सोमवार, ११ जुलै, २०२२

पाक समाप्ती

७० वर्षांपूर्वी पाकिस्तान जन्माला घालण्यासाठी धडपड करणारे पाश्चात्य देश, आज पाकिस्तानला ठेचण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. याचेच पुढचे पाऊल पाकिस्तानची समाप्ती राहील. भस्मासुराची कथा आठवावी असा हा प्रवास आहे. दोनच गोष्टी वाटतात- १) पाकिस्तान जन्माला आले त्याचा भारताला उपयोग तर काहीच झाला नाही, उलट कायमची डोकेदुखी मागे लागली. पाकिस्तानची समाप्तीदेखील नवीन डोकेदुखीच्या रुपात मागे लागू नये. पाकिस्तानच्या भावी समाप्तीचे समाधान वा आनंद यात वावगे काही नसले तरीही, त्यात सहभागी असणाऱ्या आणि रुची घेणाऱ्या पाश्चात्य देशांना भारताबद्दल प्रेम नाही. याचा विसर पडणे धोकादायक ठरू शकते. २) अशाच प्रकारच्या घडामोडीतून माणूस सभ्य, सुसंस्कृत, विकसित होत आला आहे. त्याच्या जाणीवा, त्याचे विचार समृद्ध होत आले आहेत. जीवनाची मूल्ये रुजत आलेली आहेत. नवीन जागतिक राजकीय घडामोडी, नवीन मानवीय आणि मानवी राजकीय संस्कृती आणि व्यवस्था यांच्याकडे घेऊन जाणाऱ्या ठरोत.

- श्रीपाद कोठे

१२ जुलै २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा