बुधवार, २६ जानेवारी, २०२२

यात्रा अनुभव

नागपूरच्या टेकडी गणेशाची यात्रा असते दरवर्षी पौषातल्या संकष्टी चतुर्थीला. त्यानुसार आजही ती होती. तिथे दर्शनाला जाऊन आलेले एक भक्त सांगत होते तिथल्या व्यवस्थेबद्दल. ते म्हणाले- व्यवस्था एकदम छान होती. कुठेही गडबड, गोंधळ, धक्काबुक्की नाही इत्यादी. पुढे म्हणाले- तिथे सूचना दिल्या नात होत्या ध्वनीवर्धकावरून की, `श्रीगणेशाला नमस्कार करताना कृपया डोळे बंद करू नये.' अर्थात ही सुरक्षेसाठी सावधगिरीची सूचना असणार. त्यात चूक वा गैर काहीही नाही. पण नमनच (न-मन, मन नसलेली/ मनाचा लय झालेली स्थिती) करायचे नाही तर मंदिरात जाण्याचा उपयोग काय? वर्तमान जीवन कळत वा नकळत माणसाला भक्तीपासून, आध्यात्मापासून, ज्ञानापासून दूर घेऊन जात आहे. आध्यात्मिक जडवाद आणि परिणामी वाट्यास येणारी अनर्थमालिका यांचा विचार आणि जीवनाच्या संदर्भात त्याचे उपायोजन चिंतनाचा विषय होणे आवश्यक आहे.

- श्रीपाद कोठे

२७ जानेवारी २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा