रविवार, १९ जून, २०२२

ऐक्य आणि स्वातंत्र्य

ऐक्य आणि स्वातंत्र्य. दोन गोष्टी. व्यक्तीपासून विश्वापर्यंत त्याचे अनेक पदर, त्याच्या अनेक तऱ्हा नित्य पाहायला, अनुभवायला मिळतात. या दोन्हीसाठीचे प्रयत्न जगभरात असफल होतानाच बहुधा दिसतात. भारतदेखील त्याला अपवाद नाही. भाषा, भूषा, भूगोल, भय, भावना अशा विविध गोष्टींचा आधार घेऊन ऐक्य निर्माण करण्याचा किंवा स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न होतो आणि लवकर वा उशिरा अभेद्य खडकावर आपटून संपून जातो. का? कारण या दोन्ही बाबी `बाहेरच्या'पेक्षा `आतल्या'शी संबंधित असतात. ऐक्य वा स्वातंत्र्य आतून येते, यायला हवे आणि अनुभवताही यायला हवे. त्याचा बाह्य आविष्कार वेगळा राहील. पण बाहेरील आविष्कार पाहून किंवा बाहेरील लक्षणांच्या आधारे ऐक्य वा स्वातंत्र्य जोखायला गेल्यास फसगत अवश्य होते. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश वा अन्य अनेक प्रदेश यांना भारताचे अंग म्हणून काहीही वावगे वाटत नाही आणि जम्मू-काश्मीर वा गोरखाभूमी यांना तक्रार असते याची; किंवा घर सांभाळणारी स्त्री, शिकूनही पैसा न कमावणारी स्त्री स्वतंत्र नसते अशी भावना; यांची संगती लावताच येणार नाही. आत डोकावण्याचा प्रयत्न वाढायला हवा, एवढेच.

- श्रीपाद कोठे

२० जून २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा