुद्धा किती काळ आसरा देईल माहीत नाही. अनेक अशा लोकांनी आयुष्यभर संघाला आणि प्रचारकांना आधारही दिलेला आहे. पण कुठे कुठे विपरीत अनुभव देखील आलेले आहेत. हे अनुभव विपरीत तरी कसे म्हणणार? स्वाभाविक आणि नैसर्गिकच म्हणावे लागतील. अपरिचित घरांमध्ये, काहीही न देता अनेक दिवस, महिने व वर्षे जेवताना या प्रचारकांना काही ऐकावेच लागले नसेल का? अनेकवार असे प्रसंग आले. पण संघाच्या कामासाठी, मनातील प्रखर ध्येयवादाच्या उर्मीने पाण्याच्या घोटाबरोबर कार्यकर्त्यांनी ते गिळून आणि पचवून टाकले.

त्याकाळी सगळीकडेच राष्ट्रीय विचारसरणीच्या अनेक लोकांनी विद्यालये, महाविद्यालये, वसतिगृहे वगैरे काढलेली होती. एकमेकांना मदत करण्याची वृत्ती होती, चांगली कामे उचलून धरण्याची प्रवृत्ती होती, स्वातंत्र्यासाठी संघर्षाचे वातावरण होते. त्याचीही मदत संघ प्रचारक म्हणून गेलेल्या विद्यार्थ्यांना झाली. आर्य समाजाचीही मंदिरे, धर्मशाळा असत. विशेषत: उत्तर आणि पश्चिम भागात. तेथेही प्रचारक राहत असत. रात्री दुकाने बंद झाल्यावर बाहेरच्या फळ्यांवर झोपणे, एखाद्या देवळात रात्रीची सतरंजी पसरून पाठ टेकवणे, सकाळी उठून सार्वजनिक नळावर, विहिरीवर, नदीवर आंघोळ वगैरे उरकून संघाचे काम सुरु. भेटीगाठी, आपला विषय समजावून सांगणे, बैठकी, शाखा, आजाऱ्यांना भेटणे, त्यांची सेवा, मुलांना शिकवणे, भजन मंडळे; असे लोकसंपर्क, लोकसंग्रह आणि लोकसंघटन यासाठी जे जे करता येईल ते ते करणे. मध्ये कुठे पोटात काही गेले तर गेले. नाही तर चुरमुरे, फुटाणे फाकायचे, पाणी प्यायचे अन पुन्हा हसतमुखाने भ्रमंती सुरु. अशा प्रकारेही पुष्कळांना कामे करावी लागली.

अनेकांनी छोटी मोठी कामे करून पोटासाठी चार पैसे कमावणे आणि प्रचारक म्हणून काम करणे असेही केलेले आहे. अगदी वानगीदाखल दोन नावे सांगायची तर माधवराव मुळे व नानाजी देशमुख यांची सांगता येतील. जनसंघाचे ज्येष्ठ नेते व नंतर दीनदयाळ शोध संस्थानचे अध्वर्यू म्हणून नानाजी देशमुख समाजाला परिचित आहेत. माधवराव मुळे हे पंजाबमध्ये प्रचारक होते. भारताच्या दुर्दैवी फाळणीच्या वेळी त्यांनी अतुलनीय कार्य केले. रा.स्व. संघाचे सरकार्यवाह म्हणूनही त्यांनी नंतरच्या काळात जबाबदारी सांभाळली होती. नानाजींनी स्वैपाकी म्हणून काम केले, तर माधवराव मुळेंनी टायर ट्यूबचीही कामे केली. परंतु कुरकुर नाही, त्रागा नाही अन मागे फिरणेही नाही. वयही पोरासोरांचे!! अशा अतिशय विषम, प्रतिकूल परिस्थितीत शेकडो प्रचारकांनी अनाम राहून संघाच्या कार्याचा मजबूत पाया घातलेला आहे.

प्रचारक पद्धतीची खरी सुरुवात गुरुजी सरसंघचालक झाल्यानंतर झाली. १९४२ ते १९४७ हा काळ देशाच्या दृष्टीने अतिशय धावपळीचा आणि घटनांनी भरलेला होता. देशाची फाळणी होणार हे स्पष्ट होऊ लागले होते. अशा अस्थिर व हिंदूंच्या दृष्टीने भयावह स्थितीत संघाच्या कामाची मागणीही वाढत होती. समाजाची सुरक्षा आणि हिंमत कायम राखण्याचेही जिकीरीचे काम होते. संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजींनी संपूर्ण देशभर अखंड प्रवास करून यासाठी अथक प्रयत्न केले. `सध्याचा काळ हा असामान्य काळ आहे. त्यासाठी असामान्य त्याग हवा. घराबाहेर पडा आणि देशसेवेला वाहून घ्या,' असे त्यांचे तरुणांना आवाहन होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो तरुण संघाचे प्रचारक म्हणून घराबाहेर पडले. त्यांनी अतिशय मोलाची कामगिरी देखील केली. संघाची प्रसिद्धी विन्मुखता आणि व्यक्तीनिरपेक्षता यामुळे त्याची फारशी माहिती कोणाला नाही. त्यातच सत्तेचा रोष संघाच्या पाचवीलाच पूजलेला असल्याने त्यावेळची प्रचारकांची कामगिरी हा आपल्या देशाच्या इतिहासातील एक मौन अध्याय बनून गेला आहे. अगदी संघात देखील याबद्दल फारशी माहिती नाही. तेव्हापासून सुरु झालेली ही प्रचारक पद्धती आजही सुरु आहे.

आजही दरवर्षी शेकडो प्रचारक संघाच्या कामासाठी घराबाहेर पडत असतात. आजवर अशा हजारो प्रचारकांनी संघाच्या कामाला खतपाणी घातले आहे. त्यांची नुसती सूची करायचे म्हटले तरी एखादा ग्रंथ तयार होईल. मुळातच संघाच्या कामाच्या अनोख्या स्वरुपामुळे तो विषय बाजूला पडला. परंतु १९८९ साली डॉ. हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी निमित्त नागपुरात आजी-माजी प्रचारकांचे अखिल भारतीय शिबिर आयोजित करण्यात आले होते. तेव्हा जुन्या प्रचारकांचा शोध घेतला गेला. त्यावेळी प्रचारक म्हणून काम केलेल्या शेकडो स्वयंसेवकांची माहिती समोर आली. त्यानंतर विविध निमित्ताने ही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न झाला. इ.स. २००० साली संघ स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुंबईच्या साप्ताहिक विवेकने विशेषांक काढले. त्यासाठी प्रयत्नपूर्वक काही माहिती गोळा करण्यात आली. `भारतीय उत्कर्ष मंडळ' या संघ परिवारातीलच संस्थेनेही जुन्या प्रचारकांची माहिती गोळा करण्याचा उपक्रम केला आहे. देशभर विविध प्रांतातही अशी प्रचारकांची माहिती संकलित करण्याचा प्रयत्न अलीकडे होऊ लागला आहे. परंतु कार्यकर्त्यांना ही माहिती व्हावी, प्रेरणा मिळावी एवढाच त्याचा हेतू आहे. या कार्यकर्त्यांबद्दल काही विशेष योजना वगैरे करणे हा त्याचा हेतू नाही. सत्कार, प्रमाणपत्र, थैली वगैरे तर संघाच्या कार्यपद्धतीत कुठेच बसत नाही.

सुरुवातीच्या काळात संघ कामासाठी प्रचारक गेलेल्या स्वयंसेवकांना घरचा विरोधही मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागला. अनेकदा घरच्यांच्या नकळत घरून निघून जाणे, असेही करावे लागले. मग स्थानिक कोणीतरी घरी जाऊन सांगत असत. अनेकांचे आईवडील पुष्कळदा संघावर नाराजही राहत असत. हा राग नंतर मुलाविषयीच्या अभिमानातही परिवर्तित होत असे. कुटुंबातील एकाहून अधिक मुले किंवा सगळीच मुले प्रचारक गेली, अशीही उदाहरणे आहेत. आता हा विरोध कमी झालेला आहे. एखादा स्वयंसेवक प्रचारक म्हणून जातो त्यावेळी तो ज्या ठिकाणी राहतो, त्याने ज्या ठिकाणी काम केले आहे तेथे त्याला निरोप देण्याचे कार्यक्रमही आता होतात.

काय आहे हे `प्रचारक' प्रकरण? काय काम असते त्यांचे? कसे असते त्यांचे जीवन? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही काही एखादी व्यावसायिक संस्था, संघटना नाही. आजकाल असतात तशा सार्वजनिक कामे करणाऱ्या NGO सारखी गैरसरकारी संघटनाही नाही. स्वत:हून समाजासाठी काम करणाऱ्या लोकांचा तो एक विशाल समूह आहे. सगळे कार्यकर्ते स्वत:चे शिक्षण, घरदार, नोकरी, व्यवसाय, उद्योग, कुटुंब हे सारे सांभाळून संघाचे काम करतात. पण काही थोडे स्वयंसेवक संघाचे काम हेच आपल्या आयुष्यात करायचे एकमेव काम आहे असा संकल्प करून आपला पूर्ण वेळ संघाच्या कामासाठी देतात. २४ तास संघाचेच काम करायचे. त्यांनाच संघात प्रचारक म्हणतात. साधारणपणे शिक्षण पूर्ण झाले की स्वयंसेवक प्रचारक म्हणून बाहेर पडतात. समाजात मिसळताना संघाचा प्रचारक अशिक्षित आहे असे व्हायला नको. त्याने कामावर विपरीत परिणाम होऊ शकतो, हा त्यामागील विचार. त्यासोबतच, काही काळानंतर प्रचारक जीवन थांबवून पुन्हा सामान्य गृहस्थी जीवन सुरु करण्याचा प्रसंग आला तर त्यासाठीही शिक्षण झालेले केव्हाही चांगले, हा व्यावहारिक भाग सुद्धा आहेच.

एखादा स्वयंसेवक प्रचारक म्हणून कामाची सुरुवात करतो तेव्हा साधारणपणे २ वर्षे, ३ वर्षे, ५ वर्षे प्रचारक म्हणून काम करायचे अशीच ती सुरुवात असते. काही जण ठरलेला काळ झाला की परत येऊन आपले खासगी आयुष्य सुरु करतात. काही जण मात्र हळूहळू करत आपले संपूर्ण आयुष्यच या कामासाठी देतात. एकदा प्रचारक जीवन स्वीकारून घराबाहेर पडल्यावर अखेरच्या श्वासापर्यंत संघाचेच काम करतात. संघाच्या कार्यालयातच राहतात. प्रचारक म्हणून काम करू लागल्यावर तो स्वयंसेवक घरी राहत नाही. संघाच्या कार्यालयात राहतो. सुरुवातीला संघाची कार्यालये वगैरे नव्हती. तेव्हा जशी सोय होईल तेथे प्रचारक राहत. आता मात्र बहुतेक सर्वत्र संघाची कार्यालये, इमारती असल्याने तेथेच त्यांची राहण्याची सोय असते. जेवणाची सोय मात्र आजही सगळ्या ठिकाणी आहेच असे नाही. शिवाय प्रचारक म्हटला की सतत फिरणे सुरु असते. त्यामुळे प्रचारकांचे जेवण सोय असेल तिथे कार्यालयात किंवा कार्यकर्त्यांच्या घरीच होते.

धोतर, पायजमा, कुडता असाच त्याचा साधा वेश असतो. त्याचे कपडेलत्ते, औषधपाणी, प्रवास याची सोय संघातर्फेच असते. सुरुवातीला वाहने वगैरे नव्हती तेव्हा पायीच फिरावे लागत असे. अगदी डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस यांनीही भरपूर पायपीट केलेली आहे. विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनाही सायकलवरून नागपूरभर फिरताना अनेकांनी पाहिले आहे. अलीकडे थोड्या गाड्या वगैरे आल्या आहेत आणि कष्ट जरा कमी झाले आहेत.

प्रचारक जायचे आहे हा निर्णय करीपर्यंत स्वयंसेवकाला स्वातंत्र्य असते. नंतर मात्र संघ ठरवेल त्याप्रमाणे तो काम करतो. त्याने कोणत्या गावी जायचे, काय काम करायचे, कोणत्या क्षेत्रात काम करायचे हे संघ ठरवित असतो. अर्थात हे फक्त कामाच्या संदर्भातच. बाकी तो मुक्तच असतो. प्रचारक म्हणून थांबायचे किंवा नाही याचा निर्णय तोच घेतो. प्रचारक म्हणून काम करतानाही सणावाराला, कार्यप्रसंगाला, आजारपणे, मृत्यू अशा वेळी तो मोकळेपणाने घरी जाऊ शकतो. अर्थार्जन न करणारा, घरी न राहणारा, साधे कपडे घालणारा, संघाच्या योजनेने २४ तास संघाचे काम करणारा स्वयंसेवक म्हणजे प्रचारक. अशा प्रचारकांना अधिकार मात्र काहीही नसतो. सरसंघचालक आणि सरकार्यवाह हे दोन अपवाद वगळता संघात कोणत्याही प्रचारकाला प्रणाम सुद्धा केला जात नाही. सर्व स्तरांवर संघचालक आणि कार्यवाह ही प्रणामाची पदे गृहस्थ कार्यकर्त्यांकडेच असतात. प्रचारकाला वेगळी विशेष वागणूक नसते. त्याच्यासाठी काही वेगळे code of conduct नसते. गृहस्थ कार्यकर्ता कितीही समर्पित असला तरीही त्याला मर्यादा येतात. तो नेहमीच उपलब्ध होऊ शकेल यातही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे ती कमतरता भरून काढावी हीच प्रचारकाकडून अपेक्षा असते. शिवाय संघकार्याच्या दृष्टीने आवश्यक असलेला प्रचंड संपर्क हा प्रचारकांच्या कामाचा विशेष होय. प्रत्येक प्रचारकाचा आपापल्या कार्यक्षेत्रात शेकडो, हजारो लोकांशी, घरांशी प्रत्यक्ष संपर्क असतो. त्याच्या या अफाट संपर्कातूनच अनेक लोकांना कामाशी जोडता येते, सहभागी करून घेता येते. गृहस्थी कार्यकर्ते कामाला स्थिरता प्रदान करतात आणि प्रचारक कामाला गती देतात असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

परंतु एखादा स्वयंसेवक प्रचारक म्हणून काम करू लागला की तो सर्वगुणसंपन्न झाला असे नसते आणि संघही तसे मानीत नाही. त्याची शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमता वाढावी यासाठी प्रयत्न करण्यात येतात. कधी औपचारिक बैठकी वगैरे होतात, तर अनेकदा अनौपचारिक चर्चा, संवाद, मार्गदर्शन होते. ज्येष्ठ, अनुभवी प्रचारक, गृहस्थी कार्यकर्ते या साऱ्यांचे त्याला मार्गदर्शन लाभते, आधारही लाभतो. प्रचारक काही वेगळे आहेत असा भाव कधीही बाळगला जात नाही, उत्पन्न केला जात नाही. अन्य माणसांप्रमाणेच त्यालाही कामभावना असते. एक प्रकारे तो निसर्गाच्या विरूद्धच जगत असतो. मात्र त्यासाठी काही विशेष साधना वगैरे केली जात नाही. त्याला करायला सांगितली जात नाही. एक खूप मोठ्ठ असं विशिष्ट ध्येय संघाने आपल्या कार्यकर्त्यांपुढे ठेवलेलं आहे. तीच त्यांची पूजा नि साधना. या ध्येयमयतेनेच आणि तशा प्रकारच्या आजूबाजूच्या उदाहरणांनीच तो आपल्या निसर्गदत्त भावनांवर नियंत्रण ठेवतो. विपरीत काही घडतंच नाही असे नाही. पण ते अपवाद म्हणूनच. आणि संबंधित व्यक्ती वाईट आहे अशा दृष्टीने त्याकडे न पाहता ती त्याची मर्यादा आहे असेच त्याकडे पाहिले जाते. आवश्यक ती उपाययोजनाही केली जाते. गेल्या ८-९ दशकात अशा हजारो हजार प्रचारकांच्या द्वारे सामाजिक नेतृत्वाची एक आगळी शैली, एक अनोखे दालन संघाने यशस्वीपणे राबविले आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

सोमवार, २८ एप्रिल २०१४

मंगळवार, १६ ऑगस्ट, २०२२

संजय आवटे यांची विनोदबुद्धी

साम टीव्हीचे संजय आवटे सगळ्यांना परिचित आहेत. संघाने तिरंगा फडकावणे यावर आज त्यांनी चर्चा केली. त्यात संघाची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीला त्यांनी प्रश्न केला- `१५ ऑगस्ट १९४७ रोजी हा देश जन्माला आला हे तुम्हाला मान्य आहे की नाही?' अन आपण अगदी आईनस्टाईनलाच कोंडीत पकडलं अशा थाटात स्मितहास्य करीत ते उत्तराची वाट पाहत बसले. पुढची चर्चा फारशी महत्वाची नाही. पण आवटेजी मी तुम्हाला विचारतो की, हा देश १५ ऑगस्ट १९४७ ला जन्माला आला हे तुम्हाला मान्य आहे? हे तुमचे अगदी ठाम मत आहे? ते तसे आहे असे मी गृहीत धरतो कारण त्याशिवाय तुम्ही तसा प्रश्नच विचारला नसता. आता मी तुम्हाला विचारतो- `जो देश जन्मालाच आलेला नव्हता त्यासाठी स्वातंत्र्य लढा कसा काय लढला गेला हो? इंग्रजांनी १५० वर्षे राज्य तरी कोणत्या देशावर केले? सगळेच्या सगळे नेते बुद्धू होते असे तुम्हाला म्हणायचे आहे का? या देशात मुलभूत ऐक्य असल्याविना नेत्यांच्या आवाहनाला लोकांनी सामुहिक प्रतिसाद दिला का? हे ऐक्य कोणी अन कधी निर्माण केले? असे ऐक्य एका रात्रीतून निर्माण होते का? आपण परतंत्र आहोत असे कोणत्या देशाला वाटले?' श्रीयुत संजय आवटे, तुम्ही काय लोकांना मूर्ख समजता काय?

अन या संघ विरोधकांचे ढोंग पाहा- याच चर्चेत रत्नाकर महाजन आणि राजन अन्वर हेही होते. महाजन उठसुठ गांधींचे नाव घेतातच आणि अन्वर हे तर गांधी स्मारक निधीचे विश्वस्त वगैरे. गांधीजींनी `हिंद स्वराज'मध्ये या देशाबद्दल काय लिहिले आहे हे काय या दोघांना माहीत नसेल? गांधी स्पष्ट म्हणतात- हा देश किमान पाच हजार वर्षे प्राचीन आहे. परंतु आवटे हा देश १९४७ साली जन्माला आल्याचे सांगत असताना हे दोघेही तथाकथित ढोंगी विद्वान तोंडात गोमूत्र धरल्यासारखे चूप बसले होते. तुम्हाला संघाचा विरोध करायचा आहे करा. पण म्हणून तुम्ही या देशाचा, या समाजाचा बुद्धिभेद आणि मानभंग करणार काय? लाजा बिजा विकून टाकल्या आहेत का? अन गांधींच्या रामराज्याचे काय? हा देशच जर १५ ऑगस्ट १९४७ ला जन्माला आला तर त्याच्यापुढे, त्याच्याशी काहीही संबंध नसलेल्या रामराज्याचा आदर्श गांधींनी का ठेवला? वेडे झाले होते का ते? पंडित नेहरूंनी कोणत्या जन्माला न आलेल्या भारताचा शोध घेतला होता? अन हो, भारताला त्याचे नाव तो जन्माला येण्यापुर्वीच ठेवले गेले होते का?

आवटे and company, तुम्हाला आवडो न आवडो, तुम्हाला पटो न पटो, तुम्हाला त्रास होवो अगर मिरच्या झोंबो; भारत हिंदू राष्ट्र होते, आहे आणि राहील. अन ते हिंदू राष्ट्र असल्यामुळेच ते सहिष्णू होते, आहे आणि राहील. जेव्हा सगळ्या जगाने ज्यू लोकांना हाकलून दिले तेव्हा याच हिंदू राष्ट्राने त्यांना आश्रय दिला. याच हिंदू राष्ट्राने जगातले पहिले चर्च उभारले. या देशाची सहिष्णूता १९४७ ला जन्माला आली नाही. ती या देशाच्या हजारो वर्षांच्या वाटचालीत या देशाच्या रक्तातून वाहते आहे. १९४७ आणि त्यानंतरच्या राज्यघटनेने या देशाच्या वैशिष्ट्यांना जन्म दिला नाही, त्यांनी फक्त त्यांचा सशक्त पुनरुच्चार केला. या प्राचीन समाजाने ज्या काही चुकाबिका केल्या असतील त्या केल्या असतील. ज्या त्रुटी राहिल्या असतील त्या राहिल्या असतील. कोणत्या देशात त्रुटी नसतात अन कोणता समाज चुका करीत नाही? अन भविष्यात कोणी चुका करणार नाही याची काय शाश्वती? एकूणच जग, जीवन, माणूस याबाबतचं आपलं अतिशय तोकडं अन पोरकट आकलन प्रदर्शनात मांडणं बंद करा. चुका, न्याय, अन्याय, त्यांचं परिमार्जन; वगैरे वगैरे सुरु राहील. तो जीवन प्रवाहाचा भाग असतो. पण भलती तर्कटे करून या समाजाचा, या देशाचा, या राष्ट्राचा मानभंग करणे; त्याच्यातील उत्तमता, उदात्तता, उर्जस्वलता, त्याचा त्याग, त्याची तपस्या, त्याची थोरवी, त्याची मूल्ये इत्यादींना नख लावण्याचा नतद्रष्टपणा बंद करा.

जाता जाता एक मुद्दा-

वंदे मातरम् न म्हणणाऱ्यांना देशभक्तीची प्रशस्तीपत्रे देणारे तुम्ही कोण? कोणाच्या देशभक्तीचा पुरावा मागण्याचा किंवा कोणाला देशभक्ती सिद्ध करायला सांगण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असा तुमचा रोकडा सवाल असतो ना? मग तिरंगा फडकवला नाही एवढ्यावरून संघाला देशभक्तीचे पुरावे मागणे तुमच्या कोणत्या तत्वात बसते? दुसऱ्याच्या नाकाचा शेंबूड पुसण्याचा उपद्व्याप करा. त्याला हरकत नाही पण आधी स्वत:चे नाक स्वच्छ करा. तुमची सगळी विद्वत्ता विनोद म्हणूनच पाहतो. पण त्यामुळे समाजात गोंधळ माजू नये म्हणून एवढे तिखट लिहिले आहे. लोभ कायम राहावा.

- श्रीपाद कोठे

१७ ऑगस्ट २०१७

शनिवार, १३ ऑगस्ट, २०२२

something not to forget on INDEPENDENCE DAY.

1) that our Matrubhumi was devided on religious lines.


2) that 10 lakh people were killed and lakhs were looted, raped and forced to leave their nest.


3) the official resolution demanding seperate pakistan by all india muslim league was adopted on 23 march 1940 at lahore.


4) pakistan was demanded by `all INDIA muslim league'.


5) it was the largest displacement of human beings in the history of mankind.


6) this devision of India must come to an end, otherwise India will be paralysed. - yogi arwind (shri aurobindo) said on 15 august 1947.


7) pak claims it's history to be of 5000 years. while it took birth in 1947 and even islam is only 1600 yrs old. how comes 5000 yrs?


8) pak claims indus valley civilisation, atharv ved, takshashila, panini as it's culture.


9) there are hotels named after Panini in pakistan. vyakarankar panini was a rushi is well known.


10) a birthplace of bhakt Pralhad- pralhadpuri- is in multan district of pakistan. bhagwan narasinh came out of the concrete pillar here itself.


11) the birthplace and the place of demise of guru nanakdev ji is in pakistan.


12) revolutionary bhagat singh, rajguru and sukhdev were hanged in lahore jail, which is in pakistan now.


13) independence days of pakistan and bharat are 14 august and 15 august. this is only to facilitate mr. mountbaten to be present at both the ceremonies.


14) mahatma gandhi ji was not present at the independence day ceremony at new delhi.


15) pattabhi sitaramayya, dr. rajendra prasad, dr. ram manohar lohiya, swa. sawarkar, RSS, mahatma gandhi were strongly opposed to partition.


16) dr. ambedkar was of the view of mutual exchange of hindus and muslims.


17) it was declared in the parliament of england on 20 february 1947 by britain's then prime minister Atley himself that, independence will be granted in june 1948. but montbaten came to bharat in march 1947 and hurriedly partition was executed. he kept aside redcliff maps.


18) voices of reunion of bharat can be heard even today in both- bharat as well as pakistan.


- श्रीपाद कोठे

१४ ऑगस्ट २०१३


दुसरा देश आहे म्हणूनच त्रास आहे. सोबत राहू शकत नाही या भावनेतून दोन देश झाले. ही भावना नष्ट झाली म्हणजेच `सोबत राहू शकतो' ही भावना निर्माण झाली तर पाकचे वेगळे अस्तित्वच संपून जाईल. म्हणजेच देश एक होईल. आणि हिंदू व मुसलमान एकत्रितपणे राहू शकतात हे पाकिस्तानी जनतेला जेवढे जाणवेल तेवढे एकीकरण होईल. त्यासाठी वेगळे काही करण्याची गरज नाही. पाकपेक्षा अधिक मुस्लिम भारतात राहत आहेतच. हे उदाहरण पुरेसे आहे. हा तर्क मान्य नसेल तर त्याचा अर्थ एवढाच होईल की, मुस्लिम समाज बदलूच शकत नाही. तो समाज सहिष्णू असूच शकत नाही. पण ते सत्य किती लोक मोकळेपणाने मान्य करतील? मुसलमान चांगले आहेत असे म्हणायचे. त्यांचे खरे खरे मूल्यमापन करणाऱ्यांना जातीय, सांप्रदायिक ठरवायचे आणि पुन्हा मुसलमान आणि हिंदूंचे सहअस्तित्व शक्य नाही असेही म्हणायचे, ही फार मोठी विसंगती आहे.


मग तर कॉंग्रेसचे राज्य, कितीही पापे केली तरी कुणी हटवू शकणार नाही. त्यांना तर मतांचा खजीनाच मिळेल ना! किती लाड करू अन किती नको असे होऊन जाईल!

@ मनीषा, नाही, असे नाही होणार. कारण जोवर लाड सुरु राहतील तोवर भारत अखंड होणार नाही. ती एक दीर्घ प्रक्रिया राहील. लाड बंद होणे ही त्याची सुरुवात राहील.

@ atul ji, आहे आहे. गरज फक्त राजकारण बाजूला सारून त्या प्रयत्नांना उचलून धरण्याची आहे. आणि कालच times now वाहिनीवरील चर्चेत पाकिस्तानचे बरि. झफरुल्ला खान यांनी तर चक्क एकीकरणाचाच प्रस्ताव दिला. `आम्ही स्वत:ला पाकिस्तानी भारतीय का म्हणवून घेवू नये' अशा भावना पाक लेखक व्यक्त करू लागले आहेत. `will pakistan survive' अशी निबंध व कवितांची पाकिस्तानी पुस्तके येवू लागली आहेत. बदलांचे संकेत मिळू लागले आहेत. प्रश्न आहे आम्ही त्यासाठी शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक, लष्करी, कुटनीतिक, सांस्कृतिक, धार्मिक दृष्टीने तयार आहोत का किंवा तशी तयारी करण्याची इच्छा आहे का?

@ atul ji, नेत्याचे म्हणाल तर; कोणाच्या वाईटाची इच्छा न करणारा आणि सोबतच कोणाला वाईट वाटेल का वगैरे विचार न करणारा असा नेता हवा. हिंदूंनी आणि भारताने खूप काही पचवलं आहे. नाठाळांना वठणीवरही आणलं आहे. तेच त्याच्या जीवनाचं प्रयोजन आहे. वेळ लागेल पण यांनाही इथेच मुक्ती मिळेल.


अखंड भारत आणि गुरुजींची `न्यूयॉर्क टाइम्स'मधील मुलाखत

उद्या भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे. तसाच तो भारताची दुर्दैवी आणि शोकांत फाळणी झाली होती, याची आठवण देणारा दिवसही आहे. या घटनेनंतर दोन देश स्वतंत्रपणे चालू लागल्यावर सुद्धा आपले पाकिस्तानशी पाच वेळा युद्ध झाले. काश्मीर प्रश्न, दहशतवादी कारवाया यामुळेही पाकिस्तान आणि त्यासोबतचे संबंध नेहमीच चर्चेत असतात. या सगळ्या विषयांचे अनेक पैलू आहेत. त्यावर खूपदा लिहिले गेले आहे. यानंतरही खूपदा लिहिले जाईल. अन तरीही खूपसे लिहिता येऊ शकेल. १९६५ च्या भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर `न्यूयॉर्क टाइम्स'चे प्रतिनिधी लुकस यांनी १६ मे १९६६ रोजी, रा.स्व. संघाचे तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांची हैद्राबाद येथे भेट घेतली होती. सुमारे तासभर त्यांनी विविध विषयांवर चर्चाही केली होती. त्या मुलाखतीत भारतीय राजकारण आणि पाकिस्तान या दोन विषयांवर प्रामुख्याने बोलणे झाले. `संघ आणि राजकारण' या संदर्भातही ही मुलाखत मुळातून वाचून अन समजून घेण्यासारखी आहे.

`पाकिस्तान समस्येच्या सोडवणुकीसाठी आपल्या काय सूचना आहेत?' या लुकस यांच्या प्रश्नावर गुरुजी म्हणाले होते- `दोन्ही देश एकत्र करण्याशिवाय अन्य उपाय मला दिसत नाही. दोघांचे मिळून एक राज्य व्हावे हाच एकमेव उपाय आहे. यासाठीच कार्य केले पाहिजे.' यानंतरचा प्रश्न स्वाभाविकच होता, `हे कसे साध्य करता येईल? युद्ध हा उपाय आहे का?' त्यावर गुरुजींचे नि:संदिग्ध उत्तर होते- `युद्ध हाच एकमेव उपाय नाही. हा उदेश साध्य करण्याचे अनेक मार्ग असू शकतात.' मात्र हे उत्तर देतानाच गुरुजींनी त्या अमेरिकन पत्रकाराला ही आठवण देखील करून दिली की, अमेरिकेच्या अखंडतेसाठी अमेरिकेत गृहयुद्ध झाले होते आणि हे गृहयुद्ध समाप्त झाल्यावर विजेता आणि पराभूत अशी भावनाही न राहता अमेरिका एक देश म्हणून उभा राहिला होता. गुरुजींचे हे निरीक्षण अतिशय नेमके आणि मार्मिक आहे. यावर लुकस म्हणाले- `याचा अर्थ महत्व भावनेला आणि उद्दिष्टाला आहे, असे आपल्याला म्हणायचे आहे?' त्यावर गुरुजी म्हणाले- `होय.'

मात्र युद्धाशिवाय हे कसे साध्य होईल असा प्रश्न प्रतिनिधीने पुन्हा विचारताच, `जागतिक परिस्थिती सतत बदलत असते. एखादी संधी चालत सुद्धा येऊ शकेल,' असा विश्वास गुरुजींनी व्यक्त केला होता. पाकिस्तानात सुद्धा काही लोकांना विलीनीकरण व्हावे असे वाटते, पण त्यांची तोंडे बंद केली जातात, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

यानंतर लुकस यांनी अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला. ते म्हणाले- `आपण म्हणता हा हिंदूंचा देश आहे. मग हिंदू-मुसलमान सद्भावनेने कसे राहतील? पाकिस्तानचे मुसलमान भारतात आले तर लोकसंख्येचा समतोल बिघडणार नाही का?' यावर गुरुजींनी दिलेले उत्तर अत्यंत मननीय आहे. गुरुजी म्हणाले- `सगळी अडचण ही आहे की, हिंदू आणि मुसलमान या दोघांकडे दोन परस्पर विरोधी गट याच दृष्टीने पाहिले जाते. ते दोघे एकत्र नांदू शकत नाहीत असाच सिद्धांत गेल्या ५०० वर्षात लादण्यात आला. पण ते दोघेही चांगल्या प्रकारे राहू शकतात यावर माझा विश्वास आहे. चुकीचा दृष्टीकोन सोडून आम्ही सर्व एकाच राज्याचे नागरिक आहोत, हा अगदी साधासुधा दृष्टीकोन स्वीकारावा लागेल. कुणालाही विशेष सवलती दिल्या जाऊ नयेत. असा विचार जर स्वीकारण्यात आला तर सर्व काही ठीक होऊन जाईल.'

यावर प्रतिनिधीचा प्रश्न होता- `मुसलमान आपला इतिहास कसा सोडू शकतील?' या प्रश्नावर गुरुजी म्हणाले, त्यांचा व आमचा इतिहास एकच आहे. आजचे मुसलमान मूळ याच भूमीतील आहेत. बाहेरून आलेले नाहीत. हिंदू व मुसलमानांचे पूर्वज एकच आहेत. आजचा मुसलमान स्वत:ला आपल्या पूर्वजांशी जोडू इच्छितो की, उपासना पद्धतीच्या आधारावर आक्रमकांशी जोडू इच्छितो? उपासना पद्धती एक असल्याने आक्रमक आपला होऊ शकत नाही. आजच्या मुसलमानांचे मूळ येथेच आहे. त्यांनी मुळाशी जोडून घ्यावे.'

पुन्हा एकदा प्रतिनिधीचा स्वाभाविक प्रश्न आला- `या सगळ्यांचे पुन्हा धर्मांतर करावे असे आपण म्हणता काय?' गुरुजींनी नि:संदिग्ध उत्तर दिले- `होय. मी असे म्हटले आहे. परंतु त्यांचे धर्मांतर जबरदस्तीने करावे असे मी म्हणत नाही. जे लोक जबरदस्तीने मुसलमान बनविले गेले, त्यांनी मातृधर्मात परत यावे हाच सर्वोत्तम मार्ग होय. परंतु ज्यांनी इस्लाम धर्माचे अध्ययन केल्यानंतर त्या धर्माविषयी ज्यांच्या मनात गोडी उत्पन्न झाली, तसेच इस्लाम धर्म हाच त्यांच्या मनाला अनुकूल आहे असा अनुभव ज्यांना येतो किंवा एवढ्या दीर्घ काळपर्यंत इस्लाम मतानुयायी राहिल्यामुळे ज्यांच्या ठिकाणी त्या धर्माविषयी ममत्व निर्माण झालेले आहे त्यांनी मुसलमान राहावे. पण त्यांनी आपली आनुवंशिकता का सोडावी? आणि आपापसात संघर्ष तरी का करावेत? आम्ही इस्लाम धर्माविरुद्ध नाही. हिंदू अतिशय उदार असतो. वैदिक आणि अवैदिक या सर्वांसाठी हिंदू धर्मात स्थान आहे. आम्ही येथील मुसलमानांच्या मनोवृत्तीच्या विरुद्ध आहोत. आम्हा दोघात तिसरा पक्ष नसता तर आम्ही ही समस्या फार चांगल्या रीतीने सोडवून घेतली असती. इतर मतांचे लोक ज्याप्रमाणे हिंदू धर्माच्या अंतरंगात राहतात त्याचप्रमाणे मुसलमानही राहू शकतात.'

गुरुजींच्या या मुलाखतीला सुमारे ५० वर्षे झाली आहेत. काही बदलही या काळात झालेला आहे. पण त्यातील मूळ भावना आजही सयुक्तिक आहे. या भूमिकेवर जे असहमत आहेत त्यांच्याच मनात खरे पाहता मुसलमानांविषयी विश्वास नाही आणि त्यांच्यात आत्मविश्वासाचाही अभाव आहे, असेच म्हटले पाहिजे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शुक्रवार, १४ ऑगस्ट २०१५

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने...

श्रीमती मृणालिनी बोस यांना २३ डिसेंबर १९०० रोजी देवघर येथून लिहिलेल्या दीर्घ पत्रात स्वामीजींनी व्यक्ती व समाजाच्या संबंधांवर सखोल विचार मांडले आहेत. स्वामीजी म्हणतात- `व्यक्तीला व्यक्तिगत स्वाधीनता म्हणजेच व्यक्तीस्वातंत्र्य आहे किंवा नाही; असेल तर ते किती प्रमाणात असणे उचित; व्यष्टीने समष्टीसाठी स्वत:च्या इच्छाशक्तीचा, स्वत:च्या सुखाचा अगदी संपूर्णपणे त्याग करावा किंवा नाही; हे प्रश्न प्रत्येक समाजापुढे अगदी अनादि काळापासून उभे आहेत. सर्वच समाज या प्रश्नांची उत्तरे शोधून काढण्यात गुंतले आहेत. आधुनिक पाश्चिमात्य समाजात हेच प्रश्न प्रचंड लाटांसारखे उसळून धुमाकूळ घालत आहेत. जे मत, व्यक्तिगत स्वाधीनतेचा वा व्यक्तीस्वातंत्र्याचा समाजाच्या सत्तेपुढे बळी देऊ इच्छिते त्या मताचे इंग्रजी नाव आहे `सोशॅलिझम' आणि व्यक्तित्वाची तरफदारी नि समर्थन करणाऱ्या मताला म्हणतात `इंडिव्हिज्युअॅलिझम'. पुढे स्वामीजी म्हणतात- `नियम आणि शिस्त यांच्या जोरावर व्यक्तीला समाजाचे गुलाम बनविण्याचे व तिला जबरदस्तीने आत्मसमर्पण करावयास भाग पाडण्याचे काय फळ आणि काय परिणाम होत असतात याचे आपली मातृभूमी हे एक ज्वलंत उदाहरण आहे. या आपल्या देशात माणसे शास्त्रोक्त विधीनुसार जन्मतात, खाणेपिणे वगैरे गोष्टीही जन्मभर शास्त्रीय नियमांनुसारच करतात, विवाह वगैरे तद्वतच शास्त्रात सांगितल्याप्रमाणेच करतात. फार काय पण प्राणदेखील शास्त्रातल्या साऱ्या विधींच्या अनुसारच सोडतात. या कठोर शिस्तीमध्ये फक्त एकच मोठा गुण आहे, बाकी सारे दोषच दोष आहेत. गुण हाच की, एखाददुसरे काम पिढ्यानपिढ्या रोज करीत गेल्याने अंगवळणी पडून लोक ते अगदी थोड्या श्रमात अतिशय चांगल्या रीतीने करू शकतात. चिखलाचे तीन पेंड आणि चारदोन लाकडे यांच्या मदतीने या देशातला आचारी जी चवदार भात भाजी बनवतो तशी आणखी कुठेही बनावयाची नाही. कुठल्या की जुन्या जमान्यातला एक रुपया किमतीचा माग अन पाय ठेवायला एक खळगा एवढ्या सामग्रीवर वीस रुपये वाराचा किनखाप फक्त या देशातच होणे संभवनीय आहे. एक फाटकी चटई, एक मातीची पणती अन तिच्यात एरंडीचे तेल - एवढ्या साहित्यावर दिग्गज पंडित या देशातच होतात. वेड्याबिद्र्या बायकोवर सर्वसहिष्णू प्रीती आणि फक्त कुंकवाला आधार अशा कुचकामाच्या, बदमाश नवरोजीवर आमरण भक्ती फक्त या देशातच शक्य आहे. हे झाले गुणाविषयी.'

`परंतु या साऱ्या गोष्टी माणसे अगदी निष्प्राण यंत्रांप्रमाणे करीत असतात. त्या साऱ्यात मनाचे स्फुरण नसते. हृदयाचा आविष्कार नसतो. प्राणाचे स्पंदन नसते. आशेचा आवेग नसतो. इच्छाशक्तीचा प्रबल आवेश नसतो. सुखाची उत्कट अनुभूती नसते. दु:खाचाही दाहक स्पर्श नसतो. कल्पक बुद्धीची लखलख नसते. नवलाईची आस नसते. नवीन गोष्टींची कदर नसते. असल्या मनावरचे मळभ कधीच विखरत नाही. उगवत्या सूर्याचे उज्वल दृश्य असल्या चित्ताला कधीच मोहवीत नाही. या अवस्थेपेक्षा काही चांगले असेल काय असे या असल्या मनात कधीही यावयाचे नाही. आले तरी त्याचा त्यावर विश्वास बसावयाचा नाही. विश्वास बसला तरी त्याच्याकडून उद्योग व्हावयाचा नाही आणि उद्योग झाला तरी उत्साहाच्या अभावी तो तसाच जिरून जाईल.'

या पत्रात पुढे ते म्हणतात- `तर मग काय आत्मत्याग हा धर्म नाही? आत्मसमर्पण हा गुण नाही? अनेकांप्रीत्यर्थ एकाच्या सुखाचा, एकाच्या कल्याणाचा होम करणे सर्वश्रेष्ठ पुण्यकर्म नव्हे? अगदी बरोबर. पण आपल्याकडे म्हणतात ना की, घासल्यापुसल्यानं का रूप येतं? मारूनमुटकून का प्रेम उद्भवतं? जो कायमचाच भिकारी आहे तो त्याग तरी कसला करणार अन त्याच्या त्यागाचे गोडवे तरी कसले गायचे? ज्याची इंद्रिये कुचकामाची आहेत, त्याच्या इंद्रियसंयमात काय पुण्य? भावभावना नाहीत, हृदय नाही, महत्वाकांक्षा नाही, समाज कशाशी खातात हेही माहीत नाही अशा इसमाचा कसला आला आहे परत समाजाप्रीत्यर्थ आत्मत्याग अन आत्मसमर्पण? जुलुमाने सती जाणे भाग पाडण्यात कसला आला आहे पातिव्रत्याचा आविष्कार? खुळचट समजुती अन अंधविश्वास लोकांच्या डोक्यात कोंबून त्यांना पुण्य करावयास लावण्यात काय स्वारस्य? माझे म्हणणे आहे की बंधने मोकळी करा. लोकांची बंधने मोकळी करा. जितकी शक्य आहेत तितकी बंधने मोकळी करा. समाजासाठी जेव्हा स्वत:ची समस्त सुखेच्छा बळी देऊ शकाल तेव्हा तर तुम्ही बुद्ध होऊन जाल. तुम्ही मुक्त होऊन जाल. पण ती फार दूरची गोष्ट आहे. मात्र ते सारे जुलूम जबरदस्तीने साधता येणे शक्य आहे असे का तुम्हाला वाटते? जो वीर आहे तोच आत्मत्याग करू शकतो. तोच आत्मसमर्पण करू शकतो. जो भ्याड असतो तो चाबकाच्या भयाने एका हाताने डोळे पुसतो नि दुसऱ्या हाताने दान देतो. काय उपयोग त्याच्या त्या दानाचा?'

शिकागो येथून २४ जानेवारी १८९४ रोजी आपल्या मद्रासी भक्तांना लिहिलेल्या पत्रात स्वामीजी म्हणतात- `जातीभेद राहील अथवा नष्ट होईल या प्रश्नाशी मला काहीच कर्तव्य नाही. भारतात किंवा भारताबाहेर मानवजातीने ज्या उदात्त विचारांना जन्म दिला त्या साऱ्यांचा प्रचार अगदी खालच्या वर्गापर्यंत, अगदी गरीब लोकांपर्यंत करणे हेच माझे उद्दिष्ट होय. मग त्यांना जे काय करावयाचे असेल त्याचा विचार तेच करतील. जातीभेद राहावा की नष्ट व्हावा, स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य असावे की नसावे याविषयी डोके शिणविण्याचे मला काहीच कारण नाही. जीवन, विकास व सुखशांती या साऱ्यांना आवश्यक अशी एकच गोष्ट होय आणि ती म्हणजे विचार आणि आचार यांचे स्वातंत्र्य. ते जर नसेल तर मानव म्हणा, मानववंश म्हणा, की राष्ट्र म्हणा, त्यांचे पतन अटळ होय. जातीभेद राहो की न राहो, एखादी विशिष्ट मतप्रणाली प्रचलित असो की नसो, ; जी व्यक्ती, जो वर्ग, जी जात, जे राष्ट्र वा जी संस्था मनुष्याच्या स्वतंत्र आचारविचार शक्तीला वाव देत नाही ती अन्यायी आहे असे समजावे व तिचे अध:पतन झाल्याशिवाय राहणार नाही. अर्थात या स्वतंत्रतेमुळे दुसऱ्याचे अनिष्ट होता कामा नये हे ध्यानात ठेवले पाहिजे.'

मेरी हेल यांना १ नोव्हेंबर १८९६ रोजी लिहिलेल्या पत्रात स्वामीजींनी खूप मुलभूत आणि आधारभूत असा विचार मांडला आहे. हिंदू जीवनमूल्ये समजून घेण्यासाठी आणि आज माणसाच्या जगण्यापुढे उभ्या राहिलेल्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्याची शक्ती त्या विचारात आहे. स्वामीजी म्हणतात- `सुवर्णाचे सुवर्णत्व, रजताचे रजतत्व, मनुष्याचे मनुष्यत्व, स्त्रीचे स्त्रीत्व, प्रत्येक वस्तूचे यथार्थ स्वरूप ब्रम्हच होय. या ब्रम्हाची अनुभूती बाह्य जगतात करून घेण्याचा प्रयत्न आपण अनादि काळापासून करीत आहोत. या प्रयत्नात आपले मन पुरुष, स्त्री, बालक, शरीर, मन, पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे, जगत, प्रेम, द्वेष, मालमत्ता, संपत्ती इत्यादी, तसेच भुते, सैतान, देवदूत, देवदेवता, ईश्वर इत्यादी अद्भुत गोष्टी निर्माण करीत आहे. सत्य असे आहे की, ब्रम्ह आपल्या आतच आहे. आपणच ब्रम्ह आहोत. तो शाश्वत द्रष्टा, तो यथार्थ `अहं' आपणच आहोत. तो कधीही विषय होऊ शकत नाही. त्याला विषयीभूत करण्याचा सगळा प्रयत्न म्हणजे काळ आणि बुद्धी यांचा अपव्यय होय. जेव्हा आत्म्याला याची जाणीव होते तेव्हा तो ब्रम्हाला `विषयीभूत' करण्याचा (समजून घेण्याचा) नाद सोडून देतो आणि अंतर्जगताकडे वळून अंतरात्म्यात अधिष्ठित होण्याचा अधिकाधिक प्रयत्न करतो. यात क्रमश: शरीराकडे कमी लक्ष दिले जाते व मनाकडे जास्त लक्ष दिले जाते. या जगात मनुष्य हा सर्वश्रेष्ठ प्राणी आहे. मनुष्य हा शब्द संस्कृतमधील `मनस'पासून बनला आहे. मनस म्हणजे विचार. मनुष्य म्हणजे मननशील म्हणजेच विचार करणारा प्राणी होय. केवळ इंद्रियांच्या द्वारे विषय ग्रहण करणारा प्राणी नव्हे. यालाच धर्माच्या शास्त्रात त्याग असे म्हणतात. समाजरचना, विवाहसंस्था, अपत्यप्रेम, सत्कृत्ये, सदाचरण, नीतिशास्त्र ही सर्व त्यागाची विविध रूपे होत. आपले सर्व प्रकारचे सामाजिक जीवन म्हणजे इच्छाशक्ती, तृष्णा व वासना यांचा संयम होय. या जगात जेवढे समाज किंवा सामाजिक संस्था आहेत त्या सर्व म्हणजे या जगातील एकाच गोष्टीची निरनिराळी रूपे वा स्तर होत. ती गोष्ट म्हणजे, इच्छाशक्तीचा वा भासमान `अहं'चा त्याग होय. स्वत:तून जणूकाही बाहेर उडी मारण्याची जी इच्छा आहे तिचा त्याग. जो नित्यज्ञाता आहे त्याला ज्ञेय बनविण्याचा जो प्रयत्न चालू असतो त्याचा त्याग. सर्व सामाजिक संस्था म्हणजे याच त्यागाची विभिन्न रूपे होत. या आत्मत्यागाचा, अर्थात इच्छाशक्तीच्या निरोधाचा सर्वात सोपा अथवा सरळ असा मार्ग म्हणजे प्रेम होय; द्वेष हा अगदी त्याविरुद्ध मार्ग होय.'

- श्रीपाद कोठे

१४ ऑगस्ट २०१५

शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२

स्वयंचलित गाड्या

लोकांना परवडतं म्हणून चार पाच गाड्या घेण्याची परवानगी का देता? असा सवाल उच्च न्यायालयाने सरकारला विचारला आहे. मुंबईतील पार्किंगच्या जागेसंबंधात एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा प्रश्न उपस्थित केला आहे. अतिशय महत्वाच्या मुद्याला न्यायालयाने तोंड फोडले आहे पण गांभीर्याने हा मुद्दा रेटला जाईल का हा खरा प्रश्न आहे. गाड्या, स्वतःच्या मालकीच्या गाड्या, स्वतःच्या मालकीच्या मोठाल्या गाड्या; या गोष्टी फक्त प्रतिष्ठेच्या तकलादू कल्पना आहेत. दुसरे काहीही नाही. स्वयंचलित वाहन हा विज्ञानाचा आविष्कार म्हणता येईल आणि जगणे सुखाचे आणि सोयीचे करण्यासाठी त्याचा वापरही केला पाहिजे. त्यात गैर काहीही नाही. पण स्वयंचलित वाहने याचा अर्थ सार्वजनिक वाहतुकीची वाहने, रुग्णवाहिका, मालवाहू वाहने इत्यादीही होतो. स्वयंचलित वाहने याचा अर्थ फक्त वैयक्तिक मालकीची वाहने असा होत नाही. अन सगळ्या अंगांनी विचार करता स्वतःच्या मालकीच्या स्वयंचलित वाहनांचा सोस हा खोट्या प्रतिष्ठेपलीकडे काहीही नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या प्रश्नाच्या अनुषंगाने हा विषय गंभीरपणे रेटला पाहिजे.

व्यक्तिगत स्वयंचलित वाहने हा अर्थव्यवस्थेचा मोठा भाग आणि आधार असल्याचा युक्तिवाद केला जातो आणि करता येईलही. पण त्यात फारसे तथ्य नाही. अगदी प्रामाणिकपणे असा दावा करणाऱ्यांना एक तर काही समजत नाही किंवा ते बदमाश आहेत, असे नाईलाजाने म्हणावे लागेल.

- श्रीपाद कोठे

१३ ऑगस्ट २०२१

खाद्यतेल

दोन दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी खाद्यतेलात स्वयंपूर्ण होण्याचे आवाहन केले. अन आज दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर बातमी पाहिली की, तेलबीयांचे विक्रमी उत्पादन झाले आहे. देशाच्या निरनिराळ्या भागात वेगवेगळ्या तेलबीयांचे उत्पादन होते. त्या त्या भागात बहुतेक तीच तेले वापरली जातात. तेल काढण्याचे तंत्रज्ञान आणि उद्योग फार जुने आहेत आणि सर्वत्र विखुरलेले आहेत. त्यामुळे खाद्यतेलाच्या संदर्भात देश स्वयंपूर्ण होण्याला काहीच हरकत नाही. फक्त त्यासाठी मानसिकता आणि त्यानुसार व्यवस्था, नियम, कायदे इत्यादी हवेत. मोठे तेल उत्पादक, ब्रँडिंग, पॅकेजिंग, नव तंत्रज्ञान; या चक्रातून बाहेर पडण्याची गरज आहे. समाजाला आणि सरकारलाही. त्यासाठी प्रथम देश स्वयंपूर्ण याऐवजी, प्रत्येक जिल्हा खाद्यतेलात स्वयंपूर्ण व्हावा अशी शब्दावली वापरावी. जुन्या तंत्रज्ञानाने तेल उत्पादन केल्याने काहीही बिघडत नाही. पॅकेजिंग नसेल तरी लोक आपापल्या कंटेनरमध्ये तेल घेतील. मोठ्या कंपन्या रडल्या तरी त्याकडे लक्ष देऊ नये. एक कंपनी अजस्र होण्यापेक्षा तेल उत्पादनाच्या हजार स्थानिक कंपन्या झाल्याने काहीही फरक पडणार नाही. स्वयंपूर्णता येईल आणि देशाचे उत्पादन आणि गंगाजळीही वाढेलच. हे छोटे तेल उत्पादक जसजसे सशक्त होतील तसे नवीन तंत्रज्ञान इत्यादीकडे वळतील. विचार करण्याची आणि पाहण्याची दृष्टी मात्र राज्यकर्ते, प्रशासन, नीतीनिर्धारक यांना सुधारून घ्यावी लागेल एवढेच.

- श्रीपाद कोठे
१३ ऑगस्ट २०२१

गुरुवार, ११ ऑगस्ट, २०२२

भाववाढ

कधीकधी बोललं जातं की, `धान्य, भाजीपाला, फळे यांचे भाव वाढले तर कोणी हरकत घेऊ नये. ती भाववाढ योग्यच असते. शेतकऱ्यांच्या पदरात थोडा अधिक पैसा जातो. हे अतिशय योग्य आहे.' अनेक राजकारणी, नेते, तसेच शेतकऱ्यांविषयी खरंखुरं प्रेम असणारे सुद्धा हा युक्तिवाद करतात. (भावाबद्दल घासाघीस करू नये असाही एक युक्तिवाद असतो. त्याविषयी बोलत नाही. एकूण भाववाढीबद्दल म्हणतो आहे.) या लोकांची कळकळ, अभ्यास यांचा आदर करुनही एक लक्षात आणून द्यावेसे वाटते की, हे समर्थन योग्य नाही. या लोकांना अर्थशास्त्र, शेती वगैरेही कदाचित अधिक कळतं, पण असा युक्तिवाद करताना त्यांच्या नजरेपुढे संपूर्ण समाज नसतो. खरे तर आजच्या एकूणच विचार पद्धतीत समग्र विचार, संपूर्ण समाजाचा विचार, सगळ्या अंगांचा विचार ही गोष्टच उरलेली नाही. त्याचाच हा परिणाम आहे. धान्य, भाजीपाला, फळे यांची भाववाढ पेट्रोल किंवा सोने किंवा मोबाईल किंवा गाड्या यासारखी का होऊ नये? याचे साधे कारण असे की; धान्य, भाजीपाला, फळे या सगळ्यांना लागणाऱ्या गोष्टी आहेत. घरोघरी काम करून पोट भरणाऱ्या लोकांनाही या गोष्टी लागतात. समाज म्हटला की त्यात वरपासून खालपर्यंत अनेक आर्थिक स्तर असतात. अन आर्थिक स्तर कोणताही असला तरीही धान्य, भाजीपाला, फळे लागतातच. ती सगळ्यांना परवडली पाहिजेत. मग काय शेतकऱ्यांनी दरिद्रीच राहायचे का? या प्रश्नाला स्पष्ट उत्तर `नाही' असेच आहे. पण त्या प्रश्नाची सोडवणूक आपल्याला वाटते तितकी सोपी नाही. मुळातच धान्य, भाजीपाला, फळे यांचे भाव वाढावे किंवा वाढू नये; यासारखे अनेक प्रश्न आज अर्थकारणात आहेत. त्यासाठी मुळातून अर्थशास्त्र, अर्थकारण, अर्थव्यवस्था, अर्थमूल्ये, आर्थिक सवयी, आर्थिक धोरणे, आर्थिक दृष्टीकोन या सगळ्याचा मुळातून विचार हवा. त्यासाठी `अर्थ' ही स्वतंत्र वस्तू नसून `समग्र जीवनाच्या व्यापक संदर्भात' त्याचा विचार करायला हवा. आजच्या विचारातून अन ध्येय धोरणातून ही समग्रता पूर्ण संपुष्टात आली आहे. ती समग्रता पुन्हा प्रस्थापित होईपर्यंत आंदोलने, नेतेगिरी, गोंधळ, राजकारण, कधी फायदा कधी तोटा, भांडाभांडी हे सगळे करता येईल. पण रोज निर्माण होणारी समस्यांची मालिका मात्र कमी करता येणार नाही.

- श्रीपाद कोठे

१२ ऑगस्ट २०१५

जाती आधारित जनगणना

जाती आधारित जनगणना या विषयाची चर्चा होत असते. पुन्हा सुरू झाली आहे. जी गोष्ट पुसूनच टाकली आहे तिचा आधार कसा घेतला जाऊ शकतो? पण आपण एकूणच इतके भोंगळ आहोत की, असले प्रश्न विचारायचे नसतातच. अन विचारलेच तर उत्तरेही तयार असतातच. कोणत्या जातींची प्रगती झाली, कोणत्या जातींची झाली नाही, कोणत्या नोकऱ्यांमध्ये कोणत्या जातीचे किती लोक आहेत, कोणत्या व्यवसायांमध्ये कोणत्या जातीचे किती लोक आहेत; हे समजून घेण्यासाठी अशी जनगणना हवी; हे छापील उत्तर तोंडावर फेकण्यासाठी तयारच असतं. पुन्हा दोन प्रश्न निर्माण होतात. या देशातील नोकऱ्या, व्यवसाय हे काय लोण्याचे गोळे आहेत आणि जातींचे गट हे काय बोके आहेत? कोणी कोणी काय काय बळकावलं याचे हिशेब का करायचे आहेत? या देशातील सगळी माणसे आपली आहेत आणि त्यांना चांगले जीवन जगता आले पाहिजे. त्यासाठी आवश्यक शैक्षणिक, रोजगाराच्या, वैद्यकीय, निवासाच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात. प्रत्येकाने आपापल्या कष्टाने, मेहनतीने, कौशल्याने चांगले जीवन प्राप्त करावे. प्रत्येकाच्या क्षमता कमी अधिक असल्या तरीही, त्यांना प्राप्त होणाऱ्या चांगल्या जीवनात जास्त तफावत राहणार नाही, अशी व्यवस्था असावी. क्षमतांचा विकास वेगवेगळ्या स्तरावर, वेगवेगळ्या वेळी होत असल्याने; सगळे at par येईपर्यंत काही वेळ लागणारच. मात्र तोवर अन्न, वस्त्र, निवारा, वैद्यकीय सुविधा, शिक्षण हे नाकारले जाऊ नये; या सगळ्याची नुपूर जाऊ नये; हे शासन, प्रशासनाने पाहावे. यासाठी जातींची सांख्यिकी कशाला हवी? कोणाकडे काय आहे वा नाही; किंवा कोणाची काय गरज आहे; कुठे कशाची कमतरता आहे; हे समजून घेण्यासाठी जातींची सांख्यिकी कशाला हवी? मूळ बाब ही आहे की आम्हाला फक्त भांडत आणि वाद घालत बसायचे आहे अन गलिच्छ राजकारणाला याची गरज आहे. दुसरे काहीही कारण नाही. समाजगट आपापल्या मनातील द्वेष टाकून द्यायला तयार नाहीत आणि राजकारणाला हा द्वेष पोसणे सोडायचे नाही. समाजात असे असंख्य लोक असतील, ज्यांना हे तमाशे नको आहेत. पण ते खुलेपणाने आपले मत व्यक्त करणार नाहीत. जातीनिहाय जनगणना नको, ती चुकीची आहे, त्याची गरज नाही; हे स्वच्छपणे सांगणाऱ्या लाखो पोस्ट समाज माध्यमांवर का नसाव्यात? त्यानेही योग्य गोष्टीसाठी दबाव निर्माण होईल. हे अभियान नसावे. कारण अभियान सुरू झाले की गट तयार होतात आणि मूळ विषय बाजूला पडतो. Personal capacity त योग्य मत खूप मोठ्या प्रमाणात व्यक्त व्हायला हवे. पण योग्य अयोग्य याचा विवेक असणारा बहुसंख्य समाज स्वतःला राजकारणापासून स्वतंत्र करू शकेल का? स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष सुरू होत असतानाही समाजाला या स्वातंत्र्याची जाणीव आहे का? की आपले स्वातंत्र्य राजकारणाकडे गहाण ठेवायचे नसते, हा प्राथमिक पाठ ७५ व्या वर्षी पुन्हा शिकावा आणि शिकवावा लागणार आहे?

- श्रीपाद कोठे

गुरुवार, १२ ऑगस्ट २०२१

बुधवार, १० ऑगस्ट, २०२२

Secular??

no, no, no... no `hindu'sthan... call india or bharat...

because it is a secular nation.

what is secular?

1) all paths lead to same god.

2) unity in diversity.

3) all (all- faiths, religions, religious books, gods, languages, cultures, creeds) are equal.

4) coexistence. (all should live peacefully with respect for all.)

o.k. fine.

who else than hindu subscribe these ideals?

does islam or christianity believe in these ideals? (not as a person but as a group.) if there religion stand against these principles, do they have courage to say so and still they be muslims and christians?

the so called liberal and intellectual (foolish) media must have a referendum over this issue. those who don't believe above mentioned principles should then be asked to leave the country. are arnab goswami, deepak chaurasia, brkha datt and the clan ready? or only intellectual prostitution?

- श्रीपाद कोठे

११ ऑगस्ट २०१४

मुस्लिम धर्मगुरूंचा पुढाकार

माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी पदावरून जाताजाता जे विधान केले त्यावर टीका होते आहे. ती अतिशय रास्तही आहे. त्याच वेळी त्याच दिवशी भारतातल्या एक हजार मुस्लिम धर्मगुरूंनी संयुक्त राष्ट्रसंघाला पत्र लिहून हाफिज सैदविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याच पत्रात दहशतवादी गटांचा बंदोबस्त करण्याची मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय ७० हजार मुस्लिम धर्मगुरूंनी ISIS विरुद्ध फतवा जारी केला असून दहशतवादी संघटना `गैर इस्लामिक' असल्याचे म्हटले आहे. इस्लामी धर्मगुरूंच्या या पुढाकाराची दखल घेऊन त्यांचे अभिनंदन करणेही आवश्यक कर्तव्य आहे. संघर्ष असो वा सामाजिक जीवन; सतत बेरीज करीत जायला हवे. देशासाठी, मानवतेसाठी उभे राहणारे सगळेच आपले म्हटले पाहिजेत.

- श्रीपाद कोठे

११ ऑगस्ट २०१७

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०२२

कर किती घ्यावा?

कर किती असावेत यावर चाणक्याने सांगितलेला आदर्श आहे - मधमाशी फुलातून मध गोळा करते तसा.

आज मात्र मिळेल तिथून आणि मिळेल तेवढा खिसा कापावा, असे पाहायला मिळते. नागपूर मनपाने कचरा गोळा करण्यासाठी पैसे आकारणी सुरू केली आहे. याच क्षणी मनपाची वार्षिक मालमत्ता कराची पावती पण माझ्यासमोर आहे. त्यात वेगवेगळ्या गोष्टींसाठीचे कर आहेत. वीज, रस्ते, शिक्षण, स्वच्छता इत्यादी. घराचा कर तर वेगळाच. मग पुन्हा कचरा संकलनासाठी शुल्क आकारणी का? वार्षिक करातून खर्च भगत नाही असा तर्क दिला तरी एक प्रश्न उरतो की, मालमत्ता कराचे काय करतात? तो तर सर्वाधिक आहे. वीज, रस्ते इत्यादींवरील कर घेतात तेव्हा त्या बदल्यात नागरिकांना काही तरी देतात. मालमत्ता कराच्या बदल्यात तर काहीच देत नाहीत. करोडो रुपये काहीही न देण्यासाठी कमवायचे अन तरीही कचरा संकलनासाठी शुल्क आकारायचे? बरे कचरा, सांडपाणी या नागरिकांकडून फुकट मिळणाऱ्या गोष्टींचा वापर करूनही कमाई केली जातेच. मग असे का? आजची एकूणच व्यवस्था अशी आहे की, तिचे पोट कधीच भरत नाही. पण व्यवस्थेला झालेल्या भसम्या रोगाचा भुर्दंड नागरिकांवर कशासाठी? खूप काही चुकते आहे हे नक्की.

- श्रीपाद कोठे

१० ऑगस्ट २०१९

सोमवार, ८ ऑगस्ट, २०२२

अखंड भारत (जोड)

दलाई लामांच्या ताज्या वक्तव्याने एक निराळीच चर्चा सुरु झाली आहे. विषय कितीही चघळला तरीही चघळावासा वाटेल असाच आहे. मुख्य म्हणजे या चर्चा आता निष्कर्ष निघण्याच्या पलीकडे गेलेल्या आहेत. अन निष्कर्ष निघाला तरीही उपयोग काय? खरं हे आहे की, साम्राज्यवादी शक्तींनी भारताची फाळणी त्यांच्या मनात पक्की केली होती. कोणतेही तर्क, कोणतेही डावपेच, कोणतीही धोरणे किंवा कोणतीही माणसे असती तरीही फाळणी अटळ होती. फाळणी केल्याशिवाय ब्रिटिशांनी भारत सोडलाच नसता. त्यामुळे या चर्चांचं एक बौद्धिक खाद्य याहून अधिक महत्व नाही. ७१ वर्षांनी आता `फाळणी का व कशी झाली' हा चर्चेचा विषय न राहता; पुन्हा एकत्र होण्याची गरज, शक्यता, पद्धती; हा चर्चेचा विषय हवा असे वाटते. पंडित दीनदयाळ उपाध्याय म्हणत असत - `एकात्मतेच्या अनुभूतीच्या अभावाने देशाची फाळणी झाली. त्यामुळे एकात्मतेच्या अनुभूतीनेच देश पुन्हा अखंड होईल. त्याचे पहिले पाउल म्हणजे, देशांतर्गत एकात्मतेची अनुभूती. संस्थानांच्या विलीनीकरणाच्या वेळी लोकांमध्ये संघर्ष झाले नाहीत. सरदार पटेल यांचे प्रशासकीय कौशल्य होतेच, पण सगळी संस्थाने एक झालीत याचे कारण येथील समाजात असलेली ऐक्यजाणीव. स्वातंत्र्यानंतर काहीच वर्षात आमची धोरणे, सिद्धांत, तत्वज्ञान यांनी अशी स्थिती आली की, भाषावार प्रांतरचनेच्या वेळी लोक हिंसेवर उतरले. त्यानंतर स्थिती अधिकच चिघळली आहे. देशांतर्गत समाजाची ऐक्यअनुभूती हाच आजचा चर्चेचा मुख्य मुद्दा असायला हवा. बाकी गोष्टी आपोआप घडून येतील.

- श्रीपाद कोठे

९ ऑगस्ट २०१८

'होय, मी तुमचा तिरस्कार करतो...'

 फेसबुक स्मृतीतून repost.

(संदर्भ तात्कालिक आहेत, विषय सार्वकालिक.)

फेसबुकच्या कृपेने आजच्या लोकसत्तातील एक लेख डोळ्यांवर आदळला. शीर्षक आहे- `मी पोर्न पाहते, तुम्ही?' शीर्षक वाचताच त्यावर लिहिण्याचे ठरले. पण लिहायचे म्हणजे मूळ लेख पूर्ण वाचायला हवा. म्हणून तो लेख वाचला. संहिता जोशी आणि राजेश घासकडबी या दोघांनी तो लेख लिहिलेला आहे. लेख पूर्ण वाचून होताच दोनच प्रतिक्रिया मनात उमटल्या- एक म्हणजे अत्यंत टुकार लेख, अन दुसरी म्हणजे लोकसत्ताच्या लोकांना शीर्षकेसुद्धा धड देता येत नाहीत. शीर्षक वाचून जगातील कोणाचाही हा समज होईल की, लेख लिहिणारे दोघेही पोर्न पाहतात. संपूर्ण लेखात असे कुठेही म्हटलेले नाही आणि लेखाचे कितीही विश्लेषण केले तरीही, दोघे लेखक पोर्न पाहतात असा अर्थही काढता येत नाही. हे शीर्षक देणाऱ्याचा, खरे तर पत्रकारितेची सगळी पारितोषिके देऊन सत्कारच केला पाहिजे. असो. पण मी मात्र लेखकद्वय पोर्न पाहतात असा अर्थ घेऊनच माझी मीमांसा करणार आहे.

सर्वप्रथम मी हे जाहीर करतो की, मी या दोन्ही लेखकांचा तिरस्कार करतो. अन हे छापणाऱ्या अन असंबद्ध छापणाऱ्या दैनिकाचाही तिरस्कार करतो. एक गोष्ट सुरुवातीलाच स्पष्ट करतो- जर पोर्न पाहण्याचा आणि आपल्या त्या कृतीला एखाद्या पुरुषार्थाप्रमाणे जाहीर करण्याचा जर कोणाला अधिकार आहे, तर मलाही कोणाचा तिरस्कार करण्याचा अन ते जाहीर करण्याचा पूर्ण अधिकार आहे. तेव्हा यावर लेखकांनी, छापणाऱ्या वृत्तपत्रानी किंवा वाचकांपैकी कोणी खळखळ करण्याची गरज नाही.

लेखाचा जो इंट्रो आहे त्याची सुरुवातच आहे- `कामशास्त्राच्या देशात...' त्यामुळे प्रथम तोच मुद्दा घेऊया. अनेकदा हा उल्लेख ऐकायला मिळतो. अर्थात तो खराच आहे. रिचर्ड बर्टन नावाचा एक जगप्रसिद्ध सामाजिक विचारवंत, भटक्या असं म्हणतो की, १८७६ साली त्याने भारतीय कामशास्त्राचं भाषांतर करेपर्यंत पाश्चात्यांना या गोष्टीची `शास्त्र व कला' म्हणून जाण नव्हती. यात कोणाचेही दुमत नाही. खजुराहोच्या मंदिरांवरील कामशिल्पाचाही वारंवार उल्लेख होत असतो. पण बुद्धिवादी, आधुनिक म्हणवणाऱ्या कथित विचारकांची आणि त्यांची री ओढणाऱ्या मुर्खांची याही बाबतीत कीवच करावीशी वाटते. `काम' या गोष्टीचा भारताने सर्वप्रथम विचार केला एवढेच ते सांगतात अन तेवढेच त्यांना माहीतही असते; पण याचा सर्वप्रथम विचार करण्यासोबतच त्याचा सर्वांगांनी आणि सखोल विचारही भारताने केला आहे हे त्यांना ठावूकही नसते अन ते त्यात पडतही नाहीत. ज्यांच्या नावे `कामशास्त्र' प्रसिद्ध आहे ते वात्स्यायन हे ऋषी होते. अन त्यांनी या गोष्टीचा मानवी जीवन आणि समाज या अंगांनीही विचार केला आहे. एवढेच कशाला, अन्यही अनेकांनी याचा विचार केला आहे. हजारो वर्षांपासून एक सशक्त आणि उन्नत मानवी समाज उभा करणाऱ्या, टिकवून धरणाऱ्या अन प्रगतीपथावर नेणाऱ्या समाजाने, धर्माने या मुलभूत गोष्टीचा विचार केला नसेल असे होणेच शक्य नाही. अगदी भगवदगीतेतसुद्धा त्रोटक का होईना, पण याचा उल्लेख आहेच. स्वत: भगवान श्रीकृष्णाच्या तोंडी श्लोक आहे- `धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मि भरतर्षभ'. धर्माला अविरोधी (म्हणजे धर्माला विरोध न करणारा) काम मीच (परमेश्वर) आहे. परंतु कामशास्त्राचा विचार याचा अर्थ अंदाधुंद लैंगिकतेला मुक्त वाव असा होत नाही. विचारी वगैरे म्हणवणाऱ्यांना एवढी साधी बाब समजू नये? अन भारतीय ऋषींनी, समाज चिंतकांनी, तत्वज्ञांनी हा जो विचार केला तो, आजचे टिनपाट विद्वान म्हणतात म्हणून केला नाही. तर शुद्ध सत्याची चिकित्सा आणि त्याला असलेली संपूर्ण चराचराच्या कल्याणाची कळकळ यापोटी केला. ते जेवढे सत्यान्वेषी होते तेवढेच, स्वार्थरहित, क्षुद्रत्वरहित आणि उत्तमतेचे- उदात्ततेचे- उन्नततेचे पुजारीही होते. आपल्या वासना कशाही रीतीने पूर्ण करण्याची पाशवी धडपड हा त्यांच्या अभ्यासाचा, विश्लेषणाचा गाभा नव्हता. म्हणूनच त्यांनी याचा सखोल आणि सर्वांगानी विचार केला.

काय विचार केला त्यांनी? त्यांनी जेव्हा या संबंधात अभ्यास सुरु केला तेव्हा त्यांना लक्षात आले की, ही जीवनाची मुलभूत प्रेरणा आहे. स्थूल शारीर स्तरावर स्त्री व पुरुष यांना परस्पर शरीरांची ओढ आणि दोन शरीरांचे मिलन हे त्याचे स्वरूप. पण ओढीची हीच भावना जेवढी मानसिक, भावनिक, बौद्धिक आणि त्याही वरच्या जाणिवांच्या स्तरावर पोहोचते तेव्हा ती विरळ होत जाते आणि त्यातील शारीर विचार कमी कमी होत जातो. सरतेशेवटी त्यातील दोन अस्तित्वांची जाणीवही लोप पावून कुठल्यातरी अनाम, अगम्य अशा एका भावनेत ती विलीन होऊन जाते. म्हणूनच आध्यात्मात सुद्धा याचा उल्लेख सापडतो. आध्यात्म चर्चा जेव्हा ज्ञानपातळीवर असते तेव्हा यालाच प्रकृती आणि पुरुष म्हणतात; आणि आध्यात्म चर्चा जेव्हा भक्ती पातळीवर असते तेव्हा याला मधुरा भक्ती म्हणतात. लौकिक, पार्थिव भावनांचा आधार घेऊन अलौकिक आध्यात्म समजावून सांगण्याचा हा प्रयत्न आहे.

मात्र, असे असले तरीही आमचे विचारक भोंगळ, बुद्दू नव्हते. प्रत्येक व्यक्ती आध्यात्मिक वगैरे नसते याचे त्यांना भान होते. म्हणूनच `काम' या विषयाचा लौकिक विचारही त्यांनी केला. त्यांना लक्षात आले की, सगळ्या मानवांच्या ठायी ही भावना असते. मग दुसरा मुद्दा पुढे येतो की, त्याची पूर्तता व्हायला हवी. ही कशी होईल? यालाच पूरक प्रश्न म्हणजे समाज म्हणून या भावनेचे व्यवस्थापन कसे करता येईल? कोणत्याही गोष्टीप्रमाणेच काम भावनेचा प्रश्नही ज्याचा त्याच्यावर सोडला तर शक्यता ही आहे की काही जणांना त्यापासून विविध कारणांनी वंचितच राहावे लागेल. असे झाल्यास त्याचे व्यक्तीजीवनावर आणि समाजजीवनावर काय परिणाम होतील? या सगळ्या विचारमंथनातून विवाहसंस्था उत्पन्न झाली. यालाच गर्भसंभव आणि वंशसातत्य या अन्य दोन महत्वाच्या बाबींची जोड देण्यात आली. त्यातून कुटुंबसंस्था आकारास आली. मानवी भावभावना, गरजा, प्रेरणा यांचे उत्तम व्यवस्थापन याचा अर्थ `गृहस्थ जीवन'. (गृहस्थ जीवन म्हणजे कामभावना, गर्भसंभव, वंशसातत्य, परस्परावलंबन, जीवनाचा आधार... या सगळ्याचं उत्तम व्यवस्थापन आहे.) पण यातही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे त्याच्याही अनेक अंगांचा अन पर्यायांचा विचार सुद्धा भारतीय विवाहशास्त्रात करण्यात आला. परंतु `काम' भावनेला मुक्त वाव मात्र देण्यात आला नाही.

इतका सगळा विचार करणाऱ्या भारतीय चिंतकांनी असे का केले? याची तीन कारणे असू शकतील. एक म्हणजे, `काम' भावनेची पूर्तता जवळपास अशक्य आहे. ती मानवी मनात वारंवार उद्भवते. `ययाती'चे आख्यान (ज्यावर वि.स. खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता.) याचे प्रतीकात्मक उदाहरण आहे. दुसरीकडे मानवी इंद्रियांच्या उपभोगाला मर्यादा आहे. तिसरे म्हणजे, यासाठी मर्यादित वेळ आणि उर्जा खर्च करून मानवी जीवनातील अन्य उत्तम, उदात्त, उन्नत बाबींची साधना करणे. म्हणूनच भारतीय चिंतकांनी `काम' मुलभूत आणि आवश्यक मानूनही त्याची जागा आणि मर्यादा निश्चित केली. खजुराहोच्या कामशिल्पांचे उदाहरण देणारे लोक सोयीस्करपणे हे विसरतात की, ते मंदिराच्या बाहेरच्या भिंतींवर आहेत. आत नाहीत. `काम' ही मानवी अस्तित्वाची बाह्य बाजू आहे, ते बाहेरील आवरण आहे. तिथपर्यंतच त्याचे महत्व आणि तिथवरच त्याला प्रवेश. यापुढील वाटचाल करायची असेल तर ती भावना तेथेच उतरवून ठेवावी लागेल. हाच त्याचा आशय आणि संदेश आहे. आज पोर्नचे आणि लैंगिकतेचे समर्थन करणारे अट्टाहासाने `काम' गाभाऱ्यात नेण्याचा आग्रह धरतात. भगवान बुद्धांना एकदा एकाने विचारले- विष म्हणजे काय? त्यावर भगवान म्हणाले- कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर म्हणजे विष. वाद असेल तर फक्त एवढा आहे. भारताने/ हिंदू परंपरेने कधीच काहीही नाकारले नाही. त्यांनी फक्त जीवनाच्या व्यापक संदर्भात त्याचे प्रमाण आणि पद्धती निश्चित केल्या. आज `आधुनिकता' या नावाने जर काही सुरु असेल तर ते फक्त, हे प्रमाण आणि पद्धती मोडीत काढण्याचे प्रयत्न.

भारतीय मनिषींनी `काम' मर्यादित करून त्याचे प्रमाण जसे कमी केले तशीच त्याची पद्धतीही विकसित केली. एक स्त्री आणि एक पुरुष यांच्यातील निकोप कामजीवन आणि पोर्न वा मुक्त लैंगिकता यात; रांगोळ्या, आरास, सनई, उदबत्त्या यांच्यासहित पंगतीत आदराने- प्रेमाने- स्नेहाने केले जाणारे भोजन आणि भिकाऱ्याचे मांडवाबाहेरील भोजन असा फरक आहे. प्रेमादरातून कामभावनेचे शमन आणि वासनेची वखवख हा त्यातील फरक आहे. २ फेब्रुवारी १८३५ रोजी लॉर्ड मेकॉलेने ब्रिटीश संसदेत सांगितले होते, `मी संपूर्ण भारत उभाआडवा पालथा घातला. पण मला भिकारी आढळला नाही.' ब्रिटीशांचे आर्थिक धोरण पुढे चालवून आम्ही आज भारतात भिकाऱ्यांची फौज जन्माला घातली आहे. आता ब्रिटिशांनीच आंदण दिलेले विचार आणि आचार पुढे चालवून आम्ही नवीन प्रकारचे भिकारी जन्माला घालतो आहोत.

आणखीन एक गोष्ट ओघात सांगितली पाहिजे. अशा विषयांची प्रचलितपेक्षा दुसरी बाजू मांडली जाते तेव्हा `संस्कृतीरक्षक' हा शब्द शिवीसारखा वापरला जातो. अर्थात त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. अन तो शब्द शिवीऐवजी भूषण म्हणूनच मिरवायला हवा. पण `संस्कृतीरक्षक' असे एखाद्याबद्दल म्हटले की, त्याचा अर्थ तो माणूस वा वर्ग विचार बिचार करीत नाहीत असा लावला जातो. त्यांच्यासाठी ही माहिती देतो. आपल्या देशात आणीबाणी लागली होती. त्यावेळी संघाचे असंख्य नेते, कार्यकर्ते कारागृहात होते. सुरुवातीच्या काही महिन्यांनंतर संघाच्या स्वयंसेवकांनी कारागृहातच काही कार्यक्रम, उपक्रम सुरु केले. (बाकीच्यांना हे सुचणे शक्यच नव्हते.) तसाच एक कार्यक्रम नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात होत असे. व्याख्यानांचा. कारागृहात असलेल्या अभ्यासू लोकांची व्याख्याने. नागपूरचे प्रसिद्ध विचारवंत आणि संघाचे अनेक वर्षे अखिल भारतीय पदाधिकारी राहिलेले, श्री. मा.गो. उपाख्य बाबुराव वैद्य त्यावेळी नागपूर कारागृहात होते. बाबुरावजी जसे संघाचे कार्यकर्ते आणि भाष्यकार तसेच संस्कृतचे प्रकांड पंडित, भारतीय शास्त्रांचे अभ्यासक आणि भाष्यकार. त्यांचीही पुष्कळ भाषणे त्या उपक्रमात झाली. त्या भाषणांचे नंतर `हिंदुत्व- जुने संदर्भ, नवे अनुबंध' या शीर्षकाने एक पुस्तकही निघाले. त्यातील एका भाषणात त्यांनी `हिंदू जीवन पद्धतीतील कामभावनेचे स्थान आणि त्याचे व्यवस्थापन' हाच विषय श्रोत्यांपुढे मांडला होता. अनेक भ्रम बाळगून आपण चालत असतो. ते दूर करण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून हे उदाहरण दिले.

अत्यंत उथळ पद्धतीने समाजात गोंधळ निर्माण करण्याचे उद्योग आज सुरु आहेत. लोकसत्तातील आजचा संबंधित लेख त्याचेच उदाहरण आहे. म्हणूनच दोन्ही लेखक अन लोकसत्ता यांचा मी तिरस्कार करतो.

- श्रीपाद कोठे

नागपूर

रविवार, ९ ऑगस्ट २०१५

रविवार, ७ ऑगस्ट, २०२२

आनंद आहे

२७ फेब्रुवारीला `अर्थप्रभावाची गुन्हेगारी' या शीर्षकाचा एक लेख मी लिहिला. त्यावेळी काही जणांनी त्याची हेटाळणी केली. एक-दोघांनी तर अशी काही गुन्हेगारी नसते, हा तुझा कल्पनाविलास (वेडपट हे विशेषण इच्छा असून त्यांनी वापरले नाही.) आहे असेही सुनावले. परंतु कालच भारतीय रिझर्व्ह बँकेने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आदेश दिलेत की, willful defaulters वर फौजदारी कारवाई करा. काय आहे हा प्रकार? सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे NPA (non performing assets) (थोडक्यात थकीत येणी) २ लाख ७० हजार कोटी रुपयांचे आहे. त्यातील ७० हजार कोटी रुपये म्हणजे जवळपास ३० टक्के रक्कम देशातील केवळ ४०० willful defaulters ची आहे. सरासरी काढल्यास या ४०० लोकांकडे प्रत्येकी १७५ कोटी रुपये थकीत आहेत. ज्या व्यक्तीकडे १७५ कोटीची थकबाकी आहे ती व्यक्ती नक्कीच लहानसहान आसामी नसणार. इतकी मोठी थकबाकी होईपर्यंत बँका झोपा काढतात काय? पण या आसामी बड्या असतात त्यामुळे सगळे चालते. म्हणजे अगदी कर्जफेडीसाठी विनंती करायची असेल तरी अशा व्यक्ती बँकेत जात सुद्धा नाहीत. त्यांचे मुनीमच सारे काही करीत असतात. त्या मुनिमांच्या दिमतीलाही गाड्या, माणसे असतात. बँकेचे अधिकारी या मुनिमांना सलाम करतात. ही सगळी व्यवस्थाच विचित्र, विक्षिप्त आणि सडकी आहे. पण पाणी डोक्यावरून गेले तेव्हा रिझर्व्ह बँकेला सुद्धा या प्रकाराला गुन्हेगारी ठरवून फौजदारी कारवाई करण्याचे आदेश बँकांना द्यावे लागले. आपली गंमत हीच आहे. व्यक्ती म्हणून किंवा समाज म्हणून किंवा व्यवस्था म्हणून अगदी सारं काही विस्कळीत होईपर्यंत आपण कशाचाही स्पष्ट, रोखठोक विचार करत नाही. कोणी करत असेल तर त्याला मुर्खात काढतो आणि मग हात चोळत बसतो किंवा रडत बसतो किंवा इंग्रजीत ज्याला beating the bush म्हणतात तसं काहीतरी करीत बसतो. काही हरकत नाही- रिझर्व्ह बँकेला माझे म्हणणे पटले याचा आनंद आहे आणि उशिरा का होईना अशा गुन्हेगारीला काही तरी पायबंद बसेल ही आशा कायम राहिली, त्याचाही आनंद आहे.

- श्रीपाद कोठे

८ ऑगस्ट २०१४

मदरशातील शिक्षण

मदरशांमधून अतिरेकी, आतंकवादी कारवायांच्या विरोधात शिक्षण देण्यात येणार आहे. पवित्र कुराणाचे जे चुकीचे अर्थ लावले जातात त्यांना आळा घालून, त्यांचे योग्य अर्थ शिकवण्यात येणार आहेत; अशी एक बातमी पाहण्यात आली. या प्रयत्नांचे स्वागतच करायला हवे. त्याला प्रोत्साहन देखील द्यायला हवे. सुरुवातीलाच त्यावर शंका घेण्याचेही कारण नाही. पण तेवढेच पुरेसे आहे का, या मुद्याचीही या निमित्ताने चर्चा व्हायला हवी. ईश्वराची सगळी रूपे आणि त्याला प्रसन्न करून घेण्यासाठी अथवा त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठीचे सगळेच मार्ग सत्य आहेत. ज्याने त्याने आपापल्या रुची प्रकृतीनुसार त्यांचा अवलंब करावा वा करू नये; हे तत्व सगळ्यांनी मनापासून मान्य करणे ही मूळ गोष्ट आहे. तसे झाले नाही तर अतिरेक वा दहशतवाद पुन्हा पुन्हा डोके वर काढेल. हिंदूंमध्येही असे लोक आहेत किंवा भविष्यात जन्म घेऊ शकतात, हे वादासाठी क्षणभर मान्य केले तरीही, हिंदू शास्त्रे, हिंदू चिंतन याला तत्व म्हणून मान्यता देत नाहीत; याकडे कोणालाही दुर्लक्ष करता येणार नाही. अशा गोष्टींना हिंदूंच्या धर्मात मुळातच आधार नसल्याने तशी शक्यता कमी होते. इस्लामने देखील (चुकीचा वा बरोबर) हा आधार काढून घेण्याच्या दिशेने प्रयत्न करायला हवेत. मदरशांच्या संदर्भात घेण्यात आलेल्या नवीन निर्णयाने तेथपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न केल्यास चांगले होईल.

- श्रीपाद कोठे

८ ऑगस्ट २०१५

शनिवार, ६ ऑगस्ट, २०२२

साधी अपेक्षा

संसदेत आज एका खासदाराने बोलताना आवाहन केलं, `मै अपने बहनो से भी कहना चाहुंगा की वो भी ढंग के कपडे पहने.' त्यावरून महिला खासदार संतापल्या आणि त्यांनी त्या खासदार महोदयांना धारेवर धरले. त्यानंतर त्या खासदार महाशयांनी माफी मागितली आणि प्रकरण संपले.

ही बातमी पाहिली त्याच क्षणी मी ठरवले की आपण तमाम महिला वर्गाच्या पाठीशी उभे राहायचे आणि त्यांचा रोष ओढवून न घेता त्यांच्या कौतुकास पात्र व्हायचे. त्यामुळे मीही तमाम महिला वर्गाला आवाहन करतो की, `त्यांनी मुळीच चांगले आणि सभ्य समजले जाणारे कपडे घालू नये. त्यांना हवे तसे अंग प्रत्यंगांचे प्रदर्शन करण्याची स्पर्धा लावल्यासारखेच कपडे घालावेत. खरे तर कपडे घालणे हाच मानवी सभ्यतेने केलेला महिलांवरील अन्याय आहे असे वाटत असेल तर त्यांनी त्यावर पुनर्विचार करायलाही हरकत नाही.'

माझे हे आवाहन तमाम महिला खासदार, सगळ्या महिला आयोगांना वगैरे पाठवून द्यावे असा विचार करतो आहे. आणि त्यांच्याकडून कौतुकाची थाप अन गेला बाजार `समस्त महिला हितकर्ता' वगैरे बिरूद असलेले प्रमाणपत्र मिळावे अशी किमान अपेक्षा करतो. मानवी इतिहासात मोलाची भर घालणाऱ्या माझ्या या कार्याची आपणही जाणीव ठेवाल ही अपेक्षा.

- श्रीपाद कोठे

७ ऑगस्ट २०१४


मानवी जीवनात सुविचारांचे, आदर्शांचे एक स्थान असते आणि दुसरीकडे व्यवहार असतो. लाखो वर्षांपासून हा झगडा सुरु आहे आणि माणूस हळूहळू आदर्शाकडे वाटचाल करतो आहे. कोणत्या तरी पुस्तकात, पोथीत, भाषणात, प्रवचनात, राज्यघटनेत एखादी गोष्ट लिहिली की ती प्रत्यक्षात येते असे नाही. मुळात हे विश्व, त्यातील माणूस, माणसातील स्त्री आणि पुरुष, त्यांचे गुण-दोष, जीवनाचा अर्थ अशा अनेक व्यापक परीघांचा विचार महत्वाचा असतो. म्हणूनच आपल्या परंपरेने जेव्हा काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या अवगुणांची चर्चा केली तेव्हा ते पुरुषांचे किंवा स्त्रियांचे म्हणून केली नाही. खर तर अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे चांगले किंवा वाईट, गुण किंवा दोष यांची चर्चा स्वतंत्रपणे, समग्र मानवी जीवनाच्या संदर्भात व्हायला आणि करायला हवी. आज ती तशी होत नाही हे दुर्दैव आहे. पुरुषांनी काही म्हटलं की बायकांनी तलवारी काढायच्या आणि बायकांनी काही म्हटलं की पुरुषांनी तलवारी काढायच्या. (याखाली याच पोस्ट संबंधाने अन्यत्र झालेल्या चर्चेतील माझ्या प्रतिक्रिया देत आहे. त्यावरून विषय स्पष्ट होईल अशी आशा करतो.)


बलात्कार आणि पोषाख यांचा संबंध नाहीच. हे दोन्ही वेगळे विषय आहेत. म्हणूनच तो संबंध जोडणारे पुरुष जेवढे उथळ वा अविचारी तेवढ्याच पोषाख हे बलात्काराचे कारण नसल्याने आम्ही असंस्कृत पोषाख करायला स्वतंत्र आहोत असे म्हणणाऱ्या महिला किंवा पोशाखावर बोललं की लगेच ती चर्चा सुसंस्कृत सामाजिक जीवनाकडे नेण्याऐवजी बलात्काराकडे नेणे हे उथळपणा आणि अविचाराचे म्हणावे लागेल. एक मुद्दा सरळ संबंधित नसला तरीही विचारार्थ मांडतो. कारण म्हातारी मेल्याचं दु:ख नसलं तरीही काळ सोकावतो. मुद्दा हा की, आज महिलांच्या संबंधात बोललं की आगपाखड सुरु होते. are women above scrutiny? गुणांप्रमाणेच दोष आणि विकृतीही लिंगनिरपेक्ष असते. त्याचा तसाच विचार हवा. आज अभद्र पोषाख करणाऱ्या महिला, मुली तो तसा का करतात? त्यामागची भावना, वृत्ती अयोग्य आहे की नाही? खरे तर सभ्यता, समाज, सहअस्तित्व याविषयी आस्था असणाऱ्या महिलांनी स्वत:च याची सामाजिक चर्चा घडवायला आणि करायला हवी.


तुम्हाला काय माहीत मी मुग गिळून बसलो की नाही ते? का हो स्वत:ची अक्कल पाजळण्याची आणि उतरवून घेण्याची घाई झाली आहे तुम्हाला?


संस्कृती स्त्रियांच्या कपड्यांवर अवलंबून नाही. अगदी बरोबर पण म्हणून असलेले संस्कार, सीमा, आदर्श सोडून द्यावे असे नाही ना? असलेले टिकवून जे अनिर्बंध वागतात त्यांनी मर्यादा पाळाव्या यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्याउलट असलेला चांगुलपणा सोडण्याची वृत्ती कितपत योग्य? काय चांगले काय वाईट याचा विचार निरपेक्षपणे करायला हवा. दुसरा चांगला वागत नाही म्हणून आम्हीही चांगले वागणार नाही हा तर्क योग्य राहील का? आज ज्या पद्धतीची वेषभूषा केली जाते त्यामागील तर्क काय? त्यामागचा विचार काय? कशासाठी केली जाते अशी वेषभूषा? आणि एखादी गोष्ट म्हटली की ती आपल्यालाच लागू होते असे जर समस्त स्त्री वर्ग समजत असेल तर कठीण आहे. आजही मर्यादाशील तरीही कर्तृत्ववान महिला आहेतच ना? ज्या ताळतंत्र सोडून वागतात त्यांचाच प्रश्न आहे. खरे तर ज्यांना समाज, चांगुलपणा, सहजीवन वगैरेबद्दल आस्था आहे त्या महिलांनीही अनिष्ट गोष्टींच्या विरोधात `आम्ही महिला' असा हेका न ठेवता उभे राहिले पाहिजे.


समाजातील सगळ्या पुरुषांना संपवून केवळ स्त्रियांचा समाज उभा करा आणि मग केवळ आम्ही ठरवू म्हणा. जोवर समाज म्हणजे स्त्री व पुरुष आहे तोवर आम्हीच ठरवू हे म्हणणे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. यानंतर मी तुमच्या मूर्ख कमेंटना उत्तरे देणार नाही कारण सार्थक चर्चा करण्याची तुमची तयारी व हेतू दोन्ही नाही आणि मला निरर्थकात स्वारस्य नाही. तुम्ही मला ओळखत नाही. पण नम्रपणे पण स्वाभिमानाने एकच नमूद करतो की माझ्या जवळ उभे राहण्याची सुद्धा तुमची लायकी नाही. आपण एखाद्याला वाट्टेल तसे बोललो की महान होतो असे तुम्हाला वाटत असेल तर तुमचे तुम्हाला लखलाभ असो.

Sects of islam

 there are 73 sects of islam.


73 Sects of Islam

::::::::::::: Name of the Sects in Islam and their Basic Beliefs :::::::::::: 


1. Jarudiah:

Followers of Abu'l-Jarud. They believe Holy Prophet (pbuh) designated Al-Isa as the Imam by his characteristics but not by name.


2. Sulamania:

Followers of Sulaiman ibn-Jarir al-Zaidi. They believed Imamat was a matter of Jaririya conference and could be confirmed by two best Muslims.


3. Butriyah: 

They did not dispute the Khilafat of Uthman (ra), neither they attack him nor Hurariyah praise him.


4. Yaqubiyya: 

They accepted the Khilafat of Abu Bakr (ra) and Umar (ra), but did not reject those who rejected these Khulifaa. They also believed that Muslim commiters of Major sins will be in hell forever.


5. Hanafiyah:

Followers of the Imammate of Muhammad ibn-al-Hanifah. They believe that Allah might have had a beginning.


6. Karibiyah:

They believed that Imam Muhammad ibn-al-Hanifah is not dead and is the Imam Ghaib (in disappearance) and the expected Mahdi.


7. Kamiliyah: 

Followers of Abu-Kamil. They believed companions to be heretic because they forsook their allegiance to Ali (ra) and condemn Ali (ra) for ceasing to fight them. They believed in the returning of the dead before the Day of Resurrection and that Satan is right in preferring fire to clay. 


8. Muhammadiyyah: 

Followers of Muhammad ibn-Abdullah ibn-al-Hassan. They do not believe/Mughairiyah that Imam Muhammad ibn-Abdullah died and that he is the Imam Ghaib and awaited Mahdi.


9. Baqiriyah:

Followers of Muhammad ibn-Ali al-Baqir. They believe him to be the Imam Ghaib and expected Mahdi.


10. Nadisiyah:

They believe that those who consider themselves better than anyone else are Kafirs (disbelievers).


11. Sha'iyah: 

They believe that the one who has recited La Ilaha Il-Allah (there is none worthy of worship except Allah), whatever she or he does, will never be punished.


12. Ammaliyah: 

They believe that faith for one is what he/she sincerely practices.


13. Ismailiyah:

They believe in the continuity of Imammate among the descendants of Ismail ibn-Ja'far.


14. Musawiyah:

They believe Musa ibn-Ja'far to be the Imam Ghaib and expected Mahdi / Mamturah.


15. Mubarakiyah: 

They believe in the continuity of Imammate among the descendants of Muhammad ibn-Ismail ibn-Ja'far.


16. Kathiyah: 

They believe that expected Mehdi will be twelveth Imam among the /Ithn Áshariya descendants of the Áli ibn-abi-Talib. (The Twelvers). 


17. Hashamiya: 

They Predicate a body to Allah and also allege Prophet (pbuh) of disobedience/ Taraqibiyah to Allah 


18. Zarariyah:

They believe that Allah did not live nor had any attributes till He created for Himself life and His attributes.


19. Younasiyah: 

Followers of Younas ibn-Ábd-al-Rahman al-Kummi. They believe that Allah is borne by the bearers of His Throne, though He is stronger than they are.


20. Shaitaniyah/Shireekiyah:

They believed in the view that deeds of servants of Allah are substances; and a servant of Allah can really produce a substance.


21. Azraqaih: 

Followers of Nafi ibn-al-Azraq. They do not believe in the good dreams and visions and claim that all forms of revelations have ended.


22. Najadat: 

Followers of Najdah ibn-Ámir al-Hanafi. They abolished the punishment of drinking wine also they believed that sinners of this sect would not be treated in hellfire but some other place before allowed in Paradise.


23. Sufriyah: 

Followers of Ziyad ibn-al-Asfar. They believed that sinners are in fact polytheists.


24. Ajaridah: 

Followers of Abd-al-Karim ibn-Ajrad. They believed that a child should be called to Islam after it has attained maturity. Also they believed booty of war to be unlawful till the owner is killed. 


25. Khazimiyah: 

They believe Allah loves men of all faiths even if one has been a disbeliever most of his life.


26. Shuaibiyah/Hujjatiyah: 

They believed that what Allah desires does happen no matter what and what does not happen it means Allah desires it not.


27. Khalafiyah:

Followers of Khalaf. They do not believe in fighting except under the leadership of an Imam.


28. Ma'lumiyah/Majhuliah: 

They believed that whoever did not recognise Allah by His names was ignorant of Him and anyone ignorant of Him was a disbeliever.


29. Saltiyah: 

Followers of Salt ibn-Usman. They believed in the conversion of adults only and if father has converted to Islam children were considered disbelievers till they reach maturity.


30. Hamziyah: 

Followers of Hamza ibn-Akrak. They believe that children of polytheists are condemned to hell.


31. Tha'libiyah:

Followers of Tha'labah ibn-Mashkan. They believe that parents remain guardians over their children of any age until children make it clear to parents that they are turning away from truth.


32. Ma'badiyah:

They did not believe in taking or giving alms from or to slaves.


33. Akhnasiyah:

They do not believe in waging a war except in defence or when the opponent is known personally.


34. Shaibaniyah/Mashbiyah: 

Followers of Shaiban ibn-Salamah al-Khariji. They believe that Allah resembles His creatures.


35. Rashidiyah: 

They believe that land watered by springs, canals or flowing rivers should pay half the Zakat (tithe), while land watered by rain only should pay he full Zakat.


36. Mukarramiyah/tehmiyah: 

Followers of abu-Mukarram. They believe that ignorance constitutes as disbelief. Also that Allah enmity or friendship depends upon the state of a persons' belief at his death.


37. Abadiyah/Afáliyah:

They consider Abdullah ibn-Ibad as their Imam. They believe in doing good deeds without the intention of pleasing Allah.


38. Hafsiyah: 

Consider Hafs ibn-abi-l-mikdam as their Imam. They believe that only knowing Allah frees one from polytheism.


39. Harithiya: 

Followers of Harith ibn-Mazid al-Ibadi. They believe that the ability precedes the deeds.


40. Ashab Ta'áh: 

They believe that Allah can send a prophet without giving him any sign to prove his prophecy.


41. Shabibiyah/Salihiyah: 

Followers of Shabib ibn-Yazid al-Shaibani. They believe in the Imamate of a woman named Ghazalah.


42. Wasiliyah: 

Followers of Wasil ibn-'Ata al-Ghazza. They believe that does who commit major sins will be punished in hell but still remain believers.


43. Ámriyah:

Followers of Amir ibn-Ubaid ibn-Bab. They reject the legal testimony of people from supporters of either side of the battle of Camel.


44. Hudhailiyah/Faniya: 

Followers of abu-al-Hudhail Muhammad ibn-al-Hudhail. They believe that both Hell and Paradise will perish and that preordination of Allah can cease, at which time Allah will no longer be omnipotent.


45. Nazzamiyah: 

Followers of abu-Ishaq Ibrahim ibn-Saiyar. They do not believe in the miraculous nature of the Holy Quran nor do they believe in the miracles of the Holy Prophet (pbuh) like splitting the moon.


46. Mu'ammariyah: 

They believe that Allah neither creates life nor death but it is an act of the nature of living body.


47. Bashriyah:

Followers of Bashr ibn-al-Mu'tamir. They believe that Allah may forgive a man his sins and may change His mind about this forgiveness and punish him if he is disobedient again.


48. Hishamiyah: 

Followers of Hisham ibn-ämr al-Futi. They believe that if a Muslim community come to consensus it needs an Imam and if it rebels and kills its Imam, no one should be chosen an Imam during a rebellion.


49. Murdariyah: 

Followers of Isa ibn-Sabih. They believe that staying in close communication with the Sultan (ruler) makes one unbeliever.


50. Ja'friyah: 

Followers of Ja'far ibn-Harb and Ja'far ibn-Mubashshir. They believe that drinking raw wine is not punishable and that punishment of hell could be inferred by a mental process. 


51. Iskafiyah: 

Followers of Muhammad ibn-Abdallah al-Iskafi. They believe that Allah has power to oppress children and madman but not those who have their full senses.


52. Thamamiyah: 

Followers of Thamamah ibn-Ashras al-Numairi. They believe that he whom Allah does not compel to know Him, is not compelled to know and is classed with animals who are not responsible.


53. Jahiziayh: 

Followers of 'Ámr ibn-Bahr al-Jahiz. They believe that Allah is able to create a thing but unable to annihilate it. 


54. Shahhamiyah/Sifatiyah: 

Followers of abu-Yaqub al-Shahham. They believe that everything determined is determined by two determiners, one the creator and the other acquirer. 


55. Khaiyatiyah/Makhluqiyah: 

Followers of abu-al-Husain al-Khaiyat. They believe that everything non-existent is a body before it appears, like man before it is born is a body in non-existence. Also that every attribute becomes existent when it makes its appearance. 


56. Ka'biyah: 

Followers of abu-qasim Abdullah ibn-Ahmed ibn-Mahmud al-Banahi known as al-Ka'bi. They believe that Allah does not see Himself nor anyone else except in the sense that He knows himself and others. 


57. Jubbaiyah: 

Followers of abu-'Ali al-Jubbai. They believe that Allah obeys His servants when he fulfils their wish. 


58. Bahshamiyah: 

Followers of abu-Hashim. They believe that one, who desires to do a bad deed, though may not do it, commit infidelity and deserve punishment.


59. Ibriyah: 

They believe that Holy Prophet (pbuh) was a wise man but not a prophet.


60. Zanadiqiyah: 

They believe that the incident Miraj was a vision of the Holy prophet (pbuh) and that we can see Allah in this world. 


61. Qabariyya: 

They do not believe in the punishment of grave. 


62. Hujjatiya: 

They do not believe in the punishment for deeds on the grounds. 


63. Fikriyya: 

They believe that doing Dhikr and Fikr (Remembering and thinking about Allah) is better than worship. 


64. 'Aliviyah/Ajariyah: 

They believe that Hazrat Ali shared Prophethood with Mohammad (pbuh) 


65. Tanasikhiya: 

They believe in the re-incarnation of soul.


66. Rajiýah: 

They believe that Hazrat Ali ibn-abi-Talib will return to this world. 


67. Ahadiyah: 

They believe in the Fardh (obligations) in faith but deny the Sunnah.


68. Radeediyah: 

They believe that this world will live forever.


69. Satbiriyah: 

They do not believe in the acceptance of repentance. 


70. Lafziyah: 

They believe that Quran is not the word of God but only its meaning and essence is the word of God. Words of Quran are just the words of the narrator. 


71. Ashariyah: 

They believe that Qiyas (taking a guess) is wrong and amounts to disbelief. 


72. Bada'iyah: 

They believe that obedience to Ameer is obligatory no matter what he commands.


73. Ahmadiyya: 

The followers of Hazrat Mirza Ghulam Ahmed of Qadian (as). (1835 to 1908) 

They believe that he is THE PROMISED MESSIAH and IMAM MEHDI. 

They believe in the FINALITY OF PROPHETHOOD OF THE HOLY PROPHET (pbuh) and that he was the SEAL of the all the Prophets.

They believe that the Jesus Christ was NOT CRUCIFIED but DIED a natural death.

(७ ऑगस्ट २०१५)

शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०२२

साखळी तोडायला हवी

बरोब्बर ७० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी, ६ ऑगस्ट १९४५ या दिवशी जपानच्या हिरोशिमा शहरावर अमेरिकेचा `लिटील बॉय' कोसळला आणि काही क्षणात दीड लाख लोक यमसदनी पोहोचले. मृत्युचं त्या वेळेपर्यंत अपरिचित असलेलं रूप जगाने पाहिलं. पण तेवढ्याने भागलं नाही म्हणून की काय, तीनच दिवसांनी, ९ ऑगस्ट १९४५ रोजी नागासाकीवर दुसरा बॉम्ब कोसळला आणि दुसरे ८० हजार लोक यमसदनी पोहोचले. सुदैवाने त्यानंतर असे घडलेले नाही. पण असे घडणारच नाही, असे मात्र म्हणता येत नाही. आज त्या `लिटील बॉय'ची शक्ती लाखो पटीने वाढली आहे आणि त्याची संख्याही.

अर्थात या घटनेचा सुटा विचार करून भागणार नाही. कारण या घटनेनंतर दोनच वर्षांनी याच ऑगस्ट महिन्यात, जगाने या दोन घटनांच्या पाच पटीने अधिक लोकांना यमसदनी जाताना पाहिले. कोणताही बॉम्ब न वापरताही दहा लाखांहून अधिक लोक १९४७ च्या याच ऑगस्ट महिन्यात जीव गमावून बसले होते. निमित्त होते भारताची फाळणी.

या दोन्हीच्या मुळाशी असलेले कारण मात्र एकच आहे. काय आहे ते कारण? हे जग कोणाचे? ही पृथ्वी कोणाची? ही जमीन कोणाची? या जमिनीवरील आणि जमिनीखालील (जागा, खनिजे, तेल, हवा, ग्रह... इत्यादी इत्यादी) सगळे कोणाचे? यासाठीचा संघर्ष हेच आहे मूळ कारण. हिरोशिमा, नागासाकी किंवा भारताची फाळणी; या दोनच नव्हे तुमच्या आमच्या जीवनातील असंख्य गोष्टींपासून बहुतेक साऱ्याच संघर्षाचे अन त्रासाचे हेच मूळ कारण आहे.

खरेच, कोणाची आहे ही जमीन? बाकी कोणी काय सांगितले माहीत नाही, पण ईशावास्य उपनिषद सांगते- `हे सगळे जगत ईश्वराचे आहे. जे जे आहे ते त्याचेच आहे.' पुढे ते सांगते- `याचा त्यागून (स्वामित्व, मालकी भावनेचा त्याग करून) उपभोग घ्या.' गांधीजी म्हणत असत, जगातील सगळे साहित्य लोप पावले तरीही हरकत नाही, पण एवढा एक मंत्र जिवंत आहे तोवर माणसाला आशा आहे. अर्थात हा मंत्र ही सुरुवात आहे, हे दिशादर्शन आहे. चालण्याचे काम आमचे आहे. मात्र केवळ शब्द माहीत असून भागणार नाही. पाठींबा आणि निषेध पुरे पडणार नाहीत. त्याचा अर्थ आणि आशय समजून घेण्याची, समजावून देण्याची अखंड प्रक्रिया सुरु राहावी लागेल. अणुबॉम्ब आणि फाळणी किंवा तत्सम गोष्टीच नव्हेत, तर पेटंट वा ट्रेडमार्क किंवा स्त्री-पुरुष श्रेष्ठता किंवा अगदी कोणत्या व्यवसायात कोणाची किती संख्या आहे किंवा एखाद्या गोष्टीत कोणाचा वाटा किती; या बाबी सुद्धा एकाच मूळ गोष्टीशी घेऊन जातात हे प्रथम समजून घ्यावे लागेल. ही एक साखळी आहे. स्वामित्वाच्या, सत्तेच्या वृत्तीची साखळी. साखळीची एकेक कडी ज्याप्रमाणे साखळीला मजबूत बनवते त्याचप्रमाणे एकेक कडी साखळीला दुबळेही करू शकते. ज्या स्तरावर, ज्या प्रमाणात ही साखळी तोडता येईल, दुबळी करता येईल तेवढी ती करणे आवश्यक आहे. तेच हिरोशिमा- नागासाकी किंवा भारताच्या फाळणी सारख्या प्रश्नांचे स्थायी अन चिरकालिक उत्तर राहील.

याचवेळी याहून अधिक महत्वाची एक गोष्ट विसरून चालणार नाही. ती म्हणजे सावधपण. ही साखळी तोडायची म्हटली की तुटून जाईल, असे नाही. तसे समजण्याचा भाबडेपणा अन भंपकपणा कामाचा नाही. तसे झाल्यास उलट, `फट म्हणता ब्रम्हहत्या' अशी स्थिती व्हायची. त्यासाठी दोन स्तरांवर सावध राहून सतत प्रयत्न हवेत- १) विविध स्तरांवर ही साखळी तोडत राहणे, त्यामागची मानसिकता बदलत राहणे, तिचा आशय अधिकाधिक स्पष्ट करीत राहणे आणि २) ती कमकुवत होईपर्यंत असलेला धोका लक्षात ठेवून सुरक्षात्मक उपाय करीत राहणे.

मानव जातीपुढील हे वर्तमान आव्हान आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

गुरुवार. ६ ऑगस्ट २०१५

संजय आवटे यांचे पत्र

साम टीव्हीचे संपादक संजय आवटे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रकाश मेहता वादासंबंधात लिहिलेले पत्र वाचण्यात आले. त्या वादात माझी काहीही भूमिका नाही. प्रकाश मेहता वा भाजप सरकार यांचं काय होईल ते होवो. पण गंमत ही वाटली की, त्यांनी मांडलेला एक मुद्दा त्यांनाही लागू होतो. एका पक्षाचे लोक आपल्या पक्षातील दुसऱ्यांबाबत शक्यतो बोलत नाहीत. राजकारणी दुसऱ्या राजकारण्याबाबत बोलत नाही. पण पत्रकार तरी पत्रकारितेतील अनिष्ट गोष्टींवर किती बोलतात? आवटे तरी अनिष्ट पत्रकारितेवर किती बोलतात? प्रत्येकाला दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसतं. स्वत:च्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही. तोच आजचा युगधर्म झाला आहे. त्याविरुद्ध उभं राहणारे- स्वत:च्या डोळ्यातील मुसळाची चिंता करणारे, अन दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळावरही लक्ष ठेवणारे हवेत. प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात करावी. मेहता चुकीचे वागलेच. पण आवटे यांनीही किमान आपल्या हाताखालील पत्रकार कधीही मर्यादा उल्लंघन करणार नाहीत, आपणच जगाचे तारणहार आहोत असा आव आणणार नाहीत, आगाऊपणा करणार नाहीत याची हमी घ्यावी. अर्थात आवटे यांचे नाव घेतले तरीही सगळ्याच संपादकांकडून ही अपेक्षा आहे.

- श्रीपाद कोठे

६ ऑगस्ट २०१६

मंगळवार, २ ऑगस्ट, २०२२

बालुजी

काल बालुजी गेले. अन अनेक आठवणींनी मनात गर्दी केली. मन मागे गेलं अन एका शिशू शिबिरावर थांबलं. त्यावेळी नागपूरचं शिशू स्वयंसेवकांचं एक दिवसीय शीत शिबिर होत असे. सकाळी नागपूरजवळच्या खापरी गावच्या विस्तीर्ण शेतात जायचं. दिवसभर कार्यक्रम, भोजन इत्यादी. संध्याकाळी समारोप आटोपून घरी परत. अशाच एका शिबिरातले बालुजी आठवले. खापरीच्या विस्तीर्ण मैदानावरील मंडपात कथाकथनासाठी सगळे शिशू स्वयंसेवक जमले होते. त्यात मीही होतो आणि बालुजी ध्वनिक्षेपकावरून गीत सांगत होते - 'वेदमंत्राहून आम्हा वंद्य मातरम'. त्या दिवसभरात केव्हा तरी ते माझ्याशी काहीतरी बोललेही होते एवढंच आठवतं.

त्यांची दुसरी प्रतिमा आठवली ती, आणीबाणी लागली त्या दिवशीची. सकाळी १० च्या सुमारास ते घरी आले होते. जूनचा महिना. पाऊस धो धो कोसळत होता. माझे लहान मामा प्रचारक. ते भूमिगत होणार हे सांगायला आणि त्या अनुषंगाने काही सूचना इत्यादी सांगायला, माहिती द्यायला ते आले होते. धो धो कोसळणाऱ्या पावसात डकबॅकचा रेनकोट घालून त्यांच्या व्हेस्पा स्कुटरवर ते आले. रेनकोट न काढताच दारातच ५-१० मिनिटे आईशी काही बोलले आणि गेले. नंतर एकदम घरी आले ते आणीबाणीनंतर घरी झालेल्या प्रचारकांच्या बैठकीसाठी. त्यावेळी वय लहान होते त्यामुळे फार आठवत नाही. पण त्या बैठकीला स्व. मोरोपंत पिंगळे आले होते आणि कोणाच्या तरी आग्रहावरून 'पेढ्याच्या पोळ्यांचा' बेत होता एवढे आठवते.

अधूनमधून घरी किंवा कार्यक्रम, उत्सवात बालुजी दिसत. बोलत. विचारपूस करत. साधारण १९८० च्या सुमारास ते नागपुरातून बंगालमध्ये गेले. त्यानंतर त्यांचे तेच कार्यक्षेत्र झाले. नंतर काही काळ अखिल भारतीय जबाबदारी असल्याने संपूर्ण भारत हेच त्यांचे कार्यक्षेत्र होते. त्यामुळे १९८० नंतर भेटी फार झाल्या नाहीत. माझ्यावर लहानमोठ्या जबाबदाऱ्या येण्याची सुरुवात त्याच वेळी झाली. त्यामुळे त्यांच्या सहवासात काम करण्याचा अनुभव मात्र मिळाला नाही.

त्यानंतर दीड दोन दशकांनी त्यांच्याकडे संस्कार भारतीचे मार्गदर्शक अशीही जबाबदारी देण्यात आली. माझ्याकडे त्यावेळी संस्कार भारतीची जबाबदारी होती. त्यामुळे वर्षातून किमान एकदा, अखिल भारतीय प्रबंधकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने दोन तीन दिवस भेट होत असे. एखादे वेळी नागपूरला आले तर भेट होई. त्यांना पाहिले होते. ओळखही होती. मात्र कधी त्यांचा बौद्धिक वर्ग ऐकण्याचा योग नव्हता. २००६ च्या प्रबंधकारिणी बैठकीत लखनौ येथे तो योग आला. २००६ हे गोळवलकर गुरुजी यांचे जन्मशताब्दी वर्ष होते. त्यानिमित्त बैठकीत एक दिवस सकाळच्या सत्रात त्यांचे भाषण ठेवले होते. विषय अर्थातच गोळवलकर गुरुजी हाच होता. तासभराहून थोडा अधिक वेळ बालुजी इतक्या रसाळपणे बोलले की सगळं सभागृह pin drop silence नी ऐकत होतं. एक तर त्यांनी गुरुजींना अतिशय जवळून पाहिलं, अनुभवलं होतं. नागपूर प्रांत प्रचारक म्हणून महाल संघ कार्यालयात त्यांचा निवास होता. त्यामुळे गुरुजींशी त्यांचा अतिशय निकटचा संबंध होता. गुरुजींचं कार्य, प्रवास, स्वभाव, सवयी, सलगी, प्रेम, विद्वत्ता, समर्पण, आध्यात्मिकता, शेवटला आजार; या सगळ्याचे ते साक्षीदार होते. त्या भावसंबंधांचीही त्यांच्या भाषणाला किनार होती. भाषणानंतर त्यांना भेटलो आणि दोन्ही गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे, तुमचे भाषण पहिल्यांदा ऐकले आणि दुसरे म्हणजे, गुरुजींना साक्षात उभं केलंत. त्यावर पाठीवर थाप मारून मोकळं हसले होते. त्यांचं असं दिलखुलास हसणं हा एक अनुभव होता.

एक प्रसंग बंगलोरच्या प्रबंधकारिणी बैठकीच्या वेळचा. त्या दिवशी शनिवार होता. तेव्हा मी शनिवारचा उपवास करीत असे. सकाळी नाश्त्याची वेळ होती. उपवासाची सोय असण्याचे अर्थात काही कारण नव्हते. तशी काही सूचनाही दिली नव्हती. पण चहा घ्यावा म्हणून भोजन मंडपात गेलो. चहा घेत होतो तर समोर बालुजी आले. म्हणाले, 'नाश्ता झाला का?' म्हटले, 'नाही. आज शनिवारचा उपवास आहे.' चहा झाला. बैठकीला निघून गेलो. बैठकीनंतर बालुजी मला शोधत आले. म्हणाले, 'हे घे.' त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन माझ्यासाठी गुळ दाणे आणले होते. म्हणाले, 'अरे, तुला शोधलं मघा. तू बैठकीत होता. तुझा उपवास आहे नं. नाश्ता केला नाही. हे खाऊन घे.' काय बोलावे मला कळेना. लोक संघाची खूप चर्चा करतात. तरीही त्यांना संघाचे रहस्य कळत नाही. संघाचे रहस्य बालुजींसारख्या कार्यकर्त्यांचा, अधिकाऱ्यांचा असा व्यवहार हे आहे.

गेली काही वर्षे ते नागपूर कार्यालयात मुक्कामी होते. दरवर्षी विजयादशमीला सोने द्यायला गेलं की भेट होत असेच. अन्य वेळेलाही कार्यालयात जाणे झाले की भेट होई. काही महिन्यांपूर्वी गेलो होतो. त्यावेळी निवांत भेट झाली होती. ओळख कमजोर झाली होती. पण ओळख दिली की बोलत. त्या दिवशीही जवळपास तासभर भरपूर गप्पा झाल्या. जुन्या आठवणी, अनेकांची विचारपूस, अवांतर अशा गप्पा रंगल्या. पण थकले होते.  निसर्गक्रमाने खणखणीत आवाजाची ती कृष्णमूर्ती सार्थक आयुष्य पूर्ण करून पुढील प्रवासाला गेली. बालुजींना विनम्र नमस्कार.

- श्रीपाद कोठे

सोमवार, ३ ऑगस्ट २०२०