गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

दक्षिणायन

दक्षिणायनच्या नागपुरातील कार्यक्रमाच्या संदर्भात माहिती एकाने आज मला पाठवली. गेले काही दिवस त्याची चर्चा सुरूच आहे. गांधीजी, डॉ. आंबेडकर, मार्क्स यांचे वैचारिक एकीकरण करीत वर्तमानाच्या संदर्भात दक्षिणायन चळवळ आहे हे बोललं जातं. याला हरकत असण्याचं कारण नाही. चांगली बाब आहे. परस्परविरोधी विचारांचा मेळ घालण्याचा प्रयत्न होत असेल तर त्यात वावगे काहीच नाही. परंतु त्या माहितीत `संविधान, लोकशाही याविषयीच्या प्रामाणिक व्यक्तींची चळवळ' असा काहीसा शब्दप्रयोग होता. गंमत वाटली. लोकशाहीशी बांधिलकी असणाऱ्या चळवळीने प्रामाणिक अन अप्रामाणिक अशी विभागणी करून टाकावी हे दुर्दैव नाही? कोण आणि कसं ठरवणार प्रामाणिक आणि अप्रामाणिक? कोणत्याही व्यक्ती, विचार, संस्था, आंदोलन याबद्दल खुलं असणाऱ्यांना प्रामाणिक म्हणायचं की; कोण प्रामाणिक हे ठरवून टाकून बाकीच्या अप्रामाणिक लोकांना दारे बंद करणाऱ्यांना `प्रामाणिक लोकशाहीवादी' म्हणायचं? मला हा अंतर्विरोध वाटतो. अन वैचारिक स्वागतशीलता याविषयीच बोलायचं तर रा.स्व. संघाचे दुसरे सरसंघचालक म्हणाले होते- `मार्क्सने वेदांताचा अभ्यास केला असता तर तो अधिक समावेशक विचार मांडू शकला असता.' अन पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी ज्यावेळी एकात्म मानववाद प्रतिपादन केला तेव्हा, मुंबईतील २२ एप्रिल १९६५ च्या पहिल्याच भाषणात, आजपासून ५३ वर्षांपूर्वी; गांधीजींचा किती आवर्जून आणि आदराने उल्लेख केला ते पाहण्यासारखे आहे. त्या भाषणाचा पहिलाच परिच्छेद असा-

`अंग्रेजों के शासनकाल में देश में जितने भी आन्दोलन चले और देश की जितनी भी राजनीती थी, उन सब का एक ही लक्ष्य था कि अंग्रेजों को हटाकर स्वराज्य प्राप्त करें. स्वराज्य के बाद हमारा क्या रूप होगा? हम किस दिशा में आगे बढ़ेंगे? इसका बहुत कुछ विचार नहीं हुआ था. बहुत कुछ शब्द का प्रयोग मैने इसलिए किया कि बिलकुल विचार नहीं हुआ यह कहना ठीक नहीं होगा. ऐसे लोग थे जिन्होंने उस समय भी बहुत सी बातों पर विचार किया था. स्वयं गांधीजी ने `हिन्द स्वराज' लिख कर स्वराज्य आने के बाद भारत का चित्र क्या होगा इस पर अपने विचार रखे थे. उसके पहले लोकमान्य तिलक ने भी `गीतारहस्य' लिखकर सम्पूर्ण आन्दोलन के पीछे की तात्विक भूमिका क्या होगी इसका विवेचन किया था. साथ ही उस समय विश्व में जो भिन्न भिन्न विचार चल रहे थे, उनकी तुलनात्मक आलोचना की थी. इसके अतिरिक्त समय समय पर कांग्रेस या दुसरे राजनीतिक दलों ने जो प्रस्ताव स्वीकार किये उनमे भी ये विचार आये थे. किन्तु इन सबका जितना गंभीर अध्ययन होना चाहिए था, उतना उस समय तक नहीं हुआ था. क्योंकि प्रमुख विषय था अंग्रेजों को निकालना. किन्तु आश्चर्य यह है कि देश की स्वतंत्रता के बाद भी इस पर पर्याप्त गंभीरता से विचार नहीं किया गया.' (पंडित दीनदयाल उपाध्याय, राष्ट्रवाद की सही कल्पना - २२ एप्रिल १९६५)

- श्रीपाद कोठे

२८ जानेवारी २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा