रविवार, १९ डिसेंबर, २०२१

धर्मांतर

धर्मांतराच्या मुद्यावरून खूप अकलेचे तारे तोडले जात आहेत. थोडा शिखांचा इतिहास काढून बघण्याची तसदी फारसे कोणी घेत नाही. गुरु नानकदेवांपासून गुरु तेगबहादूर यांच्यापर्यंत नऊ शीख गुरूंनी इस्लामला आत्मसात करण्याचा अथक प्रयत्न केला. अखेरीस दहावे गुरु, गुरु गोविंद सिंग यांना खालसा पंथ स्थापन करावा लागला होता. त्यांनी नाराच दिला होता-

सकल जगत मे खालसा पंथ गाजे

जगे धर्म हिंदू सकल भंड भाजे

अन त्यांच्या, ९ वर्षांचा जोरावर सिंह आणि ७ वर्षांचा फतेह सिंह या छाव्यांना मुस्लिम पंथ न स्वीकारल्याबद्दल भिंतीत चिणून मारण्यात आले होते.

ही काही फार जुनी गोष्ट नाही. फक्त ३१० वर्षे झाली त्याला.

आपण १७ व्या नाही तर २१ व्या शतकात आहोत. त्यावेळचा इस्लाम आज नाही. त्यावेळचा हिंदू आज नाही. त्यावेळची राजकीय, सामाजिक, आर्थिक, जागतिक स्थिती आज नाही. हे सगळं खरं आहे. पण अजूनही ती मानसिकता मोठ्या प्रमाणात आहे, हेही सत्य आहे. मुख्य म्हणजे- भोळेपणा कौतुकाचा विषय ठरू शकतो. मात्र त्याने काही साध्य करता येत नाही. मन परिवर्तन, मानवता वगैरे सुद्धा सजग, सावध राहून आणि संदर्भ लक्षात ठेवून आणि घेवून करावयाच्या गोष्टी आहेत; हे भान सुटता कामा नये.

- श्रीपाद कोठे

२० डिसेंबर २०१४


- वावा छान विश्लेषण केले आणि घरवापसीचे समर्थन केले पण एक गोष्ट विसरले साहेब, घर वापसी मध्ये जात कोणती मिळाली ? कारण हिंदू धर्म जाती विरहित आहे हे म्हणायचे धाडस आपण सुद्धा करणार नाही.

- हो, मी ते धाडस करतो.

- मग हे धाडस नीखलास खोट आहे आणि खोटे विचार ही हिंदू संस्कृती नसावी.

- Shahaji Patodekar तुम्ही तुमचे मत सांगू शकता, पण मी खोटा आहे हे कसे? याला धाडस म्हणायचे की मूर्खपणा? खऱ्याचा ठेका काय तुम्हाला देऊन ठेवला आहे का कोणी? यालाच म्हणतात, अक्कलशून्यता किंवा बौद्धिक दहशतवाद. म्हणजे मी म्हणतो तेवढेच फक्त खरे. कारण ते मी म्हणतो आहे. बाकीचे सारे खोटे. जरा स्वत:ला तपासा. जीभ उचलून टाळूला लावण्याचा उद्योग बंद करा.

- आहो असे गोल गोल बोलू नका आणि चुकीचा संदेश ठासून सांगू नका. 

घर वापसी वाल्यांना जात कोणती दिली ते सांगा. 

आम्ही आक्कलशून्य असू पण आक्कलवाल्यानी नीट आक्कल वापरावी सरळ मार्ग .उगाच जनतेला फसवू नये

- Shahaji Patodekar, राज्य घटनेने जर जातीविहीन समाज निर्माण केला आहे तर नसलेल्यालाही जात देण्याचा आचरटपणा कशाला करायचा? जातीशिवाय जगायला शिका ना !!! उगाच तोंडाच्या वाफा कशाला दवडायच्या? नाही तर म्हणा आम्हाला जातीवर आधारित समाजच हवा म्हणून किंवा आम्ही इतके नालायक आहोत की आम्ही जातीशिवाय जगूच शकत नाही म्हणून. जे जगू शकतात त्याविना त्यांना जगू द्या ना. मुळात काही चांगल्या आदर्श अशा निर्मितीत रस असणे वेगळे आणि नुसती कावकाव करणे वेगळे असते राव. अन यापुढे तुमच्याशी वाद करण्याची माझी इच्छा नाही. कृपया आपले सडके विचार स्वत:जवळ ठेवावे. माझ्या पोस्टवर उपदेश, सल्ले वा चर्चा करू नये.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा