मंगळवार, ६ सप्टेंबर, २०२२

थट्टेखोरांसाठी

डॉ. मोहनजी भागवत यांच्या 'भारतातील सगळे हिंदूच' या वक्तव्यावरून आधीही चर्चा झाली होती आणि कालपासून पुन्हा सुरू झाली आहे. या वक्तव्यावर टीका करणारे किंवा त्याची थट्टा करणारे यांनी अनंत काणेकर या प्रसिद्ध मराठी साहित्यिकांचं 'धुक्यातून लाल ताऱ्याकडे' हे छोटंसं पुस्तक वाचावं. १९३६-३७ साली लिहिलेलं हे पुस्तक, रशियातील कम्युनिस्ट क्रांतीचा चमत्कार भाविकपणे पाहण्यासाठी केलेल्या प्रवास वर्णनाचं पुस्तक आहे. काणेकर अजिबात हिंदुत्ववादी नव्हते. डॉ. भागवत यांच्या वक्तव्याच्या अनुषंगाने त्यात काय लिहिलेले आहे ते टीकाकारांनी आणि थट्टेखोरांनी वाचावे. त्यावेळी डॉ. भागवत यांचा जन्मही झाला नव्हता. राजकीय आखाड्यात जे कानावर पडते तेवढेच म्हणजे जगाचे संपूर्ण ज्ञान असे समजणाऱ्या सगळ्यांना कोपरापासून नमस्कार.

(या पुस्तकावरील माझा जुना लेख सापडला तर नक्की शेअर करीन.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा