बुधवार, २६ जानेवारी, २०२२

सत्तेच्या दावणीला

आजकाल भीती का खरी होते आहे ठाऊक नाही. आज रामदेव बाबांनी आणि खडगे यांनीही संतांना भारतरत्न का नाही असा सवाल उपस्थित केला. अन भगवाधारी लोकांना भारतरत्न का नाही ही चर्चा सुरू झाली. It must be fought tooth and nail. धर्म, आध्यात्म राजनीतीच्या कितीतरी वर आहे, असायला हवे. सगळ्या गोष्टी सत्तेच्या दावणीला बांधणे, सत्तेचे प्रशस्तीपत्र सर्वोच्च मानणे, तसं वाटणे, त्याची इच्छा सुद्धा होणे किंवा रणनीती म्हणून सुद्धा तसा विचार करणे; समर्थनीय तर नाहीच घातक, अयोग्य अन चुकीचे आहे. राजकारण, सत्ता ज्याला हात लावते त्याचा विनाश अवश्य होणार. दोन्हीत अंतर ठेवणे आणि प्रयत्नपूर्वक, व्रतस्थपणे, आग्रहिपणे धर्म, आध्यात्म जपणे; त्याचे सर्वोच्च स्थान जपणे हेच भारताचे नुसते वैशिष्ट्य नाही, ते त्याच्या अमरत्वाचे कारण आहे अन तोच त्याचा जीवनहेतु सुद्धा. भगव्याने सत्तेची स्वप्नात सुद्धा अभिलाषा बाळगणे या राष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात ठरेल. विवेकानंद वा दयानंद सरस्वती यांना भारतरत्न का नाही ही चर्चा अत्यंत दुर्दैवी आहे. अशा प्रकारची कोणाचीही इच्छा वा मागणी कोणत्याही स्थितीत समर्थनीय नाही.

- श्रीपाद कोठे

२७ जानेवारी २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा