मंगळवार, १८ जानेवारी, २०२२

दंडशक्ती, प्रेरक शक्ती

१) सर्वोच्च न्यायालयातील वाद,

२) न्या. लोया मृत्यू प्रकरण,

३) `पद्मावत'चा गोंधळ,

४) उत्तर प्रदेशात सहावीतील मुलीने पहिलीतील मुलाच्या हत्येचा केलेला प्रयत्न,

किंवा असे अनेक प्रश्न आणि वाद...

`कायद्याचे राज्य' हा आदर्श ठेवल्याने उद्भवतात, वाढतात, चिघळतात. `नीतिमान समाज' आणि त्याकडे लक्ष देण्यासाठी कायदा; या आदर्शांऐवजी `नीतिमान समाज' याला तिलांजली देऊन `कायद्याचे राज्य' आणि `कायद्याने चालणारा समाज' हा आदर्श मानल्याने ही स्थिती आली आहे. माणूस अथवा माणसे कायदा करतात. तो कसा केला जातो, कसा वापरला जातो, कसा वाकवला जातो इत्यादी सगळ्यांना ठाऊक आहे, ठाऊक असते. त्यामुळेच कायदा ही प्रेरक शक्ती होऊच शकत नाही. ती दंडशक्ती आहे. आज प्रेरक शक्तीला मोडीत काढून दंडशक्तीच्या भरवशावर समाज चालवण्याचे जे खेळ सुरु आहेत ते अपुरे आणि घातक आहेत. त्यातून साध्य काहीही होणार नाही. नैतिकता आणि धोरण या दोन्ही अर्थांनी नीतिमान समाज ही जोवर प्राधान्याची बाब होत नाही तोवर गोंधळाला अंत नाही. दुर्दैवाने ज्यांनी बोलायला हवे तेही यावर बोलत नाहीत. तेही हतबुद्ध आणि हतप्रभ झालेले दिसतात.

- श्रीपाद कोठे

१९ जानेवारी २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा