मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०२२

थोडेसे अप्रिय

आपली अर्थव्यवस्था १२ टक्के रोखीची आहे. जगाचा हा दर ४ टक्के आहे.

- अर्थमंत्री

अर्थमंत्री महोदय,

१) जेथे ४ टक्के दर आहे त्या अर्थव्यवस्था आपण आदर्श मानता का?

२) `international standard syndrome' चे आपण समर्थन करता का?

३) भारत `सोने की चिडिया' होता तेव्हाही भारताची अर्थव्यवस्था रोखीचीच होती. आजच्यापेक्षा त्याचे प्रमाण अधिकच होते.

४) आपले सरकार सत्तेवर आल्यापासूनच्या अडीच वर्षात foreign exchange reserve दुथडी भरून वाहत आहेत. या काळातही आपली अर्थव्यवस्था cash intense अशीच आहे.

५) IMF, WB यांच्यासाठी cashless चा खटाटोप सुरु आहे का?

६) आपल्यासारख्या तज्ञांनी स्वत:चे (स्वदेशी) paradigms निर्माण करून जगाला ते imitate करायला का लावू नयेत?

@@@@@@@@@@@@@@@@@

आज एका बँक प्रतिनिधीने त्यांचे payment app ऑफर केले. हे करताना ती म्हणाली, याचा उपयोग केल्यास सिनेमाच्या एका तिकिटावर एक फ्री मिळणार. तुम्ही आणि मादाम दोघांसाठी एकच तिकीट. मी एकटाच आहे मादाम नाहीत, हे त्या प्रतिनिधीला सांगण्यात अर्थ नव्हता. म्हणून एवढेच म्हणालो- गेल्या पुष्कळ वर्षात मी सिनेमाला गेलेलोच नाही अन पुढेही बहुतेक जाणार नाहीच. मग? माझ्या या बोलण्यावर ती बुचकळ्यात पडली. संवाद संपला.

cashless economy will push the society towards consumerism. does bjp is for that? भाजपने तसे असायला काहीच हरकत नाही. पण भाजपने हे स्पष्ट करायला हवे. अन तसे असेलच तर दीनदयाळजींचे नाव घेणे थांबवावे.

@@@@@@@@@@@@@@@@@@

जगज्जेता अलेक्झांडर याचा पराभव एका अकिंचन, अनिकेत, अवस्त्र ऋषीने केला होता. भारताची तीच पद्धती आणि परंपरा आहे आणि उपभोगवाद, सत्ताकांक्षा यांचा पराभव तसाच होऊ शकतो. सत्ताकांक्षेचा पराभव दुसरी सत्ता करू शकत नाही. भारतावर थोपवल्या जाणाऱ्या सत्ताकांक्षेचा पराभव सुद्धा याच पद्धतीने व्हावा लागेल. होईल.

@@@@@@@@@@@@@@@@@@

थोडेसे अप्रिय-

`बुडाला औरंग्या पापी, म्लेंच्छसंहार जाहला

अभक्तांचा क्षयो झाला, आनंदवनभुवनी'

असे धन्योद्गार समर्थांनी काढल्यानंतरही ते आनंदवनभुवन किती काळ टिकले?

महाप्रतापी आर्य चाणक्याने अपार पुरुषार्थ करून स्थापित केलेल्या विक्रमादित्याचे आणि साम्राज्याचे नंतर काय झाले?

सत्तेचे स्वरूपच तसे आहे. सत्ता क्षणस्थायी असते. राष्ट्र चिरस्थायी असतं.

समाज कोणत्या सत्तेचा किती पाठीराखा आहे यापेक्षा समाज किती राष्ट्रमय आहे हे महत्वाचे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, १६ नोव्हेंबर २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा