सोमवार, ७ नोव्हेंबर, २०२२

बिहारच्या निकालानंतर-

१) स्वत:च्या विजयाच्या आनंदापेक्षा भाजपच्या पराभवाचा आनंद अधिक.

२) हा पराभव हिंदुत्व विचारांचा म्हणायचा असेल, तर हा विजय हजारो कोटींचा घोटाळा करणाऱ्या भ्रष्ट वृत्तीचा म्हणायचा का? लोकांना भ्रष्टाचार हवा आहे का?

३) कथित लोकशाहीने समाज अनेक तुकड्यात विभाजित केला आहे, समाजाला विचारहीन, विवेकहीन बनवले आहे.

४) लोकशाही म्हणजे झुंडशाही.

५) ६५ वर्षात विविध जातीजमाती सशक्त का झाल्या नाहीत याचा विचार करण्यापेक्षा आरक्षणाचा झेंडा उंच धरून लाचार राहणे आणि लाचार ठेवणे हेच लोकांना आवडते.

६) मतभेद उमदेपणाने मान्य करून, मनोमालिन्य उरू न देणे; याऐवजी सगळ्या बऱ्यावाईट गोष्टींना गोंजारत खोटी दिखावटी सहिष्णुता जोपासणे (बोलीभाषेत- मुंह मे राम, बगल मे छुरी), लोकांना भावते.

७) लोकशाही ही खूप अपेक्षा करू नये अशी किंवा फारशा गांभीर्याने घेऊ नये अशी व्यवस्था आहे.

८) गांधीजी किंवा संविधान निर्मात्यांसारख्या आदर्शवाद्यांना लोकशाहीत स्थान नसते. उदा.- समाजाने गोवंशहत्याबंदी, समान नागरी कायदा यासारख्या आदर्श गोष्टींच्या दिशेने चालण्याऐवजी; शक्तीपरीक्षणात यश मिळवण्यासाठी आदर्शांना सामूहिक तिलांजली द्यावी लागते.

९) काही महिन्यांपूर्वी दिल्लीत याहून अधिक बहुमताने आम आदमी पार्टी निवडून आली. आता दिल्लीत फक्त अराजक आहे. बिहारच्या लोकांना कदाचित अराजक हवे आहे किंवा त्यांना फारसे काही कळत नाही.

- श्रीपाद कोठे

८ नोव्हेंबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा