गुरुवार, २० जानेवारी, २०२२

संपत्ती संचय

दाव्होसला सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत काही महत्वाच्या बाबी समोर आल्या आहेत.

- भारतातील १ टक्का लोकांकडे देशाच्या अर्थ संकल्पाएवढी संपत्ती आहे. ही देशातील ७० टक्के लोकांच्या एकूण संपत्तीच्या चार पट आहे.

- जागतिक स्तरावर हे प्रमाण ६० टक्के लोकांच्या संपत्तीच्या प्रमाणात आहे.

- ई कॉमर्स कंपन्यांमुळे देशात सुमारे १० लाख रोजगार कमी झाले. या कंपन्यांनी निर्माण केलेल्या रोजगाराच्या तुलनेत हा आकडा खूप मोठा आहे. (शिवाय निर्माण झालेले नवीन रोजगार नवीन कौशल्य असलेल्या नवीन लोकांसाठी आहेत. त्यामुळे रोजगार गमावलेल्या जुन्यांना त्यात वाव किती हा वेगळा प्रश्न. आकड्यांना त्यामुळेच फारसा अर्थ नाही.)

*****************

निष्कर्ष -

- संपत्तीचा संचय आणि संपत्तीचे केंद्रीकरण यांचा विचार होणे ही तातडीची गरज. या गोष्टींचा आज उल्लेख सुद्धा कोणी करीत नाही. सगळे देश, तज्ञ, राजकारणी, व्यवस्था फक्त संपत्ती निर्मितीचा विचार करतात. हे चूक आहे. (शरीरात रक्त वाढणे हे पुरेशा प्रमाणापर्यंतच आवश्यक असते. त्यानंतर ते फिरत राहणे एवढेच हवे. अधिक रक्ताची गरज नसते.)

- पाकिस्तान भिकारी झाला याचा हर्षोल्लास करणाऱ्यांनी आपली खरेदीची पद्धत बदलण्याचा विचार केला तरी तीही देशभक्तीच ठरेल. अन्यथा भारताचा पाकिस्तान व्हायला हीच देशभक्ती कारणीभूत ठरेल.

- श्रीपाद कोठे

२१ जानेवारी २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा