सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२

गोहत्या

गोहत्या, गोरक्षण, गोमांस भक्षण यांची बरीच चर्चा होत असते. हिंदू, अहिंदू असाही मुद्दा येतो. वेदकाळातही गोमांस भक्षण करीत असत वगैरे मुद्देही येतात. वेदातील ते उल्लेख इंद्रिये या अर्थाने आहेत हा युक्तिवादही मांडला जातो. या साऱ्यात मूळ विषय बाजूलाच सारला जातो. मुद्दा आहे की, अशा प्रकारे आपल्या आहारासाठी गायी वा अन्य पशुपक्षी यांची हत्या योग्य ठरेल का? पर्यावरण, जैवविविधता, नीतीमत्ता आणि मानवी मनाची उन्नती या कोणत्याही अंगाने ते योग्य म्हणता येत नाही. क्षणभर मान्य केले की, वेदकाळात गोमांस भक्षण करीत असत, पण म्हणून ते आजही केले पाहिजे असे तर नाही ना? हिंदू चिंतन तर काळाच्या, व्यवस्थांच्या कोणत्याही टप्प्यावर थांबून राहण्याचा आदेश देत नाही, अट्टाहास करीत नाही. त्यामुळे आधी काय होते वा नाही याने काय फरक पडतो? जे योग्य आहे ते स्वीकारणे हेच इष्ट. जुन्या गोष्टी आहेत म्हणून धरून ठेवणे योग्य नाही आणि योग्य गोष्टी सुटून गेल्या असतील तर त्यांचे पुनरुज्जीवन करण्यातही गैर काहीच नाही. तुमचं-आमचं, जुनं-नवं हे वाद, विचारांची ही पद्धत मुळातच चूक. समग्रतेने आणि जीवन हे साचलेले डबके नसून प्रवाह आहे हे जाणून घेऊन विचार करणेच योग्य असू शकते.

- श्रीपाद कोठे

२३ ऑगस्ट २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा