शुक्रवार, ८ जुलै, २०२२

राजेशाही

आम्ही प्रचंड conditioned असतो. उदा. लोकशाही. कोणी याबद्दल बोलायचा प्रयत्न जरी केला तरी त्याच्याकडे असं पाहिलं जातं की; हा किती वाईट, हा किती मागासलेला, हा किती दुष्ट. पण आमची विचार करण्याची तयारी नसते. जिथे लोकशाही नावाची ही व्यवस्था प्रथम विकसित झाली तिथे राजे फारसे चांगले, आश्वासक नव्हते. आमच्या देशात (भारतात) ही स्थिती नव्हती. रामापासून तर अगदी अलीकडच्या शिवाजी महाराज, शाहू महाराज, गायकवाड महाराज, अहिल्यादेवी होळकर किंवा थोडे त्यापूर्वीचे; विक्रमादित्य, अशोक, हरिहर बुक्कराय; किंवा स्वामी विवेकानंद यांना अनेक प्रकारे साहाय्य करणारे राजे वा संस्थानिक; किंवा छोट्या छोट्या राजांनी केलेल्या कामांचे मिळणारे ऐतिहासिक पुरावे; या सगळ्यातून लक्षात येते की, राजे सुद्धा चांगले होते. याचा अर्थ हा नक्कीच नाही की, लोकशाही सोडून राजेशाही स्वीकारावी. तसे तर अगदी कम्युनिस्ट वा हुकूमशाही पद्धतीत सुद्धा काही तरी चांगले असू शकते दाखवायला. चीन हे अलीकडचं उदाहरण. सारांश एवढाच की, कोणत्याही व्यवस्थेबद्दल अवास्तव ममत्व न बाळगता, गुणदोषांची, अनुभवांची, क्षमतांची आणि मर्यादांची मोकळी चर्चा करायला हवी आणि त्यात बदलाची/ सुधारणेची तयारी ठेवायला हवी.

- श्रीपाद कोठे

९ जुलै २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा