मंगळवार, २८ डिसेंबर, २०२१

मूल्यभान

स्वातंत्र्य, समता, लोकशाही वगैरे मूल्यांनी जगाचं अतोनात नुकसान केलं आहे. अजूनही करत आहेत. त्यावर विचार व्हायला हवा. या गोष्टी साधन असू शकतात, पण मूल्य नाही. स्वा. सावरकरांच्या गीतातील `जे जे उत्तम, उदात्त, उन्नत...' हे शब्द आपल्याला पाठ असतात. पण उत्तम, उदात्त आणि उन्नत होण्याची/ असण्याची ओढ आणि प्रेरणा या मूल्यांनी कुस्करून टाकली आहे. आपण जन्मजात तसेच आहोत अशा थाटात प्रत्येक जण वागताना दिसतो, तो याचाच परिणाम. व्यक्तिश: आणि समूहश: आपली विचारप्रक्रिया, मानसिकता इतक्या खोलपर्यंत बिघडलेली आहे की विचारता सोय नाही. अगदी इलेक्ट्रिशियन, प्लंबरपासून तर स्त्री पुरुष समानतेच्या लढ्यापर्यंत; किंवा औद्योगिक विवादापासून शिक्षकांच्या दर्ज्यापर्यंत असंख्य गोष्टी विनाकारण गुंतागुंतीच्या होऊन अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. एवढेच नव्हे तर समस्या सोडवण्याचे प्रयत्नदेखील या मूल्यांनी तयार केलेल्या आपल्या मानसिकतेमुळे यशस्वी होऊ शकत नाहीत.

- श्रीपाद कोठे

२९ डिसेंबर २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा