शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२

स्वयंचलित गाड्या

लोकांना परवडतं म्हणून चार पाच गाड्या घेण्याची परवानगी का देता? असा सवाल उच्च न्यायालयाने सरकारला विचारला आहे. मुंबईतील पार्किंगच्या जागेसंबंधात एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा प्रश्न उपस्थित केला आहे. अतिशय महत्वाच्या मुद्याला न्यायालयाने तोंड फोडले आहे पण गांभीर्याने हा मुद्दा रेटला जाईल का हा खरा प्रश्न आहे. गाड्या, स्वतःच्या मालकीच्या गाड्या, स्वतःच्या मालकीच्या मोठाल्या गाड्या; या गोष्टी फक्त प्रतिष्ठेच्या तकलादू कल्पना आहेत. दुसरे काहीही नाही. स्वयंचलित वाहन हा विज्ञानाचा आविष्कार म्हणता येईल आणि जगणे सुखाचे आणि सोयीचे करण्यासाठी त्याचा वापरही केला पाहिजे. त्यात गैर काहीही नाही. पण स्वयंचलित वाहने याचा अर्थ सार्वजनिक वाहतुकीची वाहने, रुग्णवाहिका, मालवाहू वाहने इत्यादीही होतो. स्वयंचलित वाहने याचा अर्थ फक्त वैयक्तिक मालकीची वाहने असा होत नाही. अन सगळ्या अंगांनी विचार करता स्वतःच्या मालकीच्या स्वयंचलित वाहनांचा सोस हा खोट्या प्रतिष्ठेपलीकडे काहीही नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या प्रश्नाच्या अनुषंगाने हा विषय गंभीरपणे रेटला पाहिजे.

व्यक्तिगत स्वयंचलित वाहने हा अर्थव्यवस्थेचा मोठा भाग आणि आधार असल्याचा युक्तिवाद केला जातो आणि करता येईलही. पण त्यात फारसे तथ्य नाही. अगदी प्रामाणिकपणे असा दावा करणाऱ्यांना एक तर काही समजत नाही किंवा ते बदमाश आहेत, असे नाईलाजाने म्हणावे लागेल.

- श्रीपाद कोठे

१३ ऑगस्ट २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा