रविवार, २१ ऑगस्ट, २०२२

धर्मनिरपेक्ष बावळटपणाचा सुंदर नमुना.

`टाईम्स नाऊ' वरील कालची चर्चा. महान अर्णव गोस्वामी संचालन करतात ती.

विषय १... उत्तर प्रदेशातील ८४ कोसी परिक्रमा.

त्याने विश्व हिंदू परिषदेच्या प्रतिनिधीला सुनावले की तुम्ही (म्हणजे विहिंप) काही सगळ्या हिंदूंचे प्रतिनिधी नाही.

विषय २... डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या.

अर्णवची सगळी चर्चा- ही हत्या हिंदुत्व वाद्यानीच केली नाही हे सिद्ध करा.

म्हणजे कोट्यवधी हिंदू पाठीशी असणारी विहिंप हिंदूंची प्रतिनिधी नाही आणि हत्या करणारा हिंदू की मुस्लीम की ख्रिश्चन हेही स्पष्ट झाले नसताना तमाम हिंदुत्वाभिमानी त्यासाठी जबाबदार.

काही लाख दर्शक असलेले `टाईम्स नाऊ' १२१ कोटी भारतीयांचे प्रतिनिधी.

५० टक्केही मते नसणारी सरकारे देशाची (राज्याची) प्रतिनिधी आणि ठेकेदार.

बहुसंख्य लोक अंधश्रद्धा चळवळीबाबत अनभिज्ञ असताना वा त्यातील अनेक गोष्टींबद्दल त्यांना आक्षेप असतानाही त्या चळवळीच्या नेत्याची निर्मम हत्या झाली आणि बुद्धिवादी अतिरेकी तुटून पडले म्हणून लगेच विधेयक पारित. म्हणजेच तो प्रातिनिधिक विचार.

प्रतिनिधित्व म्हणजे काय? मोठ्या संख्येचा पाठिंबा की १००% पाठींबा?

मोठी संख्या म्हणजे लोकशाही असेल तर अल्पसंख्येचे प्रतिनिधित्व करणारी सरकारे वा त्यांची कामे लोकशाहीचे पोषण करणारी म्हणता येतील का?

सत्यता आणि योग्यता यांची कसोटी संख्या नसेल तर प्रतिनिधित्व वगैरे वगैरे वगैरे निरर्थक म्हणावे का?

विचार व विवेकाच्या गोष्टी करतानाच मी वेगळा विचार मांडला म्हणून मी अंधश्रद्धा वा हुकूमशाहीचा समर्थक होईन का?

बावळटपणाचा विजय असो.

- श्रीपाद कोठे

२२ ऑगस्ट २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा