गुरुवार, ९ जून, २०२२

जात

'जात' हा शब्द जरी उच्चारला तरी आग लागते असा आजचा काळ आहे. पण कुठेतरी हे थांबायला पाहिजे. एवढेच नाही तर त्यावर शांतपणे विचार व्हायला पाहिजे. पुष्कळ मुद्दे असू शकतात. त्यातला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जात व्यवस्थेने आर्थिक सुरक्षा प्रदान केली होती आणि आर्थिक अराजक टाळले होते.  यावर फार लिहिणार नाही. फक्त विचारासाठी विषय समोर ठेवला आहे. अर्थात जात व्यवस्था पुन्हा यावी असा याचा अर्थ नाही. ती येऊही शकत नाही. एवढेच नाही तर ज्या ब्राह्मणांनी जात व्यवस्था आपल्या स्वार्थासाठी तयार केली अन राबवली असा कंठशोष केला जातो, ते ब्राम्हण सुद्धा आता जात व्यवस्था मान्य करणार नाहीत.  का मान्य करणार नाहीत हा एक स्वतंत्र विषय आहे. शिवाय उच्चनीच, लहानमोठा हे भाव; परस्पर द्वेष, कलह; अथवा जात पंचायत सारखे प्रकार; या गोष्टी चुकीच्याच आहेत. असमर्थनीय आहेत. परंतु हेही तेवढेच खरे की, जात व्यवस्थेमागील मूलभूत चिंतन समजून घेणे आवश्यक आणि उपयोगी आहे. मनात भीती बाळगून आणि कोण काय म्हणेल, समाज काय म्हणेल याची भिड बाळगून विचार करणे योग्य नाही. विचारकांनी भीती आणि भिड न बाळगता विचार केला पाहिजे अन मांडला पाहिजे.

- श्रीपाद कोठे

१० जून २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा