बुधवार, ६ जुलै, २०२२

स्वातंत्र्य लढ्याचा वाद

स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणे न घेणे याचा वाद हा मूर्खपणा आहे. स्वातंत्र्य लढ्याचे किंवा कोणत्याही कामाचे असे वर्गीकरण हा नीचपणा आहे. कोणत्याही चांगल्या कामाची आपली प्रेरणा काय असते हा महत्त्वाचा मुद्दा आहे. शेट्टी यांचं विधान चूक आहेच पण या नीचपणाची सुरुवात काँग्रेसने केली आहे. संघ सहभागी होता नव्हता ही चर्चा काँग्रेसनेच सुरू केली. अन त्यांना उत्तरे देणाऱ्यांचीही चूक आहे. काँग्रेसने फक्त काँग्रेससाठी लढा दिला होता का? हा प्रश्न विचारला जायला हवा. जो पिकवेल तो खाईल, जो कमवेल तोच खर्च करेल, ज्याने लढा दिला त्याचंच स्वातंत्र्य; ही सगळी गाढव विचारसरणी आहे. त्या तर्कटांना उत्तरे देण्यापेक्षा त्याच्या मुळाशी असलेली वृत्ती किती क्षुद्र आहे हे मांडण्याची अन समजून घेण्याची गरज आहे.

- श्रीपाद कोठे

७ जुलै २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा