गुरुवार, १४ जुलै, २०२२

फक्त अर्थकारण

एका मित्राने त्याच्या भिंतीवर दै. सकाळमधील कुंभमेळ्याच्या अर्थकारणाची बातमी टाकली आहे. कित्येक कोटींची उलाढाल या मेळ्यात होणार अशी. माहिती चांगलीच आहे. अन हा मित्रही हिंदुत्व, धर्म वगैरेचा विरोधक नाही. मात्र कुंभमेळ्याचे हे विश्लेषण मर्यादित आणि सदोष वाटल्याने त्यावर प्रतिक्रिया दिली. तीच अन्य मित्रांसाठी, वाचकांसाठी-

हे विवेचन खरेच आहे. पण योग्य नाही. गेल्या शंभरेक वर्षात आपल्याला अनेक सवयी चुकीच्या लावण्यात आल्या. त्याने खूप खोलवर अयोग्य परिणाम केले आहेत. त्यावर सामाजिक मंथन होणे आवश्यक आहे. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीची उपयुक्तता आणि पुढे जाऊन उपयुक्तता म्हणजे त्यातून किती पैसा जमा होतो. महाकुंभाने पैसा गोळा होतही असेल. होवो. ती स्वाभाविक प्रक्रिया आहे. पण पैसा समजा गोळा झाला नाही किंवा कमी गोळा झाला, तरीही त्याचे महत्व कमी होण्याचे कारण नाही. राष्ट्राची एकात्मता; भावनिक गुंफण, जपणूक; त्यातील धार्मिक आणि आध्यात्मिक आशय, मुख्य म्हणजे पैसा मिळणे किंवा खर्च होणे हे कोट्यवधी लोकांनी काही काळ तरी मनातून बाजूला करणे; या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत. पैसा महत्वाचा नक्कीच आहे अन त्याचा योग्य विचार व्हावाही, पण त्याचा अर्थ प्रत्येक गोष्टीचे मोजमाप करताना तो आलाच पाहिजे असे नाही. आता तर आईच्या कामाचेही पैशात मूल्यमापन करण्याचे फार काही वाटत नाही. हा चुकीचा प्रकार आहे. नुसत्या पैशाचा विचार करणाऱ्यांना उत्तर देण्याचीही खरे तर गरज नाही.

- श्रीपाद कोठे

१५ जुलै २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा