बुधवार, १० ऑगस्ट, २०२२

मुस्लिम धर्मगुरूंचा पुढाकार

माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी पदावरून जाताजाता जे विधान केले त्यावर टीका होते आहे. ती अतिशय रास्तही आहे. त्याच वेळी त्याच दिवशी भारतातल्या एक हजार मुस्लिम धर्मगुरूंनी संयुक्त राष्ट्रसंघाला पत्र लिहून हाफिज सैदविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याच पत्रात दहशतवादी गटांचा बंदोबस्त करण्याची मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय ७० हजार मुस्लिम धर्मगुरूंनी ISIS विरुद्ध फतवा जारी केला असून दहशतवादी संघटना `गैर इस्लामिक' असल्याचे म्हटले आहे. इस्लामी धर्मगुरूंच्या या पुढाकाराची दखल घेऊन त्यांचे अभिनंदन करणेही आवश्यक कर्तव्य आहे. संघर्ष असो वा सामाजिक जीवन; सतत बेरीज करीत जायला हवे. देशासाठी, मानवतेसाठी उभे राहणारे सगळेच आपले म्हटले पाहिजेत.

- श्रीपाद कोठे

११ ऑगस्ट २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा