शनिवार, १२ जून, २०२१

एकात्म मानववाद (१५)

 

समाज !! रोज हजारो वेळा वापरला जाणारा शब्द. सगळ्यांच्या परिचयाचा शब्द. पण समाज म्हणजे काय? असा प्रश्न आलाच तर बुचकळ्यात टाकणारा शब्द. वास्तविक समाज ही अतिशय सखोल विचार करावा अशी संकल्पना आहे. समाज म्हणजे काय याविषयी विविध मतांतरेही आहेत. स्व. दीनदयाळ उपाध्याय यांनीदेखील याबद्दल आपले विचार मांडलेले आहेत. भारताची समाज ही संकल्पना अन्य देशातील, विशेषतः पश्चिमी देशातील समाज या संकल्पनेपेक्षा भिन्न आहे, हे त्यांनी आग्रहाने प्रतिपादन केले आहे. पश्चिमी देशात मानतात तसे समाज म्हणजे अनेक व्यक्तींनी एकत्रित येऊन केलेला करार नसतो, तर समाज ही स्वयंभू जिवंत निर्मिती असते; असे त्यांचे प्रतिपादन होते. व्यक्तीप्रमाणेच समाजाला त्याचे स्वतःचे व्यक्तित्व असते, असा त्यांचा सिद्धांत होता.
समाज म्हणजे काय या मूलभूत प्रश्नाचा विचार मांडताना दीनदयाळ उपाध्याय म्हणतात - 'समाज मानवो का समूह है यह तो सामान्य बात है किन्तु समाज की सृष्टी कैसे हुई? इसके संबंध में अनेक विचार तत्त्ववेत्ताओने रखे है. पश्चिम का विचार, जिस के आधार पर वहां राजनीतिक व सामाजिक जीवन की सृष्टी हुई है, यह है की- समाज व्यक्तियों का ऐसा समूह है जो व्यक्तीओने स्वयम् मिलकर बनाया है. अर्थात व्यक्तियों के समझौते के आधार पर बना है. इसको 'सामाजिक समझौता सिद्धांत' नाम से जाना जाता है. इसलिए वहां अधिक महत्त्व व्यक्ती का है, जो की समाज की रचना करता है. पश्चिम के विचारो मे कही अंतर है तो इसी बात का की, यदी व्यक्ती ने समाज की रचना कर ली तो, अवशेष शक्ती (residuary power) समाज के पास रहे या व्यक्ती के पास? क्या व्यक्ति को समाज बदलने का अधिकार है? क्या समाज व्यक्ति के ऊपर भांती भांती के बंधन लगाकर अपने प्रती निष्ठा कि अपेक्षा कर सकता है? अथवा क्या व्यक्ती इन सब प्रश्नो के संबंध मे स्वतंत्र है? पश्चिम मे यह विचार विवाद का विषय बना है. किसी ने समाज का पक्ष लिया है और उसमे से संघर्ष की स्थिति पैदा हुई. सत्य तो यह है की, उनका यह विचार की समाज का निर्माण व्यक्तीयो ने किया है, मूलत: गलत है. समाज व्यक्तियों का मिला हुआ समूह है यह बात सत्य होने पर भी, व्यक्तियो ने समाज को बनाया, या व्यक्ती मिले और समाज बन गया ऐसा कही भी नही दिखाई देता.' (एकात्म दर्शन, पृष्ठ ३०, व्यष्टी समष्टी मे समरसता)
समाज म्हणजे एखादा क्लब किंवा पंजिकृत सोसायटी नाही. व्यक्तिप्रमाणेच समाजही स्वयंभू असून; समाजाचेही शरीर, मन, बुद्धी, आत्मा असतात; असे स्व. उपाध्याय यांचे प्रतिपादन आहे. सामूहिक मन, सामूहिक बुद्धी पाश्चात्य मनोवैज्ञानिकांनाही मान्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हा मुद्दा अधिक स्पष्ट करताना ते म्हणतात की, व्यक्तींच्या शक्तीची एकत्रित बेरीज आणि समाजाची एकूण शक्ती या वेगळ्या असतात. समूहाची शक्ती, बुद्धी, भावना वेगळ्या असतात. म्हणूनच एखादी व्यक्ती, व्यक्ती म्हणून दुबळी असली तरीही समाज म्हणून शूर असू शकते किंवा एखादी व्यक्ती, व्यक्ती म्हणून चांगली असली तरीही समाज म्हणून वाईट असू शकते. समाज म्हणून चांगली आणि व्यक्ती म्हणून वाईट अशीही व्यक्ती असू शकते.
अनेक व्यक्तींनी मिळून समाज तयार केलेला नाही आणि व्यक्ती म्हणजे समाजरूपी यंत्राचा एखादा छोटासा सुटा भाग नाही. दोन्हीही स्वतंत्रपणे पूर्ण आहेत आणि दोन्ही एकाच एककाचे भाग आहेत. व्यक्तिशिवाय समाज अशक्य आणि समाजाशिवाय व्यक्ती अशक्य. व्यक्ती समाजावर अवलंबून आणि समाज व्यक्तीवर अवलंबून. व्यक्तिशिवाय समाज अपूर्ण आणि समाजाशिवाय व्यक्ती अपूर्ण. म्हणूनच व्यक्तीनेही आणि समाजानेही हे अवलंबन आणि अपूर्णत्व अधिकाधिक समजून घेतले पाहिजे. हे अवलंबन आणि अपूर्णत्व व्यक्ती जेवढे अधिक समजून घेईल तेवढं त्याचं जगणं समाजानुकूल होईल. हे अवलंबन आणि अपूर्णत्व समाज जेवढं अधिक समजून घेईल तेवढ्या समाजाच्या व्यवस्था, भूमिका आणि समाजाची वृत्ती व्यक्तीला अनुकूल होईल. व्यक्ती आणि समाजाच्या अस्तित्वाचं हे ऐक्य जोवर हृदयंगम होत नाही तोवर व्यक्ती आणि समाज दोघेही स्वतःचं वर्चस्व सिद्ध करण्याचा, परस्परांवर कुरघोडी करण्याचा, आपल्याच पोळीवर तूप ओढून घेण्याचा प्रयत्न करतील. यातून सुख, शांती, स्थैर्य आणि समाधान प्राप्त होणे अशक्य होईल.
स्व. उपाध्याय यांनी हा विचार स्पष्टपणे मांडला आहे. व्यक्ती आणि समाज या एकाच अस्तित्वाच्या दोन बाजू आहेत. एकाच नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे व्यक्ती आणि समाज अविभाज्य आहेत. त्यांना वेगळे करता येत नाही, असे प्रतिपादन करून स्व. उपाध्याय म्हणतात, 'जब कोई यह प्रश्न करता है कि व्यक्ती बडा या समाज बडा, तो हिसाब लगाना कठीन हो जाता है. समाज भी बडा है और व्यक्ती भी बडा है. अथवा कहिये की जितना बडा व्यक्ती है उतना बडा समाज और जितना बडा समाज है उतना बडा व्यक्ती. दोनो अभिन्न है. कुछ लोग जो पश्चिम की विचारधारा से प्रभावित है, व्यक्ती और समाज के बीच संघर्ष की भूमिका लेकर विचार करते है. ये दोनो अलग-अलग दिखाई देते है. दोनों के अलग अलग अस्तित्व की कल्पना की जाती है. दोनो के अधिकार भिन्न बताये जाते है. दोनो मे झगडा दिखाया जाता है. कहा जाता है कि, व्यक्ती और समाज के हित टकराते है. पश्चिम मे प्रत्येक बात को संघर्ष के आधार पर ही सोचा जाता है. एक मे तो संघर्ष नही हो सकता. संघर्ष के लिए दो की जरुरत रहती है. जब दोनो के बीच एकता की कल्पना की जाती है उसमे भी, दोनों को अलग अलग माना जाता है.' (राष्ट्रजीवन की दिशा, पृष्ठ ११३-११४, व्यक्ती और समाज का संबंध)
हाच दृष्टिकोन अधिक स्पष्ट करताना ते म्हणतात, 'हम व्यक्ति और समाज को अभिन्न मानते है. व्यक्ती समाज के विरोध में कार्य करे, समाज के हित की चिंता न करे, व्यक्ती पडोसी से सदैव बैर का अनुभव करे, प्रत्येक व्यक्ती अपना सुख दुसरे के साथ प्रतिद्वंद्विता मे ही माने तो क्या काम चलेगा? रास्ते पर चलने वाली प्रत्येक मोटरगाडी मुझे टकराने वाली है, घर मे आया हर एक व्यक्ती मुझे लूटने के लिये ही आया है, बाजार में हर कोने पर जेबकत्रे ही जेबकत्रे खडे है; ऐसी कल्पना करके चलनेवाले मानव समूह मे भला कौन सी शांती निर्माण हो सकेगी? व्यक्ती यदी अधिक संपन्न धनवान हो गया तो वह समाज को धर रगडेगा और समाज के ही हाथ में सब सूत्र आ गये तो व्यक्ती की सब स्वतंत्रताओ का अपहरण होना ही चाहिये; ऐसा मान कर चलना और इन दो स्थितीयो मे से किसी एक को चूनने के लिए बाध्य होना, क्या मानव समाज के उदात्त चरित्र के स्थापना की भूमिका हो सकेंगी?' (राष्ट्रजीवन की दिशा, पृष्ठ ११५, व्यक्ती और समाज का संबंध)
व्यक्ती आणि समाज यांचा सुटा सुटा विचार केल्यानेच जगण्यासाठी सगळ्या गोष्टींमध्ये संघर्षाचा आणि या संघर्षात टिकून राहण्यासाठी स्पर्धेचा सिद्धांत भारतेतर विचारांनी गृहीत धरला आणि आग्रहाने मांडला. स्व. उपाध्याय याबद्दल म्हणतात, `विविधता में एकता अथवा एकता का विविध रूपों में व्यक्त होना ही भारतीय संस्कृति का केंद्रस्थ विचार है. यदि इस तथ्य को हमने हृदयंगम कर लिया तो फिर विभिन्न सत्ताओं के बीच संघर्ष नहीं रहेगा. यदि संघर्ष है तो वह प्रकृति का अथवा संस्कृति का द्योतक नहीं, विकृति का द्योतक है. जिस मात्स्यन्याय या जीवन के संघर्ष को पश्चिम ने प्रतिपादित किया उसका ज्ञान हमारे दार्शनिकों को था. मानव जीवन में काम क्रोध आदि षडविकारों को भी हमने स्वीकार किया है. किंतु इन सब प्रवृत्तियों को अपनी संस्कृति अथवा शिष्ट व्यवहार का आधार नहीं बनाया. समाज में चोर और डाकू होते है. उनसे अपनी और समाज की रक्षा भी करनी चाहिए. किंतु उनको हम अनुकरणीय अथवा मानव व्यवहार की आधारभूत प्रवृत्तियों का प्रतिनिधि मानकर नहीं चल सकते. जिसकी लाठी उसकी भैंस (survival of the fittest) जंगल का विधान है. मानव की सभ्यता का विकास इस विधान को मानकर नहीं बल्कि यह विधान न चल पाए इसलिए किए हुए प्रयासों के कारण हुआ है. आगे भी यदि बढना हो तो हमें इस इतिहास को ध्यान में रखकर ही चलना होगा.' (पंडित दीनदयाल उपाध्याय, एकात्म मानववाद- २३ एप्रिल १९६५)
आज काय स्थिती आहे? स्वार्थ, स्पर्धा, अविश्वास यांचेच साम्राज्य पाहायला मिळते. व्यक्तीच्या संबंधात आणि समाजाच्या संबंधातही या तिन्ही बाबी लागू होतात. स्वार्थ, स्पर्धा आणि अविश्वास हेच माणसाच्या जगण्याचे आधार झाले आहेत. या आधारांना लोकमान्यता, राजमान्यता आणि न्यायमान्यता मिळालेली आहे. कोणालाही यात वावगे काही वाटत नाही. उलट दिवसाचे चोवीसही तास स्वार्थ, स्पर्धा आणि अविश्वास यांचेच अवधान ठेवत जगायला हवे; तसे जगणे हेच खरे कौशल्यपूर्वक जगणे; हीच जीवनाची खरी समज; असाच आज व्यवहाराचा, विचारांचा आणि भावनांचा प्रवाह झाला आहे. हीच जीवनाची दिशा झाली आहे. माणुसपणाऐवजी चतुराईला महत्व आलेले आहे. ज्यांच्याकडे चतुराई नाही ते टीकेचा, थट्टेचा वा तिरस्काराचा विषय होतात. व्यक्तीने जीवनात काय करायचे इथपासून तर, सरकारी योजनांपर्यंत आणि जीवनाच्या कल्पनांवर प्रभाव टाकणाऱ्या जाहिरातींपासून तर न्यायव्यवस्थेच्या चिंतनापर्यंत; स्वार्थ, स्पर्धा आणि अविश्वास यांचाच बोलबाला आहे. याच गोष्टींना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. पती पत्नीने आपल्या बँक खात्याच्या atm चा पिन नंबर एकमेकांना सांगू नये, असा आदेश एका उच्च न्यायालयाने आणि देशातील सगळ्यात मोठ्या बँकेने देण्यापर्यंत स्वार्थ, स्पर्धा आणि अविश्वास यांचा प्रवास आलेला आहे. हीच आज मानवी जीवनाची व्यक्तिगत आणि सामाजिक मूल्ये झालेली आहेत.
लोकांमध्ये व्यक्तिवाद वाढलेला आहे. शिक्षण, करियर, सुखसाधने, गरजा, इच्छा, आकांक्षा; या साऱ्यात व्यक्तीच्या मनात उठणारे तरंग यांना अपार महत्व आलेले आहे. शिवाय मनात येणारी गोष्ट पूर्ण झालीच पाहिजे वा मिळालीच पाहिजे; मनातील इच्छा पूर्ण करणे म्हणजेच जीवनाची इतिकर्तव्यता; अशी भावना दृढमूल झालेली आहे. स्वतःची क्षमता, गरजा, परिस्थिती, जबाबदारी, भान या गोष्टींचा सारासार विचार करणे आजच्या मानवाला मान्य नाही. दुसरीकडे आईवडिलांपासून तर शेजारीपाजारी, मित्रमैत्रिणी, नातेवाईक, सहपाठी आणि सहकारी; असे सारेच इच्छापूर्तीच्या या प्रवाहाला कळत नकळत वेग आणि शक्ती पुरवत असतात. अन समाज या प्रवाहाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी अधिकाधिक बंधने, अधिकाधिक नियम, अधिकाधिक कायदे, अन या साऱ्यांची अधिकाधिक कडक अंमलबजावणी; हाच सामाजिक, सरकारी आणि प्रशासकीय सूर दिसून येतो. व्यक्तिवाद आणि परिणामी व्यक्तीस्वातंत्र्य याला स्वीकृत सिद्धांत म्हणून सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे. परंतु त्यामुळे निर्माण होणारा गोंधळ, अव्यवस्था, अराजक आणि संघर्ष मान्यही करता येत नाही, स्वीकारताही येत नाही. गोंधळ, अव्यवस्था, अराजक आणि संघर्ष नियंत्रित करावेच लागतात. मग त्यासाठी व्यवस्थेचा दंडुका उग्रपणे उगारण्याला पर्याय राहत नाही. समाज आणि सामाजिक व्यवस्था आपल्याला दाबून टाकण्यासाठीच आहेत, ही व्यक्तीची भावना; आणि लोक असेच असतात, त्यांच्यासाठी दंडुकाच हवा ही समाजाची भावना; आज सगळीकडे पाहायला मिळतात. व्यक्ती आणि समाज परस्परांकडे शत्रुत्वाच्या भावनेनेच पाहत असतात. दोघेही एकमेकांना ठकवून, फसवून, विविध शक्तींचा वापर करून, विविध आयुधांचा वापर करून; आपापले हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करतात. समाजाच्या सुव्यवस्थेत आपले सौख्य आहे आणि ती सुव्यवस्था आपल्यावरच अवलंबून आहे याचे भान आणि याची जाण व्यक्तींना नाही. तर सामाजिक व्यवस्था, कायदे, नीती, नियम हे व्यक्तीला सुखी करण्यासाठी आणि त्याचा पूर्णतेचा प्रवास सुकर करण्यासाठी असतात याचे भान आणि याची जाण समाजाला नाही. व्यक्ती आणि समाज दोघेही आपले वर्चस्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नात गुंग असतात. त्या त्या क्षणी काळाचे दान ज्याच्या पदरात पडेल तो सिकंदर ! परंतु व्यक्ती आणि समाज दोन्ही महत्वाचे, अपरिहार्य आणि एकच आहेत. त्यांचा समन्वित विचार केला पाहिजे असे फारसे लिहिले, बोलले, समजावले जात नाही. कोणती तरी एक बाजू घेण्याचाच प्रयत्न अधिक दिसतो.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा याबाबत दृष्टिकोन काय होता? ते म्हणतात, 'जो व्यक्तीवाद का अवलंबन करते है वे अध:पतन को प्राप्त होते है, परंतु जो समष्टीवाद मे रहते है वे उससे भी अधिक नीचे गिरते है. अस्तू भारतीय तत्त्वज्ञानीयोने 'मै' और 'हम' को समन्वित करने का विचार रखा है. समष्टीवाद और व्यक्तिवाद ये दोनो साथ साथ रहे तो लाभदायक होते है. व्यक्तिवाद के अनुष्ठान से व्यक्ति के कष्ट दूर किए जाते है और समष्टीवाद से अमरत्व की प्राप्ति होती है.' (पंडित दीनदयाळ उपाध्याय, राष्ट्रजीवन की दिशा, 'मै' और 'हम', पृष्ठ ३१)
व्यक्तिवाद आणि समष्टीवाद यांच्या मर्यादा, त्यांचे दुष्परिणाम आणि अपुरेपण मान्य करून, समजून घेऊन; त्यांचा समन्वय हवा या निष्कर्षावर आल्यावर स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो की, हा समन्वय होईल कसा? अशा समन्वयासाठी सर्वसाधारण आधार कोणता? समन्वय करताना कोणाची मर्यादा कोणती हे कसे ठरवायचे? कोणी माघार घ्यायची, कोणी पुढाकार घ्यायचा, कोणाला स्वातंत्र्य द्यायचं, कोणी बंधन स्वीकारायचं, त्या त्या वेळेचा आणि परिस्थितीचा विचार कसा करायचा? या सगळ्या प्रश्नांवर स्व. उपाध्याय यांचे उत्तर आहे - 'धर्म'. धर्म हीच निर्णयात्मक बाब असायला हवी असे त्यांचे मत होते. परंतु धर्मनिर्णय तरी कसा करायचा? पंडित दीनदयाळ उपाध्याय याविषयी अत्यंत व्यावहारिक विचार मांडताना म्हणतात, 'मै केवल अपना ही नहीं दुसरो का भी विचार करुंगा, इतना विचार मात्र हमारे अंदर आ जाय तो हम कहेंगे की हम धर्म के आधार पर खडे है.' (राष्ट्रजीवन की दिशा, सारांश, पृष्ठ २०६)
अर्थात स्वतःसोबत अन्य व्यक्तींचा आणि घटकांचा विचार ही पहिली पायरी म्हणावी लागेल. जीवन ही इतकी गुंतागुंतीची गोष्ट आहे की, सहज एखाद्या सुभाषितवजा वाक्यातून सगळं काही सांगणं शक्य नसतं. त्यातील आशय लक्षात घेऊन त्या त्या वेळी, त्या त्या प्रसंगी मार्ग काढावा लागतो, निर्णय घ्यावे लागतात, व्यवहार करावा लागतो. यासाठी मोठ्या प्रमाणावर लोकांची सर्वसाधारण समज परिपक्व असावी लागते, लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर सद्भाव असावा लागतो, मोठ्या प्रमाणावर नि:स्वार्थता आणि स्वार्थाचे नियमन लागते, मोठ्या प्रमाणावर संयमाची वृत्ती लागते, मोठ्या प्रमाणात विश्वास लागतो; माणसाच्या सद्गुणांना- सद्भावांना- सद्विचारांना- उचलून धरणारे, पोषण देणारे वातावरण लागते. हे सारे जादूची कांडी फिरवून होत नाही. कायदे, नियम, ठराव, जाहिराती करून होत नाही. ही एक दीर्घ प्रक्रिया असते. केली कृती आणि दिसला परिणाम असे होत नाही. त्यासाठी धैर्य आणि सातत्य लागते. जीवनाचा समग्र वेध घेणारी, त्यानुसार अधिकाधिक व्यवहार करणारी, योग्य गोष्टींना उचलून धरणारी, अयोग्य गोष्टींना वाईटपणा घेऊनही विरोध करणारी, योग्य अयोग्य आणि सारासार विचार सतत सांगणारी माणसे समाजात भरपूर संख्येने असावी लागतात. यासाठी त्या माणसांच्या जीवनाचा आणि समाजाच्या सामान्य जीवनाचा आधार आध्यात्मिक मूल्यांचा असावा लागतो. ऐहिक मूल्यांचा आधार असणारी माणसे चांगली आणि कळकळीची असली तरीही जीवनाचे योग्य मापदंड आणि मानदंड स्थापित करू शकत नाहीत. जीवनाचा आधार ऐहिक असेल तर पैसा, नावलौकिक, पदप्रतिष्ठा, लोकप्रियता, साधने, यश, सत्ता, वर्चस्व; यातूनच जीवनाची सफलता मोजली आणि जोखली जाणे अपरिहार्य ठरते. या ऐहिक गोष्टी कधीच कोणालाही व्यक्तीश: किंवा समूहश: पूर्ण समाधान देऊ शकत नाहीत. या सगळ्या ऐहिक मापदंडांच्या मर्यादा आणि त्या मर्यादांपाशी थांबण्याची प्रेरणा आणि समज आध्यात्मिक मूल्यव्यवस्थाच देऊ शकते.
('एकात्म मानववाद : अर्थ, यथार्थ' या येऊ घातलेल्या पुस्तकातील 'समाजचिंतन' या प्रकरणातील एक अंश.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा