शनिवार, १८ डिसेंबर, २०२१

नागरिकत्व

विविध युरोपीय देशांचा विस्तारवाद, हा विस्तारवाद आवरताना केलेली अनैसर्गिक देशांची रचना, दोन्ही (विशेषतः दुसरे) महायुद्धे यांच्यात आजच्या असंख्य समस्यांची बीजं आहेत. यांना युरोपीय पुनर्जागरणाने खतपाणी घातले आहे. घुसखोरी, शरणार्थी, नागरिकता हे विषयही त्यात येतात. स्वामी विवेकानंद किंवा गांधीजी यांच्या चरित्रात कुठेही पासपोर्ट, व्हिसा इत्यादी गोष्टी आढळत नाहीत. कारण त्यावेळी त्या नव्हत्याच. अनंत काणेकर यांनी 'धुक्यातून लाल ताऱ्याकडे' या शीर्षकाचे युरोप, रशिया भेटीचे प्रवासवर्णन लिहिले आहे. १९३० च्या दशकात. त्यातदेखील कुठेही पासपोर्ट, व्हिसा यांचा उल्लेख नाही. मग आज जगभरात हे विषय एवढ्या संघर्षाचे का होत आहेत? खूप खोलात जाऊन या गोष्टींचा विचार व्हायला हवा आहे.

(सध्या देशात सुरू असलेल्या वादाबाबत कोणती भूमिका मी घेतलेली नाही. प्रत्येकाने भूमिकाच घ्यावी, विचार करू नये; असे तर नाही नं. तसंच  सगळ्यांनी 'आज आणि आत्ता' यावरच बोलावं असंही नाही. मी विचार मांडतो आहे.

- श्रीपाद कोठे

१९ डिसेंबर २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा