सोमवार, २८ नोव्हेंबर, २०२२

असमर्थनीय

समता परिषदेने अरुंधती रॉय ला पुरस्कार दिला. मानभावीपणे लाखात लाख घालून तिने तो अन्य कोणाला दिला. अन महानतेचा एक कडा सर केल्याचे दाखवत नक्षलवादाला समर्थन देऊन कौतुकही केले. नक्षलवादाची मानवीय चर्चाही भरपूर झालेली आहे. मात्र आपल्या खऱ्याखोट्या अधिकारांसाठी, न्यायासाठी वगैरे दुसऱ्या मानवाची हत्या करणे ही कोणत्याही रंगाची मानवता होऊच शकत नाही. म्हणूनच नक्षलवादाचे स्पष्ट वा प्रच्छन्न समर्थनही होऊ शकत नाही. शिवाय प्रस्थापित शासकीय भूमिकेला हे छेद देणारेही आहे. यासाठी सरकारने अरुंधती बाईंना `सरकारी पुरस्कार' द्यायला हवा, अन तिला पुरस्कार देऊन प्रतिष्ठित करणाऱ्या अन तिच्या नक्षलसंबंधित भूमिकेवर मूग गिळून अप्रत्यक्ष समर्थन देणाऱ्या समता परिषदेच्या भुजबळ महाशयांनाही `सरकारी पुरस्कार' द्यावा.

- श्रीपाद कोठे

२९ नोव्हेंबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा