रविवार, ३० जानेवारी, २०२२

जीवनाचा गोंद

शेतकऱ्यांना अन्नदाता म्हणू नये इत्यादी भाषा आता सुरू झाली आहे. माणसांना परस्परांशी जोडणारं जे सिमेंट होतं, जोडणारा जो गोंद होता; तो जोडणारा घटक आपण सगळ्याच स्तरावर कसा काढून टाकत आहोत याचं हे ताजं उदाहरण आहे. परस्पर आदर, विश्वास, स्नेह, एकमेकांचा विचार हा तो घटक. हा निर्माण करण्याचे प्रयत्नही होतात पण त्यांना यश येत नाही कारण हा घटक निर्माण करता येत नाही. तो तयार व्हावा लागतो, विकसित व्हावा लागतो. तो कसा तयार होतो? आपले विचार, व्यवहार, भाषा, attitude, सह अनुभूती, संयम, समजुतदारी यातून परस्पर संबंधांचा गोंद तयार होतो. अन या साऱ्या गोष्टी तयार होतात आपल्या जीवनदृष्टीतून. जीवनाकडे पाहण्याची आपली दृष्टी काय आहे, कशी आहे त्यावर सगळे अवलंबून असते. नीतीचा उगमसुद्धा या जीवनदृष्टीतूनच होतो. आज बाकी सगळे मोठ्या प्रमाणात होते पण जीवनदृष्टीबद्दल मात्र फार काही होताना दिसत नाही.

- श्रीपाद कोठे

३० जानेवारी २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा