मंगळवार, ७ जून, २०२२

ए टी एम पिन

बंगळुरूच्या एका न्यायालयाने ए टी एम पिनच्या हस्तांतरणा संदर्भात दिलेला निर्णय, अमानवीय तर आहेच शिवाय भारतीय मूल्य, कुटुंब व्यवस्था, कुटुंब भावना यांना छेद देणारा आहे. कायदा, नियम, तंत्रज्ञान ही काही कारणे होऊ शकत नाहीत. कायदा, नियम, तंत्रज्ञान मानवी जगण्याला साहाय्य करणारे हवेत. तसे होत नसेल तर ते कायदे, नियम, तंत्रज्ञान सोडून द्यायलाच हवे. कायदे, नियम, तंत्रज्ञान मानवासाठी आहे, मानव त्याच्यासाठी नाही. कायदे, नियम, तंत्रज्ञान यांचे पालन हा काही आदर्श मानवाचा एकमेव निकष होऊच शकत नाही. विचारांना तिलांजली देणारे कायदे, नियम, तंत्रज्ञान कचरापेटीतच जायला हवेत.

- श्रीपाद कोठे

८ जून २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा