गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०२२

नवाब मलिक यांना प्रश्न

आज काही साखर कारखान्यांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना नबाब मलिक म्हणाले - 'वर्ण व्यवस्थेत ज्यांना व्यवसाय करण्याचा अधिकार आहे त्यांनाच व्यवसाय करता येईल. बाकीच्यांना करता येणार नाही. अशी भाजप सरकारची (कारण धाडी ed ने टाकल्या आहेत.) वृत्ती आहे.' अहो मलिक, बारा बलुतेदारी काय होती? अन वर्णव्यवस्था वगैरे बोलण्याआधी, तुम्ही ज्या महात्मा गांधींना मानता, त्यांनी वर्णव्यवस्थेवर काय म्हटलं आणि लिहिलं आहे ते तरी एकदा पहा नं. किती दिवस काहीही बोलत राहायचं अन समाजात गोंधळ निर्माण करायचा?

- श्रीपाद कोठे

७ ऑक्टोबर २०२१


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा