मंगळवार, १९ जुलै, २०२२

उफराटेपणा

आरोग्यविषयक, कुटुंबविषयक, सामाजिक वा अन्य बरेच प्रश्न, समस्या या नवीन (पाश्चात्य) जीवनशैलीची देणगी आहे, असे मत अनेक तज्ञ, अभ्यासक, विचारवंत, कार्यकर्ते, लेखक वगैरे व्यक्त करत असतात. अन त्यावर मात करण्यासाठी काय करावे याचीही चर्चा, मार्गदर्शन करत असतात. मनात प्रश्न येतो की, ज्या गोष्टीमुळे समस्या निर्माण होतात ती गोष्टच सोडून द्यायला, टाकून द्यायला कोणी का सांगत नाहीत? म्हणजे अमुक जीवनशैलीने समस्या निर्माण होतात हे कळले तरी; समस्या उत्पन्न करत राहा आणि मग त्यावर उपाय करा. मात्र समस्याच कमी होतील असे काही करण्याचा विचारही करू नका. धन्य आहे माणसा तुझी !!! वाट्टेल ते, वाट्टेल तसं, वाट्टेल तेवढं, वाट्टेल तेव्हा खा; इनो आणि कायम चूर्ण घ्या. तरीही आमचं कौतुकच करा, अन आम्हाला काही सांगू नका.

- श्रीपाद कोठे

२० जुलै २०२१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा