गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

इमारत

जुन्या इमारतीच्या जागी नवीन इमारत बांधण्यासाठी जुनीवर घाव घालावे लागतातच. पण एकदा जुनी इमारत धराशायी झाल्यावर घाव घालणे सोडून द्यावे लागते अन नवीन बांधणे सुरु करावे लागते. फुले, शाहू, आंबेडकर, राजाराममोहन रॉय यांनी जुनी इमारत पाडली. आताही कोणी तेच काम करीत असेल तर ते हास्यास्पद ठरेल. समाज कोणाच्याही चालवल्याने चालत नाही. थांबवल्याने थांबत नाही. त्याचे नियंत्रण कालप्रवाह करीत असतो. कालानुरूप काय आवश्यक आहे त्याला, त्या कौशल्याने हातभार लावणे एवढेच आपले कर्तव्य असते. हां, उभे काय करायचे आहे याचे भान सुटून उपयोगाचे नाही. घर उभे करताना खूप देखणे मंदिर किंवा आकर्षक हॉटेल उभे करूनही उपयोग नसतो. घर उभे करायचे असल्यास घर, मंदिर उभारायचे असल्यास मंदिर, हॉटेल उभारायचे असल्यास हॉटेल, इस्पितळ उभारायचे असल्यास इस्पितळ; असेच हवे. अवधान सगळ्यात महत्वाचे.

- श्रीपाद कोठे

२८ जानेवारी २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा