रविवार, २६ डिसेंबर, २०२१

मानव

 १) भांडवलशाही आणि उपभोगवाद,

२) समाजवाद आणि लोकशाही,

३) विज्ञानवाद आणि इहवाद,

ही तीन नाणी आहेत आणि त्या प्रत्येक नाण्याच्या दोन दोन बाजू.

- पहिल्या नाण्याने माणसाला पशू समजले आणि पशू बनवले.

- दुसऱ्या नाण्याने माणसाला मतदार समजले आणि मतदार बनवले.

- तिसऱ्या नाण्याने माणसाला निर्जीव दगड समजले आणि निर्जीव दगड बनवले.

*****************

जगातील आजचे सगळे विचार, व्यवस्था, विमर्श, व्यवहार; या तीनपैकी कुठल्या तरी साच्यात किंवा त्यांची सरमिसळ करून सुरू आहेत. त्यालाही मोठा काळ लोटला आहे. हाती फक्त शून्य. त्यामुळे फक्त विचार, व्यवहार, व्यवस्था यांची चर्चा करून उपयोग नाही. तर या तीनपेक्षा वेगळा असलेला मानव समजून घ्यावा लागेल. मानवाची भारताची कल्पना ही याहून भिन्न आहे. सगळ्यात पहिले ती समजून घेणे आणि समजावून देणे आवश्यक आहे. त्यानंतर बाकी साऱ्या गोष्टी. असाच क्रम असावा लागेल. त्याला पर्याय नाही.

- श्रीपाद कोठे

२७ डिसेंबर २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा