शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०२२

सशस्त्र क्रांती

प्रा. सरोज गिरी नावाचे कोणी डावे विचारवंत (???) आहेत. त्यांनी republic tv वरच्या चर्चेत आज उघडपणे `होय, या देशात सशस्त्र क्रांती व्हावी असे मला वाटते.' असे विधान केले. त्यानंतर झालेल्या गोंधळानंतरही `मी आपल्या म्हणण्यावर ठाम आहे,' असे ते सातत्याने सांगत राहिले. डाव्यांचे वास्तव रूप अनेकदा उघड झालेले आहेच. आज ते परत एकदा उघडे पडले. हे महाशय प्राध्यापक आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ते कशा प्रकारे प्रबोधित करीत असतील? अन देशभरातील हजारो महाविद्यालयातील असे अनेक प्राध्यापक मिळून (याचा अर्थ एकत्र येऊन किंवा सगळ्यांचे स्वतंत्र योगदान एकत्रित करून) कोणती मानवता जन्माला घालत आहेत? आमच्या पद्धतीने चला, आमचे विचार मान्य करा अन्यथा सशस्त्र संघर्ष करू; ही भूमिका कोणता विचारी माणूस मान्य करू शकेल? तरीही त्यांची तळी उचलून धरणाऱ्यांना काय म्हणायचे आणि त्यांचे काय करायचे? मानवता, सहृदयता, सहिष्णूता यांची जपमाळ ओढणाऱ्या लोकांचा चेहरा आणि मन किती विकारी, विषारी अन विखारी आहे; हे अजूनही लक्षात येऊ नये? या महाशयांनी आज इतक्या जणांचे वस्त्रहरण केले की, कितीही श्रीकृष्ण आले तरीही यांची लाज झाकली जाणार नाही. खरे तर या वस्त्रहरणाचा पोत इतका विलक्षण आहे की, उघड्या पडलेल्या सगळ्यांची तर सोडाच कुणा एकाचीही लाज झाकेल एवढे वस्त्र आज अखिल जगात उपलब्ध नाही. मानवतेला लागलेल्या या कीड्यांनी शक्य झालेच तर किमान फाटक्या चिंध्यांमध्ये तोंड लपवता आले तर लपवावे.

- श्रीपाद कोठे

१० सप्टेंबर २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा