बुधवार, २२ जून, २०२२

महाकाय बँका

आघाडीच्या सहा बँकांमध्ये २६ बँकांचे विलीनीकरण करून मोठ्या बँका करण्यात येणार आहेत. स्टेट बँकेच्या subsidiary चे अन महिला बँकेचे स्टेट बँकेत विलीनीकरण झालेही. कशासाठी? आंतरराष्ट्रीय मापदंड असल्यामुळे.

स्टेट बँकेपेक्षा कितीतरी महाकाय असलेल्या अमेरिकन बँका २००८ मध्ये कोसळल्याच ना? उलट लहान लहान बँका अन पतसंस्था असून, किंबहुना त्यामुळेच भारतीय अर्थव्यवस्था भक्कम राहिली.

किती दिवस आंतरराष्ट्रीयता, आधुनिकता, जागतिक मापदंड वगैरेचे ओझे वाहणार?

`वाढत्या किमती, वाढते पगार' यांचे अर्थशास्त्र हे अनर्थशास्त्र आहे. त्याच्या परिणामी inflation, stagnation, stagflation सगळे होऊन गेले आहे. आता भांबावलेली धावाधाव तेवढी सुरु आहे. प्रचलित अर्थशास्त्र, अर्थनीती, अर्थव्यवहार, अर्थरचना सगळ्यांना केराची टोपली दाखवण्याला पर्याय नाही. एका जागतिक अर्थक्रांतीची गरज आहे. त्याचे नेतृत्व भारताशिवाय कोणीही करू शकत नाही. भारत हे नेतृत्व करेल का? सध्या तरी तसे वाटत नाही.

- श्रीपाद कोठे

२३ जून २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा