बुधवार, १ जून, २०२२

शेतकरी

शेतकरी संपाची सध्या चर्चा आहे. त्यावर विविध अंगाने चर्चाही होईल. शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या पाहिजेत यावर वाद होण्याचे कारणच नाही. शेतकऱ्यांचे जीवनमान चांगले व्हायला हवेच. तसे न वाटणे ही कृतघ्नताच. पण मुख्य मुद्दा आहे- हे होईल कसे? काही तात्पुरते उपाय करता येतील अन करायलाही हवेत. पण हे एक कधीही न संपणारे दुष्टचक्र आहे. हे भेदले नाही तर कायम असेच सुरु राहील. अन हे भेदण्याचा उपाय आहे - सतत पैसा वाढत नेणारी अर्थव्यवस्था आणि आधुनिक जीवन पद्धती आमूलाग्र बदलणे. त्याशिवाय पर्याय नाही. केवळ जोडतोड, व्यवस्थापन किंवा करुणा याने काहीही साध्य होणार नाही.

- श्रीपाद कोठे

२ जून २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा