शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२

फौजा

आरक्षण, शेतकरी कायदे, राम मंदिर, बायडेन प्रशासनातील भारतीय वंशाचे लोक; इत्यादी विषयात जेवढं रक्त आटवलं जातं; त्याच्या एक दशांश तरी रक्त; माणसांनी माणूस व्हावं, माणसांनी जबाबदार व्हावं, माणसांनी नागरिकत्वाच्या भावनेने वागावं, माणसांनी विचारी व्हावं, माणसांनी एकांगी होऊ नये; यासाठी आटवलं जातं का? किती राजकीय पक्ष, किती सामाजिक/ धार्मिक/ सांस्कृतिक/ आर्थिक संस्था आणि संघटना; त्यासाठी प्रयत्न करतात. किती पक्ष आणि संस्था लोकांना कठोर शब्दात याची जाणीव करून देण्याचं धैर्य दाखवतात? की गाढवा डुकरांच्या फौजा गोळा करणे आणि टिकवणे हेच सगळ्यांचं कार्य झालेलं आहे?

- श्रीपाद कोठे

२२ जानेवारी २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा