सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२

रुपयाचे अपमूल्यन

सरकारे वेळोवेळी चलनाचे अवमूल्यन करतात. त्याच प्रकारे चलनाचं अपमूल्यन करता येत नाही का? अपमुल्यनाबद्दल ऐकण्या, वाचण्यात नाही. पण करायला काय हरकत आहे. चंद्रशेखर सरकारने देश चालवण्यासाठी सोने गहाण टाकल्यानंतरच्या घडामोडीत नरसिंहराव सरकारने रुपयाचे ३० टक्के अवमूल्यन केले होते. आजची आर्थिक स्थिती त्या वेळेपेक्षा कितीतरी चांगली आहे. परकीय गंगाजळी ओसंडून वाहते आहे. सोन्याचा साठा वाढला आहे. तीस वर्षांनंतर आता रुपयाचे अपमूल्यन करायला हवे. आज ७५ च्या घरातील डॉलर ३० टक्केच अपमूल्यन केल्यास ५० च्या जवळ जाईल. त्याचा बराच फायदा होऊ शकेल.

- श्रीपाद कोठे

२३ ऑगस्ट २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा