शुक्रवार, २४ डिसेंबर, २०२१

ठकासी आणावा महाठक

 'ठकासी आणावा महाठक' ही समर्थोक्ती प्रसिद्ध तर आहेच पण लोकप्रियदेखील आहे. आजकाल तर फारच सुळसुळाट झाला आहे या तत्वाचा. पण समर्थांच्या एकूण विचारसंपदेत हा विचार किती आहे? कसा आहे? ब्रम्ह निरुपणापासून तर असंख्य ऐहिक, लौकिक, आध्यात्मिक विचारांचा, भावांचा, व्यवहारांचा उहापोह समर्थांनी केला आहे. त्यासह आणि त्या प्रमाणात 'ठकासी आणावा महाठक' हे योग्य वाटते. मात्र त्याशिवाय आणि प्रमाणात नसलेले हे तत्व योग्य म्हणावे का? ते तर फक्त दोन बोक्यांचे भांडण म्हणावे लागेल.

- श्रीपाद कोठे

२५ डिसेंबर २०१९

*********

याला आभास कसं म्हणायचं? अनेक जण मिनिटभराचा का होईना, आपला वेळ खर्च करतात, शुभेच्छा व्यक्त करतात, प्रार्थना करतात; ती व्यक्ती, तिचं मन प्रत्यक्ष हे करत असतात.. हा आभास नसतो, हे वास्तव असते. प्रत्यक्ष हातात हात घेणे किंवा मूर्त रुपात जवळ असणे, दिसणे, अनुभवणे हे वास्तवाचं एक रूप; तर यातील काहीही नसलेलं वास्तवाचं हे दुसरं रूप. अरुपासारखं भासणारं रूप. तरल वास्तव. आपण सगळ्यांनी व्यक्त केलेल्या भावना म्हणूनच वास्तव आहेत. विश्वातील समग्र कटुतेला पुरून उरणारी आणि उरण्याएवढी मधुरता, जपण्याची अन जोपासण्याची शक्ती यातून मिळेल असा विश्वास आहे.

सगळ्यांना धन्यवाद.

- श्रीपाद कोठे

२४ डिसेंबर २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा