गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१

सत्ता व समाज

आज सहज दोन मराठी चित्रपट आठवले. `शिक्षणाच्या आयचा घो' आणि `कायद्याचं बोला'. भरत जाधवने मुख्यमंत्र्यांच्या घरी आवेशात मांडलेले विचार आणि मकरंद अनासपुरेने न्यायालयात कायदा आणि न्याय व्यवस्था यावर केलेलं भाष्य; हेही आठवलं. उदाहरण म्हणून; या दोन्हीचा आपल्याला समाज म्हणून किती आठव आहे? हे चित्रपट आले तेव्हा वेगळ्या पक्षांची सरकारे होती. त्यामुळे दोन्ही चित्रपटातून मांडलेल्या स्थितीसाठी ती सरकारे जबाबदार असे समाज धरून चालला. मुद्दा असा की, आज सरकारे बदलली म्हणून त्या स्थितीत फरक पडला का? या आणि त्या सरकारांचे समर्थक लगेच विश्लेषण आणि कारणमीमांसा करू लागतील. परंतु, समाजाची जडणघडण हा `सत्ता' या गोष्टीपेक्षा खूप मोठा विषय आहे. याच्याकडे किंवा त्याच्याकडे असलेली सत्ता म्हणजे; समाजाची सुव्यवस्थित बांधणी करण्याची संधी असते. सत्ता असणे म्हणजे आपोआप समाज उभा राहणे नसते.

- श्रीपाद कोठे

१७ डिसेंबर २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा