शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२

निष्पक्ष

कर्नाटकातल्या राज्य सरकारने नुकताच एक सभ्य निर्णय घेतला, सगळ्या कर्मचाऱ्यांनी अंगभर कपडे घालूनच आले पाहिजे. पुरुष तर साधारण अंगभरच कपडे घालतात. त्यामुळे हा निर्णय महिला कर्मचारी समोर ठेवून होता हे स्पष्ट आहे. यावर मते मतांतरे असतील, पण गमतीचा भाग म्हणजे प्रसार माध्यमांनी यावर काहीही कोल्हेकुई केली नाही. भारतीय जनता पार्टीने असा काही निर्णय घेतला असता तर केवढे वादळ उठले असते. शिवसेनेने मुंबईतील दुकानांमध्ये लागलेले स्त्रियांचे पुतळे हटवण्याचा प्रस्ताव दिला तेव्हा केवढा गहजब झाला होता. आता मात्र प्रसार माध्यमे आणि स्त्रीवादी देखील `अळीमिळी गुपचिळी'. कुठे गेले तत्व आणि कुठे गेले स्वातंत्र्य? कर्नाटकात कॉंग्रेसचे सरकार आहे हे तर कारण नसावे? इतर वेळी जो उपटसुंभपणा पाहायला मिळतो त्यामागील खरे सूत्रधार कोण म्हणायचे? आणि तरीही प्रसार माध्यमे निष्पक्ष? हाहाहा !!!

- श्रीपाद कोठे

१८ सप्टेंबर २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा