गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२

हिंदुत्वाची चिंता

हिंदुत्व ज्यांचा प्राण आहे असे अनेक प्रामाणिक कार्यकर्ते, विचारवंत, पत्रकार, सामान्य लोक सध्या सुरु असलेल्या शिवसेना-भाजप संघर्षावरून खूप चिंतीत आहेत. त्यांच्या भावना ठीक आहेत, पण एका गोष्टीकडे लक्ष वेधावेसे वाटते की- हिंदुत्व अशा एखाद्या युतीवर किंवा ती तुटण्यावर वगैरे अवलंबून नव्हते, नाही आणि असणार नाही. आपलं आजचं जीवन, आजची राजकीय व्यवस्था, आजची पक्षपद्धती यांचा मागमूसही नव्हता तेव्हापासून हिंदुत्व आहे. खरं तर इतिहास डोळे उघडतो तेव्हापासून हिंदुत्व आहे. अन अंतापर्यंत ते राहणार आहे. अशी असंख्य स्थित्यंतरे त्याने पचवून टाकली आहेत.

- श्रीपाद कोठे

२३ सप्टेंबर २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा