बुधवार, २९ जून, २०२२

धर्म आणि यांत्रिकता

हेल भगिनींना १५ मार्च १८९४ रोजी डेट्रोईट येथून लिहिलेल्या पत्रात स्वामी विवेकानंद लिहितात,  `चिंतनासाठी, विशेषत: आध्यात्मिक चिंतनासाठी माणूस पूर्ण मोकळा असला पाहिजे. ही मोकळीक, ही स्वाधीनता आणि माणूस म्हणजे एक यंत्र नव्हे हा सिद्धांत, हाच समस्त धार्मिक विचारांचा पाया आहे. म्हणूनच धार्मिक चिंतन ठराविक यांत्रिक पद्धतीने करता येणे अशक्य आहे. यंत्राच्या पातळीवर सारे काही ओढून आणण्याच्या या प्रवृत्तीमुळे पाश्चात्यांची विलक्षण भरभराट झाली हे खरे, परंतु तिच्याचमुळे धर्म त्यांना दुरावला हेही तितकेच खरे. या प्रवृत्तीने धर्माला जणू हुसकावून लावले आहे आणि धर्माचा जो काही थोडाफार अंश उरला आहे त्यालाही पाश्चात्यांनी यांत्रिक कवायतीचे स्वरूप दिले आहे.’

- श्रीपाद कोठे

३० जून २०१५

धर्माच्या नावावर मंदिर मस्जिद पाडापाड करणे, डोकी फोडणे या पेक्षा यांत्रिक कवायत परवडली! (प्रमोद मुनघाटे)

गांधीवादाने वा बौद्ध तत्वज्ञानाने हिंसा थांबली? शांती आणली? मार्क्सवादाने कामगारांचे राज्य आणले? फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता, बंधुता आणली? आपल्या राज्यघटनेने तिला अपेक्षित ते घडवले?

१९५५ मध्ये ११ बुद्धिवंतांच्या सह्या असलेला रसेल- आईनस्टाईन जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. रसेल आणि आईनस्टाईन यांच्याही त्यावर सह्या होत्या. त्या जाहीरनाम्याने विज्ञानाने मानवजातीला निर्माण केलेल्या धोक्याबद्दल इशारा दिला होता आणि चिंता व्यक्त केली होती. काय झाले त्याचे?

वर उल्लेख केलेल्या विचार्धारांनी तसा प्रयत्न तरी केला. पण भारतातील धार्मिक कट्टरतेणे काय केले ? देशापुढे समस्या निर्माण केल्या. माथेफिरू राजकारण्यांनी धर्माचा आधार घेऊन आपली पोळी शेकून घेतली!

विज्ञानाच्या बळावरच श्रीपाद्जी तुम्ही इथे लिहू शकत आहात. सर्वसामान्य लोक शिकू शकत आहेत, अन्यथा काय झाले असते ? शिक्षण बंदिस्तच राहिले असते, वेद्शालामध्येच!

या विश्वाची उत्पत्ती, त्यातील मानव जातीचा विकास, या विकासात त्याला झालेला चांगल्या- वाईटाचा बोध, त्याला त्याच्या लघुतेतून वर उचलण्याचे प्रयत्न, त्या प्रयत्नांचे यश आणि मर्यादा.... असे अनेक विषय आहेत.

Pramod Munghate तुमची समस्या ही आहे की, तुम्हाला उजेड हवा किंवा अंधार हवा. मी फक्त एवढेच महंत असतो की, उजेड आणि अंधार दोन्ही मिळून दिवस आहे. उजेड पण खरा आणि आवश्यक आहे आणि अंधार पण खरा आणि आवश्यक आहे.

यापुढे मी कदाचित तुमच्याशी चर्चा करणार नाही. कारण मला चर्चेतून तत्वबोध झाला तर आवडतो, कंठशोष नाही आवडत आणि पटतही. आणि राजकारणाच्या किंचितही पलीकडे तुमची नजर जाऊ शकत नाही.

आम्हाला पहाट हवी आहे, श्रीपादजी!

ठीक आहे, जशी तुमची इच्छा! श्रींची इच्छा बलीयसी!!

एक मुद्दा फक्त अखेरचा म्हणून स्पष्ट करतो- हिंदू तत्वज्ञान जगातील सगळ्यात वाईट आहे हे मत बाळगायला काहीच हरकत नाही. पण केवळ भारतातील नव्हे तर संपूर्ण जगातील असंख्य लोक मूर्ख आहेत आणि काय समजते ते फक्त आम्हालाच हा दुराग्रह चुकीचा आहे.

बरे ठीक आहे, आपल्या आज्ञेनुसार आता चर्चा बंद! क्षमा असावी!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा