बुधवार, २९ जून, २०२२

गर्वहरण

असं म्हणतात की, माणूस ज्याचा गर्व करतो त्याच गोष्टीत त्याची नाचक्की होते आणि ईश्वर त्याचं गर्वहरण करतो. अहंकार काबूत ठेवण्याची ही त्याची पद्धत. भारतीय जनता पार्टीचे असेच झाले असेल का? नुकतेच केंद्र सरकारला एक वर्षं झाल्याबद्दल सगळीकडे उच्चरवात सांगितले गेले की, वर्ष झाले पण आमच्यावर आरोप नाही भ्रष्टाचाराचा !! कदाचित त्याचा गर्वच भोवला. चांगलं काम करा, चांगले राहा पण ते डोक्यात जाऊ देऊ नका, हाच तर नियतीचा संदेश नसेल.

सहज एक आणखीन. एक संदेश वाचण्यात आला- `आम्ही काही महागाई कमी व्हावी म्हणून मत दिले नव्हते. चांगल्या शासनासाठी दिले होते वगैरे.' हा संदेश तयार करणारे भाजपचेच असावेत यात शंका नाही. आणि पक्षाच्या समर्थकांच्या माध्यमातून तो पसरला. पण पक्षाने, कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी अशा फसव्या आणि आत्मसंतोषी गोष्टींपासून दूर राहावे. या घातक ठरू शकतात. मुळात महागाई ही काही चांगली गोष्ट नाही. ती कमी व्हायलाच हवी. खूप मोठा विचार करायचा तर वाढत्या महागाईच्या अर्थव्यवस्थेचे हाल ग्रीससारखे होतील. पण माफक विचार केला तरीही, लोक काहीही बोलत नाहीत पण विचार करीत असतात आणि मतपेटीत व्यक्त होतात. आत्मसंतोषी वृत्ती प्रचार चांगला करू शकेल, पण निवडणुकीत तारणार नाही याचे भान असू द्यावे.

- श्रीपाद कोठे

३० जून २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा