रविवार, १९ जून, २०२२

दीदींचं गाणं

हे कोणाला आवडणार नाही, कोणाला पटणार नाही. पण आजकाल मला अनेकदा लता दीदींचं गाणं नाही आवडत. असं वाटतं की विनाकारण वरवरच्या पट्ट्या गाठण्याचा हव्यास तर नाही हा. त्यांचं गाणं, आवाज, त्याचा पल्ला, गोडवा याबद्दल वादच नाही. पण अकारण किंचाळल्यासारखं वाटतं. तुकारामांच्या अभंगात तर खूपच जाणवतं. वृक्षवल्ली अम्हा सोयरी किंवा सुंदर ते ध्यान वगैरे अधिक कोमलपणे हवं. कर्कश वाटतं ते. अगदी प्रेमाची गाणी सुद्धा जरा कान चिरतात असं वाटतं. त्या ऐवजी थोडी गोलाई असती तर बरं, असंही वाटून जातं.

- श्रीपाद कोठे

२० जून २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा