रविवार, ३१ जुलै, २०२२

माणूस व पक्ष

आपल्या लोकशाही व्यवस्थेचे खूप वेगवेगळे विश्लेषण होते. पण या व्यवस्थेने समाजाचे पक्षांमध्ये विभाजन करण्याचा अक्षम्य अपराध केला आहे. पक्ष, पक्षाचे मुखपत्र, पक्षाचे प्रवक्ते यांचे म्हणणे, यांचे विचार; त्या त्या पक्षाचे असतात हे खरेच. पण एखाद्या पक्षाचा समर्थक, मतदाता अशा सामान्य माणसाचे विचार त्याचे स्वत:चे असू शकतात/ असतात हे समजण्याची क्षमताच आम्ही गमावतो आहोत का? एखाद्या व्यक्तीचे मत वा विचार वा भूमिका, त्याची स्वतंत्र असते, विशिष्ट पक्षाचीच री तो ओढत असेल किंवा त्याने ओढावी असे म्हणणे तर्कदुष्ट आहे. मत देण्याचा आशय वेगळा आहे. मत देणे याचा अर्थ त्याने स्वत:ची अक्कल, समज, बुद्धी त्या पक्षाला ना विकलेली असते, ना गहाण टाकलेली. पण त्याने काही मत/ विचार मांडले की लोक आपसात तो अमुक पक्षाचा, तो तमुक पक्षाचा असेच पाहायला लागतात अन त्यानुसारच अर्थ लावू लागतात. हे मानसिक दुर्बलतेचे लक्षण आहे. ही मानसिक दुर्बलता मनोरोगात बदलण्यापूर्वी टाकून दिली पाहिजे. माणसांचे, समाजाचे स्वतंत्र अस्तित्व आहे. माणूस वा समाज पक्षांचा गुलाम नाही.

- श्रीपाद कोठे

१ ऑगस्ट २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा