गुरुवार, ३० डिसेंबर, २०२१

जीवनशैली

काल श्री. नितीन गडकरी यांच्या एका कार्यक्रमाची बातमी प्रसिद्ध झाली आहे. चांगल्या आरोग्यासाठी जीवनशैलीत बदल करण्याची गरज आहे, असे विचार श्री. गडकरी यांनी व्यक्त केल्याचे बातमीत म्हटले आहे. हा विचार नवीन नाही. सगळ्यांनाच आता ते पटू लागले आहे. त्यातही श्री. गडकरी यांच्यासारख्या व्यक्तीने ते म्हटले याला महत्व आहे. त्यांनी म्हटल्यामुळेही आता अनेकांना ते पटेल. फक्त एवढेच वाटते की, श्री. गडकरी यांनी या विषयाचा पाठपुरावा करावा. हा विषय इथेच थांबू नये. अन जीवनशैली बदलणे हा जो उपाय आहे त्याची सखोल, विस्तृत, व्यापक चर्चा व्हावी. आमचे आजचे प्राधान्यक्रम, जगण्याच्या वर्तमान प्रेरणा, उत्पादन- वितरण- उपभोगाच्या पद्धती, शहरांचे आकार, तंत्रज्ञान, सुखसाधने, विचारशून्यता, वेळेची उपलब्धता, जग आणि समाज यांचे दडपण; अशा जीवनशैलीला प्रभावित करणाऱ्या असंख्य घटकांचा साधकबाधक विचार होईल यासाठीही पुढाकार घ्यावा. आजच्या पद्धतीनेच (व्यवहार, तत्व, सिद्धांत, विचार, दिशा) जगणे रेटत राहून जीवनशैली बदलण्याचा विचार करणे हे वाळूवर रेघोट्या ओढणे ठरेल. त्यामुळे जी अतिशय योग्य भूमिका श्री. गडकरी यांनी मांडली त्याच्या सर्व अंगांचा विचार तरी प्रारंभ व्हावा एवढेच.

- श्रीपाद कोठे

३१ डिसेंबर २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा