शनिवार, ११ जून, २०२२

जय जगत

NDTV वर रवीश बंगलोरच्या एका १९ वर्षीय मुलीला कारागृहात टाकण्याबद्दल सांगतो आहे. प्रकरण लक्षात यावे म्हणून फक्त दोन वाक्ये -

या मुलीने असदुद्दीन ओवैसी यांच्या कोणत्या तरी सभेत 'पाकिस्तान जिंदाबाद' अशी घोषणा दिली होती. तिला लगेच बाजूला करण्यात आले. तिचे म्हणणे असे की, तिला जगातल्या सगळ्या देशांचा जयजयकार करायचा होता. रवीशचे म्हणणे असे की, हे तर वसुधैव कुटुंबकम आहे.

माझी टिप्पणी -

श्री. रवीश -

१) हे वसुधैव कुटुंबकम नाही. हा आचरटपणा आहे.

२) विनोबांचे 'जय जगत' हे वसुधैव कुटुंबकम आहे.

३) वसुधैव कुटुंबकम हा सिद्धांत नाही. ती आकांक्षा आहे. त्यासाठी एक दीर्घ प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेच्या शेवटी प्राप्त होणारं ते फळ आहे.

४) बटाट्याची भाजी करायची म्हणजे बटाटे आणून ठेवून द्यायचे किंवा तशी इच्छा व्यक्त करायची म्हणजे झाले, असे नसते.

- इथे एवढंच पुरे. तुम्हाला समजेल असं समजतो. लक्षात येणार नसेल तर केव्हाही माझ्याकडे या. हा एक विषय समजवायला मी तुम्हाला तुम्ही म्हणाल तेवढे दिवस देईन.

५) देशातल्या तरुणांची बाजू घेत जाच. आता घेता त्याहून जास्त घेत जा; पण विषयांची जाण, विषयांची मांडणी, प्रक्रिया यासंबंधात त्यांचे प्रबोधनही करत जा.

६) मुंह मे आया बक दिया, याला शहाणपण म्हणत नाहीत हे कृपया तुम्हीही लक्षात घ्या आणि बाकीच्यांनाही सांगत चला.

- श्रीपाद कोठे

११ जून २०२२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा